नंदुरबार | हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणारे मराठा आरक्षणाचे आंदोलक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. चार आंदोलकांच्या पैकी तीन आंदोलकांना अटक करण्यात आली असून एका व्यक्तीचा पोलीस तपास करत आहेत. या चारी आरोपींवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांच्या गाडीवर चढून त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. ही घटना रविवारी ५ ऑगस्ट रोजी नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडली आहे. काल या घटने बद्दल हिना गावित यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. तसेच नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी केली होती. या घटनेच्या निषेधार्थ काल नंदुरबार जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता.
खासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या त्या व्यक्तींवर होणार अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत कार्यवाही
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमधे व्याख्यानाला
नांदेड प्रतिनिधी
नांदेड | दिनांक ६ ऑगस्ट रोजी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया तालुका कमिटी तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांची ९८ वी जयंती नांदेड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या जीवणावर जाहिर व्याख्यान ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एकलारे सर होते तर प्रमुख वक्ते म्हणुन प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले लाभले होते.
‘आण्णाभाऊंचे विचार समाजापर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. आण्णाभाऊ हे कुणा एका समाजाचे नसुन ते जनतेचे लोकशाहीर आहेत’ असे प्रतिपादन प्रा इंगोले यांनी केले. यावेळी एस.एफ.आय. चे माजी जिल्हा अध्यक्ष शिवाजी गेडेवाड, अंनिसच्या मेघाताई गऊळकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय लोहबंदे, जिल्हा कमिटी सदस्य शंकर बादावाड, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयाचे शिक्षक बालाजी लंगेवाड आदी उपस्थित होते.
१२ वर्षा खालील मुलींवर केल्या जाणाऱ्या बलात्काराला फाशीच
नवी दिल्ली | १२ वर्षा खलील मुलींवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. यासाठी गुन्हेगारी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. ३० जुलै रोजी लोकसभेने गुन्हेगारी कायदा सुधार विधेयक २०१८ पास केले होते. तेच विधेयक काल राज्यसभेने सम्मत केल्याने आता या कायद्याची वाट मोकळी झाली आहे.
कठुआ आणि उन्नाव प्रकरण झाल्यापासून सरकार वर चौफेर टीका होत होती या टिकेतून वाचण्यासाठी सरकारने याच कायद्याचा अध्यादेश काढला होता. त्या अध्यादेशाचे आता कायद्यात रुपांतर होणार आहे.
धक्कादायक! हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवतीने दिला रेल्वे खाली जीव
भाईंदर | सासरच्या लोकांकडून होत असलेल्या हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेने रेल्वेखाली जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईजवळी मीरा भाईंदर येथे घडला आहे. माहेरच्या माणसांकडून बुलेट गाडी घेण्यासाठी पैसे आण असे म्हणत रेणुका यादव या महिलेचा प्रचंड छळ होत होता. सासरच्या या त्रासाला कंटाळून रेणुका यांनी भाईंदर मध्ये रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेन खाली जीव दिला अाहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, ही घटना हुंडाबळीची असून सर्व प्रकार सीसीटीव्ही कामेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटिव्ही फुटेजमधे सदरील महिला तिच्या दोन वर्षांच्या मुलीसहित रेल्वे येण्याच्या काही सेकंद अगोदर रेल्वे रुळावर झोपता दिसत आहे. रेणुका यादव ही गर्भवती होती तसेच तिच्या सोबत दोन वर्षांची मुलगी ही मरण पावली आहे. या अपघातात तीन जीव गेले असल्याने रेल्वेस्थानकावरील बघ्यांनी हळहळ व्यक्त केली.
रेणुका यादव हिचा पती पिंटू यादव याला भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच रेणुकाच्या सासूची आणि सासऱ्याची पोलीस कसून तपासणी करत आहेत.
इतर महत्वाचे –
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज पासून सुरू
मुंबई | राज्य सरकारी कर्मचार्यांनी आज पासून राज्यव्यापी संप पुकारला अाहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, दोन लाख रिक्त पदांची भरती करण्यात यावी तसेच निवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामध्ये मंत्रालयातील सर्व कामगार सर्व, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी, महानगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी तसेच सरकारी दवाखान्यातील कर्मचारी यांचा सहभाग आहे.
दरम्यान सरकारने विभाग प्रमुखांना कामावर उपस्थित राहून संपावरील कर्मचाऱ्यांच्यावर शिस्तभंग नोटीस काढून शिस्त भंगाची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात सरकारने परिपत्रक प्रसारित केले आहे.
सुदाम्या टाईप बामण मित्रांचा विषय लय खोलंय – कुणाल गायकवाड
कुणाल गायकवाड
ब्राम्हण मोर्चांची खिल्ली उडवणं चुकच, अर्थात ते मोर्चे आणि मागण्या कितीही विनोदी वाटत असल्या तरीही
ब्राम्हण संघटनांनी आरक्षणासंबधी काही मागणी केली, त्यावर कुणीही कुत्सीत टोमणे मारण्याची गरज नाही. लोकशाही मार्गाने मागण्या होऊ द्या, कायच हरकत नाही. खरंखोट गुऱ्हाळ होत राहील. मराठा आरक्षणासंबधी काही ब्रम्हवृंदांनी कुत्सीत टोमणे मारले होते, तर काहीजण तार्कीक विरोध न करता निव्वळ मळमळ बाहेर काढत होते, आता त्याची प्रतिक्रीया म्हणून ब्राम्हण मोर्चांची खिल्ली उडवणं चुकच, अर्थात ते मोर्चे आणि मागण्या कितीही विनोदी वाटत असल्या तरीही. त्यामुळे कोणाचही बहुसंख्यत्वाचं राजकारण वाईटच.
आयुष्यात बरेच जीवाला जीव देणारे अन् एका गांडीनं हगणारे बामण मित्र हायेत, राहतील. ते फक्त मित्रच आहेत, ब्राम्हण नाहीत. अर्थात समाजशास्त्रात असं बोलता येत नस्तय म्हणा. मित्र इकल्डे पुण्याकडले नाहीत. आपले गावाकडचे मीत्र. गांधी हत्येनंतरही गावातंच राहिलेले. आपल्या सारखच मराठवाडी दख्खन्नीत बोलणारे, दिसयलाबी गव्हाळ सावळे. हालाखी कधीकधी शाखा -भाजपची लाईन असती गड्यांची. पण मी फुले आंबेडकर सांगू लागलो की बिचारे तानात येऊन जातेत. वातावरण तंग होतंय. तितक्यात ब्रिग्रेडचा दोस्त आला की विषयच थांबायचा. पण दोस्तान्यात सब माफ. आपल्या पिढ्यांनी केलेला अत्याचार त्यांना कबुलच अन् प्रीव्हीलेजही. पण घरातले संस्कार आणि बाहेर दोस्तांचा रेटा, बिचारा कुढायचा आतमधी. मग आमी मोक्कार सामाजिक विषय काढणं बंद करायचोत. असं प्रत्येका सोबत घडलं असेल. प्रत्येकाचा एक बामण रूममेट असतो. त्याला आपण सॉफ्ट टारगेट करत असतो. नंतर मग ‘दारू वाजता’ सगळं विसरून जातो. असो.
इतर महत्वाचे –
खुप आधी स्थलांतरीत झालेले ब्राम्हणं, शैक्षणीक-सांस्कृतिक सत्ता असलेले ब्राम्हणं त्यांच्या पिढ्या न् पिढ्या सुधरल्या. विदेशात गेले. संगीत,नाटक, शिक्षण, विज्ञान,प्रशासन सगळीकडे दबदबा ठेवला आणि काही प्रमाणात ब्राम्हण्यही ठेवलं. अर्थात ते सगळ्याच जातीत वेगवेगळ्या रूपात ब्राम्हण्य अस्तय म्हणा. आता मला या उत्कर्ष झालेल्या ब्राम्हणांविषयी घेणंदेणं नाहीये. ते तसेबी आपल्याला जवळ करत नाहीत. आपला विषय वेगळाये, जे ब्राम्हणं गाव निमशहरात राहिली. शेतीवाडी नसलेली गरीब सुदाम्या टाईप स्वभाव असलेली. आपल्या सोबत मावा खायला टपरीवर येणारी, पुण्यात वट नसणारी, ज्यांना आपण ‘ऐ.. बामण्या’ म्हणून दोस्तीत पुकारतो किंवा ‘पंत’ आणि ‘देवबप्पा’ असे विशेषण लावतो, जे अभ्यासात हुशार नसल्यामुळे आपल्या सोबतच राहिले, त्यांचा विषय लय खोलंय. ह्या बामण पोरांचे लग्नच जमनात राजेहो. एकतर बामण पोरी हुशार असतात, चांगले करिअर करतात. संगीत वैग्रे असेल तर गावखेड्यात काही खरं नाही. म्हणून परत शहरात. चागलं करिअरवाल्या पोरी कशाला देवबप्पा आणि बिगर इंजैनर-डॉक्टरवाल्या संग लगीन करतील? वयाच्या पस्तशीपस्तोर ही आपली देवबप्पा मंडळी गोसायासारखी मोक्कार फिरायली. बरं आंतरजातीयचा हिकडं इषयचं नाही.
तर एकंदरीत असे की, कोणत्याही समाजाचे प्रश्न असे एकस्तरीय वैग्रे नसतात. (आता ही ओळ मी उगा ग्यान दाखवण्यासाठी लिहली आहे) मुद्दा असा आहे की, ब्राम्हण मोर्चा आणि त्यानंतर चाललेली टिंगल टवाळी बघून मला थोडेसे आत्मपरिक्षण करत असताना आपले कैक जिगरी दोस्तांचे चेहरे दिसले, जे की ‘ब्राम्हण होते’ असे आठवावे लागते. भावायहो, तुमचे लग्न लवकर जमोत.
सदरील लेखामागे ग्यान देण्याचा हेतू नसून निव्वळ थर्ड अँगल सांगण्याचा हेतू आहे. राग लोभ नसावा.

कुणाल गायकवाड
Mob. no. – 9284268904
[email protected]
इतर महत्वाचे –
लष्कराच्या जवानाची किटकनाशक पिऊन आत्महत्या
जेजुरी | सुट्टीवर घरी आलेल्या लष्करी जवानाने विषारी किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धालेवाडी भागात घडली आहे. लष्करी सेवेत असलेले चेतन रणदिवे (वय२३) हे सुट्टीवर आले असता त्यांनी आत्महत्या केली आहे.
हाती आलेल्या माहीतीनुसार, श्रीनगर येथे कार्यरत असलेले चेतन सुट्टी घेऊन गावी आले होते. सुट्टी संपत आल्याने ते माघारी लष्करात जाण्यासाठी तयारी करत होते. बॅगा वगैरे भरुन मित्राला भेटायला असल्याचे सांगून चेतन रविवारी चार वाजता दुचाकी मोटार सायकल घरा बाहेर पडले ते आलेच नाहीत. चेतन घरी परत न आल्याने त्याच्या कुटूंबियांनी सोमवारी पोलिसात तक्रार केली. दरम्यान कडे पठारावर दर्शनाला चाललेल्या एका भाविकाला झाडीं मध्ये मृत देह आढळल्याची पोलिसांना बातमी लागली. चेतनच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात आधिच दाखल असल्याने पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. मृतदेह चेतनच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
चेतन यांनी विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली असल्याचे पोलीसांनी सांगीतले आहे. जेजुरी पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करत आहेत.
चेतन हे २०१५ साली लष्करात भरती झाले होते. ते श्रीनगर मध्ये कार्यरत होते.
कॉम्रेड सीताराम येचुरी यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान
विटा | क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९४३ साली स्थापन झालेल्या सातारच्या प्रतिसरकारचे हे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने क्रांतिसिंह नाना पाटील यांची भुमी असणार्या विटा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिसरकारच्या स्थापनेनिमित्त दिला जाणारा यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांना देण्यात आला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते हा पुरस्काराच प्रदान करण्यात आला.
यावेळी मा.सिताराम येचुरी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी, कामगार, कष्टकरी विरोधी धोरणावर टिका केली. तसेच जनतेला पर्यायी विकासनिती असलेल्या डाव्या लोकशाही पर्याय मजबूत करण्याचे आवहान केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कॉ. नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील आणि अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे हे उपस्थित होते.
कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे
मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत काही महत्वाचे बदल करण्यात येत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या कोकण भागातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याआधी कोकणातल्या सर्व मतदारसंघांची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होती.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, मुंबईतल्या विभागप्रमुखांमध्येही मोठे बदल करण्यात आले असून कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिमचे विभागप्रमुख कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी सुधाकर सुर्वे यांना संधी देण्यात आली आहे.
दिल्लीत नक्की शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट
नवी दिल्ली । मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण व इतर शासकीय कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत असलेल्या असंतोषामुळे ही भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकी दरम्यान फडणवीस यांची नरेंन्द्र मोदीं समवेत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. मराठा आरक्षणामुळे राज्य सरकार वर खूप दबाव असल्यामुळे या भेटीत नेमकं काय चर्चा झाली असावी, ह्या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. राज्यात सध्या पेटलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीस मोदींना भेटले असल्याचे बोलले जात आहे.
मात्र या बैठकीत नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीस आणि नरेंन्द्र मोदी यांच्यात चर्चा झाली असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदारांची विशेष बैठक दिल्ली येथे बोलावली असल्याचेही सुत्रांकडून समजत आहे. आरक्षणाची मागणी घेऊन मराठा समाज लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करत अाहे. हे आंदोलन भाजप सरकारणे गांभीर्याने घेतले असून दिल्लीत यावर गलबते होत आहेत. पंतप्रधानांना भेटून महाराष्ट्रातील विविध प्रश्नांबाबत त्यांना माहीती दिल्याचे फडणवीस यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे.
Called on Hon PM @narendramodi ji in New Delhi this evening to apprise him on the various issues of Maharashtra.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची आज सायंकाळी नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांबाबत त्यांना माहिती दिली. pic.twitter.com/ubArAfPHDc— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 6, 2018









