Saturday, December 6, 2025
Home Blog Page 6

Pune Petrol Pump : संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद राहणार? काय आहे कारण

Pune Petrol Pump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Petrol Pump । पुण्यातून एक महत्वाची बातमी समोर येतेय. पुण्यातील पेट्रोल पंप संध्याकाळी ७ नंतर बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे पेट्रोल पंपांवर कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. याचा फटका पुणेकरांना बसणार आहे. रविवारी रात्री भैरोबा नाल्यात इंडियन ऑइल पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर काही लोकांनी हल्ला केल्यानंतर पेट्रोल डीलर्स असोसिएशन आक्रमक झाली आहे. यापूर्वी, येरवडा येथील इंडियन ऑइल कंपनी (आयओसी) पेट्रोल पंपावरही अशीच घटना घडली होती.

कर्मचाऱ्यांमध्ये भीती- Pune Petrol Pump

पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दोन्ही हल्ल्यांचा निषेध केला आहे . तसेच त्यांनी हे प्रकरण पुणे शहराच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे. शिवाय पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. रात्री उशिरा वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे पुणे पेट्रोल पंपांवर (Pune Petrol Pump) रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

आमचे परिचारक हे फक्त कामगार नाहीत, तर ते शहराला दररोज इंधन (Pune Petrol Pump) पुरवठा करणारे आघाडीचे सेवा प्रदाते आहेत. त्यांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि कल्याण या बाबींवर तडजोड करता येणार नाही. त्यांच्यावर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला एकत्रित आणि निर्णायक कारवाई केली जाईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी म्हंटल. जर योग्य कारवाई केली नाही आणि गुंडांना आळा घातला नाही तर आम्ही पेट्रोल पंप संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू ठेवू. त्यानंतर एक थेंबही पेट्रोल मिळणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

Sheikh Hasina Verdict : शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; जगाचे लक्ष्य आता भारताकडे

Sheikh Hasina Verdict

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sheikh Hasina Verdict । आंतरराष्ट्रीय पटलावरून एक मोठी घडामोड समोर येत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण कोर्टाने ही फाशीची शिक्षा सुनावली. 2024 साली बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता. याच हिंसाचारात शेकडो बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला. बांगलादेशी नागरिकांनी शेख हसिना यांचे सरकार उलथवून लावले होते. याच प्रकरणात शेख हसीना यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.

काय आरोप होते ? Sheikh Hasina Verdict

खरं तर या हिंसक आंदोलनामध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर ठेवण्यात आले होते. मात्र, शेख हसीना यांच्याकडून हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावण्यात आले होते. जुलै- ऑगस्ट 2024 मध्ये बांग्लादेशात मोठा हिंसाचार माजला होता. आंदोलकांनी बांगलादेशची संसद, पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी शेख हसिना यांनी लष्कर, पोलिसांना कारवाईचा आदेश दिला होता. हसीना यांच्या या आदेशामुळे बांगलादेश मधील हिंसाचार आणखी वाढला. या काळात महिला आणि मुलांसह १,४०० लोक मारले गेले आणि सुमारे २५,००० लोक जखमी झाल्याचा आरोप होता. या खटल्यात त्यांना दोषी ठरवत बांगलादेशमधील ICT न्यायालयाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. Sheikh Hasina Verdict

जगाचे लक्ष्य भारताकडे –

शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने आता संपूर्ण जगाचे लक्ष्य भारताकडे आहे. यामागचं कारण म्हणजे शेख हसिना या भारतातच आश्रयाला आहेत. क्राईम ट्रिब्यूनलच्या आदेशानुसार शेख हसिना यांना फाशी द्यायची असेल तर त्यांना अगोदर बांगलादेशात घेऊन जावं लागेल. त्यासाठी भारतातून त्यांचे बांगलादेशात प्रत्यार्पण करावे लागेल. अशावेळी भारत नेमकी काय भूमिका घेतो? कि ICT न्यायालयाचा आदेश पाळून शेख हसीना यांचे पुन्हा बांग्लादेशात परत पाठवतो ते बघावं लागेल.

Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी राज ठाकरेंची खास पोस्ट; कोणाचे कान टोचले??

Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray । हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १३ वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे स्मृतिस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे देखील बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले आणि आदरांजली वाहिली. यापूर्वी राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत बाळासाहेब ठाकरेंबद्दल यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले राज ठाकरे? Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray

शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.

पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही ! Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray

फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन !

संजय राऊतही प्रोटोकॉल तोडून शिवाजी पार्कवर

दरम्यान, आज शिवसेनेची बुलंद तोफ, खासदार आणि मातोश्रीचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत हे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर दाखल झाले. खरं तर संजय राऊत मागील काही दिवसापासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. तरीही ते आज बाळासाहेब ठाकरेंसाठी शिवाजी पार्कवर आले. संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनील राऊत सुद्धा होते. संजय राऊत यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्यांचं शरीर थकलेलं वाटत होत. मात्र तरीही त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क गाठलं. हा क्षण शिवसैनिकांसाठी अतिशय भावनिक असा क्षण होता.

Sanjay Raut : गंभीर आजार, थकलेलं शरीर…; संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दाखल

Sanjay Raut Shivaji Park

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sanjay Raut हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १३ वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे स्मृतिस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत. त्यातच आज शिवसेनेची बुलंद तोफ, खासदार आणि मातोश्रीचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत हे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर दाखल झाले. खरं तर संजय राऊत मागील काही दिवसापासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. तरीही ते आज बाळासाहेब ठाकरेंसाठी शिवाजी पार्कवर आले. संजय राऊतांना पाहून शिवसैनिक अक्षरशः भारावून गेला, भावुक झाला.

संजय राऊतांना गंभीर आजार –

खरं तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करत माहिती दिली होती कि ते एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. डॉक्टरांनी त्यांना काही महिने लोकांच्यात न मिसळण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक दिवसापासून त्यांची रोजची पत्रकार परिषद सुद्धा बंद आहे. मात्र आज बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेमापोटी संजय राऊत यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट दिली आणि अभिवादन केलं. संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनील राऊत सुद्धा होते. संजय राऊत यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्यांचं शरीर थकलेलं वाटत होत. मात्र तरीही त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क गाठलं. हा क्षण शिवसैनिकांसाठी अतिशय भावनिक असा क्षण होता.

संजय राऊत म्हणजे शिवसेना खरा आवाज Sanjay Raut

दरम्यान संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून समजले जातात. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसवण्यात संजय राऊत यांचाच सिंहाचा वाटा होता. शिवसेनेची अधिकृत भूमिका तर ते मांडतातच, याशिवाय विरोधकांना ते आपल्या कठोर वाणीने आणि लेखणीने घायाळ करतात. २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर संजय राऊत शिंदे गट आणि भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेत होते. देवेंद्र फडणवीस असो वा पंतप्रधान नरेंद्र मोदी … संजय राऊतांची तोफ रोज सकाळी धडाडताना उभा महाराष्ट्र पाहत असतो. संजय राऊत हे मधल्या काळात तुरुंगातही जाऊन आले मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. आजही ते शिवसेनेचा आवाज म्हणून ओळखले जातात. संजय राऊत जे काही बोलतात ती शिवसेनेची अधिकृत भूमिका असते असं मानलं जातं. मात्र आज हेच संजय राऊत एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याने शिवसैनिक चिंतेत आहे. राऊत लवकरात लवकर बरं होवो अशा प्रार्थना शिवसैनिकांकडून केल्या जात आहेत.

Mumbai To Alibaugh : मुंबई ते अलिबाग फक्त 10 मिनिटांत; उभारला जातोय नवा सागरी मार्ग

Mumbai To Alibaugh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai To Alibaugh मुंबईवरून अलिबागला अवघ्या १० मिनिटात पोचणार असं जर तुम्हाला कोणी म्हंटल, तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. परंतु आता हे खरंच शक्य होणार आहे. कारण मुंबई- अलिबाग प्रवास अतिशय जलद आणि सुलभ करण्यासाठी एक नवा सागरी सेतू उभारला जाणार आहे. सध्या मुंबईवरून अलिबागला जायचं म्हंटल कि २ तासांहून अधिक वेळ लागतोय. मात्र एकदा का हा सागरी मार्ग सुरु झाला कि मग तुम्ही फक्त १० मिनिटात मुंबईवरून अलिबागला जाऊ शकाल.

कुठे उभारला जातोय सागरी सेतू? Mumbai To Alibaugh

खरं तर मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चरची कामे जोरात सुरु आहेत. अनेक जिल्ह्यात नवनवीन रस्ते, पूल, उड्डाणपुलाचे काम दणक्यात सुरु आहे. लोकांचा प्रवास सोप्पा, आरामदायी आणि महत्वाचं म्हणजे कमी वेळेत व्हावा हाच यामागील मुख्य उद्देश आहे. मागील २ वर्षांपूर्वी मुंबईत अटल सेतूचे उदघाटन झालं होत. आता आणखी एक नवा सागरी सेतू मुंबईकरांना मिळणार आहे जो थेट अलिबागला जोडला जाईल. धरमतरजवळील खाडीवर रेवस- करंजा पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे, ज्यामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास सोपा होणार आहे.

रेवस- करंजा पुल हा 2.04 किमी लांबीचा पूल असेल. पुढील तीन वर्षांत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सुरुवातीला एमएसआरडीसीने 2,079 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सादर केला होता. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार त्याची किंमत 42.56 टक्क्यांनी वाढली आहे. 2.04 किमी असलेल्या या पुलामुळे अंतर 50 किमीने कमी होईल. सध्याच्या परिस्थितीत अलिबागला जाण्यासाठी मुंबईहून नवी मुंबई, पनवेल आणि पेण मार्गे अंदाजे 120 किमी रस्त्याने प्रवास करावा लागतो. परंतु रेवस आणि कारंजा दरम्यान 2.04 किलोमीटर लांबीच्या समुद्री पुलामुळे, मुंबईहून एमटीएचएल आणि नवाशेवा मार्गे अलिबागचे (Mumbai To Alibaugh) अंतर जवळजवळ निम्म्याने कमी होणार आहे. साहजिकच यामुळे प्रवाशांच्या महत्वपूर्ण वेळेची बचत होईल. पुलाच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटर रुंदीचा पादचाऱ्यांसाठीचा पदपथ देखील असेल. पुलाला जोडणारे रस्ते देखील बांधले जातील. कारंजामध्ये 5.13 किलोमीटर लांबीचा अप्रोच रोड आणि रेवसमध्ये स्टिल्टवर 1.17 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला जाईल.

Nitish Kumar : नितीशकुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर; बिहारमध्ये उलटा डाव फिरणार

Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nitish Kumar । बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांची JDU आणि भाजप यांच्या युतीने मोठं यश मिळवलं आहे. भाजपचे ८९ तर नितीशकुमारांचे ८५ आमदार निवडून आलेत. विरोधकांचा पुरता बाजार उठला असून नितीशकुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार कि भाजप नितीशकुमार यांचा गेम करणार हाच मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री पदावरून नितीशकुमार आणि भाजप यांच्यात वाद होण्याची शक्यता असतानाच आता एमआयएमने नितीशकुमार यांना थेट पंतप्रधान पदाची ऑफर देत मोठा डाव टाकला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत फक्त ५ पाच जागा जिंकल्या असूनही सदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आहे. ओवैसी यांचा MIM बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचे आणि स्वतःचा मुख्यमंत्री बसवण्याचे स्वप्न बघत आहे. त्यासाठी त्यांनी एक नवीन समीकरण सुद्धा तयार केलं आहे. एमआयएमने आरजेडी आणि जेडीयूला एकत्र येण्याची ऑफर दिली आहे. आमचा मुख्यमंत्री करा आम्ही नितीश कुमार याना २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देऊ असे आश्वासन एमआयएमने दिले आहे.

सरकार स्थापन करणे अजूनही शक्य Nitish Kumar

याबाबत एमआयएमने ट्विट करत म्हंटल, की सरकार स्थापन करणे अजूनही शक्य आहे. जर जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, एआयएमआयएम, सीपीआयएमएल आणि सीपीआयएम एकत्र आले तर सरकार स्थापन होऊ शकते.जेडीयूकडे ८५ जागा आहेत, तर आरजेडीकडे २५ जागा आहेत. काँग्रेस आणि एआयएमआयएमने अनुक्रमे ६ आणि ५ जागा जिंकल्या. सीपीआय-एमएल आणि सीपीआय-एमने प्रत्येकी ३ जागा जिंकल्या. त्यांच्या एकूण जागा १२४ आहेत, बिहारमध्ये बहुमतासाठी १२२ चा आकडा लागतो. त्यामुळे आपण सरकार बनवू शकतो असे एमआयएमने म्हंटल.

संभाव्य मंत्रिमंडळ कसे असेल याचीही माहिती एमआयएमने दिली आहे.त्यांनी म्हंटल कि एमआयएम कडे एक मुख्यमंत्री असेल, तर जेडीयूच्या कोट्यात दोन उपमुख्यमंत्री आणि २० मंत्री असू शकतात. आरजेडीला ६ मंत्री दिले जाऊ शकतात, तर काँग्रेसला दोन मंत्री मिळू शकतात. सीपीआय-एमएल आणि सीपीआयएमला प्रत्येकी एक मंत्रीपद मिळू शकते. महत्वाची बाब म्हणजे असं झाल्यास आम्ही २०२९ मध्ये नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ अशी घोषणा एमआयएमने केली आहे. आता नितीशकुमार काय निर्णय घेतात यावर बिहारच्या राजकारणाची दिशा ठरेल.

Fastag New Rule : आजपासून Fastag चे नियम बदलले; प्रवास करण्यापूर्वी बातमी वाचाच

Fastag New Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Fastag New Rule । तुम्हीही तुमची चारचाकी गाडी घेऊन इकडे तिकडे कुठे फिरत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. आजपासून म्हणजे १५ नोव्हेंबर पासून Fastag बाबत नवा नियम नियम लागू होणार आहे. फास्टॅग सिस्टिममध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने टोल पेमेंटच्या स्ट्रक्चरमध्ये सुधारणा केली आहे. आता तुम्ही गुगल पे किंवा फोनपे च्या माध्यमातून सुद्धा टोल नाक्यावर पेमेन्ट करू शकता. हा नियम देशभरातील वाहनचालकांसाठी लागू असेल.

केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्कनियम 2008 मध्ये सुधारणा करत टोल पेमेंट करण्यासाठी युपीआय एप्लीकेशनच्या वापराला परवानगी दिली आहे. यापूर्वी टोल भरण्याचे दोनच पर्याय उपलब्ध होते. एक म्हणजे रोख रक्कम आणि दुसरा पर्याय म्हणजे Fastag …. परंतु आता यूपीआयच्या माध्यमातून वाहन चालकांना टोल भरण्याचा तिसरा पर्याय (Fastag New Rule) आजपासून मिळणार आहे. खरं तर काही वर्षांपासून भारत सरकारने टोल नाक्यावर Fastag हि संकल्पना आणल्यापासून फास्टॅगने टोल भरला जातो. परंतु समजा काही कारणास्तव किंवा अडचणीमुळे तुमचं Fastag चालत नसेल तर वाहनचालकाला रोख रक्कम द्यावी लागते. महत्वाची बाब म्हणजे हि रक्कम टोलच्या दुप्पट असते.

वाहनचालकांना कसा फायदा होणार- Fastag New Rule

उदाहरणार्थ जर १०० रुपयांचा टोल असेल आणि तुमचा Fastag चालत नसले तर तुम्हाला दंड म्हणून २०० रुपये भरावे लागायचे. आता मात्र ऑनलाईन पेमेंट म्हणजेच फोन पे, गुगल पे च्या माध्यमातून ऑनलाईन पैसे भरण्याचा नियम लागू केल्याने वाहनचालकांचे पैसे वाचणार आहेत. कारण दुप्पट टोल देण्यापेक्षा तुम्ही फोन पे किंवा गुगल पे च्या किंवा इतर यूपीआय माध्यमातून २५ टक्केच अतिरिक्त रक्कम भरू शकता. म्हणजेच काय तर २०० रुपये भरण्याऐवजी तुम्ही १२५ रुपयात टोल भरू शकता. या नव्या नियमांमुळे वाहनचालकांच्या पैशाची बचत होणार आहे.

Maharashtra Congress : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची मोठी घोषणा; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Maharashtra Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Congress । राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी ही घोषणा केली आहे. आज मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या शिबिरात चेन्निथला यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी मध्ये फूट पडली हे स्पष्ट झालं आहे.

इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय- Maharashtra Congress

आज कॉंग्रेसचे (Maharashtra Congress) महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, मुंबई कॉंग्रेसचे प्रभारी यू.बी. वेंकटेश यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय शिबिर मालाड येथे पार पडले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,मुंबई अध्यक्ष उपस्थित होते. याच शिबिरात काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. “स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे. बीएमसी निवडणूक स्वबळावर लढावी, अशी भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडली आणि मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित शिबिरात हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

काँग्रेसचा स्वबळाची नारा म्हणजे ठाकरे गटाला धक्का असल्याचे बोलले जात आहे. कारण एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरु असतात. राज ठाकरे हे महाविकास आघाडीत येतील असेही बोललं जात होते. जर काँग्रेस आणि राज ठाकरे एकत्रितपणे महाविकास आघाडीत राहिले असते, तर मराठी मते आणि काँग्रेसची पारंपरिक मते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा मिळाली असती. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईतील काँग्रेसचा (Maharashtra Congress) पाठीराखा उद्धव ठाकरेंसोबत उभा राहिला होता हे आकडेवारी वरून स्पष्ट झालं होते. आता मात्र काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने उद्धव ठाकरेंना हा एक प्रकारचा झटका म्हणावा लागेल.

एकीकडे काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मात्र काँग्रेसने थोडा सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत (NCP) काँग्रेसची नेहमी नैसर्गिक आघाडी राहिली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. परंतु शरद पवार अशावेळी काय निर्णय घेणार? ते काँग्रेससोबत मुंबई महापालिका निवडणूक लढवणार कि ठाकरे बंधूना सोबत घेणार हे बघायला हवं.

Mumbai Bangalore Train : मुंबई ते बेंगलोर नवी एक्सप्रेस सुरु होणार; रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी

Mumbai Bangalore Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Bangalore Train । महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मागील ३० वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मुंबई ते बेंगलोर या एक्सप्रेस ट्रेनला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबई आणि बेंगलोर हि दोन्ही शहरे देशातील टॉपची शहरे म्हणून ओळखली जातात. त्यामुळे हि दोन्ही शहरे रेल्वेने थेट जोडली जावीत आणि यादरम्यान असलेल्या इतर छोट्या शहरांना सुद्धा याचा फायदा व्हावा यासाठी मागील ३० वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर मुंबई ते बेंगलोर रेल्वेसेवेला केंद्राने हिरवा झेंडा दाखवला आहे.

रेल्वे मंत्रालयाने मुंबई – बेंगलोर दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन (Mumbai Bangalore Train) सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे मात्र ही गाडी प्रत्यक्षात कधीपर्यंत सुरू होईल या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या एक्सप्रेस ट्रेनसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मुंबई – बेंगलोर एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याची गरज त्यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितली.

कधी सुरू होणार? Mumbai Bangalore Train

सध्या उद्यान एक्सप्रेस ही बेंगळुरू आणि मुंबईला जोडणारी एकमेव थेट ट्रेन होती. सुमारे १,१३६ किलोमीटर अंतर कापण्यासाठी तब्बल २३ तास ​​आणि ३५ मिनिटे लागतात. हा मार्ग दोड्डाबल्लापूर, गुंटकल, रायचूर, यादगीर, कलबुर्गी आणि सोलापूरमधून जातो, या प्रवासादरम्यान ३२ थांबे आणि परतीच्या प्रवासात ३१ थांबे असतात. आता मात्र हुबळी मार्गे धावणारी ही नवीन सुपरफास्ट ट्रेन जलद आणि अधिक कार्यक्षम असेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. अहवालांनुसार, ही सेवा प्रवाशांसाठी, विशेषतः व्यवसाय किंवा पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी, वाढीव आराम, चांगली कनेक्टिव्हिटी आणि अनुभव देईल. ही नवीन एक्सप्रेस ट्रेन नेमकी कधी सुरू होणार, याचे वेळापत्रक कसे राहणार याची अधिकृत तारीख अजूनही समोर आलेली नाही. परंतु रेल्वे मंत्रालय याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही माध्यमांनी तर मुंबई – बेंगलोर एक्सप्रेस डिसेंबर पासून सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Railway Tickets New Rule : या व्यक्तींना मोफत प्रवास ; रेल्वे तिकीट नियमांत मोठा बदल

Railway Tickets New Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासाचे उत्तम साधन मानले जाते. रेल्वेचा प्रवास हा आरामदायी आणि कमी पैशात होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशी रेल्वेला पसंती दाखवतात. महत्वाची बाब म्हणजे रेल्वेचं जाळे हे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले असल्याने लांबच्या प्रवासासाठी रेल्वे हाच बेस्ट पर्याय ठरतो. तुम्हीही सतत रेल्वेने प्रवास करत असाल तर मित्रानो, हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने मुलांच्या तिकिट बुकिंग नियमांमध्ये (Railway Tickets New Rule) महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, रेल्वेने ५ वर्षांखालील मुलांसाठी मोफत प्रवास सुरू केला आहे, तर ५ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी विशेष भाडे नियम लागू केले आहेत. हे बदल तात्काळ लागू झाले आहेत

काय आहे नेमका नियम ? Railway Tickets New Rule

रेल्वे विभागाच्या नवीन नियमांनुसार, ५ वर्षांखालील मुले तिकिटशिवाय प्रवास करू शकतात, जर त्यांना स्वतंत्र सीट किंवा बर्थची आवश्यकता नसेल तर. कारण अशा परिस्थितीत, पालक मुलाला त्यांच्या मांडीवर घेऊन मोफत प्रवास करू शकतात. परंत्तू , जर मुलासाठी स्वतंत्र बर्थ किंवा सीट बुक केली असेल तर, प्रौढांसाठी पूर्ण भाडे अनिवार्य असेल. भारतीय रेल्वेने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन मुलांसाठी तिकीट बुकिंगशी (Railway Tickets New Rule) संबंधित नियमांमध्ये हा बदल केला आहे. या नियमामुळे प्रवासी पालकांचा अनावश्यक खर्च वाचण्यास मदत होईल.

दुसरीकडे ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेष भाडे लागू केलं आहे. जर या वयोगटातील मुलाला सीट किंवा बर्थची आवश्यकता नसेल आणि तिकीट बुकिंग दरम्यान ‘नो सीट/नो बर्थ (NOSB)’ पर्याय निवडला गेला तर मुलाचे तिकीट अर्ध्या भाड्याने उपलब्ध असेल. परंतु , जर मुलासाठी सीट किंवा बर्थ बुक केली असेल तर पूर्ण प्रौढ भाडे म्हणून गृहीत धरले जाईल. याशिवाय रेल्वेने हे देखील स्पष्ट केले आहे की 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना प्रौढ मानले जाईल आणि त्यांच्या तिकिटावर सामान्य दराने भाडे भरावे लागेल. त्यांना तिकीट दरात कोणतीही सूट मिळणार नाही.