Weather Update | मे महिना चालू झालेला आहे. आणि अशातच अवकाळी पावसाचे संकट आलेले आहे. गेल्या दोन दिवसापासून वादळी वर तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. येणाऱ्या काही दिवसात देखील राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
सकाळी ऊन तर दुपारनंतर अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील अनेक ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे गारपीट आणि सोसाट्याचा वारा देखील येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळ आणि गारपीटसह सूसाट्याचा वारा पडण्याची शक्यता आहे.
कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/VQhi1CoGm7
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 11, 2024
या शहरांना ऑरेंज अलर्ट | Weather Update
राज्यात अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि हवामान खात्याने 12 ते 18 मेपर्यंत गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. अनेक जिल्ह्यांना येल्लो आणि ऑरेंज अलर्ट जाली केलेला आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील नांदेड, लातूर विदर्भामधील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. वादळीवारा देखील येणार असल्याने नागरिकांनी कामानिमित्त घराबाहेर पडावे असे देखील सांगण्यात आलेले आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील व संध्याकाळपर्यंत अंशतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २७°C च्या आसपास असेल. pic.twitter.com/RLcCErKAgB
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 11, 2024
मुंबईत कसे असेल वातावरण
मुंबईतील वातावरणाचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केलेले आहे. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश निरभ्र असेल, तर संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण असल्याचे सांगितलेले आहे. या ठिकाणी तापमान 35°c पर्यंत असेल असे देखील सांगण्यात आलेले आहे.
How To Increase Credit Score | आधुनिक जीवनात कोणतेही आर्थिक व्यवहार करताना आपल्या सिबिल स्कोर चांगला असणे खूप महत्त्वाचे आहे. चांगला असणारा सिबिल स्कोर ही तुमची आर्थिक ताकद दाखवते. त्याचप्रमाणे सिबिल स्कोरचा अनेक घटकांवर परिणाम होतो. जर तुमचा सिबील स्कोर (How To Increase Credit Score) खराब असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लोन मिळत नाही. परंतु जर तुमचा सिबील स्कोर खराब असेल. आणि तुम्हाला जर चांगला करायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा सिबिल स्कोर चांगलं करू शकता.
तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा | How To Increase Credit Score
सिबील सकोर तुमच्या क्रेडिट रिपोर्टची एक प्रत घ्या आणि ती काळजीपूर्वक वाचा. तुमचा सिबिल स्कोर कमी करणाऱ्या काही चुकांची माहिती आणि फसवणूक या सगळ्या गोष्टी तिथे असते. ते तपासा तुमची सर्व बिले वेळेवर भरा. क्रेडिट कार्डची बिले असो किंवा ईएमआय असो किंवा विजेची बिल असो, या सगळ्याचा देखील तुमच्या सिबिल स्कोरवर वाईट परिणाम होतो.
क्रेडिट कार्डचा वापर कमी करा
तुम्ही कमीत कमी क्रेडिट कार्डचा वापर करा. क्रेडिट कार्डमध्ये 30% पेक्षाही कमी वापर करण्याचा प्रयत्न करा. जास्त क्रेडिट कार्ड वापरल्याने तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो.
जास्त कर्जासाठी अर्ज करू नका
ज्यावेळी तुम्ही कर्जासाठी अर्ज करता, त्यावेळी क्रेडिट अहवालात चौकशी नोंदवली जाते. यामुळे तुमचा स्कोर कमी कालावधीसाठी कमी होऊ शकतो. त्यामुळे गरज असेल तेव्हाच कर्जासाठी अर्ज करा.
क्रेडिटमध्ये विविधता आणा
क्रेडिट कार्ड कर्जागृह कर्ज यांसारख्या विविध प्रकारचे कर्ज वापरल्याने तुमचा क्रेडिट स्कोर चांगला होऊ शकतो. परंतु तुम्ही त्याची परतफेड करू शकता एवढेच कर्ज घ्या.
तज्ञांची मदत घ्या
जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल, तर आर्थिक सल्लागार किंवा क्रेडिट सल्लागाराची मदत घ्या. आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच तुम्ही सिबिल स्कोर सुधारण्यासाठी प्रयत्न करा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सामना वृत्तवाहिनीला दिलेली एक मुलाखत प्रसिद्ध झाली. उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाखतीतून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली. मात्र ठाकरेंच्या या मुलाखतीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा आहे. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंना ५ प्रश्न केले आहेत.
याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हंटल कि, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
1) दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?
2) 1993च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता ?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?
एकीकडे पंतप्रधान @narendramodi जी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते @OfficeofUT यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या @rautsanjay61 यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) May 12, 2024
3) सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?
4) राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?
5) उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?
उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रश्नांची उत्तरे देतात का? तसेच संजय राऊत यावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Retirement Planning | अनेकजण हे आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आत्ताच तयारी करून ठेवत असतात. निवृत्ती झाल्यानंतर आपले आयुष्य सुखात जावे. यासाठी सगळेजण तयारी करून ठेवतात. आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे आर्थिक नियोजन करण्यासाठी सध्या अनेक सरकारी आणि खाजगी योजना देखील उपलब्ध आहेत. ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि मासिक पेन्शन देखील मिळू शकता. या योजना तुम्हाला चांगला परतावा देखील देतात. परंतु आता आपण अशा काही खास योजनाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या योजनांमधून तुम्हाला निवृत्तीनंतर (Retirement Planning ) चांगला परतावा मिळेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते (SCSS) | Retirement Planning
पोस्ट ऑफिसची ही योजना वार्षिक 8.20% व्याज दर देते. यात किमान गुंतवणुकीची रक्कम 1000 रुपये आहे आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये जमा करता येतील. ही रक्कमही एकाच वेळी जमा केली जाते. पाच वर्षांच्या कालावधीत मासिक उत्पन्न व्याजाच्या स्वरूपात मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, जमा केलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.
अटल पेन्शन योजना | Retirement Planning
ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. गुंतवणुकीवर अवलंबून, वयाच्या 60 वर्षांनंतर, 1000 ते 5000 रुपये मासिक पेन्शन उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील व्यक्तीने अर्ज करावा लागेल.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते
ही पोस्ट ऑफिसची मासिक पेन्शन योजना देखील आहे. यामध्ये एकत्र गुंतवणूक केल्यास तुम्हाला पाच वर्षांसाठी मासिक पेन्शन मिळू शकते. जमा केलेली रक्कम पाच वर्षांनी परत केली जाते. ही योजना दरवर्षी ७.४% व्याज देते जे दर महिन्याला दिले जाते. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक रक्कम व्यक्तीसाठी 9 लाख रुपये आणि जोडप्यासाठी 15 लाख रुपये आहे. एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त 5,550 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते तर जोडप्याला जास्तीत जास्त 9,250 रुपये मासिक उत्पन्न मिळू शकते.
म्युच्युअल फंडांमध्ये पद्धतशीर पैसे काढण्याची योजना
म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (SWP) द्वारे मासिक उत्पन्न देखील देतात. यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंडात एकत्र गुंतवणूक करता आणि हा फंड तुम्हाला निश्चित मासिक पेन्शन देतो. तथापि, ही बाजाराशी निगडित गुंतवणूक आहे, त्यामुळे फंडाची कामगिरी खराब झाल्यास तुम्ही तुमचे भांडवल गमावू शकता.
मुदत ठेव
पोस्ट ऑफिस आणि बँका विविध कालावधीसाठी मुदत ठेव (FD) सुविधा देतात. तुम्हाला FD वर जमा केलेल्या रकमेवर मासिक, त्रैमासिक, वर्षातून दोनदा किंवा वार्षिक आधारावर व्याज मिळते. याव्यतिरिक्त, ज्येष्ठ नागरिकांना देखील सामान्य नागरिकांपेक्षा 0.25% जास्त व्याजदर दिले जातात.
गिरीश महाजन हे संकटमोचक नसून जळगाव जिल्ह्यावरील संकट…गिरीश महाजनांना (Girish Mahajan) दोन नंबरच्या पैशाची मस्ती…हे दिल्लीच्या गोष्टी करतात, गल्लीच्या करत नाहीत…ही सगळी स्टेटमेंट आहेत. जळगावचे भाजपकडून स्टॅंडिंग खासदार मात्र सध्या ठाकरे गटात असलेल्या उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांची… ज्या गिरीश महाजनांना भाजप पक्षात संकट मोचक म्हणून ओळखलं जातं. तेच पाटील सध्या जळगावात भाजपसाठी संकट बनलेत, असं त्यांचं म्हणणं आहे. फडणवीसांचे अत्यंत विश्वासू, मनोज जरांगेंचं आंदोलन असून द्या किंवा मोहिते पाटलांची नाराजी भाजपकडून पहिली बोलणी करायला जातात ते गिरीश महाजन… भाजपसाठी संकट बनवून उभ्या राहिलेल्या अनेक परिस्थितीत महाजनांनी वाट मोकळी करून दिली. 2019 मध्ये पक्षात मेगा भरती केली… एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर याच महाजनांनी जळगावच्या राजकारणाचा होल्ड आपल्या हातात घेतला… राज्यातील भाजपसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या उमेदवारांसाठी हेच गिरीश महाजन सध्या जीव तोडून काम करतायत… सभा घेतायत… पण हेच महाजन ज्या जळगावातून येतात त्याच मतदारसंघात आलेल्या मशालीच्या संकटापुढे हे संकटमोचक सध्या हतबल झालेले दिसतायत. भाजपसाठी अतिशय सेफ गड समजल्या जाणाऱ्या जळगावला ठाकरेंचं वारं कस लागलं? पक्षाला राज्यात येणाऱ्या अडीअडचणी सोडवणाऱ्या महाजनांना जिथून राजकारणाची बाराखडी गिरवली त्याच जळगावात पराभवाचं संकट का दिसतंय? उन्मेश पाटील या एका नावानं महाजनांना कसं चक्रव्यूव्हमध्ये अडकवलंय? तेच पाहुयात
भाजपला एक हाती विजय मिळवून देणाऱ्या जळगावात (Jalgaon Lok Sabha Election 2024) यंदाही वारं कमळाच्याच दिशेनं होतं. मतदारसंघात भाजपच्या खासदारांची फौज आणि महायुतीची ताकद असल्यानं सगळेच निर्धास्त होते. याउलट शिवसेना फुटल्यानं जळगावातील सर्वच प्रमुख नेत्यांची फळी ही शिंदेंच्या बाजूने झुकली होती. महाविकास आघाडीकडे जळगावातून उभा करावा असा एकही स्ट्रॉंग कैंडिडेट नव्हता. थोडक्यात जळगावची लढत ही भाजपासाठी सोपी होती… मग महाराष्ट्रातील भाजपची पहिली यादी जाहीर झाली. या यादीवरून नजर फिरवल्यावर सर्वांना धक्का बसला तो जळगावची उमेदवारी पाहून… भाजपनं जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता कट करून स्मिता वाघ यांना उमेदवारी देऊ केली. ही गोष्ट उन्मेष पाटलांचं राजकीय खच्चीकरण करणारी होती… उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीला गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा विरोध होता. त्यांनी आधीपासूनच उन्मेष चव्हाण यांचा पत्ता कट होणार, असं वातावरण तयार केलं होतं. आणि अखेर झालंही तसंच… मग याच उन्मेष पाटलांनी भाजपला मोठा धक्का देत ठाकरे गटात प्रवेश केला. इतकच नाही तर शिवधनुष्य बांधायला आपल्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार (Karan Pawar) यांना घेऊन घेले…या सगळ्यात धनुष्यबान हातात घेऊन उन्मेष पाटील मैदानात उतरतील असं वाटत असताना पाटलांनी करण पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह केला.. आणि अखेर स्मिता वाघ विरुद्ध करण पवार अशी लढत फिक्स झाली…
भाजपने जळगावची सारी भिस्त ज्या महाजनांच्या खांद्यावर टाकली होती, त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका होता. महाजनांच्या हस्तक्षेपामुळेच उन्मेष पाटलांचं बंड झालं आणि जळगावात भाजप बॅकफुटला गेली, हे सरसकट बोललं जाऊ लागलं. खरंतर कागदावर बघायला गेलं तर जळगावात महायुतीची ताकद ही जास्त दिसते. महाविकास आघाडी जिल्ह्यात नाहीत जमा आहे. पण उन्मेष पाटील यांच्या येण्यानं जिल्ह्याचं राजकारण 360 अंशात बदलून गेलंय.. उन्मेष पाटील आणि करण पवार यांचं मूळ भाजपचंच असल्यानं येत्या काळात पक्षाकडून आपल्या विरोधात कशा स्टेटर्जी आखल्या जातील? याची दोघांनाही आधीपासूनच थोडीफार कल्पना आहे.
शिवाय, चाळीसगाव, पाचोरा-भडगाव, चोपडा, अमळनेर यांसह इतर विधानसभा मतदारसंघांतील खासदार पाटील यांचा चांगला जनसंपर्क, शेतकऱ्यांना पीकविम्याच्या लाभासाठी केंद्र व राज्य सरकारकडे केलेले प्रयत्न, संसदेतील उत्तम कामगिरी, पाडळसरे प्रकल्प, बोदवड उपसा सिंचन योजना, विमानतळ यांसह विविध प्रकल्पांच्या कामांना दिलेली गती या सगळ्यांचा पवारांच्या प्रचाराला फायदा होणार आहे, हे स्पष्ट दिसतंय. उन्मेष पाटील यांनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच विकासाची लाईन गडद करत टार्गेटवर ठेवलं ते गिरीश महाजनांना… महाजनांची जिल्ह्यात तयार झालेली संकट मोचकाची प्रतिमा खोडून काढून ते जिल्ह्यासाठी कसे संकट आहेत? हे मतदारांवर बिंबवत आहेत. थोडक्यात गिरीश महाजनांच्या इमेजला डॅमेज केलं की आपोआप स्मिता वाघ यांच्या मतदानावरही त्याचा इम्पॅक्ट होणार, हे गणित पाटलांना पक्क ठाऊक झालय… दुसऱ्या बाजूला उन्मेष पाटील यांच्या या खेळीने महाविकास आघाडीच्या गोटातही बारा हत्तींचं बळ आलय. उद्धव ठाकरेंनी जळगावात आपली यंत्रणा जोरात कामाला लावलीय. प्रचार सभांचाही चांगलाच जोर दिसतोय. त्यात ठाकरे गटाने जळगावच्या विजयाची नसही अचूक हेरलीय ती म्हणजे शेतकरी प्रश्नांची… दुधाचा भाव, पिक विमा, केळी उत्पादनाचे प्रश्न यावरून मविआचे नेते जळगावात भाजपाला धारेवर धरून जनमत आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करतायत… ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ अशी म्हण मराठीत रूढ आहे ती अगदी तंतोतंत सध्या करण पवार आणि ठाकरेंसाठी जळगावत तरी लागू होतेय, असं म्हणायला हरकत नाही…
या सगळ्यात गिरीश महाजन अचानकच जिल्ह्याच्या राजकारणात काहीसे थंडे पडलेत. नाथाभाऊ पक्षात आल्यापासून भाजपतील अंतर्गत गोंधळ चांगलाच वाढला आहे. पक्षांचं केडरही मतदारसंघात म्हणावा इतका आक्रमकपणे काम करताना दिसत नाहीये. हे सगळं कॅल्क्युलेशन नीट केलं तर जळगावात मशालीला निवडून येण्यासाठी फुल स्कोप आहे… जर का असं झालं तर गिरीश महाजनांसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनू शकतो. मोठ्या कष्टानं आणि संयमानं जिल्ह्याच्या राजकारणावर होल्ड मिळवूनही खासदारकी हातातून जात असेल तर गिरीश महाजनांच्या राजकीय कारकीर्दीवर यामुळे संकट येऊ शकतं.. म्हणूनच जळगावची लढाई कमळ विरुद्ध मशाल इतकीच मर्यादित नसून यावर अनेकांची राजकीय भविष्य अवलंबून आहेत, हे काही वेगळं सांगायला नको… बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
NHPC Bharti 2024 | नोकरीच्या शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड अंतर्गत (NHPC Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत आयटीआय प्रशिक्षण आर्थिक पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 64 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती पद्धती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 30 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण पाहूया.
महत्त्वाची माहिती | NHPC Bharti 2024
पदाचे नाव – आयटीआय प्रशिक्षणार्थी
पदसंख्या – 64 जागा
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2024
शैक्षणिक पात्र – दहावी आणि आयटीआय पास असणे गरजेचे आहे
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
यासाठी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
30 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मागील काही वर्षात देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठी क्रांती झाली आहे. अनेक रस्त्यांची कामे पूर्णत्वास येत आहेत, वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन यामुळे प्रवास अगदी सोपा आणि आरामदायी झाला आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात अगदी कमी वेळेत जाणं शक्य झालं आहे. आता वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता हायपरलूप ट्रेन चालवण्याची योजना आहे. त्यानुसार देशातील पहिली हायपरलूप ट्रेन (Mumbai Pune Hyperloop Train) मुंबई ते पुणे या मार्गावर धावेल. या ट्रेनमुळे मुंबई -पुणे अंतर अवघ्या २५ मिनिटात पार होणार आहे. सध्याच्या घडीला रेल्वेने किंवा रस्त्याने हे अंतर कापण्यासाठी ३ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. एवढच नव्हे तर विमानानेही हे अंतर कापण्यासाठी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो.
सुविधा कधी सुरू होणार? Mumbai Pune Hyperloop Train
पुण्यातील स्टार्टअप Quintrans Hyperloop ने 2032-33 पर्यंत सर्वसामान्यांना ही सुविधा देण्याची तयारी केली आहे. ही देशातील पहिली हायपरलूप ट्रेन असेल. मुंबई ते पुणे हायपरलूप ट्रेन यशस्वी झाल्यानंतर दिल्ली-चंदीगड आणि चेन्नई-बेंगळुरू या मोठ्या शहरांमध्येही अशा प्रकारच्या ट्रेन सुरु करण्याची योजना आहे. Quintrans Hyperloop चे संस्थापक प्रणय लुनिया म्हणतात की देशाला हाय-स्पीड वाहतुकीची गरज आहे. हायपरलूप तंत्रज्ञान ही पोकळी भरून काढू शकते. यामध्ये, कमी दाबाच्या नळीद्वारे घर्षण आणि कंपन कमी होते, ज्यामुळे ट्रेनचा वेग अतिशय जलद पद्धतीने वाढतो. या हाय[रलूप ट्रेनचे भाडे सुद्धा विमानाच्या दरापेक्षा कमी असेल. मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या हायपरलूप ट्रेनचे तिकीट अंदाजे 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत असेल.
मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दोन्हीही महाराष्ट्रातील महत्वाची शहरे असल्याने त्यांची लोकसंख्याही जास्त आहे. मुंबई ते पुणे हे अंतर सुमारे 148 किलोमीटर आहे आणि जर विमानाच्या माध्यमातून प्रवास करायचा म्हंटल तर 45 मिनिटे वेळ लागतो तेच विमानतळावर सुद्धा तुमचा अतिरिक्त वेळ वाया जातो. याउलट हायपरलूप ट्रेनद्वारे (Mumbai Pune Hyperloop Train) तुम्ही अवघ्या 25 मिनिटांत मुंबई ते पुणे प्रवास करू शकता. त्यामुळे दोन्ही शहरातील लाखो प्रवाशांसाठी हि हायपरलुप ट्रेन अतिशय महत्वाची ठरेल यात शंका नाही.
Crop Loan Stamp Duty | आपले सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच नवनवीन निर्णय घेत असतात. अशातच आता सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. महाराष्ट्र सरकारने 1.6 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होणार आहे. याआधी नवीन पीक कर्ज घेण्यापूर्वी शेतकऱ्यांना पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. परंतु आता हे शुल्क देखील माफ केलेले आहे. 1 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यानंतर घेतलेल्या सर्व नवीन पीक कर्जांनाही हा नियम लागू असणार आहे.
सरकारने (Crop Loan Stamp Duty) घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील खूप शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. जे शेतकरी कृषी गरजांसाठी लहान कर्ज घेतात. त्यांना देखील फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांना सगळ्या गोष्टींचा लाभ मिळण्यासाठी सरकार अनेक निर्णय घेत असतात. आणि हा निर्णय देखील त्यातीलच एक आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी करून त्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
सरकारने खते आणि बी- बियाण्यांवर सबसिडी देणे. यांसारख्या मदत करण्यासाठी अनेक उपाययोजना देखील केलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार वारंवार पावले उचलत आहे. पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करणे. हे महाराष्ट्र सरकारचे एक मोठे पाऊल आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. आणि त्यांचे आर्थिक स्थिती सुद्धा सुधारणार आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुनील नारायण …. कोलकाता नाईट रायडर्सचा आक्रमक सलामीवीर … आपल्या वादळी खेळीने नारायणने अनेकदा कोलकात्याला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. तसेच चौफेर फलंदाजी करत गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या आहेत. त्यामुळे भले भले गोलंदाज नारायण समोर निष्प्रभ ठरले … मात्र कालच्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात जसप्रीत बुमराहने पाहिल्याचे चेंडूवर धारधार यॉर्कर टाकला आणि नारायच्या दांड्या गुल केल्या .. याबाबतचा विडिओ सुद्धा समोर आला आहे.
जसप्रीत बुमराहने मुंबईच्या डावाचे दुसरे षटक टाकलं. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बुमराहनं टाकलेला भन्नाट यॉर्कर सुनील नारायणला समजलाच नाही …. नारायणनने तो बॉल सोडला आणि थेट स्टॅम्पवर जाऊन आदळला. बुमराहनं टाकलेला बॉल कधी स्टम्पवर जाऊन आदळला हे सुनील नारायणला समजलचं नाही. U Miss I Heat प्रमाणे नारायणाच्या दांड्या गुल झाल्या.. अतिशय अचूक टाकलेल्या यॉर्कर बॉलवर नारायण चितपट झाला आणि पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची नामुष्की नारायणवर आली.
दरम्यान, यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय सुमार राहिली असली तरी भारताच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे जसप्रीत बुमराह आपल्या नेहमीच्या फॉर्मात दिसत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 20 विकेट घेत त्यानं पर्पल कॅपवर नाव कोरलं आहे. जसप्रीत बुमराहच्यानंतर हर्षल पटेलनं देखील 20 विकेट घेतल्या आहेत. मात्र, त्यानं धावा अधिक दिल्या आहेत. अचूक लाईन आणि लेन्थ,,, गरजेच्या वेळी बाउन्सर आणि देठ ओव्हर मध्ये दमदार यॉर्कर टाकत बुमराह समोरच्या फलंदाजाला कोड्यात टाकत आहे. बुमराहचा चांगला फॉर्म हीच एकमेव भारतासाठी दिलासादायक गोष्ट आहे.
Menstrual Health | मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक महिलांमध्ये दर महिन्याला ही प्रक्रिया घडत असते. या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे, खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा महिलांना याबाबत माहिती नसते. आणि त्या मासिक पाळीमध्ये अनेक चुका करतात. त्यामुळे त्यांना तीव्र वेदनेला सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीत कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल सांगणार आहोत.
जास्त पेन किलर खाणे | Menstrual Health
अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस खूप त्रास होतो. त्यामुळे त्या पेनकिलर औषधे खातात. परंतु जास्त पेन किलर खाणे देखील तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. या औषधांच्या जास्त सेवनाने हृदयाला देखील नुकसान होते. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा झटका, किडनी आणि यकृताशी संबंधित समस्या वाढतात.
जास्त वर्कआउट
वर्कआउट केल्याचे खूप फायदे असते. परंतु मासिक पाळी दरम्यान जर तुम्ही जास्त व्यायाम केला, तर त्याचा तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान थोडासा हलका व्यायाम करावा.
पॅड न बदलणे | Menstrual Health
मासिक पाळी दरम्यान वेळोवेळी पॅड बदलणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. यामुळे त्वचेवर खाज येणे, पुरळ उठणे यांसारख्या समस्या येतात. त्याचप्रमाणे निर्माण होणाऱ्या बॅक्टेरियामुळे टॉक्सिक शॉक सिंड्रोम देखील होऊ शकतो. त्यामुळे दर तीन ते चार तासांनी पॅड बदलणे गरजेचे आहे.
पाण्याची कमतरता
मासिक पाळी दरम्यान शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. डीहायड्रेशन झाले तर त्याचा परिणाम तुमच्या रक्तप्रवाहावर होऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.