Monday, December 22, 2025
Home Blog Page 603

MSRTC Mumbai Bharti 2024 | मुंबई ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

MSRTC Mumbai Bharti 2024

MSRTC Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची अतिशय महत्त्वाची आणि चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत (MSRTC Mumbai Bharti 2024) एक भरती चालू झालेली आहे. या भरतीसाठी आता उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आलेले आहे. ही भरती समुपदेशक या पदांसाठी आहे. त्याचप्रमाणे ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत.

पदाचे नाव | MSRTC Mumbai Bharti 2024

या भरती अंतर्गत समुपदेशक या पदाची भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची समाजकार्य या विषयात पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला मुंबई या ठिकाणीच नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करायचे आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता | MSRTC Mumbai Bharti 2024

विभाग नियंत्रक विभागीय कार्यालय, मुंबई विभाग किरोळ रोड विद्या विहार मुंबई 86

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

विधानपरिषदेचा निकाल शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला बॅकफूटवर घेऊन जाईल??

vidhan parishad election 2024 Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अकरा जागा… अकरा उमेदवार… पण अशातच भर पडली ती ठाकरेंच्या विश्वासू समजल्या जाणाऱ्या मिलिंद नार्वेकरांची … बारा गडी मैदानात आल्यामुळे निवडणूक लागली… मतदान झालं… आणि आता निकालही लागला… विधान परिषदेच्या कालच्या (Vidhan Parishad Election 2024 Result) निकालात महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार निवडून आले… तर महाविकास आघाडीकडून प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर या दोघांनी बाजी मारली… डाव फिस्कटला तो शरद पवार गट पुरस्कृत शेकापच्या जयंत पाटलांचा… कालच्या निकालानं फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न सलग तिसऱ्यांदा चालला हे पुन्हा एकदा सिद्ध झालं… लोकसभेनंतर विधानसभेच्या आधीच महायुतीची गाडी रुळावर आल्याचं बोललं गेलं… पण बिघडलं ते आघाडीचं… मविआच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग तर केलच पण राजकारणातील वस्ताद म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवारांचा हा करेक्ट कार्यक्रम असल्याचंही बोलले जातय… कालच्या विधानपरिषद निकालाचा नेमका अर्थ कसा काढायचा? महाविकास आघाडीचे एकीवर याचा काही इम्पॅक्ट होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय चाणक्य ठरलेत, असं आपल्याला बोलता येऊ शकतं का? तेच पाहूया

सर्वात आधी पाहूया विधान परिषदेत महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार निवडून आल्याने लोकसभेत डॅमेज झालेल्या फडणवीसांच्या इमेजला या निकालाने उभारी मिळालीये… यापूर्वी 10 जुन 2022 ला राज्यसभा तर 20 जुन 2022 ला विधानपरिषदेच्या निवडणुकीत फडणवीसांनी आपला मॅजिक पॅटर्न वापरत मविआला धक्का दिला होता. त्यामुळे मविआ सरकार कोसळले होते. त्यामुळे आताच्या विधानपरिषदेच्या नियोजनाची आणि मतांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती. लोकसभेच्या निकालामुळे वातावरण बदलल्याने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट महायुतीच्या आमदारांची मतं फोडेल, अशी चर्चा होती. मात्र, आज विधानपरिषद निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या जादू कायम असल्याचे दिसून आले.

2022 ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी विजयाची हॅट्रिक करुन दाखवली. विधानपरिषेदेच्या गणितांमध्ये फडणवीसांची बेरीज सर्वांवरच भारी पडल्याची चर्चा आता रंगली आहे.त्यांनी सलग पाच टर्म आमदार राहिलेल्या आणि शरद पवार पुरस्कृत उमेदवार असलेल्या जयंत पाटील यांना धोबीपछाड देत वस्तादाचा डाव हाणून पाडला, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय… थोडक्यात लोकसभेच्या निकालातून शरद पवारांकडे गेलेला पॉलिटिकल फोकस फडणवीसांनी पुन्हा एकदा आपल्याकडे शिफ्ट करून घेतलाय, असं म्हणायला हरकत नाही…

या निकालानं आणखीन एक गोष्ट सिद्ध केली ती म्हणजे महाविकास आघाडी फुटीर असल्याची…. होय… विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची 23 मतं मिळवत विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची 8 मतं फुटल्याची जोरदार चर्चा आता होऊ लागलीय…विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची 2 तर कॉंग्रेसची सहा मते फुटली असा दावा माजी मंत्री आणि भाजप आमदार संजय कुटे यांनी करत महाविकास आघाडीचा पेच आणखीनच वाढवलाय… विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत, यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत होता. अजित पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नव्हते…. याचा अर्थ कसा आणि काय लावायचा? असा प्रश्न आता राजकीय विश्लेषकांनाही पडलाय… मतं फुटणं, मतं फुटू नयेत याची काळजी न घेणं या सगळ्यातून महाविकास आघाडीच्या इमेजला धक्का तर पोहचला आहेच… पण आघाडी म्हणून असणारी जनतेमधील विश्वासार्हताही गमावून बसलीये, हेच या सगळ्यातून सिद्ध होतं… त्यामुळे भाजपच्या विरोधात मत देऊन निवडून दिलेले आमदारच महायुतीला मदत करत असतील, तर याचा निगेटिव्ह मेसेज मतदारांमध्ये जाण्याची शक्यता आहे… त्याचा तोटा आगामी काळात विधानसभा निवडणुकीतही मविआला भोगावा लागू शकतो…

आता तिसरी गोष्ट येते ती विधानसभेसाठी वातावरण सेट करण्याची…. लोकसभेच्या निकालामुळे महायुती बॅकफुटला गेली होती… विधानसभेलाही मविआला 170 ते 180 जागांवर यश मिळेल, असं राजकीय विश्लेषकांचंही म्हणणं होतं… यासाठी हे मविआच्या बाजूने असणार हे मोमेंटम तोडत वार आपल्या बाजूने सेट करण्याची गरज महायुतीला होती… अर्थसंकल्पातून लोककल्याणकारी घोषणांचा पाऊस पाडून त्याचा थोडाफार प्रयत्न ट्रिपल इंजिन सरकारने केला… पण ते पुरेसं नव्हतं… विधानसभेआधी पक्षातील नेत्यांमध्ये आत्मविश्वास दुणावण्याची संधी… पक्षातील नाराजांचं राजकीय पुनर्वसन करण्याची संधी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभेआधी राज्यातील जातीय समीकरण आपल्या बाजूने वळवण्याची संधी… विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली होती… आणि यात पास होत महायुतीनं हे सर्वकाही सिद्ध करून दाखवलं… अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत दिसणार आहे. तर योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. याशिवाय, सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार झाला आहे…. पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करून माधव फॅक्टर पुन्हा आपल्याकडे वळता करून घेतलाय… थोडक्यात काय तर विधानसभा निवडणुकीआधी महायुतीनं वारं आपल्या बाजूने सेट करून घेतलय… पक्ष फुटी मुळे निर्माण झालेलं सहानुभूतीचं वार, लोकसभेच्या निवडणुकीचं मोमेंटम हे सगळं तोडण्यात महायुतीला यश आलंय… अर्थात ठाकरे गट आणि शरद पवार गटासाठी विधानसभेला याचा मोठा लॉस होऊ शकतो….

आता येतो तो शेवटचा मुद्दा तो म्हणजे काँग्रेसची खराब झालेली इमेज…. कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत भरभरून मतदान केलं… म्हणूनच की काय सर्वात कमी जागा लढवून देखील सर्वात जास्त जागा निवडून आणण्याचा रेकॉर्ड काँग्रेसने केला… भाजपच्या प्रभावामुळे महाराष्ट्र काँग्रेसला मरगळ आली होती… हीच मरगळ लोकसभेच्या निकालामुळे दूर झाली… काँग्रेससाठी ही नवसंजीवनी असल्याचं बोललं गेलं… हे सगळं काँग्रेसला विधानसभा निवडणुकीला प्लस मध्ये घेऊन जाणार होतं… पण त्याआधीच विधान परिषदेला काँग्रेसची मतं फुटल्यामुळे पक्ष चांगलाच डॅमेज झालाय… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत… आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदाना आधीच पक्षातील फुटीर आमदारांचं वर्णन केलं होतं… निकालातही हे स्पष्ट असल्यामुळे कल्पना असूनही पक्षानं या फुटीर आमदारांवर कारवाई का केली नाही? असा प्रश्न आता या निमित्ताने विचारला जातोय… या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाले, विधान परिषद निवडणुकीवेळी आम्ही ट्रॅप लावला होता. या ट्रॅपमध्ये बदमाश लोकं सापडलेली आहेत. आम्ही वरिष्ठांना हे कळवलेलं आहे. लवकरच ज्यांनी पक्षविरोधी काम केलं, पक्षासोबत गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल…

थोडक्यात काय तर विधानसभेचा एक एक्स्ट्रा कॅन्डीडेट महाविकास आघाडीने दिला… पण त्याला निवडून आणता आलं नाही… थोडक्यात काय तर आघाडीनं स्वतःच्या हाताने आपल्या बाजूने फिरलेल्या राजकीय वाऱ्याला दूर लोटलय… या सगळ्यातून साध्य काय झालं… काँग्रेसचा संघर्ष चव्हाट्यावर आला… शरद पवार गटाचा उमेदवार पडला… महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग लावला… वस्तादाची तयार झालेली बिग इमेज खोडून काढत चाणक्य पुन्हा वरचढ ठरला… बाकी विधान परिषदेच्या निकालावरून आघाडीत बिघाडी झालीये, असं तुम्हाला वाटतं का? विधान परिषदेचा निकाल विधानसभेला महायुतीच्या विजयाचं कारण ठरू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा..

Mobile Data वाचवायचा आहे? WhatsApp मधील ‘हे’ Setting बदला

mobile data saver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या देशातील आघाडीच्या टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आधीच महागाईने हैराण झालेला माणूस आता मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतींनी चांगलाच मेटाकुटीला आलाय. मात्र मोबाईल रिचार्ज आणि त्यातून मिळणाऱ्या इंटरनेटशिवाय मोबाईल वापरणं आजकाल शक्यच नाही. कारण इंटरनेटच्या माध्यमातूनच आपण आपली अनेक कामे घरबसल्या करू शकतो. अशावेळी कमी पैशाचा रिचार्ज करून पुरेल असा रिचार्ज प्लॅन मारण्याचा ग्राहकांचा कल आहे. मात्र इंटरनेट डेटा नेमका वाचवायचा तरी कसा? हे तुम्हाला माहितेय का? चला तर मग आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर सांगतो.

तुम्ही जर व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरत असाल तर यातील काही सेटिंग चेंज करून तुम्ही तुमचा इंटरनेट डेटा वाचवू शकता. व्हाट्सअप हे जगातील सर्वात लोकप्रिय असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून तुम्ही व्हाट्सअपच्या माध्यमातून फोटो- विडिओ शेअर, व्हॉईस-व्हिडिओ कॉलिंग आणि फाइल शेअरिंग करू शकता. व्हाट्सअप हे जवळपास सर्वांच्याच मोबाईल मध्ये असल्याने आणि सर्वात जास्त वापरात असणारे अँप असल्याने यासाठी अनेक वेळा जास्त इंटरनेट डेटा खर्च होतो. मात्र यात असे काही सेटिंग आहेत ज्यात बदल केल्यास तुम्ही तुमचा इंटरनेट डेटा वाचवू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲप वापरण्यासोबतच युजरला डेटा सेव्ह करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे. तुम्ही व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी WhatsApp वापरत असल्यास, तुम्ही Low Data Usage Mode करू शकता. या मोडमध्ये, कॉलिंगचा अनुभव पूर्वीसारखाच राहतो, परंतु डेटाचा वापर बऱ्याच प्रमाणात कमी होतो. हा मोड अशा प्रकारे इनेबल करा- Settings>Storage And Data>Use Less Data For Calls

व्हॉट्सॲप यूजर्स हा अनेक ग्रुपचा भाग असतो. अशा स्थितीत अनेक वेळा मीडिया फाइल्स डाऊनलोड करून फोनमधील डेटाचा वापर सुरू होतो. अनेक वेळा अशा ऑटो डाऊनलोड फाईल्सही उपयोगी पडत नाहीत. आणि आपल्याला माहित नसतानाही अनेक अनावश्यक फोटो किंवा विडिओ आपोआप डाउनलोड होत असतात. परंतु तुम्ही या फाइल्स डाउनलोड होण्यापासून रोखू शकता. यासाठी व्हॉट्सॲपवरील मीडिया ऑटो-डाउनलोड सेटिंग बंद ठेवावी लागेल. तुम्ही ही सेटिंग अशा प्रकारे इनेबल करू शकता- Settings>Storage And Data>Media Auto download>When Using Mobile Data

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वरुणराजा बरसला; 24 तासात विक्रमी 560 मिलीमीटर पावसाची नोंद

सातारा – सातारा जिल्ह्यात मी,मागील २ दिवसात धुव्वाधार पाऊस कोसळत असून नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. आजही जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर कऱण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरूच असून मागील चोवीस तासात विक्रमी ५६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज देखील संपूर्ण परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीवर जाण्याची शक्यता आहे.

24 तासात विक्रमी पावसाची नोंद

कोयना धरण क्षेत्रात मागील चोवीस तासात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगरला १८७ मिलीमीटर, महाबळेश्र्वरमध्ये ९९ मिलीमीटर तर नवजा येथे सर्वाधिक २७४ मिलीमीटर पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे धरणात प्रतिसेकंद ४८ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ४.५० टीएमसीने वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाचं धुमशान सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सकाळी धरणातील पाणीसाठा ४० टीएमसी झाला आहे.

सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने रविवारी सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता, तर सोमवारी देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रालय नियंत्रण कक्षाने नागरीकांना सावधानता बाळगण्याचं सुचित केलं आहे. संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास नद्यांचे पाणी इशारा पातळीवर जाऊ शकते.

Weather Update | IMD चा मोठा इशारा; आज ‘या’ भागाला रेड अलर्ट जारी, शाळा कॉलेजही राहणार बंद

Weather Update

Weather Update | जुलै महिना सुरू झाला, तेव्हापासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. कोकणात तर अति मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोकणातील अनेक लोकांचे जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. हवामान खाते देखील रोज हवामानाबद्दलचे आपले अंदाज व्यक्त करत असतात. अशातच आता हवामान विभागाने आज म्हणजेच 15 जुलै 2024 रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update) आजही कोकणासह मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील काही भागांना रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.

या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी | Weather Update

हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार आज रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे. कारण या भागांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाला देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे या भागातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे देखील सांगण्यात आलेले आहे.

मुंबई पुण्यातही पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार आज मुंबई, पुणे, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईत गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना देखील खूप त्रास होत आहे.

आज मुंबई कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. आज कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये देखील चांगलाच पाऊस पडणार आहे. तसेच सांगली, धाराशिव, सोलापूर, लातूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ‘तीर्थ दर्शन’; 66 स्थळांचा समावेश, काय आहे पात्रता?

Mukhyamantri Teerth Darshan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जेष्ठ नागरिकांना उतारवयात देवदर्शन करता यावं, कोणतीही आर्थिक अडचण पडू नये यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजना (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) जाहीर केली होती. या योजनेतील पात्र नागरिकांचा प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. महत्वाची बाब म्हणजे फक्त राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील तीर्थस्थळांनाही भेट देता येईल. आता या योजनेचे शासकीय परिपत्रकही काढण्यात आले असून यामध्ये कोणकोणत्या तीर्थस्थळांचा समावेश आहे? आणि यासाठी पात्रता काय आहे ते आज आपण सविस्तर जाणून घेऊयात….

या तीर्थ दर्शनासाठी रेल्वे, तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाईल. ही समिती अर्जांची छाननी करून पात्र व्यक्तींची निवड प्रक्रिया पूर्ण करेल. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल. जास्त अर्ज आल्यास लाभार्थी निवड लॉटरीद्वारे होईल.

पात्रता आणि अटी जाणून घ्या-

मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजना (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) हि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी आहे.
यातील एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार राहील.
प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा ३० हजार कमाल आहे. यामध्ये राहण्याची सोय, जेवण इत्यादी बाबींचा समावेश आहे.
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
तुमच्या घरात ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवा.

कोणकोणत्या तीर्थस्थळांचा समावेश? Mukhyamantri Teerth Darshan Yojana

मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजनेच्या (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) माध्यमातूम जेष्ठ नागरिक महाराष्ट्रातील ६६ तीर्थस्थळांना भेट देऊ शकतात. यामध्ये विठोबा मंदिर (पंढरपूर), शिखर शिंगणापूर (सातारा), महालक्ष्मी (कोल्हापूर), ज्योतिबा (कोल्हापूर), जैन मंदिर (कोल्हापूर), रेणुका देवी मंदिर (माहूर), गुरुगोविंदसिंग समाधी (नांदेड), खंडोबा मंदिर (मालेगाव), संत नामदेव देवस्थान (उंब्रज, नांदेड), तुळजाभवानी मंदिर (तुळजापूर), संत एकनाथ समाधी (पैठण), घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (वेरूळ), जैन स्मारके, वेरूळ लेणी, विघ्नेश्वर (ओझर, नाशिक), संत निवृत्तीनाथ समाधी (नाशिक), त्र्यंबकेश्वर मंदिर, फेरी नाशिक, सप्तशृंगी (वणी), काळाराम मंदिर नाशिक, मांगी-तुंगी जैन मंदिरे (नाशिक), गजपंथ (नाशिक), सिद्धिविनायक मंदिर (नगर), शनी शिंगणापूर, श्रीक्षेत्र भगवानगड (नगर), बल्लाळेश्वर (पाली), गजानन महाराज मंदिर (शेगाव), एकवीरा देवी (कार्ले), दत्त मंदिर (औदुंबर), केदारेश्वर मंदिर (बीड), वैजनाथ मंदिर (परळी), पावस, गणपतीपुळे, मार्लेश्वर (रत्नागिरी), महाकाली देवी (चंद्रपूर), काळूबाई मंदिर (सातारा), अष्टदशभुज (रामटेक), नागपूर दीक्षाभूमी, चिंतामणी (कळंब), चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ (कॅवेल), सेंट अंड्र्यू चर्च, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, सीप्झ (अंधेरी), गोदीजी पार्श्वनाथ मंदिर, नेसेट एलियाहू, शार हरहमीम सिनेगॉग, मॅगेन डेव्हिड सिनेगॉग (भायखळा), सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च (ठाणे), अग्यारी-अग्निमंदिर (ठाणे), मयुरेश्वर मंदिर (मोरगाव), चिंतामणी मंदिर (थेऊर), गिरिजात्मज मंदिर (लेण्याद्री), महागणपती मंदिर (रांजणगाव), खंडोबा मंदिर (जेजुरी), संत ज्ञानेश्वर समाधी (आळंदी), भीमाशंकर ज्योतिर्लिंग (खेड), संत तुकाराम समाधी (देहू), संत चोखामेळा समाधी (पंढरपूर), संत सावतामाळी समाधी (माढा) या तीर्थस्थळांचा समावेश आहे.

फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठापासून चपात्या करत असाल तर सावधान; शरीरासाठी आहे हानिकारक

Chapati Making

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चपाती- भाजी हा भारतीयांच्या जीवनातील मुख्य पदार्थ आहे. चपाती- भाजीशिवाय कोणाचेही जेवण पूर्ण होत नाही. परंतु चपात्या अगदी हलक्या फुलक्या, मऊ होण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. अनेक लोक हे फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवतात आणि नंतर त्यापासून चपात्या बनवतात. परंतु फ्रीजमध्ये ठेवलेल्या बनवलेल्या पिठाच्या चपात्यांपासून तुमच्या आरोग्याला समस्या निर्माण होऊ शकते.

अने वेळा आपण चपातीचे पीठ मळून घेतो आणि नंतर ते पीठ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवतो. नंतर त्या पिठापासून चपात्या करून खातो. परंतु अशा चपात्या तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठामधील पोषकतत्व कमी होतात. त्याचप्रमाणे फ्रिजमध्ये जास्त वेळ राहिल्याने त्यातील जीवनसत्व आणि मिनरल्स देखील कमी होतात. याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे फ्रिजमधील गॅसचा त्या पिठावर परिणाम होतो. आणि त्यामुळे आपल्या आरोग्याला देखील धोका निर्माण होतो.

मळलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात फंगस निर्माण होण्याचा धोका वाढतो. अशा पिठापासून बनवलेली चपाती खाल्ली, तर त्यापासून पोट दुखी, उलट्या आणि जुलाब्यांसारखे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे ताज्या पिठापासून बनवलेल्या चपात्यांची चव चांगली लागते. तर फ्रीजमध्ये बनवलेले पिठापासून बनवलेल्या चपात्यांची चव वेगळी लागते. फ्रिजमध्ये ठेवलेला पिठापासून बनवलेल्या चपात्या या पचायला देखील कठीण असतात. त्यामुळे तुमच्या पोटात गॅस ऍसिडिटी त्याचप्रमाणे पचनाशी संबंधित अनेक समस्या देखील उद्भवू शकतात.

मळलेल्या पिठामध्ये बॅक्टेरियांची वाढ खूप लवकर होते. जर हे पीठ तुम्ही जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवले, तर यामध्ये वेगाने बॅक्टेरिया वाढतात. जे आपले आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. त्यामुळे नेहमी पीठ मळून झाल्यावर लगेच त्याच्या चपात्या करा. त्यामुळे त्यातील पोषक तत्वे संतुलित राहतात. आणि आपले आरोग्य देखील चांगले राहते. पीठ मळून झाल्यावर तुमचे हात आणि भांडी स्वच्छ करा. त्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगसचा धोका कमी होतो.

FD Interest Rate | दीर्घ काळासाठी ‘या’ बँकांतील FD मध्ये करा गुंतवणूक; मिळेल चांगला परतावा

FD Interest Rate

FD Interest Rate | अनेक लोक हे भविष्याचा विचार करून आजच काही ना काही गुंतवणूक करत असतात. अनेक लोक बँकेच्या FD (FD Interest Rate) मध्ये गुंतवणूक करून ठेवत असतात. कारण बँकेची FD सगळ्यात सुरक्षित मानली जाते. यामध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी देखील पैसे गुंतवणूक करा. अशातच जर तुम्हाला पाच वर्षासाठी FD करायची असेल तर कोणत्या बँका किती व्याजदर देतात? हे माहीत असणे देखील गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार आहोत. ज्या पाच वर्षाच्या FD वर खूप चांगला व्याजदर देतात. आता त्या बँका कोणत्या आहेत? हे आपण जाणून घेऊया.

बँक ऑफ बडोदा | FD Interest Rate

बँक ऑफ बडोदा ही सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. ही बँक पाच वर्षाच्या FD वर वार्षिक 6.5 टक्के दराने व्याज देत असते. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर 7.5 टक्के दराने व्याज मिळते.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील देशातील एक सगळ्यात मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या नियमित नागरिकांना पाच वर्षांच्या FD योजनेवर 6.5% दराने व्याजदर देते. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5% दराने व्याजदर देते. त्याचप्रमाणे बँकेची विशेष योजना अमृत कलश योजना ही 400 दिवसांची एफडी योजना आहे. या योजनेमध्ये नागरिकांना 7.10% दराने वार्षिक व्यास मिळते तर जेष्ठ नागरिकांना 7.60% दराने व्याज मिळते.

एचडीएफसी बँक

खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक ही सगळ्यात आघाडीची बँक आहे. ही बँक पाच वर्षांच्या FD वर त्यांच्या सामान्य नागरिकांना वार्षिक 60 टक्के दराने व्याज देते. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.5% दराने व्याज देते हे नवीन 9 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालेले आहेत.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक ही खाजगी क्षेत्रातील एक बँक आहे. ही बँक त्यांच्या सामान्य नागरिकांना आणि जेष्ठ नागरिकांना 5 वर्षाच्या FD योजनेवर 6.25 दराने व्याजदर देते. हे नवीन 19 एप्रिल 2024 पासून लागू झालेले आहेत.

पंजाब नॅशनल बँक | FD Interest Rate

पंजाब नॅशनल बँक ही त्यांच्या सामान्य नागरिकांना पाच वर्षाच्या FD योजनेवर 6.25 टक्के दराने व्याजदर देते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7% दराने व्याज देते. त्याचप्रमाणे अति जेष्ठ नागरिकांना म्हणजेच 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना 7.3% दराने व्याजदर देते.

Senior Citizen Saving Scheme | दरमहा मिळणार 20000 रुपये, पोस्ट ऑफिसने जेष्ठयांसाठी आणली खास योजना

Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme | आजकाल महागाई खूप वाढलेली आहे. जसजसा काळ जाईल, तसतशी महागाई देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे अनेक लोक हे सेवानिवृत्तीची आताच तयारी करून ठेवतात. सेवानिवृत्तीची बचत करण्यासाठी सध्या बाजारात अनेक योजना आहेत. त्याचप्रमाणे सरकार देखील जेष्ठ नागरिक यांसाठी अनेक योजना असतात. अशातच ही एक नवीन योजना आहे. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme0 असे आहे. ज्यामध्ये तुम्ही सेवानिवृत्तीचे पैसे गुंतवू शकतात. आणि त्यानंतर दर महिन्याला तुम्हाला नियमित उत्पन्न चालू होईल. आता या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा | Senior Citizen Saving Scheme

पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीमची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये 1000 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता. ही योजना वृद्धांसाठी सर्वात सुरक्षित पर्याय आहे. यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्न मिळत राहील आणि निवृत्तीनंतर पैशाची चिंता करावी लागणार नाही. ही योजना 5 वर्षांसाठी उपलब्ध आहे.

हे खाते कोण उघडू शकेल?

ज्यांचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही वयाच्या 55 ​​ते 60 व्या वर्षी VRS (स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना) अंतर्गत सेवानिवृत्ती घेतली असेल तर तुम्ही हे खाते देखील उघडू शकता. संरक्षण सेवेतील निवृत्त कर्मचारी वयाच्या 50 व्या वर्षीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतही हे खाते उघडू शकता.

खाते कसे उघडायचे?

वृद्ध लोक कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन SCSS खाते उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपये जमा करावे लागतील. तुम्ही कमाल 30 लाख रुपये जमा करू शकता. 1000 रुपयांच्या पटीत पैसे जमा केले जाऊ शकतात.

परतावा | Senior Citizen Saving Scheme

या योजनेत तुम्हाला वार्षिक 8.2 टक्के व्याज मिळते. जर एखाद्या व्यक्तीने 30 लाख रुपये जमा केले तर त्याला वार्षिक 2.46 लाख रुपये व्याज मिळेल, जे दरमहा अंदाजे 20,000 रुपये आहे. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वृद्धांसाठी एक उत्तम पर्याय आहे. यातून त्यांना निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळत राहते आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होतात. ही योजना वृद्धांना आर्थिक सुरक्षा आणि स्थिरता प्रदान करते, जेणेकरून ते त्यांच्या जीवनाचा आनंद घेऊ शकतील.

Airtel Recharge Plan | Airtel ने ग्राहकांसाठी आणले सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन; आजच घ्या लाभ

Airtel Recharge Plan

Airtel Recharge Plan | भारतातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्हीआयने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. सगळ्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढलेल्या आहे. हे नवीन नियम 3 जुलैपासून देशभरात लागू करण्यात आलेले आहेत.

रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे आता जिओ, एअरटेल आणि व्हीआय युजर्सनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. परंतु अशातच आता एअरटेलने (Airtel Recharge Plan) त्यांच्या ग्राहकांना दिलासा दिलेला आहे. त्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी काही स्वस्त प्लॅन देखील आणलेले आहेत.

एअरटेलने आणलेल्या या नवीन प्लॅन्सची किंमत 100 रुपये पेक्षा कमी असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 11 रुपये, 49 रुपये, 99 रुपये, 22 रुपये, 33 रुपयांचा रिचार्ज प्लॅन मिळणार आहे. यामध्ये युजर्सला कमी किमतीत अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. आता हे नवीन प्लॅन्स नक्की कशी आहेत हे आपण जाणून घेऊया.

11 रुपयांचा रिचार्ज प्लॅन | Airtel Recharge Plan

एअरटेलचा 11 रुपयांचा प्लॅन अतिशय स्वस्त असा प्लॅन आहे. यामध्ये युजरला एका तासासाठी अनलिमिटेड डेटा मिळतो. जेव्हा तुम्हाला रोज असणाऱ्या इंटरनेटपेक्षा जास्त इंटरनेटची गरज लागते. तेव्हा तुम्ही हा प्लॅन ऍक्टिव्ह करू शकता.

49 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

तुमचा दर दिवसभराचा डेटा प्लॅन संपला तर तुम्ही 49 रुपयांचा हा प्लॅन करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण दिवसाच्या व्हॅलेडीटी सह अनलिमिटेड डेटा मिळतो.

99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

99 रुपयांचा हा डेटा प्लॅन दोन दिवसांच्या व्हॅलेडीटी सह येतो. तुम्ही दोन दिवस अनलिमिटेड इंटरनेटचा वापर करू शकता.

22 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

22 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये युजर्सला एक जीबी इंटरनेट डेटा मिळतो. त्याचप्रमाणे हा डेटा सुपरफास्ट असण्याची हमी देखील एअरटेल ने दिलेली आहे

33 रुपयांचा रिचार्ज प्लॅन | Airtel Recharge Plan

33 रुपयांचा हा डेटा प्लॅन देखील एक दिवसांच्या व्हॅलिडीटी सह येतो यामध्ये ग्राहकाला दोन जीबी डेटा मिळतो.