Saturday, December 6, 2025
Home Blog Page 7

Delhi Blast : दहशतवाद्याना फंडिंग कोणी केलं? समोर आली धक्कादायक माहिती

Delhi Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली बॉम्बस्फोटाबाबत (Delhi Blast) नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपास यंत्रणांमधील सूत्रांनुसार, या दहशतवादी कटाचा सूत्रधार डॉ. उमर होता, ज्याने एकट्याने हा स्फोट घडवून आणला आणि डिसेंबरमध्ये २६/११ च्या मुंबई हल्ल्यांप्रमाणेच देशाच्या राजधानीत दहशत माजवण्याचा हेतू होता. मात्र हे प्रकरण फक्त एवढ्यापुरतच मर्यादित नाही. कारण लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या काही तास आधी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. ज्यामध्ये तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आली. या हल्ल्याचा कट मागील काही दिवसांपासून रचला जात होता.

जैश कडून फंडिंग – Delhi Blast

कोणताही दहशतवादी हल्ला करायचं म्हंटल कि त्यासाठी पैशाची गरज हि लागतेच. मग स्फोटके बनवणे असो वा रेकी करणं असो, फंड असल्याशिवाय इतकी मोठी कामे होत नाहीत. अशावेळी हे डॉक्टर दहशतवादी सापडले त्यांना पैसे कोणी पुरवले याचा तपास यंत्रणांनी केला. यावेळी काही धक्कादायक माहिती समोर आली. डॉ. शाहीन सईद ही थेट जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरच्या संपर्कात होती. तिला जैश या दहशतवादी संघटनेकडून फंड मिळत होता.

दहशतवाद्यांचा तुर्की प्रवास –

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तपासात असे दिसून आले आहे की मुख्य आरोपी डॉ. उमर आणि त्याचा सहकारी डॉ. मुझम्मिल गनई यांनी अलीकडेच तुर्कीला प्रवास केला होता. त्यांच्या पासपोर्टमध्ये तुर्कीहून इमिग्रेशन स्टॅम्प सापडले होते. आरोपींनी आयईडी (इम्प्रूव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइसेस) बनवण्यासाठी २० क्विंटलपेक्षा जास्त एनपीके (नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम) खत खरेदी केले. डॉ. उमर आणि इतर सहकाऱ्यांनी संयुक्तपणे या कटासाठी २० लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा केली. Delhi Blast

दरम्यान, अटक केलेल्या आठ संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मॉड्यूलने दिल्लीतील चार महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. लाल किल्ला, इंडिया गेट, कॉन्स्टिट्यूशन क्लब आणि गौरी शंकर मंदिर याठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; या महिलांना होणार फायदा

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु मागच्या काही महिन्यापासून या योजनेच्या पात्रतेसाठी वेगवेगळे निकष सरकार कडून लावण्यात येत असल्याने महिला हैराण झाल्या आहेत. यातीलच एक अट म्हणजे इ केवायसी. लाडकी बहीण योजनेचा 16 वा हप्ता जमा होण्यापूर्वी महिलांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. हे करत असताना महिलांना त्यांचा पती किंवा वडील यांचे आधारकार्ड दाखवायला लागतेय. परंतु एखाद्या महिलेला नवराही नसेल आणि वडीलही नसतील तर तिने काय करायचं? असा प्रश्न अनेक महिलांना पडतोय. या अडचणीमुळे आपले पैसे येण्याचं बंद तर होणार नाही ना? अशीही भीती या महिलांना होती. परंतु आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महिलांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे.

काय म्हणाल्या अदिती तटकरे ? Ladki Bahin Yojana

ज्या महिलांचा नवरा आणि वडील हयात नाही त्यांच्यासाठी आता केवायसी प्रोसेसमध्ये बदल करण्यात येणार आहे. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) वेबसाइटवर एक नवीन ऑप्शन दिला जाणार आहे. त्यामध्ये जाऊन केवायसी पूर्ण करता येईल. यामध्ये महिलांना वडिलांचे किंवा पतीच्या मृत्यूचा दाखला अपलोड करण्याची परवानगी मिळणार आहे. याचसोबत ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे त्या महिला घटस्फोटासंबंधित कागदपत्रे या नवीन वेबसाईट वर अपलोड करु शकतात. यावरुन महिलांचे पती आणि वडील हयात नसल्याची माहिती महिला व बालविकास विभागाला मिळेल आणि त्यांची पडताळणी करणे सोपे जाईल. या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळेल,” अशी खात्री अदिती तटकरे यांनी दिली.

दरम्यान, मुख्यमंती माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारकच आहे. आत्तापर्यंत या योजनेचे १५ हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता १६ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत महिला आहेत. परंतु ई-केवायसी केल्याशिवाय १६ वा हप्ता महिलांना मिळणार नाही. त्यामुळे 18 नोव्हेंबर 2025 च्या आत महिलांनी त्यांच्या खात्याची ई केवायसी करावी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ सातत्याने घेत राहावा.

Ajit Pawar : अजितदादा सरकारमधून बाहेर पडणार? वर्षावरील बैठकीत मोठं काहीतरी घडलं

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गोत्यात आलेत. १८०० कोटींची महार वतनाची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या ३०० कोटी रुपयांत खरेदी केली आणि २१ कोटींचा स्टॅम्प ड्युटी न भरता फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा सगळा व्यवहार झाल्याच्या आरोपांनी महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे अजित पवारांनी म्हटले. मात्र, अजूनही पार्थ पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. याच दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे ?

पार्थ पवार यांच्यावरील जमीन घोटाळा आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीत अजित पवार हे आक्रमक झाले होते. वर्षावरील बैठकीत जे घडले त्यावर मला बोलायला वेळ मिळाला नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे, त्यादिवशी जी बैठक झाली, त्यात अजित पवारांनी रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून सरकारला पाठिंबा देऊ इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर आले आहे. खरे खोटे बाहेर येईल. अजित पवारांच्या या भूमिकेमुळेच त्यांना आणि पार्थ पवारला या प्रकरणातून वाचवण्यात येतंय असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

अजित दादांची फाईल तयार – Ajit Pawar

अंबादास दानवे पुढे म्हणाले, भाजपाला या संपूर्ण प्रकरणाची माहिती होती. हे सर्व उघड झाल्यानंतर अजित पवार अडचणीत येतील हा त्यांचा उद्देश होता. ही मोडस ओपरेंडी आहे. भारतीय जनता पार्टीनेच अडचणीत आणायचे.. भारतीय जनता पार्टीनेच बाहेर काढायचे हे काम या प्रकरणात करण्यात आलंय. आता अजित दादांची फाईल तयार केली आहे. उद्या जर अजित पवारांनी काही केले तर एक मिनिटांत पार्थ पवारांना अटक होऊ शकते असं अंबादास दानवे यांनी म्हंटल. पार्थ पवार काय लहान बाळ आहे का? ज्याने लोकसभा लढवली आहे आणि लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये. कुणाचा मुलगा म्हणून त्याला वागणूक देऊ नये, भारताचा एक नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला वागणूक दिली पाहिजे असेही मत अंबादास दानवे यांनी मांडलं.

Indurikar Maharaj : मला घोडे लावा, पण माझ्या मुलीचा …; इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार

Indurikar Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे . इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी अगदी थाटामाटात पार पडला. या साखरपुड्याचे फोटो,व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. इतरांना अत्यंत साध्या पणाने लग्न करा असा सल्ला देणाऱ्या इंदुरीकर महाराजांनीच स्वतःच्या मुलीचा साखरपुडा धुमधडाक्यात केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागली. शल मीडियातून झालेल्या व्यक्तिगत टीकांमुळे महाराज व्यथित झाले आहेत आणि त्यांनी कीर्तन सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा त्यांचा एक विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे विडिओ मध्ये? Indurikar Maharaj

आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती. आणि आता लोक इतके खाली गेलेत, की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसेत, यावरुन लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या. पण तिच्या बापाला…मला तुम्ही घोडे लावा.. माझा पिंड गेलाय… माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे. पण या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करुन टाकलंय. मला एक सांगा.. मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील? एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती? असा सवाल इंदुरीकर महाराजांनी केला. Indurikar Maharaj

आता मजा नाही राहिली-

पुढे इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) म्हणाले की, “त्याच्यामुळे आता मी कंटाळलो महाराज. जवळजवळ मी दोन-तीन दिवसात टाकणार आहे एक क्लिप. आणि थांबून घेणार आहे आता.. बास झाली ३१ वर्ष.. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं, आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ… माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना.. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही.. आणि ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजेत. खरंय की खोटंय? तुम्ही काहीच बोलत नाही.. हे त्याने बंद केलं पाहिजे.. त्याला लाज वाटली पाहिजे, की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं जगावं. आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करतोय, दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय. पण मजा नाही राहिली त्याच्यात आता.असे इंदुरीकर महाराज या विडिओ मध्ये बोलताना दिसत आहेत.

साहेब माझं लग्न जमेना, मला एक पत्नी मिळवून द्या; तरुणाचे थेट शरद पवारांना पत्र

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मुलांच्या लग्नाचा विषय खूपच अवघड झाला आहे. एकीकडे मुलांना चांगली नोकरी लागेना, तर दुसरीकडे मुलींच्या अपेक्षा मात्र डोंगराएवढ्या वाढल्यात. मुलींना चांगली नोकरी, बंगला, गाडी, मुंबई- पुण्यात फ्लॅट असणारा नवरा पाहिजे. मुलींच्या या मागणीमुळे अनेक तरुण अजूनही बिन लग्नाची राहिली आहेत. लग्नच होत नसल्याने समाजात या तरुणांची मान शरमेने खाली जातेय, त्यांची चारचौघात थट्टा केली जातेय. परिणामी तरुण मुले नैराश्यात जातायत. अशातच आता लग्न ठरेना म्हणून एका तरुणाने थेट राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार याना पत्र लिहिले आहे. साहेब, माझं लग्न जमेना, मला एक पत्नी मिळवून द्या मी तुमचे उपकार विसरणार नाही, असे या तरुणाने पत्रात लिहले आहे.

काय आहे तरुणाचे पत्र ?

या तरुणाने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात त्याला एकाकीपणा जाणवत आहे. “मी गरीब कुटुंबातून आहे. सामाजिक बंधनं आणि परिस्थितीमुळे कोणीच आपली मुलगी द्यायला तयार नाही. पण मला संसार हवा आहे, आपलेपणा हवा आहे. माझे वय वाढतेय. भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करुन मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरीही मी राहायला तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी मी देतो. मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी विसरणार नाही, अशा आशयाचे पत्र या तरुणाने शरद पवारांना लिहले आहे.

पवार गटाकडून प्रतिक्रिया-

या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हंटल कि, अकोला येथील कार्यक्रमात हे पत्र त्या तरुणाने पवार साहेबाना दिले. यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या पक्षाची मिटिंग होती, त्यावेळी हे पत्र जयंत पाटलांच्या हातात देऊन वाचायला सांगितलं. आज ग्रामीण भागात मुलांना मुली मिळत नाहीत कारण मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुली चांगलं शिक्षण घेऊन शहरात येतात, त्यामुळे त्यांना शहरातील मुलगा हवा असतो. दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये बेरोजगारांची समस्या आहे, त्यामुळे त्या मुलाने अशा प्रकारचे पत्र शरद पवार साहेबाना दिले. या पत्रानंतर पवार साहेबानी आम्हाला सांगितलं कि त्या मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करा अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

HSRP Number Plate बसवण्याची मुदत वाढली; वाहनचालकांना सर्वात मोठा दिलासा

HSRP Number Plate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन HSRP Number Plate । महाराष्ट्रात जुन्या वाहनांसाठी (1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत) HSRP (उच्च सुरक्षा नोंदणी पत्रिका) बसवण्याचे आवाहन राज्य परिवहन विभागाकडून मागील अनेक महिन्यापासून केलं जात आहे. हि नवीन नंबरप्लेट बसवण्यासाठी आतापर्यंत ३ वेळा सरकार कडून मुदत वाढवण्यात आली होती. एप्रिल, जून आणि ऑगस्टनंतर आता HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत आणखी एकदा वाढवण्यात आली आहे. तुम्ही आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत हि नंबर प्लेट तुमच्या गाडीला बसवू शकता. या मुदतवाढीमुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत राज्यातील 40% वाहनचालकांनी नवीन HSRP नंबर प्लेट बसवलेली आहे. अजूनही बरेच जण वंचित आहेत. मुंबई, पुणे सह राज्यभरात लाखो वाहनमालकांनी अजूनही ही नंबर प्लेट बसवलेली नाही. त्यामुळेच आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेनंतर नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही HSRP साठी अर्ज केलेला असेल पण प्लेट बसवलेली नसेल तर तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड बसू शकतो तर HSRP साठी अर्जही केलेला नसेल आणि प्लेट बसवलेली नसेल (HSRP Number Plate) तर मात्र तुम्हाला तब्बल 10,000 रुपयांचा दंड बसेल. त्यामुळे वेळेतच हि नंबर प्लेट बसवून घ्या आणि कारवाई टाळा.

HSRP एक विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली नंबर प्लेट आहे. यात 10 अंकी युनिक लेझर-ब्रांडेड आयडी नंबर आणि लेझरने कोरलेला कोड असतो. त्यावर ‘IND’ बॅजिंग असते. HSRP मध्ये क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-नंबर आणि नॉन-रिमूव्हेबल स्नॅप लॉक यांसारख्या सुरक्षा फीचर्स मुळे वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यास मदत होईल. तसेच, बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणूक करणे, फॅन्सी नंबर प्लेट बनवणे, नंबर प्लेटवर खाडाखोड करणे यामुळे चोरीच्या वाहनांना शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे एचएसआरपी या नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आलं आहे

HSRP Number Plate कोठून लावावी? HSRP Number Plate

तुम्ही अधिकृत संकेतस्थळ www.transport.maharashtra.gov.in किंवा www.hsrpmh.com वर ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे. दुचाकींसाठी सुमारे ₹400-450, तीनचाकींसाठी ₹500 आणि चारचाकींसाठी ₹745-1,100. रंग-कोडेड स्टिकरसाठी अतिरिक्त ₹100 लागू शकतात. बुकिंगसाठी तुम्ही तुमच्या RTO नुसार झोन निवडून, फिटमेंट सेंटरवर अपॉइंटमेंट बुक करावी. HSRP फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच लावावी, जे परिवहन विभागाकडे नोंदणीकृत आहेत. अधिकृत विक्रेत्यांची यादी VAHAN पोर्टलवर उपलब्ध आहे.

Delhi Blast Video : दिल्ली बॉम्बस्फोटाचा Video अखेर समोर; तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल

Delhi Blast Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Delhi Blast Video । दिल्ली बॉम्बस्फोटाचा विडिओ अखेर समोर आला आहे. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या या भीषण बॉम्बस्फोटात ९ नागरिकांना प्राण गमवावा लागला तर तब्बल 15 जण जखमी झाले होते. धावत्या कारमध्ये झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरून गेला. या संपूर्ण घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात असतानाच आता या स्फोटाचा भयानक आणि धक्कादायक विडिओ समोर आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या रात्री नेमकं काय घडलं याचा उलगडा झाला आहे. हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

काय आहे विडिओ मध्ये – Delhi Blast Video

तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता कि, रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी दिसत आहे. सर्व गाड्या एका सिग्नल वर थांबल्या होत्या, त्याच दरम्यान हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा होता. आणि आगीचा मोठा गोळा तयार झाला. आजूबाजूला असलेल्या कार आणि रिक्षा तसेच इतर गाड्या अक्षरशः जळून खाक झाल्या. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, मृतांपैकी काहीजणांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. त्यांच्या शरीराचे तुकडे काही अंतरावर जाऊन पडले होते. ज्या संगणकाच्या स्क्रीनवर व्हिडिओ प्ले (Delhi Blast Video) होत होता त्या संगणकाच्या स्क्रीनवर एक अंधुक फ्लॅश पसरला.

दिल्ली स्फोट हा दहशतवादी हल्ला

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) सांगितले की, सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झालेला स्फोट ‘स्पष्टपणे’ ‘दहशतवादी हल्ला’ होता. त्यांनी तपास हाताळण्यात देशाच्या व्यावसायिकतेचे कौतुक केले. स्पष्टपणे दिसत आहे कि हा दहशतवादी हल्ला होता. अत्यंत स्फोटक पदार्थांनी भरलेल्या कारच्या माध्यमातून हा स्फोट घडवण्यात आला आणि बरेच लोक मारले.

दहशतवादी डॉ.उमरचा मृत्यू

दरम्यान, या स्फोटामध्ये दहशतवादी उमर याचा मृत्यू झाला आहे. या आत्मघातकी स्फोटात त्याने कारमध्ये बसू स्वत:लाही उडवलं. डीएनए सँपलवरून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली स्फोटाचे तुर्की कनेक्शन सुद्धा समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च 2022 मध्ये काही व्यक्ती भारतातून तुर्कीला गेले होते. त्या काळात त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले असावे असा संशय व्यक्त होत आहे. डॉक्टर उमर, आदिल आणि मुझम्मिल हे दहशतवादी तुर्कीला गेले आणि तेथे त्यांच्या हँडलर्सना भेटले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mumbai Local Train : मुंबईकरांचा प्रवास होणार जलद; आता 15 डब्ब्यांची लोकल ट्रेन धावणार

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईकरांचा प्रवास आता आणखी जलद आणि वेगवान होणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी असं जिला म्हंटल जाते त्या लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) डब्याची संख्या वाढणार आहे. यापूर्वी १२ डब्याची असलेली लोकल ट्रेन आता १५ डब्बे घेऊन धावणार आहे. मध्य रेल्वेवर हा बदल पाहायला मिळेल. खरं तर लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात, साहजिकच जीव मुठीत घालून, अतिशय गर्दीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे १२ डब्यांच्या ट्रेनऐवजी १५ डब्यांच्या ट्रेनची मागणी बऱ्याच काळापासून होती, जी रेल्वेने आता मान्य केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कधीपासून धावणार 15 डब्यांची लोकल ट्रेन? Mumbai Local Train

15 डब्यांच्या लोकल फास्ट (Fast) आणि स्लो (Slow) अशा दोन्ही मार्गिकांवर धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील 34 रेल्वे स्थानकांपैकी 27 स्थानकांच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सध्या सुरु आहे. हे विस्तारीकरणाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. एकदा का हे काम पूर्ण झाले कि मग 15 डब्यांच्या लोकल ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) डब्ब्यांची संख्या वाढल्याने एकाच वेळी जास्तीत जास्त लोक प्रवास करू शकतील. यामुळे गर्दीही कमी होईल आणि प्रवासही आरामदायी होईल.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला म्हणाले, “मुंबई विभागातील ३४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. आम्ही डिसेंबरपर्यंत २७ स्थानके पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यानंतर १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवली जाईल.

कोणकोणत्या स्थानकाचे विस्तारीकरण होणार?

ज्या स्थानकांवर काम सुरू आहे त्यात विठ्ठलवाडी, उल्हासनगर, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, आंबिवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, शेलू, बदलापूर, भिवपुरी, पळसधारी, वाशिंद, मुंब्रा, कळवा, कोपर, ठाकुर्ली, कसारा आणि टिटवाळा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, सीएसएमटी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वांगणी आणि खडवलीसह इतर सात स्थानकांवर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.

Delhi Blast : राम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? समोर आली खळबळजनक माहिती

Delhi Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली स्फोट (Delhi Blast) प्रकरणी नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. कार मध्ये जरी हा भीषण स्फोट घडवण्यात आला असला तरी सत्य मात्र वेगळंच नाही. दिल्ली लाल किल्ला हे त्यांचे टार्गेट नसून त्यांचा प्लॅन यापेक्षाही कितीतरी पट खतरनाक असल्याचे आरोपींच्या चाैकशीतून पुढे येतंय. दहशतवाद्यांना दिल्लीत स्फोट करायचाच नव्हता, तर त्यांच्या निशाण्यावर राम मंदिर (Ram Mandir) होते. सूत्रांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फरिदाबाद मॉड्यूलने उत्तर प्रदेशातील प्रमुख मंदिरे आणि धार्मिक स्थळे, विशेषतः अयोध्या आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लक्ष्य केले होते.

तुर्की कनेक्शन उघड- Delhi Blast

विविध ठिकाणांहून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी अयोध्येमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठीचा कट रचला होता. अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फरिदाबाद मॉड्यूलने उत्तर प्रदेशातील प्रमुख मंदिरे आणि धार्मिक स्थळे, विशेषतः अयोध्या आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लक्ष्य केले होते. त्यासाठी सध्या अटकेत असणाऱ्या शाहीननं अयोध्येत एक स्लीपर सेलसुद्धा सक्रिय ठेवली होती. मात्र, दहशतवादी त्यांचा हा डाव साधतील त्याआधीच स्फोटकांसह त्यांच्या या कटाची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी ती जप्त केली. तपास यंत्रणांनी डॉ. उमर आणि डॉ. मुझम्मिल यांचे पासपोर्ट तपासले, ज्यामध्ये तुर्की कनेक्शन उघड झाले. टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर, हे संशयित तुर्कीला गेले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी २६/११ च्या हल्ल्यासारखाच हल्ला करू इच्छित होते.

अजूनही ३०० किलो स्फोटके-

तपासातून असे दिसून येते की, स्फोटकांमध्ये (Delhi Blast) कोणताही टायमर नव्हता. अतिघाई, घाबरलेपणा आणि गोंधळातून हा स्फोट करण्यात आला. दहशतवाद्यांनी चाैकशीत सांगितले की, त्यांना स्फोट जास्तीत जास्त लोक असलेल्या ठिकाणी उडवायचा होता. भारतासाठी धोक्याची बाब म्हणजे अजूनही ३०० किलो स्फोटके दहशतवाद्यांनी कुठे तरी लपवून ठेवली आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षा एजन्सींसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे की, उर्वरित 300 किलो अमोनियम नायट्रेट त्यांना जप्त करायचा आहे. त्यासाठी युद्धपातळीवर तपास सुरु आहे.

Delhi Red Fort Blast : दहशतवादी शाहीनचे महाराष्ट्र कनेक्शन; अंडरवर्ल्डच्या संपर्कात कशी आली?

Delhi Red Fort Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या स्फोटामुळे (Delhi Red Fort Blast) संपूर्ण देश हादरला आहे. धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटाचे कनेक्शन हे फरिदाबाद मॉड्यूलसोबत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी फरीदाबादमधून डॉक्टर जम्मिल शकील आणि लखनऊमधून डॉक्टर महिला शाहीन शाहिद हिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यानंतर तिची कसून चौकशी केली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाहीन हिचे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आलं आहे. महारष्ट्रातील एका व्यक्तीसोबत तिचे लग्न झालं होत, त्यानंतर २ वर्षातच तिचा घटस्फोट सुद्धा झाला. मात्र या कालावधीत ती राज्यातील अनेक लोकांच्या संपर्कात राहीली असल्याचे बोललं जातेय.

कोण आहे शाहीन शाहिद? Delhi Red Fort Blast

डॉक्टर शाहीन शाहिद जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेच्या जमात उल मोमिनतची कमांडर होती. शाहीन ने प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजमधून जानेवारी 2003 मध्ये एमबीबीएस आणि डिसेंबर 2005 मध्ये एमडी केली. या शिक्षणानंतर तिची लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली. ऑगस्ट 2006 मध्ये जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये फार्माकोलॉजी विभागात ती रुजू झाली. त्यानंतर वर्ष 2009-10 मध्ये कन्नौज मेडिकल कॉलेजमध्ये तिची बदली झाली. तर सहा महिन्यांनी ती पुन्हा जीएसव्हीएम कॉलेजमध्ये परतली. Delhi Red Fort Blast

शाहिना एका प्रतिष्ठित रुग्णालयात प्रॅक्टिस करत होती, ज्यामुळे तिच्यावर कोणालाही संशय आला नाही. मात्र शाहिन शाहिदीच्या कारमधून AK-47 रायफल आणि अनेक मॅगझिन जप्त करण्यात आल्या होत्या. शाहीनने 2013 साली महाराष्ट्रातील जफर हयातशी लग्न केले होते. मात्र 2015 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटापूर्वी काही काळ ती महाराष्ट्रात राहत होती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या असून, दोन्ही राज्यांमध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. शाहीन हि दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलच्या संपर्कात कधी आली याचा उलगडा झालेला नाही. परंतु ती सुरुवातीला डॉ. परवेज सईदच्या संपर्कांत आली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.