हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) याना कोपरखळी लावत एक मोठी ऑफर सुद्धा दिली. जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या असं म्हणत हसत हसत शिंदेनी जयंत पाटलांना महायुतीत सामील होण्याची ऑफर दिली.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
जयंतरावांनी म्हटलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे कधी आणणार? आम्ही ब्रिटनच्या म्युझियमशी सामजंस्य करार झाला आहे. सुधीर मुनगंटीवार हे तेथून जाऊन आले आहेत. लवकरच ही वाघनखे आपल्याला पाहायला मिळतील. जयंतराव, या महिन्यातच वाघनखे मिळतील. त्या वाघनखांचा योग्य वापर आम्ही नक्की करू. लोकांमध्ये स्फूर्ती आणि जागृती आणण्यासाठी ही वाघनखे ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवू. जयंतराव, अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात. थोडं असली वाघांबरोबर या” असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी हसत हसत जयंत पाटलांना ऑफर दिली.
विरोधकांवर हल्लाबोल –
यावेळी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून हल्लाबोल केला. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना म्हणजे महायुतीच्या भावंडांकडून माताभगिनींना आहेर आहे. 46 हजार कोटी रुपये राज्यातील मतभगिनींना देण्याचे काम सरकार करणार आहे यामुळे खरं तर विरोधकांना आनंद व्हायला पाहिजे होता? मात्र त्यांच्या पोटात दुखत आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे चांगल्याला चांगलं म्हणा. चुकत असेल तिथे सूचना करा. परंतु चांगल्या चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटलं नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात (CM Ladaki Bahin Yojana) एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज या योजनेमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. हे बदल नेमके कोणते आहेत आणि या बदलांमुळे कोणाला फायदा होणार आहे याविषयी आपण जाणून घेऊया.
विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे की, यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी 60 वर्ष वयोगटापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती. परंतु आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. त्याऐवजी वयोमर्यादा 65 वर्ष करण्यात आली आहे. त्याचबरोबर जमिनीच्या मालकीची देखील अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. लक्षात ठेवा की, लाडकी बहीण योजनेसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. या अर्जासोबत पुढे देण्यात आलेली कागदपत्रे जोडावीत.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती??
आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र वा जन्म दाखला बँक पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड योजनेच्या अटी मान्य असलेले हमीपत्र हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.
अर्ज कुठे भरता येईल?
अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे
अर्ज भरण्याची अंतिम तारीख
अर्ज प्रक्रियेला १ जुलैपासून सुरुवात झाली आहे. 15 जुलै अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल.
IRCTC : रेल्वेचे प्रवास हा सुखदायक प्रवास मानला जातो. शिवाय रेल्वेला इतर प्रवासी वाहनांपेक्षा कमी तिकीट आकारले जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. खरेतर कोल्हापूर -पुणे या मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणूनच कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी (IRCTC) मोठी सोय होणार आहे यात शंका नाही. चला जाणून घेऊया रेल्वेच्या या निर्णयाबद्दल अधिक माहिती …
ठराविक कालावधीपर्यंत धावणार रेल्वे गाड्या (IRCTC)
कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर अशा एकूण 184 फेऱ्या रेल्वेच्या माध्यमातून आता होणार आहेत. मात्र या फेऱ्या काही कायमस्वरूपी असणार नाही तर मध्य रेल्वे करून केवळ एक जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या विशेष रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये (IRCTC) वाढ करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या आधी 56 फेऱ्यांसाठी मध्य रेल्वे कडून डिसेंबर महिन्यामध्ये मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता 184 फेऱ्यांची मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर ते पुणे 92 आणि पुणे ते कोल्हापूर 92 फेऱ्यांचे नियोजन असेल.
कोल्हापूरहून मुंबईला जाणारी कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ही काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती. आता हीच गाडी सहा नोव्हेंबर 2023 पासून कोल्हापूर ते पुण्यापर्यंत विशेष रेल्वे म्हणून धावते आहे. रात्री साडेअकरा वाजता गाडी कोल्हापूर (IRCTC) मधून सुटते आणि सात 45 वाजता पुण्यामध्ये पोहोचते. तर पुण्यातून रात्री नऊ चाळीस वाजता ही रेल्वे सुटते आणि कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी पहाटे पाच 40 वाजता पोहोचते. आता कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर फेऱ्यांची वाढ करण्यात आल्यामुळे हा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरहून शिक्षण,नोकरी आणि कामधंदा निमित्त येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
कुठे कराल बुकिंग ? (IRCTC)
विशेष रेल्वेसाठी विशेष प्रवास शुल्क द्यावा लागतो . तुम्हाला या रेल्वेने प्रवास करण्यासाठी या रेल्वे (IRCTC) गाडीचं आरक्षित तिकीट काढावे लागेल. http://www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवर 30 जूनपासून तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागराज मंजुळेच्या सैराटमध्ये ओबडधोबड आणि रांगड्या मातीतल्या प्रेमळ माणसांचा करमाळा आपल्याला बघायला मिळाला… करमाळ्याची (Karmala Assembly Election 2024) माणसं ही साधीसुधी असली तर इथलं राजकारण मात्र भयानक गुंतागुंतीचं आणि भल्याभल्यांना पाणी पाजणारं आहे… इथल्या आमदारांपासून ते स्थानिक नेत्यांनी एका मागून एक इतके पक्ष बदललेत की ते पाहून तुमचेही डोकं गरगरल्याशिवाय राहणार नाही… सध्या या करमाळ्याचे विद्यमान आमदार आहेत संजय मामा शिंदे… व्हिडिओ बनेपर्यंत तरी अजित पवार गटात असणाऱ्या संजय मामांची (Sanjay Shinde) आमदारकी येणाऱ्या टर्मला धोक्यात आलीय? करमाळ्याच्या राजकारणात याच संजय मामांना पाणी पाजत किंगमेकर कोण ठरू शकतं? करमाळ्याचा 2024 चा आमदार कोण? संजयमामा शिंदे पुन्हा एकदा आमदार झालेच, तर त्यांना प्लसमध्ये ठेवणाऱ्या गोष्टी नेमक्या कोणकोणत्या असू शकतात? त्याचंच हे विश्लेषण…
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या करमाळा विधानसभा मतदारसंघावर सध्या विद्यमान आमदार म्हणून संजय मामा शिंदे यांचं वर्चस्व आहे… अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळा नेमका आमदार म्हणून कुठल्या चेहऱ्याला पसंती देईल? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 2014 च्या राजकारणापासून इथली बदलती समीकरणे तपासून घ्यावी लागतात… करमाळ्याला तसं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजलं जायचं… 2014 ला झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेचे नारायण आबा पाटील, राष्ट्रवादीकडून रश्मी बागल तर स्वाभिमानीकडून संजय मामा शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते… अत्यंत अटीतटीचा झालेल्या करमाळ्याच्या 2014 च्या आमदारकीला गुलाल उधळला तो शिवसेनेच्या नारायणा आबा पाटलांनी…पण अवघ्या 357 मतांच्या लिडने हा विजय पदरात पडल्यामुळे 2019 साठी प्रत्येकानेच तगडी तयारी सुरू केली होती…
रश्मी बागल या राष्ट्रवादीतील तालुक्यातील महत्त्वाच्या चेहऱ्याने तानाजी सावंतांच्या मदतीने शिवसेनेचं शिवबंधन हाती घेत 2019 ला उमेदवारीही मिळवली… तर 2014 नंतर स्वाभिमानीचा हात सोडत जिल्हा परिषदेसाठी भाजपचा हात सोबत घेणाऱ्या संजय मामा शिंदेंनी लोकसभेसाठी घड्याळाच्या चिन्हावर माढातून अपयशी फाईट दिली होती…तरीदेखील राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्याची त्यांना गळ घालण्यात आली होती.. पण लोकसभेला पराभवाचा चटका बसल्याने संजमामांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला… त्यामुळे राष्ट्रवादीने अधिकृतरित्या संजय पाटील घाटणेकर यांना तिकीट देऊ केलं… मात्र नंतर पवारांनी संजय मामांच्या पाठीशी ताकद लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे घाटणेकर आपोआपच शर्यतीतून बाहेर फेकले गेले ..पण तत्कालीन स्टॅंडिंग खासदार नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना उमेदवारी दिल्याने नारायण पाटलांनी इथून अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला…एकूणच अपक्ष म्हणून संजय मामा शिंदे विरुद्ध शिवसेनेच्या रश्मी बागल अशी इथली लढत झाली… आणि साडेपाच हजाराच्या लीडने का होईना पण संजय मामा शिंदेंनी आमदारकी खेचून आणली…
तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या संजय मामांनी निकालानंतर राजकीय गणित पाहून भाजपाला पाठिंबा दिला होता…पण पुन्हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोबतच राहणं पसंत केलं…त्यांच्या मधल्या राजकीय भूमिका या सतत बदलत्या राहिल्या तरी अजित दादांना त्यांचा कायम सपोर्ट राहिला… त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीपासून ते अजित पवार गटात आहेत… मतदारसंघात केलेली काम, स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणारी पकड आणि सोशल कनेक्ट तगडा असल्याने संजय मामा करमाळ्याच्या राजकारणात नेहमी प्लसमध्ये राहतात… त्यात मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणूनही संजय मामा शिंदेंची ओळख आहे… मतदारसंघातील जुने हेवेदावे विसरून त्यांनी लोकसभेला एकदिलाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला होता… त्यामुळे महायुतीकडून सध्या तरी त्यांच्याच नावाचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो… दुसरीकडे शिवसेनेकडून दोन नंबरची मतं मिळवणाऱ्या रश्मी बागल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने संजय मामांचा किमान एक अडथळा दूर झाला आहे…तर राहिला प्रश्न तो केवळ नारायण पाटील यांचा… तर शरद पवार गटाची तुतारी हाती घेत तालुक्यात नारायण पाटलांनी लोकसभेला मोहिते पाटलांच्या पाठीशी बरीच ताकद लावली… त्याचंच फळ म्हणून त्यांना महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं… त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा ज्या काही मोजक्या लढती महाराष्ट्रात बघायला मिळतील. त्यात करमाळ्याचंही नाव ऍड होईल, असं सध्याचे चित्र आहे…
शरद पवार प्लस मोहिते पाटील अशी ताकद ही नारायण पाटलांच्या पाठीशी लागू शकते… लोकसभेच्या निकालाचा ट्रेंड पाहता यंदा करमाळ्याचंही वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूनेच झुकलेलं पाहायला मिळतंय…पण या मतदारसंघाला असणारी राजकीय चुरशीची परंपरा यंदाही कायम राहील, असं म्हणायला हरकत नाही… बाकी राजकारणातील निर्णायक क्षणी लोकसभेचा वचपा काढण्यासाठी मोहिते पाटील इथून काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे… बाकी तुम्हाला काय वाटतं? करमाळा विधानसभेचा 2024 चा संभाव्य आमदार कोण असेल? संजय मामा शिंदे आपल्या विजयाची परंपरा यापुढेही कायम राखू शकतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये (Hathras) एक मोठी घटना घडली आहे. याठिकाणी भोले बाबांचा सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरी 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना हाथरसमधील रतिभानपूर भागात घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कार्यक्रम स्थळी गोंधळ उडाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रतिभानपूर येथे भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सत्संगाचा समारोप सुरू असतानाच तिथे चेंगराचेंगरी सुरू झाली. या चेंगराची इंग्रजीत तब्बल 23 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. यामध्ये अनेक लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.
या सर्व प्रकरणाची माहिती देत एटा एसएसपी राजेश कुमार सिंह यांनी सांगितले आहे की, हाथरस जिल्ह्यातील मुगलगढ़ी गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना चेंगराचेंगरी झाली. ज्यात अनेकजण जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाला. आतापर्यंत एटा हॉस्पिटलमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 23 महिला, 3 मुले आणि 1 पुरुष आहे. आता या 27 मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवत टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. या विजयानंतर सर्वजण जल्लोषात गुंग असताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अचानक खेळपट्टीच्या मध्ये गेला आणि खेळपट्टी वरील माती त्याने चाखली. रोहितच्या या कृतीने सर्वांचीच मने जिंकली. मात्र रोहितने असं का केलं? खेळपट्टी वरील माती चाखून त्याला काय मिळालं? असा प्रश्न सर्वाना पडला. यावर आता खुद्द रोहीतनेच खुलासा करत खेळपट्टी वरील माती चाखण्यामागचं कारण सांगितलं आहे. (Rohit Sharma Taste The Soil Of The Barbados)
रोहित म्हणाला, मी त्या खेळपट्टीवर गेलो कारण त्या पीचने मला वर्ल्डकप जिंकवून दिला. आम्ही त्या पीचवर खेळलो. ही तीच खेळपट्टी होती जिने मला विजय मिळवून दिला. त्यामुळे हे पीच आणि ते ग्राऊंड आयुष्यभर माझ्या लक्षात राहणार आहे. त्यामुळे मला खेळपट्टीचा लहानसा भाग कायम स्वतःसोबत ठेवायचा होता. मी वर्ल्डकप जिंकण्याच्या गोष्टींचं वर्णन करूच शकत नाही, कारण त्या गोष्टी स्क्रिप्टेड नव्हत्या. मी त्या क्षणाचा आनंद घेत होतो. त्यावेळचे सर्व फार महत्त्वाचे होते असं म्हणत रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, तब्बल १७ वर्षानंतर भारताने टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत टीम इंडिया चॅम्पियन ठरली. कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या भारताच्या विजयाचे मुख्य हिरो ठरले. कपिल देव आणि महेंद्रसिंघ धोनी यांच्यानंतर भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा रोहित शर्मा हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताला विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर रोहित शर्माने टी-20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. खरं तर माझ्या मनात निवृत्तीचा विचार नव्हता परंतु यापेक्षा मोठा क्षण निवृत्तीसाठी असू शकत नाही असं म्हणत रोहित आपल्या निर्णयावर ठाम राहिला.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी आमदार प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात सुमोटो प्रस्ताव मांडला होता. यावर नेते प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी बोलताना प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी उभे राहिलेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना हात दाखवला. यावरून अंबादास दानवे (Ambadas Danave) चिडले. यानंतर त्यांनी सभागृहात प्रसाद लाड यांना शिव्या घातल्या. या सर्व प्रकरणानंतर अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात आले आहे
विधानसभेत झालेल्या सर्व प्रकरणानंतर अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता. त्यानंतरच सभापतींनी निलंबनाची कारवाई केली आहे. आज दानवे यांचे निलंबन केल्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. तसेच सभापतींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळासाठी सभागृहातील काम खोळंबले होते.
भाजपकडून मांडण्यात आलेला प्रस्ताव
दरम्यान, दानवे यांच्या निलंबनाबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात भाजपने म्हटले आहे की, “१ जुलै रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात चर्चा करत असताना प्रसाद लाड यांच्याप्रती आक्षेपार्ह, अशोभनीय आणि अश्लाघ्य अपशब्द वापरून विधानपरिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली. तसेच त्यांनी सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे. त्यांच्या या बेशिस्त आणि असभ्य वर्तणाकडे दुर्लक्ष केल्यास सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळे त्यांच्या वर्तणाची गंभीर दखल घेऊन अंबादास दानवे यांचे सदस्यत्व 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात यावे. या कालवधीत त्यांना सभागृहातील परिसरात येण्यास बंदी घालावी”
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावर्षीच्या अंदाजपत्रकात शासनाने “माझी लाडकी बहीण” (Mazi Ladki Bahin) हि योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची नोंदणीची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ केलेली आहे, अशी नोंदणीला कोणतीही मुदत न देता ती काढावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेत केली. यासोबतच या योजनेमध्ये सुधारणा आणणेसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी चार मागण्या केल्या आहेत. ज्यामध्ये या योजनेची नोंदणी मुदत काढून टाकावी, या योजनेतील महिलांची वयोमर्यादा ६० वर्षावरील महिलांना सुद्धा लाभ मिळावा, तसेच अविवाहित महिलांना सुद्धा या योजेनचा लाभ मिळावा यासाठी २१ वर्षावरील अविवाहित महिलांना योजनेचा लाभ व्हावा तसेच हि योजना निवडणुकीची घोषणा न राहता याचा कायदा केला जावा अशा प्रमुख मागण्या योजना दुरुस्तीबाबत केल्या आहेत.
यावेळी पुढे बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की , या योजनेच्या १५ जुलै अंतिम नोंदणीच्या तारखेमुळे राज्यात नोंदणी केंद्राबाहेर मोठी गर्दी होत आहे. तसेच राज्यात काही भागात उन्हाची तीव्रता अजून असल्याने काही महिलांना भोवळ आल्याची घटना घडल्या आहेत. तसेच काही भागात पावसात सुद्धा रांगा लागल्या आहेत. आज महाराष्ट्रात पंढरपूरची वारी सुरु आहे. आषाढी एकादशी १७ जुलै ला आहे. या वारीत जवळपास १० लाख वारकरी सहभागी होत असतात, या वारीत निम्याहुन अधिक महिला भाविक असतात. अशावेळी या योजेनच्या नोंदणीसाठी भाविक महिलांनी वारी सोडून यायचे का ? त्यामुळे या योजनेला तारखेचे बंधन नसले पाहिजे. प्रत्येक महिलेला तिचा अधिकार मिळालाच पाहिजे. केंद्रातील युपीए सरकारने ज्याप्रमाणे अधिकारावर आधारित कायदे केले गेले होते. त्याप्रमाणे या योजनेचा सुद्धा कायदा केला गेला पाहिजे. हि योजना फक्त निवडणुकीपुरती सुरु करायची व त्यानंतर बंद करायची हे योग्य होणार नाही. यासाठी या योजनेबाबतचा कायदा करण्याची गरज असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आग्रहाने मांडले आहे.
त्याचबरोबर या योजनेत २१ वर्षावरील अविवाहित महिलांना वगळले आहे, त्यांचा काय दोष आहे ? त्यांना या योजनेचा फायदा मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर ६० वर्षावरील सर्व महिलांना ज्यांना कोणी सांभाळणारे नसतील तर अशा वयोवृद्ध महिलांना या योजेतून वगळणे योग्य नाही. या योजनेमुळे नोंदणी केंद्राबाहेर एजेंटचा सुळसुळाट झाला आहे. महिलांना उत्पानांचा दाखल काढण्यासाठी ७००-८०० रुपये मागितले जात आहेत, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे. अशा अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी शासनाने लवकरात लवकर दूर केल्या पाहिजेत अशी आग्रही मागणी पृथ्वीबाबांनी विधानसभेत केली.
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशी येत्या 17 जुलै रोजी आहे. या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रच्या वेगवेगळ्या ठिकाणातून हजारो वारकरी ,भाविक हे पंढरपुराकडे जात असतात. यासाठीच भाविकांची सोय व्हावी याकरिता एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी वारी करिता मुंबईतून दोनशे ज्यादा बसेस सोडण्यात येत असल्याचं महामंडळाकडून ( Ashadhi Ekadashi 2024) सांगण्यात आलं आहे.
मिळणार सवलत ( Ashadhi Ekadashi 2024)
या प्रवासात 75 वर्षांवरील जेष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50% तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
5000 विशेष बस सोडण्याचे नियोजन
एसटी महामंडळाकडून पंढरपूर ला 5000 विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून ( Ashadhi Ekadashi 2024) एसटी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असं आवाहन देखील एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
वाढीव गर्दी करीता 700 बसची व्यवस्था ( Ashadhi Ekadashi 2024)
भाविकांच्या वाढीव गर्दी करीता 700 बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परतीची वाहतूक एकादशीच्या दिवसापासूनच सुरू होत आहे त्याकरिता दशमी पर्यंत जास्तीत जास्त गाड्या प्रत्येक विभागाकडून उपलब्ध राहतील यासाठीच नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
फुकट्यांना बसणार लगाम
गेल्या वर्षी आषाढी यात्रेनिमित्त 4245 विशेष बस सोडल्या होत्या. यात्रेद्वारे यात्रा काळामध्ये 18 लाख 30 हजार 934 भाविक प्रवाशांची सुखरूप ने आणि एसटीने केली होती. फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला ( Ashadhi Ekadashi 2024) जाणाऱ्या विविध मार्गांवर बारा ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचा नियोजन केले आहे. शिवाय फुकट प्रवाशांना अटकाव घालण्यासाठी एसटीचे 200 सुरक्षा कर्मचारी अधिकारी यात्रा काळात 24 तास नजर ठेवतील.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काय झाडी…काय डोंगर… काय हॉटेल… हा फक्त काही डायलॉग नव्हता तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं हे होतं जळजळीत वास्तव… कधीच कुठे फारसं चर्चेत नसलेलं शहाजी बापू पाटील (Shahaji Patil) हे नाव याच डायलॉगमुळे उभ्या महाराष्ट्राला माहित झालं…पण हे शहाजी बापू ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तो मतदारसंघ वेगळ्याच राजकीय चेहऱ्यासाठी ओळखला जातो…होय, आम्ही बोलतोय सांगोला विधानसभा मतदारसंघाबद्दल…आम्ही बोलतोय तब्बल 11 टर्म, पन्नास वर्ष, एकाच पक्षातून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या गणपतराव देशमुखांबद्धल… 1995 चा अपवाद वगळता 1972 पासून ते सलग अकरा वेळा निवडून आले… अतिशय साधी राहणी, सर्वसामान्यांच्यात मिसळणार नेतृत्व आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाड्यावस्त्यांवर पसरलेलं कार्यकर्त्यांचं नेटवर्क यामुळे शेकापचा लाल झेंडा कायमच इथे फडकत राहिला… एसटीने प्रवास करणारा आमदार म्हणून त्यांचा वायरल फोटो आपण कधी ना कधी पाहिला असेलच…पण याच अजातशत्रू गणपतरावांनी वयाचं कारण समोर करत २०१९ च्या निवडणुकीतून माघार घेत नातू अनिकेत देशमुखला निवडणुक रिंगणात उतरवलं… पण चेहरा बदलल्यामुळे सांगोल्याचं राजकारण फिरलं आणि देशमुखांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे शहाजी बापू पाटील यांनी मतदारसंघात आमदारकीचा भगवा फडकवला…
पण शिवसेनेच्या फुटीला सपोर्ट करणं… गुहावटीमध्ये डायलॉगबाजीमुळे फेमस होणं… शिंदे गटासाठी वायरल भाषण करणं एवढंच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला डायरेक्ट मोहिते पाटलांना शिंगावर घेण्याची धमक दाखवण… हा सगळा गेलाबाजार राजकीय इतिहास पाहता शहाजीबापूंना सांगोल्याची जनता पुन्हा निवडून देईल का? आजोबांचा वारसा पुढे चालवत अनिकेत देशमुख यंदा शेकापचा गुलाल कुणा मतदारसंघात उधळणार का? सांगोल्यात आमदारकीला शिवसेना की शेकाप? याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग…
गणपतराव देशमुख…पक्ष शेकाप…मतदारसंघ सांगोला…तब्बल 11 टर्म अजिंक्य आमदार म्हणून त्यांची ओळख… जसा गणपतरावांचा आमदारकीचा विक्रम आहे, तसा विक्रम माझा पराभवाचा आहे…असं दिलदारपणे कबूल करणारे गणपतरावांचे विरोधक म्हणजे शहाजी बापू पाटील…1995 सालीही याच शहाजीबापूंनी पहिल्यांदा गणपतरावांना पराभवाचा दणका दिला…पण आपला हा विजय त्यांना पुढे कंटिन्यू करता आला नाही…शहाजी बापू प्रत्येक निवडणुकीत पराभूत व्हायचे… पण जिद्द आणि चिकाटी कायम ठेवून ते प्रत्येक वेळेस विरोधात उमेदवारी द्यायचेच… पण त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना 2019 च्या आमदारकीला सुवर्णसंधी चालून आली… कारण वयाचं कारण पुढे करत गणपतरावांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला…त्यांनी माघार घेऊनही आबासाहेबच फिरसे! अशा घोषणा सांगोल्या दिल्या जाऊ लागल्या… यावरून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांची मनस्थिती आपल्या लक्षात येऊ शकते…
त्यानंतर शेकापने सांगोल्यातून भाऊसाहेब रुपनवरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र अचानकच हा निर्णय पलटी करत गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांना उमेदवारी जाहीर करण्यात आली… नाराज झालेल्या रुपनवरांनी शिवसेनेची वाट धरली… राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखेही शिवसेनेत गेले… त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शहाजीबापूंची ताकद चांगलीच वाढली होती… त्यात फडणवीसांसोबत त्यांनी जमवलेली गट्टी बघता विजयाचं मार्जिन खेचून आणण्यात जे अंतर कमी पडत होतं, तो गॅप या सर्वांच्या बॅकअप मुळे यंदा भरून निघणार होता…मात्र अनिकेत देशमुखांच्या पाठीशी असणारी आजोबांची साथ, सहानुभूतीच वारं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघटनेचा कनेक्ट अनिकेत देशमुखांच्या पाठीशी होताच…
निवडणूक झाली… निकाल लागला… आणि आश्चर्यकारकरीत्या अवघ्या 674 मतांच्या लीडने शहाजीबापूंनी शिवसेनेचा भगवा झेंडा सांगोल्यात फडकवलाच… शिवसेना भाजपची युती, शेकाप मधील इच्छुक नाराज कार्यकर्ते आणि घराणेशाहीचा झालेला आरोप या सगळ्या गोष्टी अनिकेत देशमुखांना मायनस मध्ये घेऊन गेल्या… आणि शहाजी बापू जायंट किलर ठरत आमदार झाले… पण त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती गुवाहाटीच्या डायलॉग बाजी मुळे… त्यामुळे कधीतरी कानावर पडलेलं शहाजीबापूंचं नाव महाराष्ट्राला माहित झालं… शिंदे गटाच्या अनेक जाहीर सभांमध्ये त्यांची भाषण गाजू लागली, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीला तर शहाजी बापूंनी विरोधाची हाईप केली…महायुतीच्या प्रचारात थेट मोहिते पाटलांना शिंगावर घेण्याची हिम्मत त्यांनी दाखवली..अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला…आता परत त्याला जन्माला घालू नका… इथपासून ते मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेले आहेत… अशा शब्दात त्यांना पाडायची भाषा शहाजी बापूंनी केली… आता त्यांच्या सांगोल्यातच मोहिते पाटलांना चिखली मिळालं, तो भाग वेगळा… पण मागच्या एक ते दोन वर्षात शहाजी बापूंनी आपले अनेक स्थानिक नेत्यांना विरोधात घालवलय…
बायकोची शपथ घेऊन सांगतो, गणपतरावांना पाडायचं नव्हतं, तालुक्याला पाणी आणि विकास आणायचा होता, म्हणून निवडणूक लढवली, अशा शपथा खाणाऱ्या शहाजी बापूंनीही मतदार संघातील पाण्याचा प्रश्न कितपत सोडवला? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो…मतदारसंघात तुरळक कामं झाली पण त्यांना विशेष वगैरे म्हणता येणार नाही…त्यात शिवसेना फुटीपासूनच्या सगळ्या काळामध्ये शहाजी बापूंची क्रेझ वाढली असली तरी त्यांची इमेज डाऊन झाली आहे… मतदारसंघातील सच्चा शिवसैनिकांचा कनेक्टही त्यांच्यापासून लांब गेलाय… त्यात मोहिते पाटील लोकसभेचा वचपा विधानसभेला काढणार हे फिक्स असल्यामुळे महायुतीचे उमेदवार असूनही शहाजी बापू चहूबाजूंनी कोंडीत सापडले आहेत… दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक आबा सोळंके देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत…शेकाप बद्दल बोलायचं झालं तर अनिकेत देशमुख आणि त्यांचे काका बाबासाहेब देशमुख यांच्यातही तिकीट कुणाला मिळणार? यासाठी संघर्ष पाहायला मिळू शकतो… पण सध्यातरी शेकापचं पारडं सांगोल्यात जड दिसतंय…शेतकरी कामगार पक्षाचा तालुक्यावरील कंट्रोल तसंच धनगर समाजाचं एकगठ्ठा मतदान नेहमीच देशमुखांच्या पाठीशी राहिलं…त्यामुळे अनिकेत देशमुख यंदा उमेदवार असतील तर हा समाज विजयाचं निर्णायक मतदान शेकापच्या पारड्यात टाकू शकतो, असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतय…
ही सगळी जरी वस्तुस्थिती असली तरी मतदारसंघातला मोठा भाग आजही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. एमआयडीसी नाही ना तरुणांच्या हाताला रोजगार..,टेंभू योजनेच्या पाण्याची वाट पाहता पाहता मतदारसंघातील जनतेच्या घशाला कोरड पडली… हे सगळंच शेकापच्या आणि देशमुख कुटूंबाच्या राजकारणावर भलंमोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतं.. त्यामुळे अनिकेत देशमुख यांना याचा काहीसा का होईना फटका बसण्याची दाट शक्यता आहे… त्यामुळे सांगोल्याचा आमदार कोण होईल, तो होईल… पण मतदारसंघातील समस्यांकडे हे आमदारजीवी लोक खरंच सिरीयसली बघणार आहेत का, हा मुख्य प्रश्न आहे…सांगोल्यात शहाजीबापू पुन्हा एकदा आमदारकी जिंकत सगळं ओक्के करुन टाकतील, की अनिकेत देशमुख शेकापचा वारसा पुढे चालवण्यासाठी यंदा गुलाल लावतायत, तुम्हाला काय वाटतं, सांगोल्याचा पुढचा आमदार कोण, ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा…