Monday, December 22, 2025
Home Blog Page 700

Desi Jugaad: अस्सल देशी जुगाड ! पाहून तुम्ही म्हणाल, काय नेक्स्ट लेव्हल क्रिएटिविटी

desi jugad photo

Desi Jugaad: भारतामध्ये जुगाडू लोकांची काही कमी नाहीये. सोशल मीडियावर सुद्धा असे अनेक जुगाडू लोक आणि त्यांचा जुगाडूपणा व्हायरल होत असतो.आज आम्ही तुम्हाला अशाच काही जुगाडू लोकांचे कारनामे दाखवणार आहोत ज्यामुळे तुम्ही नक्की म्हणाल की ही काय डोक्यालिटी (Desi Jugaad) ?

चालते फिरते सलून (Desi Jugaad)

यापूर्वी तुम्ही गावागावांमध्ये झाडाखाली बसलेले न्हावी पाहिले असतील मात्र फिरते सलून तुम्ही पाहिले आहे का? एका व्यक्तीने आपल्याTVS XL ला एका व्यक्तीने चालते फिरते सलून बनवले आहे. हा व्यक्ती रस्त्याच्या कडेला कुठेही आपली गाडी उभी करतो आणि मिळेल तिथे आरसा लावून हा व्यक्ती त्याचे काम करतो. त्याने आपल्या गाडीला मॉडीफाय केलं असून मागे टेकण्यासाठी खुर्ची सारखा रॉड देखील लावला आहे.

बाईकला केली टमटम

आजही खेडेगावात शेअर ऑटो हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालतो आणि खेड्यातल्या माणसांना शहराला स्वस्तात नेऊन जाण्यासाठी हा शेअर ऑटो परवडणारा ठरतो. मात्र शेअर ऑटोमध्ये खचाखच माणसं कोंबलेली अनेकदा बघायला मिळतात. मात्र एका व्यक्तीने एक जुगाड केला असून त्याने आपल्या बाईकलाच शेअर सेटिंग बाईक बनवली आहे. एका रिक्षामध्ये जेवढे प्रवासी बसतात तेवढेच प्रवासी या बाईकमध्ये बसतात . एवढेच नाही त्या रिक्षा प्रमाणे (Desi Jugaad) याला छत आणि पकडण्यासाठी हॅण्डलही आहे. पण अर्थातच पावसापाण्याच्या दिवसांमध्ये ही सवारी परवडणारी नसेल. याप्रमाणे एका बाईक वरून हा व्यक्ती सहा जणांना घेऊन जातो आहे.

लॅपटॉपलाही थंडावा

वर्क फ्रॉम होम ही कल्पना कोरोना काळ झाला तरी अद्यापही काही ठिकाणी लागू आहे. तुम्हाला माहितीच असेल की घरात लॅपटॉप घेऊन काम करणारे अनेक जण आहेत. मात्र दिवसभर हा लॅपटॉप चालू राहिला तर त्याची बॅटरी ही खूप गरम होते आणि पर्यायाने लॅपटॉपही गरम होतो. म्हणूनच एका व्यक्तीने दोन (Desi Jugaad) लोड ठेवले असून त्याच्यामध्ये उभा फॅन ठेवला आहे. आणि आपल्या लॅपटॉपला थंड करण्यासाठी त्या फॅन वर लॅपटॉप ठेवला आहे. आपल्या लॅपटॉप ला थंड करण्याचा हा काही अजब फंडा या व्यक्तीने वापरला आहे.

कुलरची cool ट्रिक

यंदाच्या वर्षाची गर्मी किती जास्त प्रमाणात होती हे काही वेगळं सांगायला नको म्हणूनच कुलर घरात एकच असेल आणि रूम अनेक असतील तर मग काय पर्याय आहे? दुसरा कुलर विकत घेण्यापेक्षा एका व्यक्तीने कुलरच्या बाजूला चक्क पॅन्ट बांधली आहे आणि त्याचा एक पाय एका खोलीत तर दुसऱ्या पाय दुसऱ्या खोलीत केला आहे त्यामुळे दोन्ही खोलीत एका कुलर मुळे हवा येते.

कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही

कांदा कापताना डोळ्यांमध्ये किती पाणी येतं हे काही वेगळं सांगायला नको मग हे पाणी येऊ नये म्हणून एका व्यक्तीने चक्क डोक्यावर हेल्मेट घालून कांदा कापायला सुरुवात केली आहे.

एअर इंडियाची प्रवाशांसाठी खास सुविधा!! आता भाडे शुल्क बदलले तरी होणार नाही नुकसान

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विमान कंपनी एअर इंडियाने (Air India Flight) आपल्या सर्व प्रवाशांसाठी एक खास सुविधा आणली आहे. या सुविधेमुळे आता प्रवाशांना विमानाच्या भाड्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. याबाबतची माहिती देत एअर इंडियाने सांगितले आहे की, कंपनीने प्रवाशांसाठी फेअर लॉक (Fair Lock) सुविधा आणली आहे. या सुविधेमार्फत ते एअर लाइनवर तब्बल 48 तासांसाठी तिकीटाचे भाडे लॉक करू शकतात, परंतु यासाठी त्यांना शुल्क भरावे लागेल. यानंतर त्यांना या नव्या सुविधेचा लाभ घेता येईल.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा बुकिंगच्या तारखेपासून किमान 10 दिवस दूर असलेल्या फ्लाइट पर्यायांसाठी उपलब्ध असेल. या सुविधेसाठी ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा फ्लाइट पर्याय निवडावा लागेल. यानंतर त्यांना बुकिंग फ्लोमध्ये भाडे लॉक पर्याय निवडावा लागेल. पुढे नॉन रिफंडेबल फी भरावी लागेल. प्रवासीनंतर ‘बुकिंग व्यवस्थापित करा’ पर्यायाद्वारे त्यांच्या बुकिंगवर परत येऊ शकतात.

फेअर लॉकची वैशिष्ट्ये

1) फेअर लॉक कालावधीदरम्यान बुकिंगमध्ये कोणताही बदल केला जाऊ शकत नाही.

2) एअर इंडियाच्या वेबसाइटवरून बुक केलेल्या एअर इंडियाच्या फ्लाइटसाठीच भाडे लॉक करता येऊ शकते.

3) फेअर लॉकसाठी दिलेले शुल्क परत मिळणार नाही.

एवढे शुल्क भरावे लागेल

आपल्या प्लॅनिंगनुसार प्रवासी 2 दिवसांसाठी भाडे लॉक करू शकतील. यामुळे मधल्या काळात तिकिटाच्या रकमेत वाढ झाली तरी प्रवाशांना लॉक केलेले भाडे भरावे लागेल. परंतु फ्लाईट बुक करताना प्रवाशांना या सुविधेसाठी पाचशे रुपये भरावे लागतील. तर आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी 850 आणि
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 1500 रुपये भरावे लागतील.

Travel : जून महिन्यात फिरण्यासाठी ‘ही’ आहेत बेस्ट पिकनिक स्पॉट्स ; जाणून घ्या

Travel : सध्या उकाड्याचे दिवस संपून पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. देशासह राज्यातल्या अनेक भागात पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही गर्मीला कंटाळला असाल तर आत्ताचा मौसम तुम्हाला फिरण्यासाठी खूप आल्हाददायक असेल. आज अशा काही ठिकाणांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी ठिकाणे जून महिन्यात फिरण्यासाठी उत्तम असतील. चला तर मग जाणून घेऊया…

हेमकुंड (उत्तराखंड ) Travel

केवळ थंड हवेचे ठिकाण म्हणून हेमकुंड प्रसिद्ध नाही तर हे एक तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जून महिन्यामध्ये इथं कमाल तापमान हे दहा अंश सेल्सिअस पेक्षा कमी असते. त्यामुळे जर तुम्ही उघड्यामुळे हैराण झाला असाल तर हा स्पॉट तुमच्यासाठी पिकनिक (Travel) करण्यासाठी तसेच एक धार्मिक श्रद्धास्थान म्हणून सुद्धा उत्तम ठरेल. हे ठिकाण हिमालयाच्या कुशीत वसलेलं असून साहेब गुरुद्वारा म्हणजेच शिखांचं तीर्थस्थान इथे प्रसिद्ध आहे.

हेमकुंड हा एक संस्कृत शब्द असून हे म्हणजेच बर्फ आणि कुंड म्हणजेच कटोरा. इथे सुंदर तलाव देखील आहे शिवाय केवळ वर्षातील पाच महिने हे ठिकाण दर्शनासाठी खुले असते. इथे जाण्याचा मार्ग हा मनोहरी दृष्टीने परिपूर्ण आहे. शिवाय इथे रस्ता देखील बर्फाने झाकला जातो. तुम्ही येथे भेट (Travel) देणार असाल तर ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा की इथं जाण्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता तुम्हाला पायीच पार करावा लागतो.

तवांग (अरुणाचल प्रदेश ) (Travel)

ईशान्यकडील हा प्रदेश असा आहे जिथे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. जून ही महिन्यात मात्र पर्यटकांची या भागात सर्वाधिक गर्दी होत असते. भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन पैकी हे एक ठिकाण आहे. इथला डोंगराळ आणि शांत प्रदेश तुम्हाला मन प्रसन्न करण्यासाठी पुरेसा आहे. हिवाळ्यात इथे बर्फ पडतो. जसं काश्मीरला स्वर्गाचा प्रदेश म्हटला जातो. थंड हवेचे ठिकाण (Travel) पाहायची तुमची इच्छा असेल तर हा ऑप्शन उत्तम आहे.

Dinner Habits : रात्रीचे जेवण नीट पचत नाही? तर फॉलो करा ‘हे’ डिनर हॅबिट्स, होईल सकारात्मक परिणाम

Dinner Habits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dinner Habits) अख्ख्या दिवसाचा क्षीण घेऊन संध्याकाळी दमून, वैतागून घरी आल्यानंतर मरणाची भूक लागलेली असते. दिवसभरात विविध कामे करताना आपल्या शरीरातील एनर्जी केव्हा संपते ते आपलं आपल्याला कळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा कामावरून घरी आल्या आल्या भूक लागल्याचे जाणवते. रात्रीचे जेवण हे आपल्या दिनचर्येतील लास्ट मील असते. त्यामुळे रात्रीचे जेवण आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम करत असते. म्हणूनच, रात्रीच्यावेळी हलका आहार घ्यावा असे सांगितले जाते.

मात्र, भुकेच्या तडाख्यात आपण गरजेपेक्षा जास्त अन्न ग्रहण करतो. अनेकदा बाहेर जेवायला गेले असताना जिभेला आवडतंय म्हणून जास्त खाल्लं जात. ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर अत्यंत गंभीर स्वरूपात होत असतो. (Dinner Habits) अशा आहारामुळे वजन वाढणे, अपचन, रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणे आणि इतर जुनाट आजरांना आमंत्रण मिळते. त्यामुळे रात्रीच्या जेवणाबाबत काही महत्वाच्या सवयी अंगी लावून घेणे गरजेचे असते. या सवयी कोणत्या? ते जाणून घेऊ.

सकारात्मक परिणामांसाठी फॉलो करा ‘हे’ डिनर हॅबिट्स (Dinner Habits)

1. रात्रीचे जेवण हे सूर्यास्तापूर्वी किंवा शक्यतो संध्याकाळी ७ च्या आधी करावे. जुने लोक सांगायचे की, रात्रीचे जेवण लवकर करणे आपल्या पचन आणि चयापचयसाठी चांगले असते. विज्ञानाने देखील या गोष्टीला समर्थन दिले आहे. त्यामुळे हे सुनिश्चित करा की, रात्रीच्या वेळी तुमचा आहार लवकर होईल. यामुळे जेवण पचवण्यासाठी शरीराला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही.

2. तुम्ही रात्री काय जेवता याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. (Dinner Habits) त्यामुळे रात्रीचे जेवण शक्यतो हलके असावे. तुमच्या जेवणात तेलकट आणि तळलेले पदार्थ नसतील याची काळजी घ्या. अशा पदार्थांमुळे पित्त आणि ऍसिडिटीच्या समस्या होऊ शकतात.

3. रात्रीच्या जेवणात शक्यतो सुपसारखे पदार्थ असावेत. (Dinner Habits) यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे हायड्रेशन मिळेल. जे पचनास मदत करते. हे सूप विविध भाज्यांसोबत तयार केल्यास अधिक पोषण आणि फायदे मिळतील.

4. हे सुनिश्चित करा की, तुमच्या रात्रीच्या आहारात अॅनिमल प्रोटीन नसेल. कारण, असा आहार पचविण्यासाठी खूप जड असतो आणि त्यामुळे तुमच्या पचनक्रियेला खूप कष्ट पडू शकतात. यामुळे निरोगी गट फ्लोरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. (Dinner Habits)

5. रात्रीच्या जेवणात कोणत्याही प्रकारचे ब्रेड किंवा पाव पाहू नका. असे पदार्थ पचायला जड असतात. शिवाय याचे पचन नीट न झाल्यामुळे चयापचय क्रियेत अडचण येऊ शकते. यामुळे मानसिक आरोग्य अस्थिर होऊन चलबिचल निर्माण होते. ज्यामुळे चांगली झोपही येत नाही.

6. रात्रीच्या आहारात पौष्टिक आणि हलके जेवण घ्या. पण हे जेवण घाईघाईने आवरते घेऊ नका. तर शांत चित्ताने आणि मन लावून करा. प्रत्येक घशावर लक्ष केंद्रित करा. असे केल्याने तुमचा आहार व्यवस्थित पचेल. (Dinner Habits)

Sugarcane Juice : बहुगुणी उसाचा रस ‘या’ रुग्णांसाठी ठरू शकतो घातक; काय सांगतात तज्ञ?

Sugarcane Juice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sugarcane Juice ) बरेच लोक चहा, कॉफी, कोल्डड्रिंकऐवजी एखादं थंड पेय पिणं पसंत करतात. यामध्ये विविध फळांच्या रसाचा समावेश आहे. ज्यात उसाचा रस हे सर्वाधिक लोकप्रिय पेय मानले जाते. हे एक नैसर्गिक पेय असून ते पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण असे असूनही काही लोक उसाचा रस गरम असतो, असे म्हणून पिणे टाळतात. पण मुळात उसाचा रस एक अत्यंत लाभदायी स्पोर्ट्स ड्रिंक आहे. त्यामुळे कोणतेही कारण देऊन हे पेय टाळण्याची गरज नाही. असे असले तरीही काही बाबतीत उसाचा रस पिताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

नैसर्गिक पेय (Sugarcane Juice )

उसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे. त्यामुळे यातील घटक हे नैसर्गिकरित्या आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरतात. उसाच्या रसामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. सुमारे १३ ग्रॅम फायबरयुक्त या रसात १८३ कॅलरीज आणि ५० ग्रॅम नैसर्गिक साखरेचा समावेश असतो. त्यामुळे काही प्रमाणात उसाचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे उसाचा रससुद्धा काही प्रमाणात पिण्याचा सल्ला दिला जातो.

उसाचा रस कोणी पिऊ नये?

उसाचा रस पिणे हे आरोग्यदायी असले तरी काही लोकांसाठी हे पेय पिणे धोक्याचे ठरू शकते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या आहारात उसाच्या रसाने सेवन घातक ठरू शकते. (Sugarcane Juice ) त्यामुळे तज्ञ सांगतात की, मधुमेहींनी उसाचा रस पिणे टाळावे. उसाच्या रसात नैसर्गिक साखर जरी असली तरीही ती मधुमेहींच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवू शकते. ज्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणूनच मधुमेहींनी उसाचा रस पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

आरोग्यदायी फायद्यांसाठी ‘असा’ प्या उसाचा रस

अनेक लोकांना उसाचा रस पिण्याची योग्य पद्धत माहित नाही. त्यामुळे उसाच्या रसाचे वेळी यावेळी केले जाणारे सेवन हानिकारक सिद्ध होऊ शकते. याबाबत सांगताना काही आहार तज्ञांनी म्हटले आहे की, उसाचा रस पिण्याची योग्य वेळ म्हणजे दुपार. त्यामुळे जर तुम्हाला उसाचा प्यायचा असेल तर तो दुपारी प्या. यामुळे काही आरोग्यवर्धक फायदे होऊ शकतात.

(Sugarcane Juice ) तसेच आणखी एक महत्वाचे म्हणजे, उसाचा रस कधीही फ्रेश तयार केलेला प्यावा. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या होत नाहीत.

याशिवाय उसाच्या रसात नारळाचे पाणी आणि थोडा आल्याचा रस मिसळून प्यावा. यामुळे एक उत्तम डिटॉक्स ड्रिंक तयार होते. जे तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

Matheran : हिरवाईने नटलेले महाराष्ट्रातील ‘हे’ सुंदर ठिकाण; पावसाळ्यात देते स्वर्गसुखाची अनुभूती

Matheran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Matheran) महाराष्ट्रात नुकताच मान्सून दाखल झाला आहे. ठिकठिकाणी पावसाने मुसळधार सरीसोबत हजेरी लावली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून गरमीने हैराण झालेले सगळेच पावसाळा सुरु होण्याची अगदी चातकासारखी वाट बघत होते. अखेर पावसाच्या दमदार हजेरीनंतर जो तो सुखावला आहे. पावसाळ्यात निसर्गाचे रूप अगदी पाहण्यासारखे आणि डोळ्यात साठवण्यासारखे असते.

अशा या सुंदर आणि आल्हाददायी मोसमात फिरायला जावे, असे प्रत्येकाला वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुंबई- पुण्याच्या अगदी जवळ असणाऱ्या अत्यंत सुंदर ठिकाणाबाबत माहिती देणार आहोत. ते म्हणजे माथेरान. पावसाळ्यात माथेरान फिरायचा म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूती. चला तर माथेरानविषयी अधिक जाणून घेऊया.

स्वर्गसुखाची अनुभूती देणारे माथेरान (Matheran)

महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक छोटेसे हिल स्टेशन म्हणजे माथेरान. मुंबई आणि पुणेकरांसाठी हे ठिकाण अत्यंत जवळ आहे. शिवाय कोणत्याही ऋतूमध्ये इथे जाणे मनाला दिलासा देणारे ठरते. शिवाय रोजची धावपळ, गोंधळ आणि प्रदूषणाने मलीन झालेल्या वातावरणापासून मुक्तता देणारे हे प्रदूषण मुक्त हिल स्टेशन आहे. शिवाय इथे जायला फार खर्च करावा लागत नाही. अत्यंत सुंदर, नेत्रदीपक दृश्य आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या समृद्ध अशा या ठिकाणी गेल्यानंतर आपण स्वर्गात आलो का काय? असेच वाटते.

त्यात पावसाळ्यात माथेरानला गेलात तर इथले नैसर्गिक सौंदर्य १०० पटीने वाढलेले दिसते. (Matheran) सर्वत्र हिरवळ, खोल दऱ्या, लहान मोठे धबधबे, थंडगार हवा, शुभ्र धुक्याची चादर आणि त्यात रिमझिम सरी..अहाहा! असे वातावरण क्षणात मनावरील ताण दूर करण्यास मदत करते. त्यामुळे पोवसाळ्यात माथेरानला आवर्जून जावे.

कसे जाल?

माथेरानला जाताना नैसर्गिक सौंदर्य न्याहाळत जायचे असेल तर, तुम्ही नेरळ स्टेशनवरुन टॉय ट्रेनने प्रवास करू शकता. या टॉय ट्रेनच्या नियोजित वेळा असतात. त्यामुळे वेळ चुकली तर किमान तासभर वाट पहावी लागते. (Matheran) टॉय ट्रेनची खासियत म्हणजे, ही ट्रेन सुमारे २० किलोमीटर अंतर अत्यंत वळणदार रस्त्यांवरून कापत जाते. त्यामुळे आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्य फारच आकर्षित करणारे ठरते. मात्र, या ट्रेनमधून प्रवास कारताना पर्यटकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.

महत्वाचे असे की, पावसाळ्यात टॉय ट्रेन बंद असू शकते. अशावेळी तुम्ही येथे प्रायव्हेट टॅक्सीने जाऊ शकता. माथेरानमध्ये दस्तुरी पॉइंटच्या पुढे तुम्हाला साधारण अडीच किलोमीटर अंतर हे पायी कापावे लागते. (Matheran) यावेळी निसर्गाचे असे काही दर्शन होईल की, पाहता पाहता तुम्ही त्यात हरवून जाल.

काय पाहाल?

माथेरान हे एक असे हिलस्टेशन आहे जिथे खोल दऱ्या आणि डोंगर पाहताना डोळ्यातली चमक आपोआप वाढते. इथे पावसाळ्या दरम्यान ढगांनी वेढलेले पर्वत आणि कोसळणारे लहान मोठे धबधबे, सुंदर तलाव, उद्याने आणि अनेक वेगवेगळे पॉइंट्स पाहणे मनाला आनंद देणारे ठरते. (Matheran) माथेरानला गेले असता शार्लोट लेक, पॅनोरमा पॉईंट, सनसेट पॉईंट, पॉर्च्यूपॉईन, लुईझा पॉईंट, एको पॉईंट, चौक पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, गार्बट पॉईंट अशा विविध लोकप्रिय लोकेशन्सला जरूर भेट द्या.

मुहूर्त ठरला!! या तारखेला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार

Narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ केव्हा घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबतच एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 8 जून रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान पदाची शपथ घेतील, असे वृत्त समोर आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेतील.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाचे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 17 वी लोकसभा विसर्जित करण्याची झाली. येत्या 16 जून रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर आज नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींच्या हवाली केला. आता पुन्हा एकदा येत्या
7 जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल.
तसेच, नरेंद्र मोदी ही पंतप्रधान पदाची शपथ घेतील.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. यात राजकीय घडामोडींचा वाढता वेग बघता नरेंद्र 8 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन करतील, अशी दाट शक्यता आहे.

कोल्हापुरात बंटी पाटलांनी “असा” फिरवला डाव; शाहू महाराजांच्या विजयात ठरले किंगमेकर

shahu maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरात मान आणि मत दोन्ही गादीलाच मिळाली… जसं वाटतं होतं अगदी तसंच झालं… पण यात एका माणसाला विसरून चालणार नाही तो म्हणजे बंटी उर्फ सतेज पाटील (Satej Patil) … कोल्हापूरच्या राजकारणात विरोधकांचा कुणी ठरवून कंडका पाडला असेल तर तो बंटी पाटलांनी… भाजपची तगडी फौज असतानाही सगळ्यांना पुरून उरत शाहू छत्रपतींना निवडून आणण्यात कुणाचा मोठा वाटा असेल तर तो बंटी पाटलांचाच… २०१९ मध्ये ज्या संजय मंडलिकांना मदत करत बंटी पाटलांनी खासदार केलं, त्याच मांडलिकाचा पराभव सुद्धा आपण करू शकतो हे सिद्ध करून कोल्हापूरमधली आपली ताकद बंटी पाटलांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलीय… शाहू छत्रपती आणि संजय मंडलिक अशी लढत झाली असली तरी चर्चेच्या सेंटर पॉईंटला बंटी पाटीलच का आहेत? कोल्हापूरच्या निकालात बंटी पाटील कसे निर्णायक ठरलेत? तेच पाहुयात

कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांचा प्रचार करण्यात बंटी पाटलांनी आघाडी घेतली होती. तस पाहिलं तर कोल्हापूरची जागा ठाकरे गटाची… त्यामुळे शाहू महाराजांनी ठाकरेंच्या मशालीवर महाविकास आघाडीकडून लढावं अशी ठाकरेंची इच्छा होती… परंतु बंटी पाटलांच्या विश्वासावर शाहू महाराजांनी मशालीवर न लढता काँग्रेसच्या हातावर लढणं पसंत केलं. परिणामी ठाकरेंनी शाहू महाराजांचा मान राखत काँग्रेसला कोल्हापूरची जागा सोडली. आता जबाबदरी होती ती बंटी पाटलांची … इतक सगळं केल्यानंतर आता शाहूंच्या विजयासाठी बंटी पाटलांनी कोल्हापूरची सगळी सूत्रे हातात घेतली आणि संपूर्ण कोल्हापूर पिंजून काढला…. निवडणूक जिंकून कशी आणायची याचं पक्क गणित बंटी पाटलांच्या डोक्यात आधीपासूनच होतं.. त्यामुळे निकालानंतरच्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये शाहू महाराजांच्या विजयाचा दावा आधीपासूनच करण्यात आला होता. सतेज पाटलांचा कोल्हापुरातील करिश्मा, अगदी बूथ मॅनेजमेंट पासून केलेलं नियोजन, कार्यकर्त्यांची मजबूत फळी याच्या जीवावर शाहू महाराजांचा विजय आता पक्का झाला….

कोल्हापुरातील काँग्रेसचा मताधिक्य जास्त असलेल्या करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात जास्तच्या मतदानाचाही याला फायदा झाला… सतेज पाटील यांच्यासोबत ऋतुराज पाटील, जयश्री पाटील आणि पी एन पाटील यांनी शाहू महाराजांच्या विजयासाठी जीवाचे रान केलं. त्याउलट महायुतीमध्ये एकदिलाने काम झालं नाही असं बोललं जात आहे. त्यातच संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवर दत्तक पुत्राचा आरोप केल्यानंतर तर जनतेमध्ये शाहू महाराजांबद्दलची सहानभूती आणखी वाढली आणि त्याचा फायदा शाहू महाराजांना झाला. शाहू महाराजांची इमेज सुद्धा त्यांच्या विजयात महत्वाची ठरली. भाजप आणि मोदी सरकार विरोधात असलेल वातावरण, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीचे आधीपासून असलेले वलय शाहू महाराजांच्या पथ्यावर पडलं. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापुरातील सभेने सुद्धा वार फिरलं आणि परिणामी शाहू महाराजांनी ऐतिहासिक विजय मिळवला….

नेत्यांचं बलाबल बघायचं झालं तर संजय मंडलिकांच्या बाजूने हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, राजेश पाटील, कुटेकर, समरजीतसिंह घाडगे आणि अशी अजून मातब्बर नेत्यांची फौज होती… पण या सगळ्यांना एकटे पुरून उरले ते बंटी पाटील… छत्रपती घराण्यातून असणं हा इमोशनल फॅक्टर असला तरी त्याला मतांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा मोठा टास्क बंटी पाटलांना पार पाडायचा होता… आणि त्यांनी तो यशस्वीपणे पार पाडला देखील…या निकालाने फक्त शाहू छत्रपती दिल्लीत गेले एवढीच गोष्ट घडली नाही तर सोबत बंटी पाटील यांच्या कोल्हापूरच्या वर्चस्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय… साध्या भाषेत बोलायचं झालं तर येत्या काळात बंटी पाटील या नावाला या विजयामुळे काँग्रेसमध्ये मोठा युएसपी मिळेल, हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाहीच… त्यामुळे कोल्हापुरात बंटी पाटलांनी ठरवलं तर कार्यक्रम होऊन कंडका पडतोच… ही लाईन आणखीन गडद झालीय एवढं मात्र नक्की….

राजाभाऊ जायंट किलर ठरले; नाशिकमध्ये डाव नेमका कुठं फिरला

hemant godase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साधा सदरा गळ्यात मफलर… विरोधकांवर टीका न करण्याच्या स्वभावाने ते अस्सल मुरलेले राजकारणी वाटत नाहीत पण हा साधा भोळा मराठा चेहरा आपल्या फरडया इंग्रजीनं भल्याभल्यांना घाम फोडू शकतो. होय मी बोलतोय नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल… वाजेंनी मशालीच्या चिन्हावर नाशिक लोकसभेचा गुलाल उधळला… शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि इतर बड्या नेत्यांना डावलून उद्धव ठाकरेंनी खासदारकीसाठी एका सर्वसामान्य मराठा नेतृत्वावर विश्वास टाकला. वाजेंच्या विरोधात आपण सहज निवडून येऊ असा काहीसा एटीट्यूड पहिल्या दिवसापासून महायुतीत पाहायला मिळाला. पण आता याच वाजेंनी जिल्ह्यात अशी काय फील्डिंग लावली की, हेमंत गोडसेंच्या नाकावर टिच्चून राजाभाऊ मशाल पेटवणारच! इतका कॉन्फिडन्स त्यांनी ठाकरेंना दिला… आणि दिलेल्या शब्दावर पक्कं उतरत हा साधासुधा माणूस आता खासदार झालाय…नाशिक सारख्या बालेकिल्ल्यातून अनेक पर्याय असतानाही राजाभाऊच योग्य पर्याय ठाकरे यांना का वाटले?

राजाभाऊ वाजे यांना दोन महिने अगोदर मिळालेली उमेदवारी

लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांना दोन महिने अगोदर तिकीट मिळाल्याने त्यांनी सगळा मतदारसंघ पिंजून काढून होता. प्रचारात वाजे हे हेमंत गोडसेंपेक्षा आघाडीवर होते. महायुतीचं ठरत नव्हतं तोपर्यंत राजाभाऊ वाजेंनी प्रचाराचा दणका उडवून दिला होता. आता तोच त्यांना गुलालाचा मानकरी बनवण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे…

आता दुसरा मुद्दा येतो तो शांतिगिरी महाराजांची उमेदवारी

अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे युतीचे उमेदवार हेमंत गोडसेंनी अडचणी वाढल्या होत्या. हिंदू मतांमध्ये झालेली विभाजन याचा जोरदार फटका हेमंत गोडसेंना बसलाय… ग्रामीण पट्टयात मोठ्या प्रमाणात शांतिगिरी महाराजांचा प्रभाव राहिला. त्या भागातील सर्व मतं महाराजांना मिळताना दिसली तर हेमंत गोडसेंना ग्रामीण भागातून झालेले कमी मतदान हे देखील वाजे यांच्या पथ्यावर पडलं…

तिसरा महत्त्वाचा मुद्दा राहिला तो शहरातील घटलेले मतदान

शहरात घटलेले मतदान व ग्रामीण भागातील वाढलेले मतदान याचा फटका यावेळी हेमंत गोडसेना बसला. प्रामुख्याने शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीचेच आमदार होते या आमदारांनी हेमंत गोडसे यांचे काम केलेले दिसलं नाही तर शहरातील भाजपच्या मतदारांनी हेमंत गोडसे यांना टांग दिली. याउलट ग्रामीण भागात राजाभाऊ वाजे यांच्या मशालीची सुप्त लाट होती. त्यात ठाकरेंचा इमोशनल फॅक्टर चालल्यामुळे वाजे आरामात निवडून आले…

आता पाहू शेवटचा मुद्दा तो म्हणजे गोडसेंच्या झालेल्या उमेदवारीला विलंब

सुरुवातीपासून भाजपचा गोडसेंच्या उमेदवारीला विरोध होता… त्यात छगन भुजबळ फॅक्टरचा गोडसेंना मोठा तोटा झाला.. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत गोडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. अजित पवारांची राष्ट्रवादी सायलेंट मध्ये राहणं, भाजपचा असणारा अंतर्गत अंतर्गत विरोध आणि या सगळ्यात मागच्या काही दिवसात वाजेंनी बनवलेली सेल्फ इमेज या सगळ्याचा परिणाम म्हणून आता नाशिकमधून एक साधा शिवसैनिक खासदार झालाय…

Night Trekking Places : महाराष्ट्रातील अशी ठिकाणे, जिथे आकाशातील चमत्कारिक हालचाली पाहून वाटेल कुतूहल

Night Trekking Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Night Trekking Places) आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक सुंदर तसेच निसर्गरम्य ठिकाणे आहेत जिथे गेल्यानंतर कितीही प्रयत्न केला तरी पाय निघत नाही. प्रत्येकालाच रोजच्या दगदगीतून थोडासा निवांत वेळ हवा असतो. अशा निवांतपणासाठी आपण लहान सहान पिकनिक प्लॅन करतो. पण निसर्गाच्या अद्भुत सौंदर्यात हरवून जाण्याची मजा काही वेगळीच मानसिक शांतता देते. अशा मानसिक शांततेसाठी आकाश दर्शनाइतका सुंदर इतर कोणताच पर्याय असू शकत नाही.

निरभ्र आकाश, लुकलुकणार्या चांदण्या, ढगांच्या मागे लपणारा चंद्र अशा कवी मनाचं आभाळ तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण अमावास्येच्या रात्री आकाशात अशा काही नैसर्गिक हालचाली होतात, ज्या पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. (Night Trekking Places) आपल्या महाराष्ट्रात अशी काही शांत आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत जिथे नैसर्गिक चमत्कारासह आकाश दर्शन करण्याचा आनंद घेता येतो. या ठिकाणांविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. जिथे आयुष्यात किमान एकदा तरी तुम्ही जरूर भेट द्या.

1. कळसूबाई शिखर

बऱ्याच नाईट ट्रेकर्ससाठी कळसूबाई शिखर प्रमुख आकर्षण आहे. (Night Trekking Places) कळसुबाई शिखरावरून आकाश दर्शन करण्याचा अनुभव काही वेगळाच आहे. खास मिल्कीवे पाहण्यासाठी इथे नाईट ट्रेकिंग केली जाते.

2. राजमाची (Night Trekking Places)

महाराष्ट्रात अशी काही ठिकाण आहेत जी नाईट ट्रेकसाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये लोणावळाजवळील राजमाचीचा समावेश आहे. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी निसर्गाचा अद्भूत चमत्कार पहायला मिळतो. त्यामुळे बरेच पर्यटक इथे रात्रीच्या वेळी आकाश दर्शनासाठी येत असतात.

3. हरिश्चंद्र गड

नाईट ट्रेकिंगसाठी आणखी एक बेस्ट स्पॉट म्हजे हरिश्चंद्र गड. (Night Trekking Places) या गडावरून दिसणारं आभाळ हे शहरात धूळ आणि प्रदूषणात हरवून गेलेल्या आभाळासारखं दिसत नाही. तर हरिचंद्रगडावरून होणारे आकाश दर्शन कायम डोळ्यात साठवून घ्यावे असे असते.

4. भंडारदरा

आकाश दर्शनासाठी भंडारदरा हेदेखील एक अत्यंत लोकप्रिय ठिकाण मानले जाते. इथे खास आकाशगंगा आणि ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी नाईट ट्रेकचे आयोजन केले जाते. (Night Trekking Places) खास करून अमावस्येच्या रात्री इथे आवर्जून आकाशदर्शयासाठी पर्यटक येतात.