Saturday, December 20, 2025
Home Blog Page 6733

तुमचं हे असं होतंय का? बाॅयफ्रेंडच्या मित्राबद्दल आकर्षण वाटतंय का?

relationship tips marathi
relationship tips marathi

बर्याचवेळा तुमच्या गर्लफ्रेंडला तुमचा एखादा मित्र आवडत असतो किंवा तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडची एखादी मैत्रीण आवडू लागते. पण असे होतंय म्हणुन तुम्हाला जास्त मनाला लावून घेण्याची गरज नाही. हे असं होणं अगदी स्वाभाविक आहे. एकत्र वेळ घालवल्याने समोरच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे अगदी साहजिक आहे. प्रेम आणि आकर्षण यात फरक असतो हे तुम्ही जाणुन घ्यायला हवे.

इतर महत्वाचे –

या गोष्टी करणार्या बाॅयफ्रेंडवर मुली भरभरुन प्रेम करतात

जॅकलिन बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हालाही धक्का बसेल

तुमचं हे असं होत असेल तर पहिल्यांदा तुम्ही हे शोधा की तुमच्या मनात तुमच्या बाॅयफ्रेंडच्या मित्राबद्दल नक्की काय विचार येत आहेत. किंवा तुमच्या गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीबद्दल तुमच्या मनात नक्की काय विचार येत आहेत. तुमचे फक्त क्रश आहे की आणखी काय आहे? बर्याचदा तुम्हाला एखाद्यावर खूप कमी वेळात क्रश होत असतो. परंतू या भावना दिर्घकाळ राहत नाहीत. कालांतराने पहिल्यापहिल्यांदा वाटणारे आकर्षण नंतर नाहिसे होते. तेव्हा तुम्हाला वाटत असणारे आकर्षण नक्की कोणत्या कॅटेगरीतले आहे याचा शोध घ्या. कमी कालावधीसाठी वाटणार्या आकर्षणासाठी कायमसाठी वाटणारे प्रेम गमावणार नाही याची खबरदारी घ्या.

इतर महत्वाचे –

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

या पाच गोष्टी केल्यावर मुली होतात इम्प्रेस

सात दिवसाचा दुखवटा जाहीर, अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे सरकारचा निर्णय

atal bihari vajpeyi holiday
atal bihari vajpeyi holiday

नवी दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान त्यांच्या निधनामुळे सरकारने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. उद्या दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या पासून सात दिवस देशातील सर्व कार्यालयावरील राष्ट्रध्वज मध्यावर ठेवले जाणार आहेत. तसेच दिल्लीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयाना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच उद्या दिल्ली महानगर बंद राहणार आहे. वाचपेयी यांच्या जाण्याने देश भरातून तीव्र दुःख व्यक्त होत आहे.

अटलजींनी मला भावासारखे प्रेम, लता मंगेशकरांनी केल्या भावना व्यक्त

Lata mangeshkar on atalbihari death
Lata mangeshkar on atalbihari death

मुंबई | अटल बिहारी वाचपेयी यांचे आज निधन झाले आहे यासंदर्भाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अटलजी देव माणूस होते म्हणून त्यांच्यासाठी सर्व धर्माचे लोक प्रार्थना करत होते. त्यांनी मला भावासमान प्रेम केले माझेही त्यांच्यावर भावा समान प्रेम होते अशी भावना लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

मी एकदा त्यांना भेटायला गेले असता त्यांना मी सांगितले की मी तुमच्या कवितेचे गाणे गाणार आहे तेव्हा त्यांनी कवितेचं नाव विचारले. तेव्हा मी म्हणाले ‘मोत से ठणी’ त्यावर ते म्हणाले की या कवितेत तुम्हाला गाणे करावे असे का वाटले. आशा आठवणीना लता मंगेशकर यांनी उजाळा दिला.

मोठी बातमी, अटलबिहारी वाजपेयीं यांचे निधन

Atalbihari vajpeyi death
Atalbihari vajpeyi death

दिल्ली | भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे अखेर दुर्धर आजाराने एम्स रुग्णालयात निधन झाले. वाजपेयी यांची प्रकृती मागील ४० तासांपासून चिंताजनक होती. त्यांच्यावर गेल्या ९ आठवड्यांपासून एम्स मधे उपचार सुरु होते. नुकताच एम्स रुग्णालयाचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला त्यानुसार वाजपेयी यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले.

इतर महत्वाचे –

अटलबिहारी वाजपेयींच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?

अटल बिहारी वाचपेयींच्या नावावरील हे राजकीय रेकॉर्ड कोणीच मोडू शकले नाही

अटलबिहारी वाजपेयी डिमेंशिया या आजाराने त्रस्त होते. या आजारात वाढत्या वयामुळे स्मृतीभ्रंश होऊन प्रकृतीत बिघाड होतो.तसेच त्यांची एकच किडनी काम करत होती त्यामुळे त्यांच्या मूत्राशयाला इन्फेक्सशन झाले होते. वाजपेयी मागील ३ दिवस वेंटिलेटरवर होते. मात्र गुरुवारी त्यांची प्रकृती अचानक ढासळली.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देशावर दुःखाचे सावट पसरले आहे. भाजपाचे देशातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,फारूक अब्दुल्ला त्याचबरोबर अनेक केंद्रीय मंत्री आदींनी वाजपेयींची भेट घेतली आहे.

अटल बिहारी वाचपेयींची प्रकृती सुधारावी म्हणून महाराष्ट्रात ही होमहवन

Atal bihari vajpeyi orayer
Atal bihari vajpeyi orayer

नागपूर | नऊ आठवड्यापासून दिल्लीच्या एम्समध्ये उपचारासाठी दाखल असलेले अटल बिहारी वाचपेयी यांची प्रकृती सुधारावी म्हणून नागपूर शहरातील शितलादेवी मंदिरात होम हवन करण्यात येत आहे. वाचपेयी यांच्या खालावलेल्या प्रकृती बद्दल चिंता लागून राहिलेल्या लोकांनी देवाची प्रार्थना सुरू केली आहे. तर अमरावतीमधील साई मंदिरात ही वाचपेयीं यांच्या प्रकृती सुधारणेसाठी महाआरती करण्यात आली तर अहमदनगर शहरातील महागणपतीलाही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने साकडे घलण्यात आले आहे.
देशभर अटल बिहारी वाचपयी यांच्या प्रकृती सुधारणेसाठी धार्मिक कृती केल्या जात आहेत. मुस्लिम समाजातील लोकांनीही वाचपयी यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.

अटल बिहारी वाचपेयी यांच्या प्रकृती त सुधारणा व्हावी म्हणून देश करतोय प्रार्थना.

Thumbnail
Thumbnail

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती सुधारून त्यांना दीर्घ आयु मिळावी यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रार्थना केली जाते आहे. विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक वाचपेयी यांच्या प्रकृती स्वस्थासाठी प्रार्थना करत आहेत.
गोल्हेरच्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या मुलांनी वाचपेयींच्या प्रकृती सुधारणेसाठी होम हवन करून प्रार्थना केली आहे. तर तिकडे लखनव मधील हनुमान मंदिर जिथे वाचपेयींचे येणे जाणे होते तिथं ही त्यांच्या स्वस्थासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. एम्स रुग्णालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. तेथे जमलेले कार्यकर्तेही देवाची प्रार्थना करताना दिसत आहेत.

म्हणून आज केजरीवाल वाढदिवस साजरा करणार नाहीत

arvind kejriwal on Atalbihari vajpeyi health
arvind kejriwal on Atalbihari vajpeyi health

नवी दिल्ली | आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. परंतू माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याने आपण आज वाढदिवस साजरा करणार नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.

अटल बिहारी वाचपेयी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर दिल्ली एम्स मध्ये उपचार करण्यात येत आहेत.वाचपेयीं सर्वसाठी आदरणीय व्यक्ती आहेत म्हणूनच त्यांच्या बद्दल सर्व स्थरातून सहानभूती व्यक्त होत आहे.केजरीवाल यांनी ही त्यांच्या आजारपणाच्या दुःखातूनच वाढदिवस साजरा नकरण्याचा निर्णय केला आहे.

अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती जैसे थे, मेडिकल बुलेटिन जाहीर

Atal bihari vajpeyi in aiims
Atal bihari vajpeyi in aiims

नवी दिल्ली | अटल बिहारी वाचपेयी यांची प्रकृती जैसे थे अशीच असल्याचे एम्स रुग्णालयाने प्रसारित केलेल्या मेडीकल बुलेटीन वरुन स्पष्ट झाले आहे. वाजपेयी मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असून सध्या त्यांच्यावर दिल्ली एम्स मध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळी नऊ वाजता जाहीर होणारे मेडिकल बुलेटिन ११ वाजून ५ मिनिटांनी जाहीर करण्यात आले आहे. वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हॅटिलेटर वर ठेवण्यात आले आहे असे या बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे.

दरम्यान देशाचे २२ मंत्री एम्स मध्ये दाखल झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, सुषमा स्वराज, अमित शहा हे ही एम्समध्ये उपस्थित झाले आहेत. एम्स रुग्णालयाबाहेर पोलीस संरक्षण वाढवण्यात आल्याने कार्यकर्त्यां च्या मनात उलट सुलट विचार येऊ लागले आहेत. एकंदरीतच दिल्ली एम्स बाहेरील वातावरण अत्यंत चिंताजनक बनले आहे.

मी देवाला प्रार्थना करतेय की फक्त एकदा अटलजींना भाषण करताना मला पाहुदे – वाजपेयींची भाची

IMG
IMG

दिल्ली | अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अतिशय गंभीर असून ते मागील ९ आठवड्यांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील २४ तासांत अटलजींची प्रकृती खालावली असून त्यांना वेंटीलेटर वर ठेवले असल्याचे एम्स रुग्नालयाने प्रसारित केलेल्या रिपोर्ट मधे म्हटले आहे. ‘मी देवाला प्रार्थना करतेय की फक्त एकदा अटलजींना भाषण करताना मला पाहुदे’ असे अटलबिहारी वाजपेयी यांची भाजी कांति मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून पंतप्रधान मोदी सहीत २२ केंद्रीय मंत्री सध्या एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी देशभर प्रार्थना केली जात आहे.

मंटो चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

Thumbnail
Thumbnail

दिल्ली | सहादत हसन मंटो यांच्या आयुष्यावर आधारीत मंटो नावाचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नवाझउद्दीन सिद्दकी ची मुख्य भुमिका आणि नंदिता दास यांचे दिग्दर्शन असलेल्या मंटो चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला मंटो चित्रपटाने स्वातंत्र्याबाबत मुलभूत प्रश्न निर्माण केले असून संपूर्ण चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना २१ सप्टेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

मंटो यांनी आपल्या कथांमधून नेहमी समजातील भयान वास्तवावर भाष्य केले. काही गोष्टी जशा आहेत तशाच सादर का करु नयेत असा सवाल त्यांनी कायम उभा केला. लोकांच्या गोष्टी जशाच्या तशा लोकांपर्यंत पोहोचवण्यास ते आयुष्यभर झटत राहिले. मंटोच्या कथा आरशासारख्या आहेत ज्यामधे समाज आपली प्रतिमा पाहू शकतो असे मंटोचे मत होते.

माणुस जेव्हा गुलाम होतो तेव्हा आझादीची स्वप्न पहातो. आता आपण आझाद आहोत तर कोणती स्वप्न पहायची? असा प्रश्न स्वतंत्र्यदिना दिवशी मनात पेरुन मंटोने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.