Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 635

New Criminal Laws : आजपासून देशभरात लागू होणार 3 नवे फौजदारी कायदे! पहा काय परिणाम होणार?

New Criminal Laws

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहितेत बदल करून, मंजूर केलेले तीन नवे कायदे आज, सोमवारपासून (१ जुलै) लागू होत (New Criminal Laws) आहेत. ब्रिटिश कालीन भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशात लागू होतील. डिसेंबर २०२३ मध्ये कायदे संसदेत मंजूर करण्यात आले होते. आता आजपासून ते देशभरात लागू होणार आहेत. यामुळे भारताच्या फौजदारी न्याय व्यवस्थेत मोठे बदल होणार आहे. तसेच जुने ब्रिटिश कालीन कायदे हे हद्दपार होणार आहेत.

काय परिणाम होणार? (New Criminal Laws)

नवीन कायद्यांमुळे (New Criminal Laws) न्यायालयीन व्यवस्थेत बदलांसह तांत्रिक प्रगती होत आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब कमी होऊन ऑनलाइन फाईलिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्षीदारांचे म्हणणे ऐकण्यावर भर देण्यात येईल. कोणतीही व्यक्ती पोलीस ठाण्यात न जाता इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे घटनांची तक्रार करू शकतो. त्यामुळे गुन्हाची नोंद करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार आहे. नवीन कायद्यांतर्गत, एफआयआर झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावं लागतं. कोर्टाला आरोपपत्र दाखल केल्यापासून 60 दिवसांच्या आत आरोप निश्चित करावे लागतील. यासोबतच खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निकाल द्यावा लागणार आहे. बलात्कार पीडितेचं जबाब महिला पोलीस अधिकारी पीडितेच्या पालक किंवा नातेवाईकाच्या उपस्थितीत नोंदवतील. वैद्यकीय अहवाल सात दिवसांत पूर्ण करणं अनिवार्य राहणार आहे. 7 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये, पीडितेला पोलीस ठाण्यात महिला हवालदार असल्यास, पीडितेचं म्हणणं नोंदवून कायदेशीर कारवाई करावी लागेल.

महिला आणि बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांचा नवा अध्याय कायद्यात जोडला गेला (New Criminal Laws) आहे. यामध्ये लहान मुलांची खरेदी-विक्री करणं हा जघन्य गुन्हा म्हणून वर्गीकृत करण्यात आला असून, त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. लग्नाचं खोटं आश्वासन देऊन किंवा त्यांची दिशाभूल करून महिलांना सोडून दिलेल्या प्रकरणांमध्ये आता नव्या कायद्यात शिक्षेच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, नव्या कायद्यात महिलांवरील गुन्ह्यातील पीडितांना 90 दिवसांच्या आत त्यांच्या केसेसचं नियमित अपडेट मिळण्याचा अधिकार असेल.

LPG Price Reduced : गॅस सिलेंडर झाला स्वस्त; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

LPG Price Reduced

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महागाईच्या विळख्यात अडकलेल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांना जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. जीवनावश्यक वस्तू असलेल्या LPG गॅस सिलेंडर ची किंमत कमी (LPG Price Reduced) झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचिऊ किंमत 31 रुपयांनी कमी केली आहे. मात्र कमी झालेली किंमत घरगुती सिलिंडरसाठी नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवण आता काहीसे कमी पैशात तुम्ही खाऊ शकाल. दुसरीकडे घरगुती सिलिंडरच्या किमती मात्र जैसे थे आहेत.

कोणत्या शहरात किती रुपये ? LPG Price Reduced

नव्या दरानुसार, मुंबईत सिलिंडरची किंमत 1629 रुपयांवरून 1598 रुपयांवर आली आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १६७६ रुपयांऐवजी १६४६ रुपयांना मिळणार आहे तर कोलकाता मध्ये १७८७ रुपयांचा गॅस सिलिंडर १७५६ रुपयांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय चेन्नईमध्ये 1809.50 रुपयांना तुम्ही गॅस सिलिंडर खरेदी करू शकता. (LPG Price Reduced)

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर

दरम्यान, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 802.50 रुपये आहे. तर कोलकात्यात 829 रुपये, दिल्लीत 803 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे. 1 जून 2023 रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपये होती. कंपन्यांनी 30 ऑगस्ट 2023 रोजी त्यात 200 रुपयांची मोठी कपात जाहीर केली आणि नंतर किंमत 903 रुपयांपर्यंत खाली आली. यानंतर पुन्हा 9 मार्च 2024 रोजी कंपन्यांनी त्याची किंमत 100 रुपयांनी कमी केली होती. तेव्हापासून आजपर्यंत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही.

Indian Railway | कन्फर्म तिकीट आणि गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

Indian Railway

Indian Railway | आजकाल रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कारण रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सुखकर आणि आरामदायी मानला जातो. त्याचवेळी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये देखील रेल्वे प्रवाशांची संख्या आजकाल वाढतच चाललेली आहे. रेल्वे (Indian Railway) प्रवास करताना जेव्हा रेल्वेचे तिकीट कन्फर्म करावे लागते. त्यावेळी ट्रेनमधील गर्दी ही एक मोठी समस्या असते. परंतु आता रेल्वेने पुणे आणि मुंबईकरांना एक चांगली न्यूज दिलेली आहे.

ती म्हणजे आता मुंबई आणि पुण्यावरून (Indian Railway) मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता प्रवासांना प्रवाह कन्फर्म तिकीट मिळू शकते आणि त्यांना ट्रेनमधील गर्दीचा सामना देखील करावा लागणार नाही. रेल्वेने सप्टेंबरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रवाशांची खूप जास्त गर्दी होते. आणि ती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबईत रीवा- पुणे ते जबलपूर दरम्यान असणाऱ्या गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे.

02188 सीएसएमटी मुंबई रीवा स्पेशल 28 जूनपर्यंत दर शुक्रवारी धावत होती. ती आता 27 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. या ट्रेनच्या जवळपास 13 ट्रीप वाढवण्यात आलेल्या आहेत. तसेच 02187 रेवा सीएसएमटी मुंबई स्पेशल 27 जूनपर्यंत दर गुरुवारी धावत होती. 26 सप्टेंबरपर्यंत या ट्रेनच्या 13 फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत.. त्याचप्रमाणे 02131 पुणे जबलपूर स्पेशल 1 जुलैपर्यंत सोमवारी धावते. तिचा कालावधी आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवणार आहे. या ट्रेनच्या एकूण 13 ट्रिप होणार आहेत.

T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माची खास पोस्ट; तुम्हालाही वाटेल अभिमान

rohit sharma post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत वर्ल्डकप आपल्या नावावर केला. अतिशय रोमांचक अशा या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी विजय खेचून आणला. या विजयानंतर जगभरातून टीम इंडिया आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच दरम्यान, रोहित शर्माने (Rohit Sharma) ट्विटर वर स्वतःचा एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत.

काय आहे रोहितची पोस्ट ?

फोटो या गोष्टीचं प्रतीक आहे की यावेळी माझ्या भावना काय आहेत… कालचा दिवस माझ्यासाठी काय होता हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे अनेक शब्द आहेत. पण कोणत्या योग्य शब्दाचा उपयोग करू कळत नाही… पण मी असं करेल आणि माझ्या भावना व्यक्त करेल…सध्या मी एक स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद घेत आहे जे स्वप्न अरबो लोकांनी पाहिलं…असं म्हणत रोहित शर्माने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

रोहितची T20 क्रिकेटमधून निवृत्ती –

दरम्यान, भारताला विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने T20 क्रिकेट मधून निवृत्त्ती जाहीर केली. हा माझा शेवटचा सामना होता. निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. मला ती (ट्रॉफी) हवी होती. हे शब्दात मांडणे खूप कठीण आहे. मला हेच हवे होते आणि हेच घडले. मी माझ्या आयुष्यात यासाठी खूप हताश होतो. यावेळी आम्ही सर्व सीमा पार करून वर्ल्डकप जिंकलो याचा आनंद झाला. असं म्हणत रोहित शर्माने T20 मधून निवृत्ती (Rohit Sharma Retirement) जाहीर केली.

कस आहे रोहितचे T20 करिअर ?

रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये रोहोतच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 121 आहे. 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता आणि भारतासाठी दोन T20 विश्वचषक जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.

पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराची विष्ठा; पुण्यात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातल्या जनता वसाहत मधील अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांना, महिला व बाल कल्याण विभाग मार्फत खराब पोषण आहार देण्यात आला आहे, धक्कादायक बाब म्हणजे या पोषण आहारात आळ्या आणि उंदराची विष्ठा सापडली आहे. या घटनेनंतर लाभार्थी नागरिक प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत. सरकार मुलांच्या जीवाशी खेळ करत आहेत का? असा सवालही पालकांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकात्मिक बाल योजना अंतर्गत अंगणवाडीमधील मुलांना देण्यात येणाऱ्या कडधान्यात अळया आणि उंदराच्या लेंड्या सापडल्या आहेत. एकात्मिक बाल योजना ही महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत येते. ज्या पाकिटातून हे धान्य वाटप करण्यात आले आहे. त्यावर शासनाचा अधिकाऱ्यांचा शिका सुद्धा दिसत आहे. वाटप करणाऱ्या प्रशासकीय अधिकारीने पाकीट फोडल्यानंतर पहिल्याच पाकिटात अळया आणि उंदरांच्या लेंड्या आढळून आल्या. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेस रिक्षा संघटनाचे अध्यक्ष संदिप काळे यांनी हा सर्वप्रकार उघडकीस आणला.

पुण्यातल्या जनता वसाहतमधील पान आळीमध्ये हा सर्व प्रकार घडला. संबंधित महिलेने हाच पोषण आहार शिजवण्यासाठी घेतल्यानंतर त्यामध्ये अळी आढळली आणि निरखून पाहायला नंतर त्यामध्ये उंदराची विष्ठा आढळून आली. संबंधित महिलेने संताप व्यक्त करत तक्रार दिली आणि पोषण आहार मिळलेल्या लाभार्थींना पण सतर्क करण्यात आले आहे. सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे का ? असा प्रश्न आता संबंधित नागरिक विचारत आहे

मनोहर भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ड्रेस घातलेल्या महिलांनी…..

manohar bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी आज पुनः एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं मनोहर भिडे यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधान केली होती. महात्मा गांधी यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी असच बेताल विधान केलं होत.

मनोहर भिडे हे पुण्यात असून त्यांनी म्हंटल कि, वटसावित्रीच्या पूजेला साडी घातलेल्या महिलांनी जावं, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. वारकरी आणि धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचं आहे. कुत्र्याला लांबचं ऐकायला येतं. वटवाघळाला येतं. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मतांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत आहे. ह्या व्रताची पथ्य आहेत, त्यामुळे साडी घातलेल्या महिलांनी पूजेला जावं असे मनोहर भिडे म्हणाले आहेत.

महात्मा गांधींविषयी वादग्रस्त विधान –

यापूर्वी मनोहर भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होते. महात्मा गांधीं यांचे खरे वडील मोहनदास नसून ते मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत असं भिडे यांनी म्हंटल होते. तसेच त्यांनी आपलं विधान पटवून देण्यासाठी वेगळाच दाखला दिला. मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. तीन वर्ष करमचंद फरार होते, याचा काळात मोहनदास यांचा जन्मा झाला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत असं वादग्रस्त विधान भिडे यांनी केलं होते.

UPI Payment | Internet शिवाय करा Online Payment; फक्त वापरा सोप्पी पद्धत

UPI Payment

UPI Payment | आजकाल ऑनलाईन पेमेंट ही सुविधा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अनेक लोक हे आता कॅश पेमेंट न करता ऑनलाइन पेमेंट करतात. त्यामुळेच आपल्याला संपूर्ण हिस्टरी समजते. आपण कुठे खर्च केलेला आहे. या सगळ्याची माहिती मिळते. परंतु ऑनलाईन पेमेंट करायचे म्हटलं तर त्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील चांगली असावी लागते. परंतु कधी कधी आपण अशा ठिकाणी अडकतो, जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नसते. त्यामुळे आपले पेमेंट अडकते. आणि इंटरनेट नसताना यूपीआय द्वारे पैसे पाठवणे देखील खूप कठीण होऊन जाते. परंतु आता याची काय काळजी करायची गरज नाही. कारण आता यूपीआयद्वारे (UPI Payment) तुम्ही इंटरनेटशिवायही पैसे पाठवू शकता.

तुम्ही फोनवरून एक विशेष USSD कोड डायल करून पेमेंट करू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. याt तुम्ही इंटरनेट नसतानाही ऑनलाईन पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला *99# हा कोड वापरून पैसे पाठवावे लागेल. किंवा पैसे तुम्हाला येऊ देखील शकतात यासाठी तुम्ही यूपीआय (UPI Payment) पिन सेट करू शकता. आता आपण हा कोड वापरून पैसे कसे पाठवायचे? याची पद्धत जाणून घेऊया.

इंटरनेट नसताना पैसे कसे पाठवायचे ? | UPI Payment

  • तुम्ही तुमच्या बँकेची लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर वरून *99# हा कोड डायल करा. आणि तुमच्या स्क्रीनवर बँकेची सर्व माहिती उपलब्ध येईल.
  • यामध्ये पैसे पाठवा किंवा पैसे मागवा बॅलन्स चेक करा ज्याची माहिती तुम्हाला पाहिजे आहे तो पर्याय निवडा.
  • तुम्हाला जर पैसे पाठवायचे असेल तर 1 टाईप करा आणि सेंट या बटणावर टॅप करा.
  • त्यानंतर तुम्ही पैसे पाठवण्याची पद्धत निवडायची आहे. म्हणजे जसे की युपीआय आयडी किंवा इतर कुठला पर्याय असेल तर त्यावर तुम्हाला पैसे पाठवायचे आहे.
  • जर तुम्ही मोबाईल नंबरवरून पैसे पाठवत असाल तर ज्याला पैसे पाठवायचे आहे. त्याचा यूपीआय खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाईप करा आणि नंतर सेंड यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला जेवढी रक्कम टाकायची आहे तेवढी रक्कम एंटर करा सेंड या बटनावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमचा यूपीआय पिन एंटर करा.
  • अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील यूपीआय पेमेंट द्वारे पैसे पाठवू शकता

Meta AI in Whatsapp | आता whatsapp वर मिळणार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर; लॉन्च केले नवीन AI फिचर

Meta AI in Whatsapp

Meta AI in Whatsapp | व्हाट्सअप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आजकाल प्रत्येकजण whatsapp वापरतात. व्हाट्सअप हे एक देवाणघेवाणीचे खूप चांगले साधन आहे. अशातच आता व्हाट्सअपची कंपनी मेटाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एआय फीचर लॉन्च केलेले आहे. त्यामुळे आता फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपवर देखील एआय चॅटबॉक्स उपलब्ध झालेला आहे. या चॅटबॉक्समुळे तुम्हाला एका क्लिकवर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

व्हाट्सअप (Meta AI Whatsapp) हे जगात सगळ्यात जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात जवळपास कोट्यावधी व्हाट्सअपचा वापर करतात. व्हाट्सअपने अनेक फीचर्समध्ये बदल केलेला आहे. व्हाट्सअपद्वारे आपण व्हिडिओ कॉल, वाईस कॉल, डॉक्युमेंट पेमेंट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे इतर ॲप्सची गरज फार कमी लागत आहे.

आपल्याला जर कोणताही प्रश्न पडला, तर आपण थेट गुगलवर जाऊन त्या प्रश्नाचे उत्तर शोधतो. परंतु आता व्हाट्सअपने ही सुविधा यायच्या माध्यमातून व्हाट्सअपवर देखील उपलब्ध करून दिलेली आहे. whatsapp वर मेटा एआय आयकॉन आहे. त्यामध्ये तुम्ही चॅट बॉक्स ओपन करू शकता. आणि तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते विचारू शकता. त्यानंतर अगदी एका सेकंदात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

व्हॉट्असॅपवर एआय कसं वापराल? | Meta AI Whatsapp

  • व्हाट्सअपमध्ये गेल्यावर न्यू आयकॉनवर तुम्हाला मेटा एआय आयकॉन दिसेल.
  • त्यानंतर तुम्हाला त्या आयकॉनवर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यावर स्क्रीनवर येणारे संपूर्ण अटी वाचा आणि मान्य करा.
  • त्यानंतर तुमचा चॅट बॉक्स सुरू होईल.
  • या चॅट बॉक्स वर तुम्हाला हवा तो प्रश्न तुम्ही टाईप करून एंटर करा.
  • काहीच सेकंदात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल.

या फिचरचं वैशिष्ट्य काय?

  • ज्याप्रकारे तुम्ही रेगुलर चॅट डिलीट करता, त्याच प्रकारे तुम्ही आय चॅट बॉक्सवर विचारलेल्या प्रश्न देखील डिलीट करू शकता.
  • त्याचप्रमाणे एआयद्वारे तुम्ही जी काही प्रश्न विचारले असतील ते सगळ्याच प्रश्नांची उत्तरे अचूक मिळतील असे नाही. व्हाट्सअपने हे कबूल देखील केलेले आहे.
  • यामध्ये तुम्हाला केवळ इंग्रजीमध्ये उत्तर मिळतील तरीदेखील तुम्ही कोणत्याही भाषेत प्रश्न विचारू शकता.

रोहित-विराटसाठी सचिनची खास पोस्ट!! वाचून तुमचाही ऊर भरून येईल

rohit virat sachin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताला T20 विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) यांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला अलविदा केला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे अनमोल रत्न आहेत. एक असे खेळाडू ज्यांनी मागील १५ वर्षात भारतीय क्रिकेटची भरपूर सेवा केली आहे. भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यात या दोन्ही खेळाडूंचा मोठा वाटा राहिला आहे. आज विराट आणि रोहितने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

सचिन रोहित शर्माबाबत म्हणाला कि, रोहित, एक आश्वासक तरुण ते विश्वचषक विजेत्या कर्णधारापर्यंत तुझ्या उत्क्रांतीचा मी साक्षीदार आहे .क्रिकेट बद्दलची तुझी अतूट बांधिलकी आणि अपवादात्मक प्रतिभेने देशाला मोठा अभिमान मिळवून दिला आहे. T20 विश्वचषकातील विजय हा तुझ्या उत्कृष्ट कारकिर्दीचा परिपूर्ण कळस आहे. शाब्बास, रोहित! पुढे सचिनने विराट कोहलीसाठी सुद्धा म्हंटल कि, विराट तू या खेळाचा खरा चॅम्पियन आहेस . स्पर्धेच्या आधी तुला कदाचित कठीण वेळ गेला असेल, परंतु काल रात्री तू सिद्ध केले की तू खरोखरच सज्जन खेळातील महान खेळाडूंपैकी एक आहात. ६ विश्वचषकांमध्ये भाग घेणे आणि शेवटच्या विश्वचषकात विजय मिळवणे हा मला चांगलाच माहीत असलेला अनुभव आहे. मला आशा आहे की तू खेळाच्या लांब फॉरमॅटमध्ये (कसोटी क्रिकेटमध्ये) भारतासाठी सामने जिंकत राहशील .

तस बघितलं तर रोहित 2007 पासून आणि विराट 2010 पासून भारताच्या T20 संघाचा भाग आहे. दोघांनी या फॉरमॅटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आणि आता भारताला टी-20 चॅम्पियन बनून त्यांच्या करिअरचा शेवट केला. कोहलीने 12 जून 2010 रोजी आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आपल्या कामगिरीत सातत्य राखणारा कोहली भारताचा नंबर १ चा बॅट्समन ठरला. रोहित, धोनी यांच्यासारखे मोठे फटके मारणं कोहलीला शक्य नसलं तरी आपल्या क्लासीक खेळीच्या जोरावर त्याने भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिलेत.

दुसरीकडे, रोहित शर्मा हा आक्रमक फलंदाज, एकदा जम बसला कि मग सुट्टी नाही… मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू भिरकावण्याची रोहितची क्षमताच त्याला जगातील सर्वात्कृष्ट फलंदाज बनवते. रोहित जेव्हा बॅटिंग करतो त्यावेळी त्याचा खेळ बघणं म्हणजे डोळ्याचं पारणं फिटणारच असतं. रोहित शर्माने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून आपल्या T20 आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती.आता तर १७ वर्षांनी त्याने स्वतः च्या नेतृत्वाखाली भारताला T20 विश्वचषक चॅम्पियन बनवले आणि चॅम्पियन म्हणूनच निवृत्ती जाहीर केली.

World Social Media Day 2024 | सोशल मीडियावर घरबसल्या पैसे कसे कमवायचे ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

World Social Media Day 2024

World Social Media Day 2024 | आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. आपल्याला जगभरातील सगळ्या घडामोडी घरात बसल्यात एका क्लिकवर सोशल मीडियाला पाहायला मिळतात. त्यामुळे सोशल मीडियाने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले आहे. तंत्रज्ञानाने केलेल्या या विकासामुळे आता घरबसल्या माणसांना जगभरातील गोष्टी समजतात. अगदी मनोरंजनासाठी महत्त्वाच्या गोष्टींसाठी सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापरले जाते. महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मोठ्या बातम्या वाचण्यापेक्षा सोशल मीडियावर एका क्लिकने समजते. त्यामुळे अनेक लोक सोशल मीडिया जास्त प्रमाणात वापरतात.

सोशल मीडिया (World Social Media Day 2024) हा केवळ माहितीचा स्त्रोत न राहता, आता कमाईचा एक मोठा स्त्रोत झालेला आहे. अनेक लोक आता घर बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावत आहे. कोरोनाच्या काळात व्हिडिओ बनवण्याची कला अनेक लोकांमध्ये आलेली आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या व्हिडिओद्वारे त्यांचे टॅलेंट दाखवतात. आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून लाखो रुपये कमवतात. तुम्ही देखील instagram facebook youtube वर व्हिडिओ शेअर करून लाख रुपये कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल.

तुम्ही अशी कमाई करू शकता

स्टेप 1 | World Social Media Day 2024

तुम्हाला सोशल मीडियावर तुमचे अकाउंट तयार करावे लागेल. आणि त्यावर तुम्हाला जो आवडतो तो कंटेंट टाकावा लागेल. म्हणजे जर तुम्हाला चांगले जेवण बनवता येत असेल तर तुम्ही जेवणाचे व्हिडिओ टाकू शकता. त्याचप्रमाणे डान्स येत असेल किंवा तुम्हाला नवीन कंटेंट क्रिएट करता येत असेल, तर तुम्ही त्याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करू शकता.

तुम्ही जेव्हा व्हिडिओ पोस्ट करतात. तेव्हा ते व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. आणि तुमचे फॉलोवर्स वाढतात हे फॉलोवर जमा होण्यासाठी थोडा वेळ लागतो. परंतु एकदा का तुमचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले की तुमचे व्हिडिओ क्षणार्धात वायरल होतात.

स्टेप 2

तुम्ही जर सोशल मीडियाचे सगळे नियम व अटी पूर्ण केल्या त्यानंतर तुमच्या व्हिडिओवर सोशल मीडिया करून जाहिराती दाखवल्या जातात. आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळतात यातून देखील तुमची कमाई सुरू होते

स्टेप 3

सोशल मीडिया जाहिरातीशिवाय अनेक मोठ्या कंपन्या देखील जाहिरातीसाठी तुमच्याशी संपर्क साधतात. त्यातूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला कष्ट घेणे गरजेचे आहे आणि चांगला कंटेंट पोस्ट करणे देखील गरजेचे आहे.