Monday, December 22, 2025
Home Blog Page 598

Indian Railway : रेल्वेने नियम केले कडक ! वेटिंग तिकिटाबद्दल मोठी अपडेट आली समोर

Indian Railway : भारतीय लोक रेल्वेने प्रवास करणे अधिक पसंत करतात. त्यामुळे बहुतांश रेल्वेला मोठी गर्दी पहायला मिळते. अशावेळेला आरक्षित केलेल्या डब्ब्यांमध्ये देखील इतर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. मात्र लवकरच रेल्वेकडून नियम कडक केले जाणार असून त्यामुळे घुसखोरांना आळा बसणार असून रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.

भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांच्या सोयीशी संबंधित नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका लाखो रेल्वे प्रवाशांना बसणार आहे. 1 जुलैपासून वेटिंग तिकिटांवर प्रवास करण्याबाबत रेल्वेने कठोर निर्णय घेतल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. आता कोणत्याही प्रवाशाने नियम मोडल्यास त्याच्यावर केवळ दंडच होणार नाही तर टीटी त्याला मध्यभागी खाली उतरवेल, असे रेल्वेने म्हटले आहे. यासाठी ट्रेनमध्ये तिकीट तपासणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही कडक आदेश देण्यात येणार आहेत.

वेटिंग तिकिटांवर आरक्षण डब्यातून प्रवासाला बंदी

रेल्वेने आता वेटिंग तिकिटांवर आरक्षण डब्यातून प्रवास करण्यास पूर्णपणे बंदी घातली असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे तुमचे तिकीट वेटींग असेल तर तुम्ही एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करू शकत नाही. जरी तुम्ही स्टेशन खिडकीतून तिकीट ऑफलाइन खरेदी केले असेल तरी. आता या प्रकारच्या तिकिटावरही रेल्वेने आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास बंदी (Indian Railway) घातली आहे. आरक्षित डब्यांमध्ये कन्फर्म तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय लागू करण्यात आला असला, तरी वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. मात्र, याबाबत रेल्वेकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

काय सांगतो नियम ? (Indian Railway)

भारतीय रेल्वेचा नियम आहे की जर एखाद्या प्रवाशाने स्टेशनच्या खिडकीतून वेटिंग तिकीट घेतले असेल तर तो आरक्षित डब्यातूनही प्रवास करू शकतो.
जर एखाद्याकडे एसीचे वेटिंग तिकीट असेल तर तो एसीमध्ये प्रवास करू शकतो आणि जर त्याच्याकडे स्लीपर तिकीट असेल तर तो वेटिंग तिकिटावर स्लीपर डब्यात प्रवास करू शकतो. तथापि, ऑनलाइन खरेदी केलेल्या तिकिटांवर (Indian Railway) आगाऊ प्रवास करण्यावर निर्बंध आहे, कारण ऑनलाइन तिकीट वेटिंग सोडल्यास आपोआप रद्द होतात.

काय आहे रेल्वेचे म्हणणे ? (Indian Railway)

वेटिंग तिकिटावर प्रवास करण्यावर बंदी ब्रिटिश काळापासून लागू नसून त्याचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रेल्वेचा स्पष्ट नियम आहे की जर तुम्ही खिडकीतून तिकिट खरेदी केले असेल आणि ते वेटिंगमध्ये (Indian Railway) राहिले तर ते रद्द करा आणि पैसे परत मिळवा. असे करण्याऐवजी प्रवासी डब्यात चढून प्रवास करतात. परंतु, प्रवाशांच्या सोयीचा विचार करून सध्या फारसे कडकपणा आणला जात नाही.

AIATSL Vacancy 2024 | मुंबई AIATSL अंतर्गत मोठी भरती सुरु, अशाप्रकारे करा अर्ज

AIATSL Vacancy 2024

AIATSL Vacancy 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. नेहमीच आम्ही तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इयर इंडिया इयर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL Vacancy 2024) अंतर्गत विविध पदांसाठी सध्या भरती निघालेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. ही भरती तब्बल 1049 पदांसाठी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा.

पदाचे नाव | AIATSL Vacancy 2024

ही भरती ग्राहक सेवा कार्यकारी वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी या पदांसाठी होणार आहे.

एकूण रिक्त जागा

या भरती अंतर्गत एकूण 1049 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | AIATSL Vacancy 2024

या भरतीचा अर्ज करताना तुम्हाला 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Indian Railway : ट्रेनचे तिकीट 2 मिनिटांत होईल कन्फर्म ; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Indian Railway : आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यामुळे बहुतांश लोक हे परवडणारा आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. परंतु अनेकदा जर तुमचे प्लान काही अचानक ठरले असतील तर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी प्रॉब्लेम होतो. विशेषतः सुट्टीच्या हंगामामध्ये वेटिंगवर अनेक प्रवासी असतात. मात्र रेल्वे कडून अशा प्रवासांसाठी खास सोय करण्यात आली असून अगदी काही साध्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळू शकतं. त्यामुळे तुमचे प्लानिंग (Indian Railway) मात्र खराब होणार नाही हे नक्की. चला तर मग पाहूया हे रेल्वेचे कन्फर्म तिकीट कसं मिळवायचं

भारतीय रेल्वेकडून आयत्यावेळी हमखास प्रवासासाठी तात्काळ तिकीटची सुविधा दिली जाते. या सुविधेनुसार आपला प्रवास आदल्या दिवशी तात्काळ कोटातून तिकीट काढून हमखास कन्फर्म तिकीट काढू शकतो. हे तात्काळ तिकीट कसं काढायचं? या तात्काळ (Indian Railway) तिकीट बुकिंग ची ठराविक वेळ दिलेली असते त्याच वेळेत हे तिकीट काढावे लागते.

  • सर्वात आधी तिकीट बुकिंग साठी तुम्हाला आय आरसीटीसी ची वेबसाईट (Indian Railway) उघडायची आहे.
  • त्यानंतर होमपेज च्या बाजूला उजव्या कोपऱ्यात मेनूचा पर्याय दिसेल इथे तुम्ही लॉगिन करून घ्या.
  • त्यानंतर तिकीट बुक वर क्लिक करा
  • त्यानंतर फॉर्ममध्ये तुम्ही प्रवास सुरू करणाऱ्या बोर्डिंग स्टेशनचं नाव टाका त्यानंतर तुमच्या डेस्टिनेशन च नाव TO या कॅटेगरीच्या मध्ये टाका.
  • त्यानंतर Tatkal पर्यायाला सिलेक्ट करा. हा बाय डिफॉल्ट General वर सेट असतो.
  • त्यानंतर प्रवासाची तारीख टाका, डिटेल्स टाकल्यानंतर (Indian Railway) सर्चवर क्लिक करा.
  • त्यानंतर त्या मार्गाने जाणाऱ्या अनेक ट्रेनची नावे दिसतील
  • त्यानंतर तुम्हाला ज्या ट्रेनमध्ये ज्या श्रेणीची तिकीट काढायची त्यावर क्लिक करुन बुक नाऊवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला प्रवाशाची वैयक्तिक माहिती टाकावी लागेल.
  • तात्काळ तिकीट काढताना वेग दाखविणे गरजेचे आहे. जर तुम्ही मास्टर लिस्ट (Indian Railway) आधी तयार करुन ठेवली असेल तर तुम्हाला तपशिल भरायला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही एका क्लिकवरच पॅसेंजर समाविष्ट करु शकता.
  • त्यानंतर इतर तपशील भरावा, कॅप्चा टाकावा, मोबाईल नंबर टाकावा, त्यानंतर तुम्हाला (Indian Railway) पेमेंट करण्यासाठी सांगितले जाईल, त्यानंतर तुम्ही पेमेंट करावे. त्यानंतर तुमचे तात्काळ तिकीट बुक होईल.

Maharashtra Government | महाराष्ट्रातील महिलांसाठी नोकरीची संधी, ‘या’ पदासाठी निघाल्या तब्बल 14,690 जागा

Maharashtra Government

Maharashtra Government | महाराष्ट्र सरकार हे महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत असतात. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना, आता सरकार महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणत आहेत. महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Maharashtra Government) सध्या राज्यभर चर्चा चालू आहे. अशातच आता महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची एक सुवर्णसंधी दिलेली आहे.

आदित्य तटकरे यांनी अंगणवाडी मदतनीस यांच्या भरतीची एक मोठी घोषणा जाहीर केलेली आहे. या भरतीच्या अर्ज करण्याची प्रक्रिया देखील चालू झालेली आहे. 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदर लवकरात लवकर अर्ज करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीस यांची तब्बल 14690 रिक्त पदे आहेत. ती रक्त पदे भरण्यासाठी आता अधिसूचना निघालेली आहे. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी अर्ज करावा असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

नुकतेच काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी (Maharashtra Government) लाडकी बहिनी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे राज्य सरकारकडून थेट महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. परंतु ज्या महिलांचे बँकेमध्ये खाते नाही त्यांना अडचणी येत आहे. त्यामुळे ज्या महिलांची बँकेमध्ये खाती नाही. त्यांना खाती खोलून देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, असे देखील सांगण्यात आलेले आहे.

चंद्रावर सापडली गुहा!! एलिअन्सचे अस्तित्व की आणखी काही??

Moon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपले अवकाश खूप मोठे आहे. अवकाशात नक्की काय घडते ? कोणत्या गोष्टी असतात? या सगळ्याची माहिती जाणून घेण्यासाठी सगळेच लोक उत्सुक असतात. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अनेक शोध लावलेले आहे. परंतु अनेक गोष्टींचा त्यांना शोध लागलेला नाही.परंतु अशातच आता एक आवाक करणाऱ्या रहस्याची उकल करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले आहे. चंद्रावर असणारी माती तेथील ध्रुव आणि जीवसृष्टी या संदर्भात आता आणखी एक गोष्ट समोर आलेली आहे. आणि त्याबाबत अनेक दावे देखील केले जात आहे.

शास्त्रज्ञांना चंद्रावर एक गुहा सापडलेली आहे. या गुहेचा शोध लागल्यापासून आता वेगवेगळे अंदाज लावले जात आहे. काही वर्षांमध्ये माणूस चंद्रावर सहज राहू शकतो. अशी देखील अशा व्यक्त केली जात आहे. बीबीसीने नासाच्या अहवालातून काही फोटो शेअर केलेले आहेत. ही गुहा साधारण 100 मीटर एवढी खोल आहे. त्यामुळे मानवाला सहज तिथे राहता येऊ शकते. अशाप्रकारे शेकडो गुहा चंद्रावर असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

गुहा कुठे आढळली ?

अपोलो ११ ज्या ठिकाणी लँड झाले होते. त्या ठिकाणाच्या अगदी जवळपास ही गुहा सापडलेली आहे. अपोलो 11 हे एक अंतराळ यान आहे 55 वर्षांपूर्वी चंद्रावर यशस्वी लँडिंग करत नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. याच ठिकाणापासून साधारण काही अंतरावर ही गुहा सापडलेली आहे.

चंद्रावर सापडलेल्या या गुहेची तुलना संशोधकांनी पृथ्वीवर ज्वालामुखीच्या उद्रेकातून ज्या नैसर्गिकरित्या भुयारे तयार झालेली आहेत. त्याच्याशी तुलना केलेली आहे. एकीकडे या गुहेसंदर्भात चर्चा चालू आहे, तर दुसरीकडे अशी देखील माहिती समोर येत आहे की, अंतराळावीरांना चंद्रावरून काही विचित्र शीळ वाजल्यासारखे आवाज आलेले आहे. ओपोलो 10 मोहिमेदरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगितले गेलेले आहे. तर नेमका हा आवाज कशाचा आहे? त्या ठिकाणी एलियन्सचा वावर तर नाही ना? अशा वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज देखील व्यक्त केले जात आहेत.

मोठी बातमी!! शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं

shahu chhatrapati vishalgad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. कोल्हापुरचे खासदार आणि छत्रपती शाहू महाराज याना (Chhatrapati Shahu Maharaj) विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे. रविवारी विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला हिंसक वळण लागलं होते. जमावानं विशाळगडावर दगडफेक आणि जाळपोळ केली. यात अनेक घरे, वाहनांचे नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर आज शाहू महाराज विशाळगडाच्या पाहणीसाठी निघाले होते मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं आहे. पत्रकारांना सुद्धा त्याठिकाणी पोलिसांकडून रोखण्यात आले. यावेळी पोलीस आणि पत्रकाराच्या बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे.

विशाळगडावरील हिंसाचारानंतर खासदार शाहू छत्रपती यांनी काल विशाळगडाची पाहणी करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणं शाहू महाराज विशाळगडाच्या परिसराची करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पांढरेपाणी येथे रोखलं. शाहू महाराज यांच्यासोबत काँग्रेस आमदार सतेज पाटील हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. मात्र जमावबंदीचे कारण सांगून पोलिसांनी शाहू महाराजांना गडावरून जाण्यापासून रोखलं. यानंतर शाहू महाराजांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिक पत्रकाराना सुद्धा रोखण्यात आल्यानंतर पोलीस आणि पत्रकार यांच्यातही खडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली ज्यांची घरं पेटवली,वाहनांचं नुकसान झालं त्याची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्यांना रोखताय. ज्यांनी नुकसान केलं त्यांना काहीच करत नाही, असं सतेज पाटील म्हणाले. आम्ही शांतता प्रस्थापित करायला जात आहोत. शिधा आणला आहे, आम्हाला केवळ 15 लोकांना तिथं जाऊद्यात, असं सतेज पाटील म्हणाले. 15 लोकांना सोडायची लोकशाहीत परवानगी नाही का असा सवाल सुद्धा सतेज पाटलांनी पोलिसांना केला.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहू महाराजांना विशाळगडकडे जाण्यापासून अडवणूक केली जाते ही दुर्दैवाची बाब आहे, असं म्हटलं. ज्या शाहूंनी देशाला समता शिकवली त्यांच्या वारसाला अडवलं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांना अडवायला पाहिजे होत त्यांना अडवलं नाही. हा सरकारचा प्लॅन आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Kitchen Tips : मिक्स करा केवळ एक पदार्थ आणि इडल्या होतील मऊ, लुसलुशीत, यम्मी…!

Kitchen Tips : रोजच्या नाश्त्याला इडली,डोसे, आंबोळी असे साऊथ इंडियन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही ? हे पदार्थ संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे नाश्त्याला आवर्जून इडली बनवली जाते. शिवाय आंबवलेल्या पीठात बरेच प्रो बायोटिक्स असतात जे पोटासाठी आणि आतड्यांसाठी चांगले असतात. म्हणून इडली खाण्याचा सल्ला (Kitchen Tips) देतात. मात्र तुम्ही घराच्या घरी इडली बनवत असाल तर इडली बऱ्याचदा फसते. कधी कधी ती हवी तशी सॉफ्ट होत नाही. कारण इडलीचे मिश्रण नीट फर्मेंट होत नाही.

तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर काळजी करू नका केवळ एक छोटीशी टीप आणि तुमच्या इडल्या होतील मऊ उसलुशित घरची मंडळी तुमच्या इडलीचे तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत . चला तर मग जाणून घेऊया इडलीची (Kitchen Tips) खास रेसिपी…

साहित्य (Kitchen Tips)

तांदूळ, उडीद डाळ, पाणी, मीठ, मेथी दाणे , शिजवलेला भात

कृती (Kitchen Tips)

ही कृती करताना सर्वात आधी तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. आता हे दोन्ही स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे दोन-तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या. म्हणजे इडली ही पांढरी शुभ्र होते. आता तुम्हाला उद्या सकाळी नाश्त्याला इडली (Kitchen Tips) हवी असेल तर आदल्या दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान तुम्ही हे तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घालू शकता.

याबरोबरच एक छोटा चमचा मेथी दाणे सुद्धा घाला म्हणजे फर्मेंटेशन ची प्रोसेस चांगल्या प्रकारे होते. आता रात्री झोपताना तुम्हाला हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. तांदूळ आणि डाळ साधारण ८ तास भिजायला हवेत. आता. वाटत असताना त्यामध्ये शिजलेला भात थोडा घाला त्यामुळे इडल्यास सॉफ्ट होतील. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फर्मेंटेशन ची प्रोसेस कधी कधी वेळानं होते त्यामुळे मीठ घालत असताना (Kitchen Tips) ऋतूनुसार घालावे. म्हणजे पावसाळा असल्यास मीठ हे मिश्रण वाटतानाच घाला आणि जर उन्हाळा असेल तर मीठ दुसऱ्या दिवशी घाला म्हणजे फर्मेंटेशन मुळे पीठ जास्त आंबट होणार नाही.

Gold Price Today : सोने- चांदीचा भाव वाढला! आजचे दर इथे चेक करा

Gold Price Today 16 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफा बाजारात आज १६ जुलै २०२४ रोजी सोन्या चांदीच्या किमतीत (Gold Price Today) किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे, त्यामुळे आधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज २४ कॅरेट १० ग्राम सोने 73475 रुपयांवर व्यवहार करत असून कालच्या तुलनेत या किमती 164 रुपयांनी वधारल्या आहेत. तर दुसरीकडे चांदीचा दर 92848 रुपये असून या किमतीत 311 रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव ७३४५५ रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमती (Gold Price Today) खाली गेल्या. १० वाजता सोन्याच्या भावाने ७३३८९ रुपयांच्या निच्चांकी पातळीवर गेला. मात्र यानंतर सोन्याच्या किमतींनी चांगलीच उभारी घेतली. ११ वाजता सोन्याचा भाव ७३५०० रुपयांवर गेला. त्यानंतर या किमतीत थोडी घसरण पाहायला मिळून सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोने 73475 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमती थोड्याफार प्रमाणात वाढल्याने सोने खरेदीदार ग्राहकांसाठी हि आनंदाची गोष्ट आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 67,850 रुपये
मुंबई – 67,850 रुपये
नागपूर – 67,850 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 74,020 रूपये
मुंबई – 74,020 रूपये
नागपूर – 74,020 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Dengue Vaccine | भारत लवकरच होणार डेंग्यूमुक्त; स्वदेशी लसीची 10 हजार लोकांवर होणार चाचणी

Dengue Vaccine

Dengue Vaccine | पावसाळा सुरू झाला की, पावसासोबत अनेक आजार देखील येतात. पावसाळ्यात सहसा डेंगूच्या डासांची संख्या वाढते. आणि अनेक लोकांना डेंगूची (Dengue Vaccine) लागण होते. डेंगूचा ताप झाल्यावर वेळेवर उपचार घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा अनेक लोकांचा यात मृत्यू देखील होतो. सध्या डासांपासून डेंगूची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि यावर आळा घालण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. लोकांमध्ये जनजागृती करणे, त्याचप्रमाणे औषधाची फवारणी करणे. यांसारख्या गोष्टी आरोग्य विभाग करत आहे. अशातच आता डेंगूला रोखण्यासाठी (Dengue Vaccine) लस देखील तयार करण्यात आलेली आहे. आणि याची चाचणी सुमारे 10335 नागरिकांवर देखील करण्यात येणार आहेत.

शास्त्रज्ञांनी डेंगीऑल नावाची एक लस (Dengue Vaccine) तयार केलेली आहे. या लसीची चाचणी 18 ते 60 वर्षांच्या लोकांवर केली जाणार आहे. पॅनिसिया या बायोटेकने अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या मदतीने ही लस तयार केलेली आहे. या लसीची देशभरात 19 ठिकाणी चाचणी घेण्यात येणार आहे.

अमेरिकन संस्थेसोबत करार करून ही एक स्वदेशी लस (Dengue Vaccine) तयार करण्यात आलेली आहे. काही घटक वगळता या लसीची विषाणू रचना ही NIH प्रमाणेच आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या लसीचा निकाल चांगला आलेला आहे. डेंगूच्या चार प्रकारच्या विषाणूंवर ही स्वतः प्रभावी ठरणार आहे. या एकाच लसीमध्ये चारही विषाणूंची संरचना उपलब्ध असणार आहे. त्यातून विषाणूजन्य जनकांचे काही भाग हे काढून टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही लस घेतल्याने स्वतःहून डेंगू होणार नाही. याची काळजी देखील घेण्यात आलेली आहे. अशाप्रकारे आता आपला भारत हा डेंगूमुक्त होणार आहे. ही लस एकदा नागरिकांना देण्यात आली की, याचे चांगले परिणाम दिसायला लागणार आहेत.

Cleaning Hacks : पावसाळयात हमखास येते भिंतींवर बुरशी ; वापरून पहा सोप्या टिप्स

Cleaning Hacks : आपल्यापैकी अनेकांना पावसाळा हा ऋतू हवाहवासा वाटत असेल पावसाळ्यातलं आल्हाददायक वातावरण , सर्वत्र हिरवळ , गरमागरम भजी चहा, कणीस खाण्याचा आनंद कुणाला नाही आवडत… पण पावसाळ्यासोबत अनेक आजार येतात आणि दमट हवामानामुळे भिंतींवर बुरशी, शेवाळ अशा काही नकोशा गोष्टी सुद्धा पावसाळ्यात येत असतात. भिंतींच्या ओलाव्यामुळे पावसाळयात भिंतींवर येणारी बुरशी ही आरोग्यासाठी घातक तर असतेच शिवाय त्यामुळे भिंती देखील वाईट दिसायला लागतात. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला काही घरगुती (Cleaning Hacks) टिप्स सांगणार आहोत जेणेकरून घरातील वातावरणही फ्रेश राहील आणि भिंतींवरील बुरशी सुद्धा निघून जाईल.

घरामध्ये भिंतींवर बुरशी अली असेल तर त्याच्या जवळ वस्तू ठेवणे किंवा जाणे टाळा कारण अनेकांना (Cleaning Hacks) बुरशीची ऍलर्जी सुद्धा असू शकते. त्यामुळे शिंका येणे किंवा लहान मुलांच्या तवचेवर रॅश येणे असे प्रकारही घडू शकतात.

एक गोष्ट लक्षात ठेवा बुरशी म्हणजेच फंगस खरंतर पावसाळ्यामध्ये ओलावा निर्माण झाल्यामुळे होत असतात. कारण पावसाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश नसतो. हवेतील आद्रतेमुळे घरातील वस्तू, भिंती ह्या ओलसर होतात अशा स्थितीमध्ये हवा खेळती राहणं गरजेचं असतं. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर खिडक्या उघड्या ठेवा सूर्यप्रकाशामुळे फंगस आणि बॅक्टेरिया नष्ट होतात. शिवाय या दिवसांमध्ये (Cleaning Hacks) भिंतीला चिटकून कोणतीही वस्तू ठेवू नका कारण बुरशी प्रथम भिंतीवर तयार होते.

एक्झॉस्ट फॅन (Cleaning Hacks)

घरातील किचन, बाथरूममध्ये बऱ्याच अंशी हवा खेळती राहण्यासाठी एक्झॉस्ट फॅन बसवलेले आढळतात. त्यामुळे घरामध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते. घरातील एसी किंवा बेसिनच्या पाईपला गळती होत असेल तर तातडीने या गोष्टी दुरुस्त करून घ्या. खराब होऊ नये म्हणून मसाले आणि धान्य वेळीच सूर्यप्रकाशात ठेवा त्यामुळे घरात कुबट वास पसरणार नाही

विनेगर

व्हिनेगर हे एक प्रकारचे आम्ल आहे. घरामध्ये बुरशीची वाढ होत असेल तर त्या ठिकाणी व्हिनेगर फवारा यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये विनेगर भरा, स्प्रे करा स्प्रे केल्यानंतर स्क्रब करा. वीस मिनिटं तसंच राहू द्या त्यानंतर ओल्या कपड्याने (Cleaning Hacks) पुसून घ्या. त्यामुळे भिंतीवरची बुरशी निघून जाईल.

बेकिंग सोडा (Cleaning Hacks)

जर तुमच्या घरामध्ये विनेगर नसेल तर बेकिंग सोडा हा असतोच. आपण बेकिंग सोड्याचा वापर करून भिंतीवरची बुरशी घालवू शकतो. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये बेकिंग सोडा आणि पाणी घालून मिश्रण तयार करा. तयार स्प्रे भिंतीवर शिंपडा. स्क्रबरने भिंत घासून घ्या. ओल्या कापडाने भिंत पुसून घ्या. यामुळे भिंतीवरचे डागही निघून जायला मदत होईल.