Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 630

Chandrayaan 3 | चंद्रयान-३ मिशनला मोठं यश; प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या निर्मितीबाबत केलं महत्वाचे संशोधन

Chandrayaan 3

Chandrayaan 3 | मागील वर्षीच म्हणजे 2023 मध्ये भारताचे मिशन चंद्रयान 3 यशस्वी झाले. याआधी दोन वेळा हे मिशन अयशस्वी झालेले आहे. अशातच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान 3 ला दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड करत एक मोठा इतिहास निर्माण केलेला होता. दक्षिण ध्रुवावर पोचणाऱ्या भारत हा पहिला देश ठरलेला आहे. अशातच आता चंद्रयान 3 संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे. ज्यामुळे आता संशोधकांना चंद्र जवळून समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे. Chandrayaan 3 | चंद्रयान-३ मिशनला मोठं यश; प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या निर्मितीबाबत केलं महत्वाचे संशोधन प्रज्ञान (Chandrayaan 3) रोवरने शिवशक्ती प्वाईंटजवळ एक संशोधन केलेले आहे. हे संशोधन चंद्राची निर्मिती तेथील दगड जमीन यांसंदर्भातील आहे.

चंद्रावर मिळाले खडकांचे तुकडे | Chandrayaan 3

चंद्रयान 3 चा विक्रम लँडमध्ये असणाऱ्या प्रग्यान रोवरने चंद्राच्या पृष्ठभागावरील जवळपास 103 किलोमीटर अंतर पूर्ण केलेले आहे. आता या भागामध्ये नक्की काय असणार आहे? याचे कुतूहल सगळ्या वैज्ञानिकांना आहे. चंद्रयान 3 चंद्रावरच्या ठिकाणी लॅंड झाले. त्या ठिकाणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिव प्वाइंट असे नाव दिलेले आहे. या ठिकाणी अनेक लहान खडकांचे तुकडे सापडलेले आहे. ज्याची लांबी ही 1 सेंटीमीटर ते 11.5 सेंटीमीटर एवढी आहे. तसेच एकाही खडकाची व्यास ही 2 मीटरपेक्षा जास्त नाही.

प्रज्ञान शिवशक्ती प्वाइंटच्या पुढे वाटचाल

चंद्रयान 3 च्या संशोधनात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. हे प्रज्ञान शिवशक्ती प्वाइंटच्या जवळपास 39 मीटर पुढे गेलेले आहे. त्या ठिकाणी त्याला खडक मिळालेला आहे. त्याचा आकार देखील आधीच्या खडकांपेक्षा मोठा आहे. तसेच या शिवशक्ती प्वाइंट पश्चिमेला दहा मीटर व्यासाचा एक खड्डा देखील आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या भागात खडकांचे पुनर्वितरण झालेले असेल, असा देखील अंदाज लावला जात आहे.

इस्रोकडून एका नवीन मोहिमेला सुरुवात | Chandrayaan 3

इस्रोचे चंद्रयान 3 यशस्वीपणे पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता इस्रो आता एका नवीन मोहिमेला सुरुवात करत आहे. याबाबतची माहिती इस्रोचे प्रमुख एस स्वामीनाथ यांनी सांगितलेले आहे. भारत आता चंद्रयान (Chandrayaan 3) मिशन 4 ची अंतिम योजना तयार केलेली आहे. परंतु आता ही योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

Koyna Dam Water Storage : कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; साताऱ्यासाठी पावसाचा यलो अलर्ट

Koyna Dam Water Storage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून पावसाच्या सऱ्या कोसळत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात वरूणराजा बरसत असून शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यात सुद्धा मोठा पाऊस सुरु आहे. पावसाची बॅटिंग अजूनही सुरु असून त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात गेल्या 24 तासात परिसरात 133 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात 2 टीएमसीची पाण्याची वाढ (Koyna Dam Water Storage) झाली असून, एकूण पाणीसाठी हा 23 टीएमसी झाला आहे.

23 टीएमसी पाणीसाठा शिल्लक- Koyna Dam Water Storage

कोयना धरण हे 105 टीएमसी क्षमतेचे धरण आहे. महाराष्ट्रासाठी हे धरण म्हणजे एकप्रकारचे वरदान आहे. सध्या कोयना धरणात 21000 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु असून 23 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. साताऱ्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जर असाच पाऊस सुरु राहिला तर कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ (Koyna Dam Water Storage) होऊ शकते. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्याच्या कोकण पट्ट्यासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसासाठी चांगली परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टी भागासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकच्या घाटमाथ्यावर आज पावसाचा जोर वाढताना दिसेल. या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यात सुद्धा तब्बल 21 दिवसानंतर पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

Car Insurance | पाण्यात गाडी बुडाली किंवा वाहून गेली तर कोणता विमा मिळतो? जाऊन घ्या नवा नियम

Car Insurance

Car Insurance | यावर्षी सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. अगदी शहरांपासून ते गावापर्यंत अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे अनेकवेळा आपण पावसामध्ये वाहन बुडल्याच्या घटना पाहिलेल्या आहेत. सध्या दिल्ली आणि उत्तराखंडमधून अशा अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या ठिकाणी पाणी पाण्यावर गाड्यात रंगत जाताना दिसत आहे. अनेकवेळा आपल्या गाडीचा एक्सीडेंट झाल्यावर आपल्याला विमा कंपनीकडून भरपाई मिळते. परंतु जर आता पावसात आणि पुरात गाडी पाहून गेली तर आपल्याला विमा संरक्षण (Car Insurance) मिळेल का असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याच प्रश्नांच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

पावसाळ्यामध्ये जर गाडी बुडाली तर कारमध्ये पाणी शिरते आणि इंजिन देखील खराब होते. आणि ते दुरुस्त करण्यासाठी खूप खर्च येतो. यासोबतच अनेक उपकरणे खराब होऊ शकतात. त्याच्या दुरुस्तीसाठी देखील मोठा खर्च येतो.

कोणत्या प्रकारचे कार विम्याचे फायदे मिळतील? | Car Insurance

जर तुमच्याकडे कार इन्शुरन्स असेल तर तुम्ही अशा सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता. नैसर्गिक आपत्ती, अपघात, चोरी इत्यादींसाठी सर्वसमावेशक विमा पॉलिसी अधिक फायदेशीर आहे. यामध्ये, खराब हवामानामुळे वाहनाचे झालेले नुकसान दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी कव्हर मिळते. जरी हे धोरण ऐच्छिक आहे. जर तुम्ही सर्वसमावेशक विमा पॉलिसी घेतली असेल, तर तुम्ही पूर, आग, चोरी यामुळे झालेल्या सर्व नुकसानीवर दावा करू शकता. याचे कारण असे की सर्वसमावेशक धोरणात पूर किंवा पाण्यामुळे होणारे सर्व प्रकारचे नुकसान समाविष्ट आहे.

विमा घेताना या गोष्टी लक्षात ठेवा | Car Insurance

विमा घेताना अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. आपण ज्या देशात राहतो त्या देशातील शहरे. पावसानंतर पूरसदृश परिस्थिती उद्भवल्यास अशा परिस्थितीत सर्वसमावेशक विमा पॉलिसी घेणे चांगले. मानक सर्वसमावेशक धोरणासोबत, ॲड-ऑन कव्हर जसे की शून्य घसारा आणि इंजिन संरक्षण कव्हर घेतले पाहिजे. कारण स्टँडअलोन पॉलिसीमध्ये पाण्यामुळे इंजिनचे झालेले नुकसान कव्हर केले जात नाही. म्हणूनच, जर तुम्ही इंजिनच्या बिघाडासाठी ॲड-ऑन कव्हर घेतले असेल, तर तुम्ही कंपनीकडे संपूर्ण दावा करू शकता.

मिलिंद नार्वेकरांच्या एन्ट्रीने विधानपरिषदेत कोणाचा गेम होणार??

milind narvekar vidhan parishad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत येत्या २७ जुलै २०२४ रोजी संपत असून या रिक्त होऊ घातलेल्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी मतदान होत आहे. या ११ जागांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसताना महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या रूपाने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. नार्वेकरांच्या या अचानक झालेल्या एन्ट्रीमुळे कोणाची गेम होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य असेल.

विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन, तर काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी एक उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीने सुरुवातीला दोन जागा लढवण्याची तयारी केली होती. यापैकी एक जागा काँग्रेस लढवणार होती तर दुसऱ्या जागेसाठी शेकापच्या जयंत पाटलांना पवार गट आणि ठाकरे गट पाठिंबा देतील, असे ठरले होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने ऐनवेळी मिलिंद नार्वेकर याना उमेदवारी दिल्यामुळे रंगत वाढली आहे. नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे कोणाचे टेन्शन वाढणार? कोणाचा गेम होणार ते निकालानंतरच समजेल.

23 मतांचा कोटा-

विधान परिषदेसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा २३ वर आला आहे. पक्षीय बलाबल बघायचं झाल्यास सध्या विधानसभेत काँग्रेसचे ३७, ठाकरे गटाचे १५ आणि शरद पवार गटाचे १३ असे एकूण ६५ आमदार आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख उद्धव ठाकरेंसोबत असल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ ६६ पर्यंत जाते. त्यामुळे महाविकास आघाडीला आपले तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मते फोडावी लागतील.

कोण कोण विधान परिषदेच्या रिंगणात ?

भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोत,अमित गोरखे,
शिंदे गट : भावना गवळी, कृपाल तुमाने
अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस : डॉ. प्रज्ञा सातव उद्धव सेना :
ठाकरे गट– मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील

एक अकेला मोदी-शाह पर भारी; सामनातून राहुल गांधींचे तोंडभरून कौतुक

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा आणि हिंदूंचा ठेका घेतलेला नाही, असा जोरदार हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. भर संसदेत मोदी, शहा व त्यांच्या भाजपचा मुखवटा गांधी यांनी ओरबाडून काढला व एकच गोंधळ झाला. त्यामुळे गेल्या दहा वर्षात लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागण्याची वेळ अमित शहांवर आली. याबद्दल गांधी यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना राहुल गांधी यांनी मोदी यांच्या देवत्वाचा शेंदूर खरवडून काढला. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हणताच मोदी यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष लोकसभेत अवतरताच हिंदुत्वाच्या नावावर मनमानी करणाऱ्यांचा टांगा पलटी झाला आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने राहुल गांधींचे तोंडभरून कौतुक केलं आहे.

राहुल गांधी यांनी सांगितले, “हे लोक हिंदुत्वाच्या नावावर दंगली घडवत आहेत. मत्सर, द्वेष पसरवत आहेत. खरे हिंदुत्व संयमी आणि सत्याची कास निर्भयपणे धरणारे आहे.” यावर पंतप्रधान मोदी हे तगमगत उठले व गांधी हे हिंदू समाजाचा अपमान करीत असल्याचे बोलले. यावर गांधी यांनी ताडकन उत्तर दिले, “महाशय, तुम्हाला हिंदुत्व कळलेच नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.” यावर मोदी यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. मोदी-शहांच्या मैदानात शिरून त्यांना अशा पद्धतीने कोणीच सुनावले नव्हते. दहशत व पाशवी बहुमताच्या बळावर या जोडगोळीने संसद आपल्या टाचेखाली ठेवण्याचा प्रयत्न केला, पण गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत विरोधी पक्ष लोकसभेत अवतरताच हिंदुत्वाच्या नावावर मनमानी करणाऱ्यांचा टांगा पलटी झाला आहे.विरोधी पक्षनेते म्हणून मी तुमच्याशी हस्तांदोलन केले, तेव्हा तुम्ही भलत्याच ताठ कण्याने उभे होता, पण मोदींशी हात मिळवताना तुम्ही सपशेल वाकलात. म्हणजे लोकशाहीच वाकली असे म्हणावे लागेल.” गांधी यांच्या हल्ल्यामुळे संसदेतील प्रतिष्ठित चमचे व अंधभक्त उताणेच पडले.

एकाच फटक्यात शंभरावर खासदारांचे निलंबन करून मोकळया सभागृहात महत्त्वाचे कायदे मंजूर करून घेणाऱ्या लोकसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेत्याने जे खडे बोल सुनावले, त्यामुळे गेली दहा वर्षे मरगळलेल्या संसदेच्या भिंतींनाही जाग आली. ‘आपण बायोलॉजिकल नसून परमेश्वराचे पुत्र आहोत. आपला थेट संवाद परमेश्वराशी आहे’, असे मोदी सांगतात. गांधी यांनी या अवताराची चांगलीच खिल्ली उडवली. ते म्हणाले की, ‘मोदीजी, नोटाबंदी करण्याचा संदेश थेट वरून देवाकडून आला काय? मुंबई विमानतळ अदानी यांना देण्यासाठीसुद्धा वरूनच ऑर्डर आली असेल खटाखट खटाखट.’ यावर मोदी-शहांना लोकसभा अध्यक्षांकडे संरक्षण मागण्याशिवाय पर्याय राहिला नाही. संसदेत नरेंद्र मोदी हे स्वतःच्या कर्माने चेष्टेचा विषय झाले. मोदी यांचे हिंदुत्व हे नफरत आणि हिंसा फैलावणारे आहे. हिंदू-मुसलमानांत भांडणे लावणारे आहे, पण पंतप्रधान मोदी एकदाही हिंसाचारग्रस्त मणिपुरात गेले नाहीत. भाजप भय आणि द्वेषाचे विष पसरवतो. हा राष्ट्रवाद नाही आणि हिंदुत्व तर नाहीच. हिंदुत्व हे संस्कारी आणि सुसंस्कृत आहे. हा संस्कार भाजपमध्ये नाही. मोदी यांना निवडणूक प्रचारात ‘मुजरा’ आठवला. मुसलमान तुमच्या बायकांच्या गळय़ातील मंगळसूत्रे खेचतील. तुमच्याच दारात दोन म्हशी असतील तर एक म्हैस घेऊन जातील, अशी उटपटांग भाषणे करूनही मोदी यांना हिंदूंची मते मिळाली नाहीत. महाराष्ट्र, प. बंगाल, केरळ, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत त्यांचा सपशेल पराभव झाला. मोदी यांचे नकली हिंदुत्वाचे नाणे अजिबात चालले नाही व सोमवारी संसदेत गांधी यांनी मोदी-शहांना नामोहरम केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, किरेन राहुल रिजिजू, रविशंकर प्रसाद, भूपेंद्र यादव हे एका बाजूला व दुसऱ्या बाजूला एक अकेला’ राहुल गांधी या सगळय़ांवर भारी पडले. मोदी-शहांचा अहंकार संसदेत चूर करण्याचे काम गांधी यांनी केले. ईडी, सीबीआयचा दुरुपयोग करून संपूर्ण विरोधी पक्षाला मोदी-शहा घाबरवत राहिले. आता विरोधी पक्षनेते झालेल्या राहुल गांधींना रोखा, त्यांच्यापासून संरक्षण द्या, अशी याचिका लोकसभा अध्यक्षांकडे करण्याची वेळ या अहंकाऱ्यांवर आली. काळाने घेतलेला हा सूड आहे. मोदी-शहांना यापेक्षा वाईट दिवस भविष्यात पाहावे लागणार आहेत. गांधी यांना थांबवणे आता सोपे नाही. ईडी, सीबीआयला हा संदेश एव्हाना गेलाच असेल! असं म्हणत सामनातून भाजपला इशारा देण्यात आलाय.

Itching Problem | पावसाळ्यात खाज-खुजलीच्या समस्येपासून मिळेल त्वरीत आराम; करा हे घरगुती उपाय

Itching Problem

Itching Problem | अनेक लोकांना पावसाळा आवडतो. पावसाळ्यात अगदी निसर्ग देखील हिरवा गार झालेला असतो. आणि वातावरण थंड असते. परंतु हा पावसाळा येताना त्याच्यासोबत अनेक शारीरिक समस्या देखील घेऊन येतात. पावसाळ्यामध्ये जास्त डेंगू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. तसेच त्वचेचे संसर्ग देखील वाढत असतो. पावसात भिजल्याने तुमच्या त्वचेला खाज येऊ शकते. आणि त्यामुळे तुम्हाला अनेक त्वचेच्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. आता तुम्ही येणाऱ्या या खाजेवर (Itching Problem) काही घरगुती उपाय करून त्यापासून आराम मिळू शकता. आता तेच घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

खोबरेल तेल | Itching Problem

नारळ तेल त्वचेसाठी सर्वोत्तम तेल आहे. जे केवळ खाज आणि इतर समस्या दूर करत नाही तर त्वचेला हायड्रेट ठेवते. खोबरेल तेलामध्ये असलेल्या फॅटी ऍसिडच्या गुणधर्मांमुळे ते त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

बर्फाचे तुकडे

पावसाळ्यात होणारी खाज कमी करण्यासाठी बर्फाचे तुकडे वापरणे देखील खूप फायदेशीर आहे. थंड गोष्टी त्वचेला बधीर करतात, त्यामुळे खाज येत नाही.

कोरफड जेल

एलोवेरा जेल केवळ खाज सुटणेच नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवरही रामबाण उपाय आहे. कोरफड वेरा जेलमध्ये थंड आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे उष्णतेमुळे होणारी खाज, सनबर्न आणि इतर अनेक समस्यांवर एक प्रभावी उपचार आहे.

पुदिन्याचे तेल | Itching Problem

पावसाळ्यात त्वचेवर होणाऱ्या खाज सुटण्यासाठी पुदिन्याचे तेल खूप प्रभावी आहे. यामुळे खाज सुटण्यासोबतच शरीर थंड राहते. खाज सुटण्याव्यतिरिक्त दाद किंवा खरुजचा त्रास होत नाही. पुदिन्यात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संसर्ग रोखण्याचे काम करतात

Hathras Stampede : सत्संग मैदान बनलं ‘स्मशानभूमी’!!! चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू; जबाबदार कोण?

Hathras Stampede

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये येथील भोले बाबांचा सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत (Hathras Stampede) आत्तापर्यंत तब्बल ११६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं देशभरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. भोले बाबांच्या सत्संगासाठी अलोट गर्दी झाली होती. पण सत्संग संपल्यानंतर उन्हात बसलेल्या लोकांनी घरी परतण्यासाठी गर्दी केली. परीस्थिती इतकी चिघळली कि लोक एकेकेकांच्या अक्षरशः अंगावरून जाऊ लागले. यूपी पोलिसांनी ‘भोले बाबां’च्या शोधात मैनपुरी जिल्ह्यातील राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये शोधमोहीम राबवली, मात्र या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालाय.

नेमकं काय घडलं ?? Hathras Stampede

सत्संग संपल्यावर गुरुजींची गाडी निघाली. लोक त्याच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावले आणि चेंगराचेंगरी झाली. बाहेर पडण्याचे गेट खूपच अरुंद होता आणि रस्त्यात एक नाला देखील होता. आजूबाजूला चिखल होता. याच दरम्यान, चेंगराचेंगरी (Hathras Stampede) झाली. अनेक जण एकावर एक पडले. तरीही एकमेकांना तुडवत लोक जात होती. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला तर काहीजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मृतदेह, जखमींना ट्रक आणि इतर वाहनांमध्ये भरून सिकंदरौ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं. इतके मृतदेह होते की, शवाघर पूर्ण भरुन गेलं होतं. अखेर रुग्णालयाबाहेरच्या आवारात मृतदेह ठेवण्यात आले. तिथेच नातेवाईकांनी गर्दी केली होती. काही मृतदेहांची ओळख पटली होती, तर काहींची ओळख अजूनही पटलेली नव्हती.

आपल्या जवळच्या माणसांचा आणि नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचे पाहून आप्तेष्ठांचा आक्रोश ऐकू येत होता. सत्संगात इतके भाविक जमले की आयोजक आणि प्रशासनाची व्यवस्था कोलमडली, मग अपघातातील जखमींची संख्या इतकी वाढली की, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पुरेशी वाहनं नव्हती. या एकूण सर्व घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठक बोलावली. तसेच या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडलं जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही आदित्यनाथ यांनी दिली.

Cold And Cough | पावसाळ्यात सर्दी-खोकलासाठी करा घरगुती ‘हे’ उपाय; चुटकीसरशी मिळेल आराम

Cold And Cough

Cold And Cough | पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. या पावसामध्ये सर्दी आणि खोकल्याची समस्या मोठ्या प्रमाणात होते. पावसाळ्यात असणारे जिवाणू आणि विषाणू संसर्ग झपाट्याने वाढतो. त्यामुळे अनेक लोकांना खोकला, सर्दी या गोष्टींची लागण होत असते. परंतु ही सर्दी आणि खोकला होऊ नये किंवा झाल्यानंतर काय काळजी घ्यावी? हे माहीतच असणे गरजेचे आहे. आज आपण या लेखातून सर्दी आणि खोकला ( Cold And Cough) झाल्यानंतर काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल आणि डॉक्टरकडे जावे लागणार नाही.

चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा |  Cold And Cough

सर्दी, ताप आणि फ्लू टाळण्यासाठी, आपण आपल्या चेहऱ्याला सतत स्पर्श करू नये. वारंवार नाक आणि तोंडाला हात लावण्याची सवय असते. याशिवाय मास्क वापरा आणि कुटुंबातील कोणाला खोकला किंवा सर्दी होत असेल तर त्यांच्यापासूनही योग्य अंतर ठेवा.

उकळलेले पाणी प्या

पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात आजार होण्याचा धोका असतो. या ऋतूत कोणत्याही प्रकारचे संसर्ग टाळण्यासाठी फक्त उकळलेले पाणी प्या. याशिवाय सकाळी उठून कोमट पाणी लिंबू, लेमन ग्रास, मध किंवा पुदिन्यासोबत रिकाम्या पोटी प्यायल्यास सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो.

वाफ घेणे

पावसाळ्यात वाफ घेणे देखील फायदेशीर ठरू शकते. यामुळे छातीत साचलेला श्लेष्मा तर बाहेर पडतोच पण त्यामुळे बंद केलेले नाक सहज उघडण्यासही मदत होते. यासाठी, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही गरम पाण्यात लवंग तेल किंवा टी ट्री ऑइल घालून वाफ देखील घेऊ शकता, कारण त्यात अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत

गार्गल करणे

खोकला किंवा सर्दी झाल्यास गार्गल करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यासाठी कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ टाकून चांगले मिसळा. आता तुम्ही या पाण्याने दिवसातून दोनदा गार्गल कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होत नाही.

Pune News : लोणावळ्यातील घटनेनंतर पुणे प्रशासन सतर्क ; आता पर्यटन स्थळांसाठी नियमावली जारी

lonavala news

Pune News : ३० जूनला लोणावळ्यातील भुशी डॅम येथून कुटुंब वाहून गेल्याच्या घटनेनंतर पुणे (Pune News) प्रशासन खडबडून जागे झाले असून पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या काही ठिकांणाकरिता खास नियमावली घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांसाठी सुरक्षा उपायांची साखळीच तयार केली आहे, ज्यामध्ये धोकादायक क्षेत्रांची ओळख आणि सीमांकन, जीवरक्षक आणि बचाव पथकांची उपस्थिती आणि सुरक्षा फलकांची स्थापना यांचा समावेश आहे.

पावसाळ्यात, पुणे (Pune News) जिल्ह्यातील पश्चिम घाटातील भुशी आणि पवना धरण, लोणावळा, सिंहगड, माळशेज आणि ताम्हिणी आणि इतर ठिकाणांना मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात, अनेकदा अज्ञात आणि धोकादायक भागात जातात.पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी सोमवारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि या पर्यटन स्थळांवर संभाव्य धोकादायक ठिकाणे शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

धरण, धबधबे, तलाव, नद्या, खडक इत्यादीसारख्या विविध पर्यटन स्थळांवर धोकादायक ठिकाणे ओळखा आणि सुरक्षा रेषा आणि चेतावणी फलक उभारून त्यांना प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून चिन्हांकित करा जेणेकरून पर्यटक त्यांच्या पलीकडे जाऊ नयेत,” दिवसे यांनी एका अधिसूचनेत म्हटले आहे. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना सर्व उपाययोजना अंमलात आणण्यास सांगितले आणि कोणतीही जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. उपाययोजनांच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकारी व विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल, असेही ते म्हणाले.

काय आहे नियमावली ?(Pune News)

  • महसूल, वन, रेल्वे, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या एजन्सींनी पर्यटकांनी वारंवार येणाऱ्या पाणवठ्यांवर डायव्हर, बचाव नौका, जीवरक्षक, लाईफ जॅकेट तैनात करावेत.
  • एनजीओ, बचाव संस्था, ट्रेकर्स, एनडीआरएफ आणि स्थानिक लोकांना या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहभागी करून घ्यावे.
  • प्रथमोपचार सुविधा असलेल्या रुग्णवाहिकाही तैनात कराव्यात.
  • संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांना वनक्षेत्रात असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
  • वनविभागाने वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांच्या अतिक्रमणांवर कारवाई करावी आणि स्थानिक प्रशासनाने पर्यटकांसाठी वेळ निश्चित करून सूर्यास्तानंतर तेथे थांबणार नाही याची काळजी घ्यावी
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यक असल्यास कारवाई करा

Kitchen Tips : मुंग्यांना पळवण्यासाठी वापरून पहा ‘हे’ सरळ साधे घरगुती उपाय

rid from ants

Kitchen Tips : घरात आपण आपल्या कुटुंबासोयाबत राहत असतो असे जरी आपल्याला वाटत असले तरी आपण आपल्या घरात एकटे नसतो. घरात उपद्रव करणाऱ्या कीटकांचा वावर असतोच असतो. त्यातही मुंग्या म्हणजे बापरे…! सहजासजी निघून न जाणाऱ्या कितीही स्वच्छता केली तरी वारंवार येणाऱ्या लाल, काळ्या मुंग्या अगदी नकोशा वाटतात. अन्नपदार्थ , तेलकट पदार्थ जरा जरी फरशीवर सांडला तरी मुंग्या लागल्याच म्हणून समजा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुंग्यांना पळवण्यासाठी सरळ साधे घराच्या घरी करता येण्याजोगे उपाय सांगणार (Kitchen Tips) आहोत चला तर मग जाणून घेऊया…

काळी मिरी (Kitchen Tips)

मसाल्याचा पदार्थ म्हणून अन्नपदार्थांमध्ये वापरली जाणारी काळी मिरी ही घरातल्या मुंग्या पळवण्यासाठी उत्तम मानले जाते. घरात जिथे जिथे मुंग्या दिसतील तिथं काळी मिरची पावडर शिंपडा. याशिवाय वाटलेली लाल मिरची सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता ज्यामुळे (Kitchen Tips) मुंग्या लवकर मरतील आणि पडतील शिवाय पुन्हा येणार नाहीत.

खडू (Kitchen Tips)

उपद्रव करणाऱ्या मुंग्यांना घालवायचा असेल तर खडू हा मुंग्यांना पळवण्यासाठी उत्तम ठरतो. ज्या ज्या ठिकाणी मुंग्या फिरतात अशा ठिकाणी खडू फिरवा खास करून अशा ठिकाणी गोल बनवा जिथे सर्कल मधून मुंग्या बाहेर (Kitchen Tips) येणार नाहीत.

व्हिनेगर

एक प्रकारचे आम्ल असलेले व्हिनेगर हे घरातल्या वस्तूंची स्वच्छता करण्यासाठी , अन्नपदार्थ बनवण्यासाठी शिवाय मुंग्यांना पळवून लावण्यासाठी उत्तम उपाय आहे. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये विनेगर भरून ते मुंग्यांवर शिंपडा. घरातील दरवाजे खिडक्या आणि फरशीवर तुम्ही व्हाईट व्हिनेगर (Kitchen Tips) लावू शकतात त्यामुळे मुंग्या येणार नाहीत.

मिंट (Kitchen Tips)

मिंट म्हणजेच पुदिना हा सर्रास सगळ्या घरांमध्ये वापरला जातो. चटणी बनवण्यासाठी तर पुदिन्याचा वापर हा आवर्जून केला जातो. मात्र पुदिनाचा गंध हा स्ट्रॉंग असल्यामुळे पुदिनाचा वापर हा मुंग्यांना पळवून लावण्यासाठी होऊ शकतो. पुदिनाचे (Kitchen Tips) पाणी उकळून याचे थेंब इसेन्शियल ओईल थेंब आणि एक कप पाण्यात मिसळून मुंग्यांवर फवारा यामुळे मुंग्यांपासून सुटका मिळेल.

लिंबू

लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असते त्यामुळे मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू हा परिणामकारक ठरतो. यासाठी लिंबाचे साल ज्या ठिकाणी मुंग्या येतात त्या ठिकाणी ठेवा मुंग्या लिंबाच्या गंधामुळे दूर पळून जातील लिंबाचा रसही तुम्ही मुंग्यांवर (Kitchen Tips) शिंपडू शकता काही आंबट पदार्थ मुंग्यांना अजिबात आवडत नाहीत.