Monday, December 22, 2025
Home Blog Page 665

Benefits Of Boiled Vegetables : निरोगी जगायचंय? तर ‘या’ भाज्या उकडून खा; मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Benefits Of Boiled Vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Boiled Vegetables) निरोगी आरोग्य हवे असेल तर तशी जीवनशैली असायला हवी. आता निरोगी जीवनशैली म्हणजे काय? तर आरोग्याशी संबंधित चांगल्या सवयींचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहार पूर्ण, उत्तम व सकस असायला हवा. पण रोजच्या दगदगीत आणि धावपळीत आपली जीवनशैली कधी बिघडत चालली आहे हे आपल्या लक्षात येत नाही.

सकाळी घाईत नाश्ता टाळणे, वेळेवर न जेवणे, भूक लागली म्हणून अरबट चरबट खाणे यामुळे आपले आरोग्य खराब होते. तळलेले आणि चमचमीत पदार्थ भले आपल्या जिभेचे चोचले पुरवत असतील पण आरोग्याची सोयीने वाट लावतात. (Benefits Of Boiled Vegetables) म्हणूनच आपल्या आहारात काही उकडलेल्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला आहार तज्ञ देतात. मुख्य म्हणजे, भाज्या उकडून खाल्ल्यास मिळणारे फायदे फारच आश्चर्यकारक आहेत. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

उकडलेल्या भाज्या देतात आरोग्यवर्धक फायदे (Benefits Of Boiled Vegetables)

आपल्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या असायला हव्या. कारण यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळत असतात. तसेच काही भाज्या उकडून खाल्ल्याने आरोग्याला मिळणारे फायदे फारच चमत्कारिक असतात. कारण भाज्यांमध्ये असणारे जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक त्यांच्या उकळण्यानंतरदेखील सुरक्षित राहतात.

तथापि, त्यातील पोषक घटक नष्ट होण्यापासून रोखण्यासाठी आणि ते योग्य प्रमाणात तसेच मर्यादित वेळेसाठीच उकळले गेले तर अधिक फायदेशीर ठरते. याशिवाय उकडलेल्या भाज्यांचे पाणी हे अत्यंत पोषक असते. त्यामुळे ते फेकून न देता त्याचे सेवन करावे. अगदी ग्रेव्ही, सूप किंवा सॉसच्या माध्यमातून देखील या पाण्याचे सेवन करता येते. (Benefits Of Boiled Vegetables) चला तर या आरोग्यदायी भाज्यांविषयी जाणून घेऊया.

पालक

पालेभाज्यांमधील पालक ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. त्यामुळे विविध पद्धतीचे तिचे सेवन करता येते. भाजी, सूप किंवा अगदी कच्चा पालकदेखील खाणे फायदेशीर ठरते. (Benefits Of Boiled Vegetables) अशी ही गुणकारी पालकाची पाने उकळून घेऊन त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ले असता यातील ऑक्सलेटचे प्रमाण कमी होते आणि त्यातील लोह व कॅल्शियम अधिक चांगल्याप्रकारे शरीराला मिळते.

बटाटा (Benefits Of Boiled Vegetables)

बऱ्याच लोकांना बटाटा खूप आवडतो. पण बटाटा खाण्याची योग्य पद्धत वापरली तर तो अधिक लाभदायी ठरतो. बटाटे तळण्याऐवजी उकडून खाल्ले तर त्याचा आरोग्याला चांगला लाभ मिळतो. यातील व्हिटॅमिन सी आणि बी योग्य प्रमाणात शरीराला मिळतात. मुख्य म्हणजे, बटाटा उकडल्याने त्यातील कॅलरीज कमी होतात आणि वजन वाढत नाही.

गाजर

गाजर हे शरीरासाठी अत्यंत चांगले असते. (Benefits Of Boiled Vegetables) खास करून डोळ्यांसाठी गाजराचे सेवन बरेच फलदायी मानले जाते. असे हे गाजर पाण्यात उकळल्याने त्याच्या पेशींच्या भिंती तुटतात आणि यामुळे गजरात बीटा कॅरोटीन शरीरात शोषून घेणे सोपे होते. ज्याचे ग्रहण केले असता शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होते. याचा शारीरिक आरोग्याला विशेष लाभ होतो.

रताळे

उकडलेले रताळे खाणे फारच आरोग्यदायी मानले जाते. कारण, उकळून झाल्यानंतरदेखील यातील बीटा कॅरोटीन टिकून राहते. जे एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि हे शरीरात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. याचा सर्वाधिक लाभ आपले डोळे, त्वचा आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो. (Benefits Of Boiled Vegetables)

धक्कादायक!! उष्माघातामुळे तब्बल 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू; अनेकांवर उपचार सुरू

Saudi aribia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाने जगभरातील नागरिकांना हैराण करून सोडले आहे. यामध्ये उष्माघातामुळे अनेक लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशातच सौदी अरेबियातूनही (Saudi Arabia) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी अति उष्णतेमुळे सुमारे 550 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियातील तापमानाने 50 अंशांचा टप्पा ओलांडल्यानंतर नागरिकांना याचा प्रचंड त्रास होताना दिसून आला. अशा परिस्थितमुळेच अनेक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून ईदच्या निमित्ताने हजला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या संकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यातील अनेक यात्रेकरूंना उष्माघाताचा त्रास झाला. यामुळेच तब्बल 550 हज यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतची माहिती मंगळवारी सौदी सरकारकडून देण्यात आली आहे. मृत झालेल्या यात्रेकरूंमध्ये 323 इजिप्त लोकांचा समावेश असल्याचे ही सरकारने सांगितले आहे. या घटनेनंतर हज यात्रेकरूंनी तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन ही सरकारने केले आहे.

दरम्यान, दरवर्षी लाखोंच्या संख्येने ईदच्या काळामध्ये मुस्लिम बांधव हज यात्रेला जात असतात. गेल्या वर्षी हज यात्रेला गेलेल्या सुमारे 240 यात्रेकरुंचा उष्णतेमुळे मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा 550 हज यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात उष्णतेमुळे अनेक यात्रेकरू आजारी पडले आहेत. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवाल तर अवघ्या 5 वर्षात लखपती व्हाल

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Post Office Scheme) कोणताही गुंतवणूकदार पैसे गुंतवण्याआधी सुरक्षा आणि निश्चित परतावा या दोन गोष्टी पडताळतो. कारण आपण कमावलेला पैसे योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवला तरच फायदा होतो, हे सगळेच जाणतात. गेल्या काही काळात मार्केटमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजनांना गुंतवणूकदारांकडून चांगली पसंती मिळाल्याचे दिसले आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसदेखील आपल्या गुंतवणूकदार वर्गासाठी कायम वेगवेगळ्या आणि फायदेशीर योजना घेऊन येत असते. ज्या कायम मार्केटमध्ये खळबळ उडवताना दिसतात. आजही आपण अशाच एका धमाकेदार योजनेची माहिती घेणार आहोत. ज्यामध्ये गुंतवणारे मालामाल होत आहेत.

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना (Post Office Scheme)

जर तुम्ही सर्वोत्कृष्ट योजनेच्या शोधात असाल तर पोस्टाची ही योजना तुमच्यासाठी एकदम करेक्ट आणि बेस्ट आहे असे समजा. कारण गुंतवणूक करून भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे. या योजनेचे नाव आहे आरडी योजना. जी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाते आणि यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळू शकतो. या योजनेत सामील होण्यासाठी ज्या गोष्टी माहित असायला हव्या त्याविषयी आज आपण माहिती घेत आहोत.

आरडी योजना

पोस्ट ऑफिसची आरडी योजना हीभविष्यातील आर्थिक अडचणींवर तोडा ठरू शकते. ती कशी? याविषयी जाणून घेऊ. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. ५ वर्षानंतर ही योजना मॅच्युअर झाल्यास तुम्हाला एकरकमी रक्कम प्रदान केली जाते. (Post Office Scheme)

आरडी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दरमहा किमान ७ हजार रुपयांची गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. म्हणजे, तुम्हाला योजनेच्या ५ वर्षाच्या कालावधीत एकूण ४,२०,००० रुपये गुंतवावे लागतील. (Post Office Scheme) यावर तुम्हाला योजनेंतर्गत ६.७% व्याजदर मिळेल. आता कॅल्क्युलेशननुसार योजनेच्या परिपक्वतेवर तुम्हाला ५ वर्षानंतर ७९,५६४ रुपये इतके व्याज मिळेल.

आता तुम्ही गुंतवलेली रक्कम आणि मिळालेले व्याज एकत्र केल्यास लक्षात येते की, आरडी योजनेच्या मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला मिळणारी एकूण रक्कम ही ४,९९,५६४ रुपये इतकी अर्थात सुमारे ५ लाख रुपये अगदी सहज होईल. इतकेच नव्हे तर आरडी योजना परिपक्व होण्याआधी तुम्ही योजनेचा कालावधी पुढील ५ वर्ष वाढवू शकता. म्हणजे तुम्ही एकूण १० वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.

(Post Office Scheme) असे केल्यास तुमची एकूण गुंतवणूक ८,४०,००० रुपये इतकी होईल आणि यावर तुम्हाला ६.७% टक्के व्याजदर मिळेल. ज्यानुसार, १० वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या परिपक्वतेवर तुम्हाला एकूण ३,५५,९८२ रुपये इतके व्याज दिले जाईल. अर्थात तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीनंतर मिळणारी एकूण रक्कम ही ११,९५,९८२ रुपये इतकी असेल.

कशी कराल गुंतवणूक?

जर तुम्हालाही पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेचा एक भाग व्हायचे असेल यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल. सगळ्यात आधी तुम्हाला पोस्टात या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. (Post Office Scheme) त्यानंतर प्रत्येक महिन्याला ठरल्यानुसार ठराविक रक्कम गुंतवावी लागेल. असे केल्यास तुम्ही या योजनेत सहभागी होऊन योजनेच्या म्यॅच्युरिटीवर एकूण जमा झालेली रक्कम व्याजासह मिळवू शकाल.

विनातिकीट प्रवाशांच्या दंडामुळे रेल्वेच्या कमाईत वाढ; 2 महिन्यात कमावले करोडो रुपये

central Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा प्रवास हा अत्यंत स्वस्त आणि आरामदायी मानला जातो. रेल्वेकडून देखील प्रवाशांचा प्रवास चांगला प्रवास होण्यासाठी अनेक सुविधा आणल्या जातात. आपण नेहमीच पाहतो की, रेल्वेमध्ये खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे अनेक लोक हे विना तिकीट प्रवास करतात. आता रेल्वेने देखील या विना तिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांविरुद्ध अनेक कठोर पावले उचललेली आहेत. कारण या प्रवाशांमुळे इतर प्रवाशांना देखील त्रास होतो.

त्यामुळे या प्रवासांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम आता रेल्वेने राबवली आहे. त्यामुळे आता उपनगरीय लोकल एक्सप्रेस, विशेष ट्रेनमध्ये टीसीकडून तिकिटांची तपासणी करण्यात येत आहे. अशावेळी जर एखाद्या व्यक्तीकडून प्रवाशांना त्रास होत असेल, किंवा कोणी नुकसान पोहोचवत असेल, तर रेल्वेकडून त्याची कठोर कारवाई देखील करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विना तिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून दंड देखील वसूल करण्यात येत आहे.

एप्रिल आणि मे 2024 या दोन महिन्यांमध्ये विना तिकीट प्रवास करणारे तब्बल 9.4 लाख प्रवासी सापडल्याने त्यांच्याकडून 63.62 कोटींचा दंड वसूल देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे रेल्वेच्या महसुला 14.64 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेने अनाधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 4.29 लाख प्रकरणात 28.44 कोटींचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे हा महसूल 2.54 टक्क्याने वाढलेला आहे..

मध्यरेल्वे बरोबर पश्चिम रेल्वेने देखील फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 2 महिन्यातच 2.80 लाख रुपये विना तिकीट प्रवास करणाऱ्या लोकांकडून 17.19% रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.

LIC संदर्भात सगळ्यात मोठी बातमी; कंपनीला घ्यावा लागला ‘हा’ महत्वाचा निर्णय

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LIC ही देशभरातील फार जुनी विमा कंपनी आहे. गेली अनेक वर्ष आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक जबरदस्त योजना आणि फायदे प्रदान करणारी एलआयसी सर्वात मोठी विमा कंपनी आहे. आज LIC च्या ग्राहकांची संख्या प्रचंड मोठी आहे. अनेक गुंतवणूकदार मोठ्या विश्वासाने एलआयसीच्या योजनांमध्ये डोळे झाकून गुंतवणूक करतात. त्यामुळे देशभरात एलआयसीचे कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. त्याच पॉलिसी धारकांसाठी आज अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. तुम्हीही एलआयसी पॉलिसी धारक असाल तर ही बातमी चुकूनही स्किप करू नका.

LIC चा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसीने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा परिणाम साहजिकच पॉलिसी धारकांवर होणार आहे. त्यानुसार, एलआयसी आता देशातील मेट्रो शहरांमधल्या रिअल इस्टेट मालमत्ता विकणार आहे, असे समजत आहे. यातून एलआयसी एकूण ६- ७ बिलियन डॉलर इतकी रक्कम उभी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी एलआयसी आपल्या प्लॉट आणि कमर्शियल इमारतींचीसुद्धा विक्री करणार असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तानुसार, एलआयसीने आपल्या मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत इंटर्नल टीमला सूचनादेखील दिल्या आहे. ज्याची सुरुवात मुंबईतील मालमत्ता विकून केली जाईल, असेही समोर आले आहे.

LIC ची मालमत्ता विकली जाणार

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून स्टॉक मार्केटमधील सर्वाधिक गुंतवणूक करणारी नामांकित कंपनी आहे. तिच्या मालमत्तेत, दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील जीवन भारती बिल्डिंग तसेच कोलकातामधील चित्तरंजन अव्हेन्यू स्थित एलआयसी बिल्डिंग आणि मुंबईतील एशियाटिक सोसायटी, अकबर रॅलीतील एका हाउसिंग प्रॉपर्टीचा समावेश आहे. वृत्तानुसार, या मालमत्तेची अंतिम व्हॅल्युएशन लक्षात घेता याची एकूण किंमत ५० ते ६० हजार कोटी रुपयेच्या आसपास आहे.

LIC च्या संपत्तीचे मूल्यांकन होणार

वृत्तानुसार, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडे एकूण ५१ ट्रिलियन रुपयांची मालमत्ता आहे. जिच्या विक्री प्रक्रियेपूर्वी ही कंपनी आपल्या मालमत्तेचे एकूण मूल्यांकन करेल, असे सांगितले जात आहे. अद्याप एलआयसीच्या बऱ्याच संपत्तीचे मूल्यांकन केलेले नाही. ते आता केले जाईल. शक्यता आहे की, उर्वरित संपत्तीचे मूल्यांकन हे वास्तविक किमतीपेक्षा पाचपट जास्त असू शकते. अर्थात हा आकडा सुमारे ३ ट्रिलियन रुपयांच्या आसपास वाढू शकतो.

उत्तम आरोग्यासाठी दिवसाला प्या एवढेच दूध; अतिसेवनाने होते ‘हे’ नुकसान

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर नेहमीच आपल्याला दररोज दूध पिण्याचा सल्ला देतात. कारण दूध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. अगदी लहान मुलं असो किंवा वृद्ध सगळ्यांनीच दुधाचे सेवन केले पाहिजे. कारण त्यामुळे आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. परंतु या दुधाचे सेवनही नियमित प्रमाणात केले पाहिजे. अन्यथा जर तुम्ही जास्त सेवन केले, तर त्यामुळे तुमच्या शरीराला नुकसान देखील होऊ शकते.

दूध आपल्या शारीरिक वाढीसाठी आणि विकासासाठी चांगले असले, तरी देखील त्याचे सेवन मर्यादितच केले पाहिजे. ज्या लोकांना सर्दी, खोकला, अपचन, डायरिया स्किन डिसिज अशा प्रकारच्या समस्या आहेत. त्या लोकांनी दुधाचे सेवन करणे टाळावे. आता दररोज एका सामान्य व्यक्तीने किती दूध पिणे गरजेचे आहे? आपल्या शरीराला किती गरज असते? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

दररोज किती दूध प्यावे ?

एका निरोगी व्यक्तीने नियमितपणे दूध पिणे चांगले आहे. दुधातून शरीराला कॅल्शियम, विटामिन बी 12, विटामिन डी, कॅलरी, पोटॅशियम, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स देखील मिळतात. परंतु एका अभ्यासातून असे समोर आलेले आहे की, एका वयस्की व्यक्तीने दररोज तीन कप म्हणजे 750 मिली दूध प्यावे. त्याचप्रमाणे लहान मुलांनी 2.5 कप एवढे दूध प्यावे. हे प्रमाण व्यक्तीच्या शारीरिक गरजेनुसार कमी जास्त देखील होऊ शकते. परंतु सामान्यपणे रोज 500 मिली दूध आपल्या शरीरासाठी गरजेचे असते. त्यामुळे आपल्या शरीराला पुरेसे कॅल्शियम आणि विटामिन डी मिळते.

अति दुधाच्या सेवनाने काय नुकसान होते

स्वीडनमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार 3 कपापेक्षा जास्त दूध पिल्याने हीप फ्रॅक्चर, हाडांसंबंधी समस्या इतकेच नाही, तर अनेकवेळा जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे जास्त दूध पिल्याने हाडे जास्त मजबूत होतात. असा गैरसमज ठेवणे चुकीचे आहे. लहान मुलांनी जर जास्त दूध पिले तर दुधातील कॅलरीजमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि त्यामुळे मुलं जेवण करणे देखील टाळतात. तसेच जास्त दूध पिल्याने आयनचे प्रमाण देखील कमी होते.

अशाप्रकारे तुम्ही दररोज दूध पिणे गरजेचे आहे. परंतु साधारणपणे 500 मिली पेक्षा जास्त दूध जर तुम्ही दिवसाला पीत असाल, तर त्यामुळे तुमच्या शरीराला नुकसान देखील प्राप्त होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचे सेवन योग्य प्रमाणात करणे, हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Gold Price Today: ग्राहकांसाठी खुशखबर!! चांदीच्या किमतीत मोठी घसरण; पहा सोन्याचा भाव

Gold Price Today

Gold Price Today: लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता याचं किमतींमध्ये हळूहळू घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज म्हणजेच 19 जून रोजी सोन्याचे भाव स्थिर आहेत. परंतु चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मौल्यवान चांदीची योग्य दरामध्ये खरेदी करता येणार आहे. तर सोन्याच्या किमतीही स्थिर असल्यामुळे ग्राहकांना फटका बसणार नाही.

Good Return नुसार बुधवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 66,200 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने हे 72,220 रुपयांवर आले आहे. यासह MCX नुसार, आज 24 कॅरेट सोने 71,737 रुपयांनी बाजारात व्यवहार करत आहे. ज्यामुळे ग्राहकांना आता सोने खरेदी करताना कोणतीही चिंता करावी लागणार नाही. (Gold Price Today)

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 66,200 रुपये
मुंबई – 66,200 रुपये
नागपूर – 66,200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,220 रूपये
मुंबई – 72,220 रूपये
नागपूर – 72,220 रूपये

चांदीचे आजचे भाव

आज सोन्याचे भाव स्थिर असले तरी चांदीच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण की Good Return नुसार, आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 910 रुपयांनी व्यवहार करत आहे. (Gold Price Today) तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 9100 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 91,100 रूपये अशी आहे. या कारणामुळेच सोन्यापेक्षा चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसत आहे.

Yoga For Lung Strength | फुफुसांच्या उत्तम आरोग्यासाठी करा ‘ही’ योगासने; इतर आजारही होतील बरे

Yoga For Lung Strength

Yoga For Lung Strength | आजकाल लोकांची जीवनशैली खूप बदललेली आहे. सगळ्यांचे आयुष्य अगदी धावपळीचे झालेले आहे. त्याचप्रमाणे वातावरणात देखील खूप बदल झालेले आहे. अति प्रदूषण त्याचप्रमाणे अनेक विषाणू वाढलेले आहेत. या सगळ्याचा मानवी आरोग्यावर मात्र मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आज काल अनेक लोकांना फुफुसाच्या समस्या निर्माण झालेल्या आहे. त्यामुळे फुफ्फुसाची क्षमता देखील कमकुवत झालेली आहे.

या सगळ्या परिस्थितीत आपण आपल्या आरोग्यासाठी काही योगासनांचा (Yoga For Lung Strength) वापर करणे खूप गरजेचे असते. आयुर्वेदामध्ये योगासनाला खूप जास्त महत्त्व आहे. निरोगी आरोग्यासाठी रोज योगा करण्याचा सल्ला दिला जातो. अशातच आता येथे 21 जून 2024 रोजी जागतिक योग दिन साजरा होत आहे. यानिमित्त आपण आता फुफुसांना बळकट करण्यासाठी काही योगासनांची माहिती जाणून घेऊया.

उष्ट्रासन

तुमच्या फुफुसांची क्षमता वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी तुम्ही हे उष्ट्रासन करू शकता. हे केल्याने तुम्हाला श्वासासंबंधीच्या अनेक समस्या देखील दूर होतात. यासाठी तुम्ही गुडघ्यावर बसा त्यानंतर आपले हात आपल्या नितंबावर ठेवा आणि आपले पाय आपल्या हातांनी धरा. आपली कंबर मागे वाकवा तुम्ही 30 सेकंद या स्थितीत थांबा.

त्रिकोणासन | Yoga For Lung Strength

फुफुसांची ताकद वाढवण्यासाठी त्रिकोणासन खूप महत्त्वाचे आहे. यामुळे फुफ्फुसाचे स्नायू देखील मजबूत होतात. हे करण्यासाठी तुम्ही एका सरळ रेषेत उभे रहा. दोन्ही पायांमधील अंतर राखून हात मांडीजवळ ठेवा. त्यानंतर श्वास घेताना हात डोक्याच्या वर घ्या. आता श्वास सोडताना शरीर डावीकडे वळवा. यावेळी तुम्ही गुडघे वागू नका.

मत्सासन

या आसनाचा उपयोग खूपच मजबूत करण्यासाठी होतो. असे केल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे हे योगासन नियमित करणे गरजेचे आहे. हे असं करण्यासाठी तुम्ही पायाना पद्मासनात ठेवून पुढील बाजूने झोपा. या स्थितीमध्ये श्वास आत घ्या आणि कमरेला उंच उचला या स्थितीमध्ये शरीरातील नितंब आणि डोके हे खालच्या बाजूला जमिनीवर ठेवायचे. आणि कंबर वर उचलायची तुम्ही पाच मिनिटापर्यंत हळूहळू हे असं करू शकता.

भुजंगासन

तुम्ही जर भुजंगासनाचा नियमितपणे सराव केला, तर तुमची फुफ्फुसे मजबूत होतात. त्यामुळे या आसनाचा रोज सराव करा त्याचप्रमाणे खांदे आणि मनक्याशी संबंधित काही समस्या असेल तर त्या देखील दूर होतील. यासाठी तुम्हाला पाठीवर झोपावे लागेल. त्यानंतर तुमचे दोन्ही पाय जवळ करा. आणि दोन्ही पाय छातीच्या बाजूने जमिनीवर टिकून ठेवा. त्यानंतर हनवटी जमिनीला टेकलेली असेल लांब श्वास घेत दोन्ही हातांवर भार देत वर उठा.

Electric Tiffin Box | आता कधीही घ्या गरमागरम जेवणाचा आस्वाद; बाजारात आलाय इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स

Electric Tiffin Box

Electric Tiffin Box | आजकाल मानवाची जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण करियरच्या आणि नोकरीच्या मागे धावत असतो. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. कारण लोक वेळेवर जेवण करत नाही. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त ते बाहेरचे जेवण खातात. धावपळीच्या जीवनात दुपारी लोकांना घरी बनवलेलं ताज आणि गरम अन्न खाणं शक्य होत नाही. परंतु अशावेळी आता तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आला आहे. ते म्हणजे बाजारात आता इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स उपलब्ध झाला आहे. या टिफिन बॉक्समध्ये तुमचं जेवण अगदी ताजे आणि गरम राहते. त्यामुळे तुम्ही सकाळी डब्यात भरलेले जेवण दुपारपर्यंत अगदी गरम राहते. आणि तुम्हाला एकदम गरमागरम जेवणाचा आस्वाद घेता येतो.

इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स नक्की काय आहे | Electric Tiffin Box

हा नवीन इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स नॉर्मल टिफिन बॉक्सप्रमाणे दिसतात. परंतु त्यात एक इलेक्ट्रिक फिटिंग घटकाचा समावेश असतो. जेवण गरम करण्यासाठी आणि ताजे ठेवण्यासाठी असतात. यामध्ये विजेचा वापर केला जातो. या टिफिन बॉक्समध्ये टेंपरेचर नियंत्रित करण्याचा आणि टाइमरचाही समावेश असतो. त्यामुळे तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे अन्न गरम करू शकता.

इलेक्ट्रिक टिफिन बॉक्सचे फायदे | Electric Tiffin Box

गरम आणि ताजे जेवण

तुम्ही आता केलेले जेवण दुपारी किंवा संध्याकाळी जरी खायचे म्हटले तरी ते अगदी ताजे आणि गरम राहते. त्यामुळे तुम्हाला चांगल्या जेवनाचा आस्वाद घेता येतो.

वापरण्यास सोयीस्कर

हा इलेक्ट्रिक टिफिन बॉक्स वापरण्याला अगदी सोपा आहे. यासाठी तुम्ही तुमचं जेवण टिफिन बॉक्समध्ये ठेवायचा आणि लॉग इन करायचं. त्यानंतर तुमचे जेवण गरम होते.

वेळेची बचत

तुम्हाला दुपारी देखील गरमागरम जेवण मिळते. यासाठी तुम्हाला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामुळे तुमचा वेळ देखील वापरतो.

पर्यावरण पूरक

या इलेक्ट्रिक टिफिन बॉक्समुळे प्लॅस्टिकच्या टिफिन बॉक्सचा वापर कमी होतो. आणि पिशव्यांचा वापर कमी होतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होतो.

टिफिन बॉक्स घेताना या गोष्टी लक्षात | Electric Tiffin Box

  • तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य आकाराचा टिफीन बॉक्स निवडू शकता. तुम्हाला किती जेवण गरम करायचा आहे. यावर ते अवलंबून असते.
  • शक्तिशाली हीटिंग घटक असलेला टिफिन बॉक्स निवडा.
  • टायमर असलेल्या टिफिन बॉक्स विकत घ्या जेणेकरून तुमचे जेवण किती वेळात गरम करायचे. हे तुम्हाला निश्चित करता येईल.
  • बाजारामध्ये वेगवेगळ्या किमतीचे टिफिन बॉक्स उपलब्ध आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही हा टिफीन बॉक्स विकत घ्या.

Electric Vehicles Subsidy | आनंदाची बातमी ! इलेक्ट्रिक दुचाकीच्या खरेदीवर सरकारकडून मिळणार ‘एवढी’ सबसिडी

Electric Vehicles Subsidy

Electric Vehicles Subsidy | नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी निवडून आल्यामुळे आता लोकांना त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार 2024 च्या बजेटमध्ये फेम 3 या योजनेची घोषणा करू शकतात. म्हणजेच आता सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर फास्टर अँडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेईकल (Electric Vehicles Subsidy) ही योजना पुन्हा एकदा सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेसाठी सरकारकडून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद देखील केली जाऊ शकते.

या आधी सरकारने इलेक्ट्रिक दुचाकीवर सबसिडी (Electric Vehicles Subsidy) देण्यासाठी चालू केली होती. परंतु मार्चमध्ये अचानक ही योजना बंद झाली. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीमध्ये देखील घट निर्माण झाली होती. परंतु आता ही सबसिडी पुन्हा एकदा लागू केली आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा फरक पडेल, असे मानले जात आहे.

मार्चमध्ये सरकारकडून ही योजना बंद झाली होती. आणि मिळणारे अनुदान देखील बंद केल्याने इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. तसेच इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री ही कमी झाली होती. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कमी रेंजचे अनेक मॉडेल्सही लॉन्च केले होते. तसेच त्यात फीचर्स देखील आणले होते. जेणेकरून त्यांच्या विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांनी हे कमी-कीमतीचे मॉडेल्स विकत घेतले असले, तरी टॉप मॉडेलची मागणी मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.

परंतु आता सरकार पुन्हा एकदा ही योजना सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही योजना पुन्हा चालू झाली तर इलेक्ट्रिक दुचाकीवर आता सरकारकडून सबसिडी मिळेल. त्यामुळे या दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील वाढेल. आणि कंपन्यांना देखील त्यांचे टॉप मॉडेल विकता येईल. अशा प्रकारे सरकारने सुरू केलेल्या योजनेचा फायदा सगळ्यांनाच होईल.