Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 709

Best Travel Places : जूनच्या गरमीला कंटाळला असाल, तर ‘ही’ ठिकाणे करा एक्स्प्लोर; एकदम फ्रेश व्हाल

Best Travel Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Travel Places) सहसा जून महिन्यात पावसाच्या रिमझिम सरी येऊ लागतात. पण नुकत्याच सरलेल्या उन्हाळ्याची झळ पूर्णपणे गेलेली नसते. यंदा देशातील बऱ्याच भागांमध्ये उष्णतेची भीषण लाट पहायला मिळाली. ज्यामुळे उष्माघात, सनस्ट्रोक, डिहायड्रेशन आणि इतर उन्हाळी आजरांची बरीच प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अक्षरशः दमवणारा ठरला. यामुळे जोपर्यंत धुवाँधार पाऊस कोसळत नाही तोपर्यंत मूड रिफ्रेश होणं जरा कठीण आहे.

(Best Travel Places) अशावेळी फ्रेश फिलिंगसाठी कुठेतरी फिरायला जावे असे कुणाला वाटणार नाही? मग तुम्हीही जूनमध्ये फिरायला जायचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांची माहिती देणार आहोत. जिथे फिरताना तुम्ही एकदम ताजेतवाने फील कराल. चला लगेच जाणून घेऊया.

तवांग

ईशान्य भारतात ‘तवांग’ हे अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. तवांग हे एक सुंदर आणि थंड असे हिलस्टेशन आहे. जे अरूणाचल प्रदेशमध्ये स्थित असून सध्या इथे जून महिन्यात कमाल तापमान १९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ९ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे, इथे उन्हाच्या कितीही झळा लागत असल्या तरी तवांगमध्ये मात्र वातावरण थंड आहे. (Best Travel Places)

अशा थंड वातावरणात तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबासोबत निवांत वेळ घालवू शकता. तवांगमध्ये तुम्हाला बर्फाळ भाग, खोल दऱ्याखोऱ्या आणि उंच झाडांचे सुंदर नजारे आकर्षित करतील. शिवाय येथे पाहण्यासारखे बरेच स्पॉट्स आहेत. जे तुमचा मूड रिफ्रेश व्हायला मदत करतील.

लेह लडाख (Best Travel Places)

जून महिना सुरु झाला असला तरी गरमीपासून काही सुटका होत नाहीये. अशा दिवसात कुठेतरी थंड गार ठिकाणी जावे आणि रिफ्रेश व्हावे कुणाला वाटणार नाही? तुमचाही असाच विचार असेल तर तुम्ही लेह- लडाखला भेट देऊ शकता. इथे कडक उन्हाळ्यातही तुम्ही थंडगार हवेचा आनंद घेऊ शकता. लेह, लडाखमधील प्रेक्षणीय स्थळे, खोल दऱ्याखोऱ्या, नयनरम्य तलाव आणि उंच उंच बर्फाचे डोंगर तुम्हाला अविस्मरणीय आठवणी देतील. त्यामुळे जूनमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय तर लेह लडाखचा विचार नक्की करा.

हेमकुंड

उत्तराखंड राज्यातील हेमकुंड हे अत्यंत सुंदर आणि पर्यटकांसाठी आकर्षण असलेले एक ठिकाण आहे. जून महिन्यातील उष्णता हेमकुंडमध्ये फिरताना अजिबात जाणवत नाही. (Best Travel Places) सध्याच्या तापमानाबद्दल बोलायचं झालं तर, हेमकुंडचं कमाल तापमान ९ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. त्यामुळे, उन्हाची झळ लागायचा सवालच नाही.

Dal- Rice Price | गरिबांचा डाळ – भातही महागला; जाणून घ्या तांदूळ आणि डाळीच्या वाढलेल्या किमती

Dal- Rice Price

Dal- Rice Price | मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये पाऊस अगदी कमी प्रमाणात पडला. त्यामुळे तांदूळ उत्पादनात देखील घट झालेली होती. तांदळाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे तांदळाच्या किमती ही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. सध्या महागाई गगनाला भिडलेली आहे. अगदी भाजीपाल्यासह घरातील सगळ्याच गोष्टी महाग झालेल्या आहेत. त्यामुळे आता तांदूळ आणि डाळींच्या किमती देखील वाढणार आहे. आणि सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मागील वर्षाचे तांदळाचे (Dal- Rice Price) दर जर आपण पाहिले तर मागील वर्षी तांदूळ साडेचार हजार रुपये क्विंटल दराने विकला जात होता. परंतु आता यावर्षी हे दर वाढलेले असून तो तांदूळ आता साडेपाच हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. बाजारामध्ये आंबेमोहर आणि इंद्रायणी या तांदळांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु आता या तांदळाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. तरी देखील अनेक नागरिक हे तांदूळ खरेदी करताना दिसत आहेत.

चिनोर या तांदळाच्या दराबद्दल पाहिले तर या तांदळाचे जर 6 हजारांवरून 7500 रुपयांनी वाढलेले आहे. डाळ आणि भात हा गरीब लोकांचा मुख्य आहार मानला जातो. परंतु आता तो डाळ भात खाणे देखील आता सामान्य नागरिकांना परवडणार नाही. कारण त्याच्यासाठी देखील अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.

डाळीच्या दरात कितीने वाढ | Dal- Rice Price

मागील 15 दिवसांमध्ये डाळींच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तुरीची डाळीची किंमत ही 40 ते 50 रुपयांनी वाढली आहे. मागील महिन्यामध्ये तुरडाळीचा भाव हा 140 ते 145 रुपये प्रति किलो होता. परंतु आता ही डाळ 180 ते 190 रुपये किती किलोने विकली जात आहे. हरभरा डाळ ही 70 ते 72 रुपयांवरून थेट 90 ते 95 रुपये किलोवर पोहोचलेली दिसत आहे.

केवळ तांदूळ आणि डाळीच्याच किमती नाही, तर यावर्षी उष्णता जास्त प्रमाणात वाढल्याने फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव देखील वाढलेले आहेत. बाजारात कोथिंबिरीची एक जुडी 50 ते 60 रुपयांवर पोहोचलेली आहे. तसेच मेथी कोथिंबीर कांदापातीसह पालेभाज्यांचा भाव 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झालेली दिसत आहे.

Monsoon Update | महाराष्ट्रातील या ठिकाणी पडणार 100 % पाऊस, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Monsoon Update

Monsoon Update | दरवर्षी 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावर्षी एक दिवस आधीच म्हणजे 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. परंतु या निकालासोबतच शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे आहे. कारण सध्या देशभरात उष्णतेने कहर केलेला आहे. तापमानाचा पारा काही भागात 50° c एवढा पोहोचलेला आहे. त्यामुळे आता मान्सूनचे आगमन कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. केरळमध्ये मान्सून पोहोचलेला आहे. परंतु इतरत्र पाऊस कधी पडणार आहे? असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दक्षिणेकडून गोव्या मार्गे कोकणातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. केरळमध्ये आल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवसांनी महाराष्ट्र मध्ये पाऊस येत असतो. त्यामुळे यावर्षी आठ ते दहा जून रोजी मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सूनबाबत हवामान विभागाने काही अंदाज वर्तवलेले आहे. त्यानुसार यावर्षी कोकण नाशिक चंद्रपूरमध्ये 100 टक्के पाऊस कोसळणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील उर्वरित भागात 95 ते 98 टक्के पाऊस पडणार आहे. पुण्यात सुद्धा 100 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे.

यावर्षी जून ते जुलै महिन्यात साधारण पाऊस पडेल. परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवण्यात आलेला होता. मागील वर्षी पावसाचे प्रमाण खूप होते. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडणार आहे. उष्णतेने अनेक लोकांना आजार देखील होत आहे. त्यामुळे सगळेचआता या उकड्यापासून सुटका मिळण्यासाठी पावसाची वाट पाहत आहेत.

मुस्लिम मतदारांची साथ कोणाला? Exit Poll मध्ये धक्कादायक खुलासा

muslim voter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्याच्या ४ जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे. देशाची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी अनेक वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळ्या Exit Poll च्या माध्यमातून अंदाज वर्तवला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये NDA ची सत्ता पुन्हा एकदा येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, एक्झिट पोलनुसार देशातील मुस्लिम मतदाराने (Muslim Voter) कोणाला साथ दिली याचीही आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार यंदा मुस्लिम मतदारांनी भाजपला नाकारत इंडिया आघाडीला भरगोस मत दिल्याचे दिसत आहे.

रिपब्लिक टीव्हीच्या पीमार्क सर्वेक्षणानुसार, 72 टक्के मुस्लिम मतदार काँग्रेसला मतदान करताना दिसतात. याचाच अर्थ काँग्रेसला प्रत्येक 4 पैकी 3 मुस्लिम मतदारांची पहिली पसंती आहे. 2019 मध्ये हेच प्रमाण 52 टक्के होतं, मात्र यंदा 72 टक्के मुस्लिम मतदार इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) पाठीशी उभा राहिला आहे. तर भाजपला मात्र मुस्लिम मतदारांनी ठेंगा दाखवल्याचे दिसत आहे. इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडियानुसार यंदाच्या लोकसभा निडवणुकीत भाजपला 6 टक्के मुस्लिम मते मिळू शकतात. 2019 मध्ये हेच प्रमाण ९ टक्के होते. म्हणजे भाजपच्या मुस्लिम मतांत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार यावेळी इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशात 38 टक्के जास्त मुस्लिम मत मिळतील. यात बहुजन समाजवादी पार्टीचे 34 टक्के मुस्लिम वोट इंडिया आघाडीकडे वळण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट बिहारमध्येही पाहायला मिळेल. बिहारमध्ये इंडिया आघाडीला मागील निवडणुकीपेक्षा 16 टक्के मुस्लिम मत जास्ती मिळण्याचा अंदाज आहे . तर दुसरीकडे भाजपला ५९ टक्के ओबीसी मते मिळू शकतात असा अंदाज रिपब्लिक टीव्हीच्या पीमार्क सर्वेक्षणानुसार दिसत आहे. देशातील महिलांचाही भाजपवर विश्वास असल्याचे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. भाजपला देशभरात 40 टक्के मते मिळू शकतात असा मोठा दावा करण्यात आला आहे.

टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याबाबत गौतम गंभीरचं मोठं विधान; पहा नेमकं काय म्हणाला?

gautam gambhir coach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात येत असून त्याच्या जागी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात बीसीसीआय आहे. यामध्ये गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) नाव आघाडीवर असून बीसीसीआयचे सचिन जय शहा यांनी गंभीरसोबत चर्चा सुद्धा केली आहे. गंभीरच नाव जवळपास नक्की मानल जात आहे. मात्र अजून त्याने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याबाबत गौतम गंभीरने आपलं मौन सोडलं आहे. आपल्या देशाच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवणं ही अभिमानाची गोष्ट असून मला ते आवडेल असं गंभीरने म्हंटल आहे.

नुकतेच युवा क्रीडाप्रेमींशी झालेल्या संवादाच्या प्रश्नाला उत्तर देताना गंभीर म्हणाला की, आपल्या देशाच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवणं ही अभिमानाची गोष्ट आहे. मला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद व्हायला आवडेल. तुमच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. तुम्ही 140 कोटी भारतीयांचे आणि जगभरातील अन्य भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहात आणि जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करता, तेव्हा यापेक्षा मोठा सन्मान कसा असू शकतो. भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी मदत करणारा मी नाही, तर 140 कोटी भारतीय भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करतील. जर सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करू लागलो, तर भारत विश्वचषक जिंकेल असं गंभीरने म्हंटल.

दरम्यान, गौतम गंभीर भारताच्या लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जातो. २००७ च्या T20 वर्ल्डकप आणि २०११ च्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात गंभीरनेच दमदार खेळ्या करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. गंभीरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्याशिवाय मेंटॉर म्हणूनही त्यानं यशस्वी काम केले आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात गंभीरचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे गौतम गंभीरच भारताचा मुख्य प्रशिक्षक व्हावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे. गंभीर टीम इंडियाचा कोच झाल्यास 3.5 वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल.

BSF Bharti 2024 | BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती सुरु; थेट ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

BSF Bharti 2024

BSF Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता सीमा सुरक्षा दल अंतर्गत एक भरती निघालेली आ.हे या भरती अंतर्गत असिस्टंट (BSF Bharti 2024) पदासाठी रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 2 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून लवकरात लवकर अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे उमेदवारांना भरतीचे अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे 24 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या तारखेच्या सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | BSF Bharti 2024

  • पदाचे नाव – असिस्टंट कमांडर
  • पदसंख्या – 1 जागा
  • अर्जापद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2024
  • शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमधून डिग्री पूर्ण असणे गरजेचे
  • वेतनश्रेणी – 56 हजार 100 रुपये ते 1,77,500. रुपये प्रति महिना

अर्ज कसा करावा ? | BSF Bharti 2024

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • 24 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
  • त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Farmers Friend Insect | हे 4 कीटक आहेत शेतकऱ्यांचे मित्र; पिकाचे करतात संरक्षण

Farmers Friend Insect

Farmers Friend Insect | अनेक कीटकांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत असते. परंतु काही कीटक असे असतात, ज्यामुळे पिकांना कोणतीही हानी पोहोचत नाही. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो. परंतु हे कीटक कोणते आहे? हे शेतकऱ्यांना माहीत नसते. त्यामुळे रासायनिक फवारणी केल्याने त्या कीटकांचा जीव जातो. आज आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांच्या फायद्याचे कीटक आणि त्याची ओळख याबद्दलची माहिती सांगणार आहोत.

पिकांवर कीटकांनी (Farmers Friend Insect ) हल्ला करणे, ही अगदी सामान्य गोष्ट आहे. कीटकांमुळे पिकाला कीड लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि पर्यायाने त्यांचे आर्थिक नुकसान होत असते. परंतु असे काही कीटक आहेत, जे शेतकऱ्यांचे मित्र आहे. शेतकऱ्यांचे मित्र असलेले हे कीटक शत्रू कीटकांना मारतात. आणि पिकांचे देखील संरक्षण करतात. शेतकरी जेव्हा त्यांच्या पिकांवर काही कीटक येतात तेव्हा ते सगळेच कीटक वाईट आहेत, असे समजून शेतकरी त्यावर रासायनिक फवारणी करतात. परंतु यामुळे त्यांचे देखील नुकसान होते.

काही कीटक असे आहेत जे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. त्यामुळे कोणते कीटक आपले शत्रू आहेत आणि मित्र आहेत. हे शेतकऱ्यांनी वेळेत ओळखणे खूप गरजेचे आहे आता शेतकऱ्यांचे कोणते कीटक मित्र आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत

रेड लेडी बर्ड बीटल कीटक | Farmers Friend Insect

हा कीटक जर शेतकऱ्यांना त्यांच्या बागेत किंवा पिकांवर दिसला, तर ते शेतकरी भाग्यवान असतात. कारण हे कीटक शेतकऱ्यांच्या पिकांवर हल्ला करणाऱ्या कीटकांचा पराभव करतात. या कीटकांच्या अळ्या बागेत असणे म्हणजे खूप फायदेशीर असते. हे कीटक लाल किंवा केशरी रंगाचे असतात. तसेच त्याच्या शरीरावर काळया रंगाच्या खुणा असतात.

शेतकऱ्याचा मित्र कोळी

कोळ्याच्या अनेक जाती आढळतात. अगदी घरात आणि शेतात देखील आढळतात. कोळी हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कारण पिकांना हानी पोहोचवणाऱ्या कीटकांपासून कोळी मदत करतो. त्यामुळे पिकांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.

प्रार्थना मँटिस कीटक

शेतकरी या कीटकाला टोल समजतात आणि मारतात. हा कीटक शेतकऱ्यांचा मित्र आहे. खरीप पिकावर जे किडे हल्ला करतात. त्या किड्यांना हे कीटक खाऊन टाकतात. हे कीटक हिरव्या रंगाचे असतात. त्यामुळे हे किडे दिसल्या शेतकऱ्यांनी त्यांना मारू नये.

ट्रायकोग्राम कीटक | Farmers Friend Insect

हा कीटक देखील शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. हानिकारक कीटकांना नष्ट करण्यासाठी हा कीटक मदत करतो. हा कीटक पानांवर हानी पोहोचवणाऱ्या किड्यांना खाऊन टाकतो.

Cleaning Hacks : पॉटला हात न लावता टॉयलेट बनवा चकाचक ! वापरा ‘ह्या’ सोप्या ट्रिक्स

Cleaning Hacks : टॉयलेट स्वच्छ करणे मोठ्या मेहनतीचे काम. पण जर टॉयलेट स्वच्छ केले नाही तर अनेक आजरांना निमंत्रण… कारण अनेक बॅक्ट्रिया आणि व्हायरस टॉयलेट मधूनच पसरतात. म्हणूनच टॉयलेट स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. पण अनेकांना हाताने टॉयलेट साफ करणे म्हणजे किळसवाने वाटते. म्हणूनच आम्ही आजच्या लेखात अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हला टॉयलेटला हात लावावा (Cleaning Hacks) लागणार नाही आणि टॉयलेटही स्वच्छ होईल. चला तर म्हणून जाणून घेऊया…

सोडा

सोडा हा क्लिनिंग एजंट म्हणून ओळखला जातो. स्वच्छतेच्या अनेक उपायांमध्ये सोड्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. सोडाच्या मदतीने टॉयलेट सीट स्वच्छ करणं खूप सोपं आहे. याकरिता चार चमचे सोडा अर्धा कप पाण्यामध्ये मिक्स (Cleaning Hacks) करून घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट करून घ्या. ही पेस्ट डाग असलेल्या ठिकाणी लावून आर्धा तास तसेच ठेवा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा त्यामुळे सर्व डाग निघून जातील.

ग्लिसरीन आणि व्हिनेगर

व्हीनेगर खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते. मात्र व्हिनेगर चा उपयोग हा स्वच्छतेसाठी सुद्धा चांगला होऊ शकतो. तसेच ग्लिसरीन आपण त्वचा चांगली बनवण्यासाठी आपण वापरतो मात्र ग्लिसरीनचा वापर क्लीनिंग एजंट म्हणून सुद्धा होऊ शकतो. ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्ही एका बॉटलमध्ये कोल्ड्रिंक घ्या त्यात एक कप ग्लिसरीन आणि व्हाईट व्हिनेगर मिक्स करा. यात थोडा लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल घालून हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. हे मिश्रण कोणत्याही स्प्रे बॉटलमध्ये भरून टॉयलेट क्लीनर म्हणून तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे टॉयलेट सीट क्लीन (Cleaning Hacks) तर होईलच शिवाय ती बॅक्टेरिया फ्री सुद्धा होईल.

क्लिनिंग टॅबलेट (Cleaning Hacks)

टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी क्लिनिंग टॅबलेट हा एक उत्तम उपाय आहे बॅक्टेरिया, व्हायरस आणि अन्य किटाणू दूर करण्यासाठी टॅबलेटच्या पाकिटावर लिहिलेले टॉयलेट टॅंक मध्ये घालून ठेवा. यासाठी ब्रशचा वापर करण्याची गरज नाही.

बोरेक्स आणि लिंबाचा रस (Cleaning Hacks)

बोरेक्स पावडर आणि लिंबाचा रस घालून टॉयलेट स्वच्छ करू शकता. ही ट्रिक वापरण्यासाठी तीन ते चार चमचे बोरेक्स पावडर घ्या. त्यामध्ये अर्धा कप लिंबाचा रस मिसळा आणि हे मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण टॉयलेट सीटवर घालून एक तासासाठी (Cleaning Hacks) तसेच ठेवा त्यानंतर कपड्याने साफ करा. या उपायामुळे टॉयलेट सीट चमकदार होईल

INDIA की NDA? देशात सत्ता कोणाची? निकालाच्या जलद अपडेटसाठी Dailyhunt पहा

lok sabha 2024 result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून आता 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपप्रणीत NDA विरुद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखालील INDIA आघाडीत यंदा थेट सामना पाहायला मिळाला आहे. सलग तिसऱ्यांदा आपली सत्ता आणण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली होती, तर कोणत्याची परिस्थितीत मोदींची सत्ता उलथवून टाकण्याचा चंग INDIA आघाडीने बांधलाय. दोन्ही गटाकडून आपापल्या विजयाचे दावे करण्यात येत असून उद्या ४ जूनच्या निकालातच देशाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. देशातील एकूण 543 लोकसभा जागांसाठी 8,360 उमेदवारांचे भवितव्य उद्याच्या निकालात ठरणार आहे.

यापूर्वी, 1 जून रोजी झालेल्या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए मोठा विजय मिळेल असा दावा वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी केला आहे. या सर्वेक्षणांनुसार, इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाने NDA ला 361-401 जागांचा अंदाज वर्तवला आहे, न्यूज 24-टूडेज चाणक्यने 400, एबीपी न्यूज-सी मतदाराचा अंदाज 353-383, रिपब्लिक भारत-पी मार्कने अंदाज 359, इंडिया न्यूज-डी-डायनॅमिक्सने 371जागांचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय रिपब्लिक भारत-मॅट्रिझचा अंदाज 353-368 जागा, दैनिक भास्करचा अंदाज 281-350, न्यूज नेशनचा अंदाज 342-378, TV9 भारतवर्ष-पोलस्ट्रॅटचा अंदाज 342, टाइम्स नाऊ-ईटीजीचा अंदाज 358, इंडिया टीव्ही-सीएनएक्स आणि जन की बातने अंदाजे ३६२-३९२ जागांचा अंदाज वर्तवत देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता येईल असं म्हंटल आहे. परंतु एक्झिट पोल नेहमीच अचूक नसतात हे सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणूनच उद्याच्या ४ जूनच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणूक निकालासाठी उद्या 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. सुरुवातीलाच कोण कोण उमेदवार आघाडीवर आहे? काय ट्रेंड सुरु आहे यावरून आपल्याला निकालाचा अंदाज येईलच. दुपार पर्यंतच निकालाचे एकूण चित्र स्पष्ट होईल. मात्र अंतिम निकाल उद्या ४ जूनला रात्री किंवा ५ जूनला सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल अगदी जलद आणि अचूकपणे मतदारांपर्यंत पोचवण्याचे काम प्रसिद्ध मीडिया प्लॅटफॉर्म डेलीहंट करत आहे. Dailyhunt वर तुम्हाला लोकसभा निकालाचे थेट कव्हरेज पाहायला मिळेल.

निवडणुका केवळ आकड्यांवर नसतात, असे आमचे मत आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निकाला पर्यंत पोहोचण्यासाठी डेटा, नमुने आणि विश्लेषणाचा अर्थ लावण्यावर आमचे लक्ष आहे. आम्ही सर्व कानाकोपऱ्यातून विश्लेषण करू आणि डेटा आणि त्याचा अर्थ काय आहे याचा सखोल अभ्यास आपल्यापुढे सादर करू. या निवडणूक निकालाचे विश्लेषण अशा प्रकारे सादर केले जाईल की ते सर्वसामान्य व्यक्तींपासून ते राजकीय तज्ञापर्यंत सर्वजण अत्यंत सोप्या पद्धतीने समजू शकेल.

Dailyhunt च्या कव्हरेज मध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल.

1) एका चांगल्या मांडणीच्या स्वरूपात निकालांचे लाइव्ह अपडेट
2) सध्याच्या निवडणुकीतील आकडेवारी आणि त्याची मागील निकालांशी तुलना
3) राज्यवार आणि मतदारसंघनिहाय जागांच्या निकालाचे अपडेट
4) सोशल मीडियावरील प्रतिक्रिया तसेच ट्विटरवरील ट्रेंडिंग स्टोरीज
5) याशिवाय थेट व्हिडिओ, व्हायरल मिम्स, ट्रेंडिंग स्टोरीज, व्हिडिओ असा सर्वसमावेशक गोष्टी डेलिहंटच्या कव्हरेज मधून मिळतील.

Stay tuned with Dailyhunt

Disadvantages Of Sugar | गोड साखर ठरू शकते जीवघेणी; शरीराला होतात हे तोटे

Disadvantages Of Sugar

Disadvantages Of Sugar | साखर ही आपल्याला दैनंदिन आयुष्यात लागत असते. परंतु साखर ही आपल्या आरोग्यासाठी जितकी चांगली आहे, तितकीच वाईट देखील आहे. अनेक आजारांचे कारण साखर ठरते. त्यामुळे साखरेला व्हाईट पॉइजन असे देखील म्हटले जाते. वजन वाढणे, डिप्रेशन, हार्ट डिसीज, त्वचा खराब होणे, डायबिटीज, स्मृती कमी होणे यांसारख्या अनेक समस्या साखरेच्या अतिसेवनामुळे उद्भवतात.

साखरेच्या (Disadvantages Of Sugar) अति सेवनाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन, आता राष्ट्रीय पोषण संस्था आणि भारतीय आयुर्वेदिक अनुसाधन परिषद यांनी सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस, कुकीज, आईस्क्रीम सेरीअल्स आणि इतर पॅकेज फोर्समध्ये साखरेचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिलेला आहे.

बाजारामध्ये कोको कोला, ज्यूस, बिस्कीट यांवर 100 ग्रॅम साखरेचे प्रमाण आता 86 ग्रॅम पर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आता आयसीएमआरने शिफारस केली आहे की, गोड पदार्थांमध्ये पाच टक्के एनर्जी एडिट शुगर मिळते 10% टोटल शुगर या पदार्थांमध्ये दहा टक्के एडिट शुगर आणि तीस टक्के टोटल शुगर असते.

जास्त साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे डायबिटीस, लठ्ठपणा आणि कॅन्सर देखील होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपले वजन देखील वाढते आणि ब्लडप्रेशरची समस्या देखील निर्माण होते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात साखरेचा वापर अतिशय कमी करण्याचा सल्ला देखील तज्ञांनी दिलेला आहे.

अमेरिकन हार्ड असोसिएशनच्या रिपोर्टनुसार महिलांनी दर दिवशी 100 कॅलरीस पेक्षा जास्त आणि पुरुषांनी 150 कॅलरीज पेक्षा जास्त साखर खाऊ नये. बॉलीवूडमधील कलाकार जॉन इब्राहिम आणि जॅकलीन फर्नांडिस हे दोघे जण साखर अजिबात खात नाही. जवळपास गेल्या 27 वर्षांमध्ये त्याने साखरेला हात देखील लावलेला नाही.

साखर (Disadvantages Of Sugar) हा वजन वाढण्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे ज्या लोकांचे वजन कमी आहे. त्या लोकांनी योग्य प्रमाणात साखरेचे जास्त सेवन केले तर त्याचा त्यांना फायदा होतो. त्यामुळे भरपूर कॅलरीज मिळतात आणि त्यांचे वजन वाढते. परंतु या साखरेचे सेवन करताना त्याचे योग्य आणि प्रमाणात सेवन करणे खूप गरजेचे असते. अन्यथा यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अन्यथा हीच गोड वाटणारी साखर एक दिवस तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते.