हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरी की बिजनेस म्हणलं की अनेकजण नोकरी हा पर्याय निवडतात. कारण नोकरीमध्ये आठ तास काम करणे, महिन्याला पगार घेणे, दिले जाणारेच काम करणे, या सर्व बाबी असतात. याच्या उलट बिजनेस करायचे म्हटले की, आर्थिक पाया भक्कम ठेवूनच सर्व बाबींचे नियोजन करावे लागते. यात बिझनेस चांगला चालला तर ठीक नाही चालला तर आर्थिक फटका ही सहन करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पैसे कमावण्याचे असे काही पर्याय सुचवणार आहोत, जे तुमच्यासाठी ही सोयीचे ठरतील.
कर्ज देऊन व्याजातून पैसा मिळवा – सध्या महागाई वाढल्यामुळे पैशांची गरज सर्वांना असते. त्यामुळे अनेकजण कर्ज घेण्याचा मार्ग निवडतात. आजकाल आपल्याकडे घर घ्यायचे असो, की कार घ्यायची असो, किंवा साधा फोन घ्यायचा असो कर्ज काढलेच जाते. त्यामुळे तुम्ही पैसे कमवण्यासाठी एक रक्कम जमा करून गरजू व्यक्तीला देऊ शकता. या कर्जावर मिळणाऱ्या व्याजदरातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल. परंतु कोणत्याही व्यक्तीला कर्ज देताना काही कायदेशीर नियम पाळणे ही आवश्यक आहेत, तेही तपासून घ्या.
स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करा – आज काल स्टार्टअप सुरू करणारे व्यक्ती गुंतवणूकदाराच्या शोधात असलेले पाहायला मिळतात. अशावेळी तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करून सांगा पैसा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्या नवीन व्यक्तींनी स्टार्टअप सुरू केले आहे त्याचा शोध घ्यावा लागेल. आणि विश्वास ठेवून त्या व्यक्तीच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी लागेल.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा – पैसे कमवण्यासाठी शेअर मार्केट देखील चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला सखोल अभ्यासाची गरज आहे. तसेच पैसे गुंतवण्यासाठी एक चांगली रक्कम तुमच्याजवळ असायला हवी. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला त्यातून चांगला परतावा मिळू शकतो. तसेच तुम्ही म्युच्युअल फंडाचा देखील विचार करू शकता. ज्यामुळे चांगली रक्कम तुम्हाला मिळेल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Funny Video) सोशल मीडियावर कायम वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यांपैकी काही व्हिडीओ पाहून खरोखरच मनाला आनंद होतो. जस की, सोशल मीडियावर बऱ्याच लहान मुलांचे गोड व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून दिवसभराचा थकवा क्षणात निघून जातो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ही चिमुकली शाळेच्या कार्यक्रमात एक कविता सादर करते आहे. आपल्या बोबड्या स्वरात तीने अशी काही कविता ऐकवलीये की, तुमच्याही गालावर खुद्कन हसू येईल.
व्हायरल व्हिडीओ (Funny Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक चिमुकली मुलगी आपल्या शाळेच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहे. हा कार्यक्रम एखाद्या शाळेचे वर्षक स्नेहसंमेलन असल्याचे समजत आहे. या व्हिडिओतील चिमुकलीने मस्त नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला आहे. ज्यामध्ये ती फारच गोड दिसते आहे. स्टेजवर उभी राहून ही चिमुकली समोर बसलेल्या पाहुणे मंडळींसमोर अत्यंत आत्मविश्वासाने कविता सादर करते आहे. तिच्या बोबड्या स्वरात तिने सादर केलेली कविता अशी आहे की, (Funny Video) आणल्या बाई पाकुळ्या धरुन, दिले बाई नवऱ्याला तळून.. नवरा गेला पळून.. आता काय करायचं रडून? घ्या बाई दुसरा करुन’. या चिमुकलीच्या कवितेने एका क्षणात संपूर्ण सभागृहात हशा पिकवला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर anotherneha नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘हे मला माझ्या भावंडांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकवलं होतं जे मी शाळेत सादर केलं’. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Funny Video)एका युजरने म्हटलंय, ‘लहानपणीचा आवाज.. किती गोड आहे’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘लहान मुलं अशीच असतात त्यांना जे शिकवलं जातं तेच ते बोलतात करतात, हीच त्यांची निरागसता आहे’.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण की, बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट अंतर्गत म्हणजेच मुंबई बेस्टअंतर्गत (Mumbai Best) विविध जागांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहे. अर्ज करण्याचे अंतिम तारीख 20 मे 2024 आहे. महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियांतर्गत 8 वी आणि 10 वी पास उमेदवार ही अर्ज करु शकतात. त्यामुळेच इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांसाठी त्वरीत अर्ज करावा.
पदाचे नाव
“बस चालक, बस वाहक” या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
शैक्षणिक पात्रता
रिक्त पदासाठी 8 वी आणि 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (RBI Rules) अनेकदा आपण बाजारात जाताना पाकीट तपासत नाही. मग ऐन वस्तू खरेदी करताना आपल्या लक्षात येत की, आपल्याकडे तर पुरेसे पैसे नाहीत. अशावेळी पैसे काढण्यासाठी ATM कार्डचा वापर केला जातो. पण, बऱ्याचदा आपल्या लक्षात आले असेल. एकतर ATM बंद असतात नाहीतर ATM मधले पैसे संपलेले असतात. त्यातूनही नशिबाने एखादं ATM सापडलं जे सुरु आहे, त्यात पैसे देखील आहेत आणि पैसे काढताना जर फाटलेल्या नोटा आल्या तर???
बऱ्याचदा असा प्रसंग घडला तर घाबरायला होतं किंवा नेमकं काय करावं ते सुचत नाही. म्हणूनच अशा प्रसंगांबाबत रिझर्व बँकेने काही नियम जारी केले आहेत. ज्याबाबत तुम्हाला माहिती असायला हवी. ज्यामुळे समजा एखाद्या वेळी ATM मधून मधून फाटकी नोट आली तर तिचे काय करावे? ही नोट कुठे बदलावी आणि त्याबाबत आपले काय अधिकार आहेत? हे माहित असल्याने भीती वाटणार नाही. चला तर याविषयी RBI चे काय नियम (RBI Rules) आहेत याविषयी जाणून घेऊ.
ATM मधून फाटकी नोट आली तर..
समजा तुम्ही ATM मशीनचा वापर केल्यानंतर जर तुम्हाला फाटकी आली तर तुम्ही ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढायला गेले आहात त्याच बँकेला तुम्हाला त्या बदलून देणे गरजेचे आहे. यासाठी एटीएम मधून पैसे काढल्यानंतर फाटकी न निदर्शनास आल्यास लगेच बँकेत जाऊन एक महत्वाचा अर्ज भरा.
(RBI Rules) हा अर्ज भरताना त्यामध्ये पैसे केव्हा काढले त्या दिवसाची तारीख, वेळ आणि एटीएम चे लोकेशन नमूद करा. तसेच या अर्जासोबत पैसे काढल्यानंतर एटीएम मधून मिळालेली स्लिपदेखील जोडा. जर तुम्ही स्लीप घेतली नसेल तर तुम्हाला मिळालेल्या एसएमएसच्या माध्यमातून व्यवहाराचा तपशील सादर करा. या प्रक्रियेनंतर संबंधित बँकेकडून तुम्हाला सर्व नोटा लगेच बदलून दिल्या जातील.
काय सांगतो RBI चा नियम? (RBI Rules)
ATM मध्ये फाटक्या नोटा आल्यास अशा प्रकारच्या नोटा बदलून देण्याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून काही नियमावली सादर केलेली आहे. त्यानुसार ज्या बँकेच्या ATM मध्ये फाटलेल्या नोटा आल्या असतील त्या बँकेने नोटा बदलून देणे बंधनकारक आहे. हा नियम प्रत्येक बँकेला लागू आहे आणि त्यामुळे कोणत्याही बँकेला जुन्या तसेच फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देता येत नाही. बँकांना आपल्या सर्व शाखांमध्ये ही सेवा ग्राहकांना देणे बंधनकारक आहे.
फाटलेल्या नोटा कुठे बदलून देतात?
RBI विभागीय आणि सर्व सरकारी बँकांमध्ये अशा फाटक्या नोटा बदलून दिल्या जातात. (RBI Rules) मात्र, खाजगी बँक असल्यास खाजगी बँकांच्या चेस्ट शाखांमध्येच अशा नोटा बदलून मिळतील. फक्त अशा प्रकारची चेस्ट शाखा रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून अधिकृत केलेली असायला हवी.
बँकेने फाटक्या नोटा बदलून देण्यास नकार दिला तर…
RBI च्या नियमानूसार खरतर कोणतीही बँक तुम्हाला फाटक्या नोटा बदलून देण्यास नकार देणार नाही. मात्र तरीही एखाद्या बँकेने तुम्हाला फाटक्या नोटा बदलून देण्यास नकार दिला तर अशावेळी संबंधित बँकेच्या विरोधात तुम्ही आरबीआयकडे रितसर तक्रार करू शकता. ही तक्रार ऑनलाइन स्वरूपात देखील करता येते. (RBI Rules) अशा तक्रारींवर कारवाई करताना RBI संबंधित बँकेवर १० हजारापर्यंत दंड आकारू शकते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तंत्रज्ञानाच्या सजग उपयोगाने शिक्षण सरळ, सुगम आणि रूचीपूर्ण होते. हे सूत्र लक्षात ठेऊन ध्रुव ग्लोबल स्कूलने बालवाडीपासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत पारंपरिक शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल करत आता नव तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. “स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा तसेच औंध व बाणेर येथे या वर्षापासून ध्रुव बालवाडीचे वर्ग सुरू करीत आहोत”, अशी घोषणा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या (Dhruv Global School) शालेय संचालिका अनिष्का मालपाणी व मालपाणी ग्रुपचे संचालक यशोवर्धन मालपाणी यांनी पत्रकार परिषदेत केली.
अनिष्का मालपाणी म्हणाल्या की, “नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसाठी ओळखल्या जाणार्या मालपाणी ग्रुपच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षणात अनेक आनंददायी बदल केले आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना कल्पकतेने विचार करण्याऐवजी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी घोकंपट्टीवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे शिकविण्याची ही पद्धत बदलल्या नंतर आता त्याला नव तंत्रज्ञानाची वैशिष्टपूर्ण जोड दिली आहे. विद्यार्थ्यांनी स्वयंप्रज्ञेने विचार करावा. आपल्या मूल्यांची जपणूक करीत सखोल ज्ञान संपादन करत ते समाजातील सर्वच क्षेत्रात नेतृत्व करण्यास सज्ज असावे. अशा प्रकारचे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
त्याचबरोबर, “यासाठी मालपाणी ग्रुप ने तज्ज्ञांच्या मदतीने एक आराखडा तयार केला आहे. या नुसार प्रत्येक विद्यार्थी त्याच्या अभ्यासक्रमातील विषयांबरोबर कला, क्रीडा किंवा अन्य आवडीच्या विषयात कशा प्रकारे प्रगती करीत आहे, याची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपशीलवार नोंद ठेवली जाईल. यासाठी तयार केलेल्या या नव्या सॉफ्टवेअरमुळे प्रत्येक विद्यार्थ्याची केवळ विषयावरच नव्हे तर शैक्षणिक संकल्पनानिहाय सखोल माहितीचे विश्लेषण प्राप्त होणार आहे. त्यानुसारच शिक्षकांनी त्याच्या व्यक्तिगत गरजेनुसार शिकवता येईल.” असे अनिष्का मालपाणी यांनी म्हटले.
यानंतर यशोवर्धन मालपाणी यांनी सांगितले की, “ध्रुव ग्लोबल स्कूल भविष्यात नवी शाळा सुरू करण्याबरोबरच नवे विद्यापीठा सुरू करण्याचा विचार करीत आहोत. तसेच येणार्या काळात अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी व अध्ययन-अध्यापन पद्धतीत सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धीसाठी या क्षेत्रात चांगले काम करणार्यांसोबत भागीदारी करण्यासाठी इच्छुक आहोत. स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा या वर्षी सुरू केली आहे. तसेच औंध आणि बाणेर परिसरात या वर्षीपासून ध्रुव तर्फे बालवाडीचे नवीन वर्गही सुरू करीत आहोत.”
त्याचबरोबर, ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, क्रीडा व योगाच्या क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. याची दखल कॅलिफोर्निया, बोस्टनसारख्या जगातील शीर्ष विद्यापीठांनी घेतली आहे. ध्रुव ग्लोबल स्कूल ज्या पद्धतीने शैक्षणिक प्रयोग करीत आहेत त्याचा अनुभव घेण्यासाठी पालकांनी उंड्री व सूस येथील शैक्षणिक संकुलला भेट देण्यासाठी आवाहन केले आहे.” अशी माहिती यशोवर्धन मालपाणी यांनी दिली.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HUF Benefits) नवे आर्थिक वर्ष म्हटले कि, आयटी रिटर्न्स दाखल करणं आलंच. तुम्हीसुद्धा रिटर्न्स भरत असाल तर तुम्हाला माहित असेल की, येत्या ३१ जुलै २०२४ पर्यंतच आयकर विवरणपत्र भरायचे आहे. दरम्यान ITR भरताना प्रत्येक करदात्याचा प्रयत्न असतो की, काही करून टॅक्स वाचवावा. अशातच हिंदू कुटुंबांना आयकर कायद्यात स्वतंत्र सूट देण्यात आल्याचे समजत आहे. ज्याच्या माध्यमातून हिंदू कुटुंब लाखो रुपयांची कर बचत करू शकतील.
न केवळ हिंदू, तर जैन, शीख कुटुंब कायदेशीर मार्गाने पूर्ण वार्षिक उत्पन्न दाखवून HUF अर्थात हिंदू अविभक्त कुटुंबाद्वारे कर वाचवू शकणार आहात. आता HUF म्हणजे नक्की काय? आणि यामुळे कर कसा वाचतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चिंता करू नका. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.
HUF म्हणजे काय? (HUF Benefits)
संपूर्ण देशभरात आयकर कायद्यामध्ये हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी एक वेगळी तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीअंतर्गत कोणतेही हिंदू कुटुंब HUF खाते उघडू शकते. या खात्यातून केले जाणारे व्यवहार आणि होणारी कमाई स्वतंत्र व्यक्तीसाठी असल्याचे मानले जाते. ज्यामुळे HUF करदात्याला – ८०सी, दीर्घकालीन भांडवली नफा किंवा २.५ लाख रुपयांची मूळ सूट असलेल्या कर सवलतींचा लाभ घेता येतो.
कसा लाभ घ्याल?
HUF खात्याचा फायदा हा केवळ हिंदू कुटुंबांना दिला जातो. मात्र हा लाभ कसा घ्यायचा हे आपल्याला माहित हवे. यासाठी हिंदू कुटुंबांना वेगळा पॅन बनवावा लागतो. ज्याद्वारे फायनान्सशी संबंधित सर्व कामे करणे अनिवार्य असते. तसेच HUF अंतर्गत कुटुंबाचा प्रमुख हा कर्ता तर बाकीचे सर्व त्याचे सदस्य मानले जातात. (HUF Benefits) त्यामुळे जन्म किंवा लग्नानंतर दुसरी व्यक्ती कुटुंबात सामील झाल्यास तीला सुद्धा HUF अंतर्गत सदस्य मान्यता मिळते. यानुसार, तुम्ही संपूर्ण एक कुटुंब मिळून १ व्यक्ती म्हणून HUF खात्याअंतर्गत गुंतवणूक करून कर सवलतींचा लाभ घेऊ शकाल.
HUF अंतर्गत अशी मिळेल कर सूट
HUF अंतर्गत केवळ हिंदू कुटुंबांना कर सुटीचा लाभ घेता येतो. यात आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत जीवन विमा, FD, PPF, लहान बचत योजना, गृहकर्ज आणि ELSS मध्ये केलेल्या गुंतवणुकीद्वारे १.५ लाख रुपयांपर्यंत कर सुटीचा दावा करता येतो. (HUF Benefits) तर कलम 80DD अंतर्गत, हिंदू कुटुंबाच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर २५ हजार आणि ज्येष्ठ पालकांच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर ५० हजार रुपयांच्या कर सुटीचा दावा करता येतो. याशिवाय HUF खात्याअंतर्गत घर खरेदी केल्यास त्याच्या व्याजावर कलम 24B अंतर्गत २ लाख रुपयांची कर सूट दिली जाते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शुक्रवारी पुण्यामध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. तसेच, जातीपातीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीकाही केली. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) भरभरून कौतुक केले. याबरोबर, “शरद पवारांसोबत राहूनही अजय पवारांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही” असेही म्हणले.
पुण्यात झालेल्या जाहीर सभेत बोलताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. जातीपातीच्या राजकारणावरून बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना केली आणि राज्यात जातीपातीतेचे राजकारण सुरू झाले. राम गणेश गडकरींच्या पुतळ्यावरून राजकारण झाले, भांडारकर आणि जेम्स लेनच्या मुद्द्यावरून राजकारण झाले. परंतु अजित पवारांनी शरद पवार यांच्याबरोबर राहूनही जातीपातीचे राजकारण केले नाही”
त्याचबरोबर, “आज काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात आहेत. परंतु आज मी फतवा काढतो की, सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांनी भरघोस मतांनी विजयी करावे. आज राम मंदिर उभे राहिले असेल, तर ते फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे. कारसेवकांनी जे काम केले, त्याचे फळ आज बघायला मिळत आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना पुणेकरांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे” असे खुले आवाहन राज ठाकरे यांनी केले.
अजित पवारांची प्रतिक्रीया
दरम्यान, राज ठाकरेंनी केलेल्या याच वक्तव्याचा उल्लेख अजित पवार यांनी बीडच्या सभेमध्ये केला. यावेळी ते म्हणाले की, “कालच राज ठाकरेंनी सभेत जाहीरपणे सांगितले की, अजित पवार जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी कधी जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊनच पुढे जाण्याची माझी भूमिका आहे. शिव-शाहू-फुले आंबेडकरांचे विचार घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो”
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मधून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली कपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतवर BCCI मोठी कारवाई केली आहे. रिषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित (Rishabh Pant Suspended) करण्यात आलं आहे. स्लो ओव्हर रेटमुळे पंतला हि शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे पंत दिल्लीकडून पुढील सामना खेळू शकणार नाही. दिल्लीची पुढील मॅच १२ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध होणार असून संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.
७ मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये सामना झाला होता. या लढतीत दिल्लीला निर्धारीत वेळेत ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत. दिल्लीला निर्धारित २० ओव्हर पूर्ण करण्यासाठी १० मिनिटे अतिरिक्त वेळ लागला. यापूर्वी दिल्लीच्या संघाकडून २ वेळा अशीच चूक झाली होती, आता तिसऱ्यादा धीम्या गतीने ओव्हर टाकल्याबद्दल आयपीएलच्या आचारसंहितेनुसार कर्णधार म्हणून रिषभ पंतवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच पंतला ३० लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. याशिवाय संघातील सर्व खेळाडू इम्पॅक्ट खेळाडूसह सर्वांना प्रत्येकी १२ लाख रुपये किंवा मॅच फ्रीच्या ५० टक्के यातील जी रक्कम कमी असेल तितका दंड करण्यात आला आहे.
पंत आणि संघाला वाचवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने रेफ्रींच्या या निर्णयाविरोधात बीसीसीआय लोकपालाकडे अपील सुद्धा केले होते. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लोकपालने सुनावणी घेतली आणि नंतर मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असल्याचे सांगितले. दिल्लीचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम आहे. प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी दिल्लीला कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन्ही सामने जिंकणं आवश्यक आहे. त्यातच अशा महत्वाच्या वेळी रिषभ पंतला निलंबित (Rishabh Pant Suspended) करण्यात आल्याने दिल्ली कपिटल्स साठी हा जबर धक्का मानला जात आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।साधा सदरा गळ्यात मफलर… विरोधकांवर टीका न करण्याच्या स्वभावाने ते अस्सल मुरलेले राजकारणी वाटत नाहीत पण हा साधा भोळा मराठा चेहरा आपल्या फरडया इंग्रजीनं भल्याभल्यांना घाम फोडू शकतो. होय मी बोलतोय नाशिक लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्याबद्दल… वाजे यांची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि इतर बड्या नेत्यांना डावलून उद्धव ठाकरेंनी खासदारकीसाठी एका सर्वसामान्य मराठा नेतृत्वावर विश्वास टाकला. वाजेंच्या विरोधात आपण सहज निवडून येऊ असा काहीसा एटीट्यूड पहिल्या दिवसापासून महायुतीत पाहायला मिळाला. पण आता याच वाजेंनी जिल्ह्यात अशी काय फील्डिंग लावलीय की, हेमंत गोडसेंच्या नाकावर टिच्चून राजाभाऊ मशाल पेटवणारच! इतका कॉन्फिडन्स त्यांनी ठाकरेंना दिलाय. नाशिक सारख्या बालेकिल्ल्यातून अनेक पर्याय असतानाही राजाभाऊच योग्य पर्याय ठाकरे यांना का वाटले? आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला राजाभाऊ कसा परफेक्ट न्याय देतायत? राजाभाऊंना हलक्यात घेऊन शिंदेंनी कशी मोठी चूक केलीय? तेच सविस्तर पाहणार आहोत…
शिवसेनेत शिंदेंनी बंड केलं… नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेही (Hemant Godse) यात सहभागी झाले… त्यामुळे ठाकरे येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मोहऱ्याला नाशिकमधून उभं करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल असं वातावरण मतदारसंघात अनेक महिन्यांपासून होतं. करंजकरांनी तर निवडणुकीची तयारीही केली होती. “लोकसभा तुलाच लढवायची आहे असा आदेश मला उद्धव साहेबांनी दिलाय” असं म्हणून आपल्या नावाची फक्त औपचारिकताच बाकी असल्याचं वातावरण त्यांनी तयार केलं होतं. पण शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आली आणि त्यात नाशिक मधून उमेदवारी देण्यात आली ती राजाभाऊ वाजे यांना…
करंजकर सक्षम उमेदवार नसल्याचं कारण पुढे करत वाजेंना उमेदवारी देण्यात आली होती. मग उमेदवारी मिळालेल्या राजाभाऊंकडे नेमकं असं काय होतं की ते उमेदवारीच्या स्पर्धेत सर्वात पुढे राहिले? तर याचे उत्तर देता येतं ते म्हणजे साधेपणा आणि निष्ठा. राजाभाऊ वाजे यांची कट्टर आणि कडवे शिवसैनिक अशी ओळख. घरातूनच राजकारणाचे बाळकडू पिलेल्या राजाभाऊंचे आजोबा शंकरराव वाजे हे सिन्नरचे पहिले आमदार तर त्यांच्या आजी रुक्मिणीबाई सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून 1967 साली निवडून आल्या होत्या. राजाभाऊंचे वडील प्रकाश वाजे हे 2009 ला सिन्नर मधून आमदारकी लढले, मात्र यात त्यांचा पराभव झाला. आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदल घेण्यासाठी म्हणूनच राजाभाऊ वाजे यांनी राजकारण करायचं ठरवलं. आणि 2014 ला ते सिन्नरचे आमदार झाले. तेव्हापासून राजाभाऊ वाजे हे कट्टर शिवसैनिक बनले. मातोश्रीचा शब्द हा अंतिम शब्द, ही त्यांच्या राजकारणाची खासियत. राजाभाऊ 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांना डायरेक्ट लोकसभेचे तिकीट देण्यात आल्यानं अनेकांनी ठाकरेंच्या या निर्णयावर शंका घेतली होती. पण ठाकरेंना राजाभाऊ आणि त्यांच्या जिल्ह्यातील ताकदीची कल्पना चांगलीच ठाऊक होती…
त्यांची पहिली ताकद होती ती म्हणजे मराठा प्लस वंजारी असं मतदान खेचून आणण्याची ताकद… राजाभाऊ हे शांत, संयमी मराठा नेतृत्व. मराठा समाजासोबतच जिल्ह्यातील वंजारी समाजाशीही त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. हे जातीचं गणित जोडून बघितलं, तर राजाभाऊ नाशकात उजवे ठरतात. शेती आणि पेट्रोल पंप व्यवसाय सांभाळणाऱ्या राजाभाऊंनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये केलेल्या अनेक सामाजिक आणि विकासाभिमुख कामांनी मतदारांचे प्रेम मिळवलं होतं. जनसेवा मंडळासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल सव्वा कोटीहून अधिकची रक्कम वाजेंनी औषधोपचारासाठी गरजूंना मिळवून दिली होती. अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्यातही त्यांचा पुढाकार होता. साधा सदरा, गळ्यात मफलर असा लुक असल्याने विरोधकांनी त्यांना उमेदवारीनंतर हलक्यात घेतलं होतं. खासदाराला इंग्रजीतून बोलावं लागतं असं म्हणत त्यांच्या अबिलिटी वरच शंका घेण्यात आली होती. त्यावर राजाभाऊंनी खटक्यावर बोट जाग्यावर पलटी या न्यायाने विरोधकांना उत्तर देत चांगलीच अद्दल घडवली होती. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने येऊन इंग्रजीतून चर्चा करावी. मी त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे देईन. अगदी ग्रॅमॅटिकली व शुद्ध इंग्रजी भाषेत मी चर्चा करायला तयार आहे. त्यात थोडी जरी चूक झाली किंवा कोणी शोधली, तर मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही…
राजाभाऊंनी दिलेल्या या आव्हानामुळे विरोधक गपगार पडले आणि राजाभाऊंना नाशिकमध्ये यामुळे मोक्कार पब्लिसिटी मिळून गेली. राजाभाउंचं नाव तर कन्फर्म झालं पण त्यांच्या विरोधात महायुतीकडून कोण निवडणूक लढणार? यावर काही निर्णय होत नव्हता. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना आपलं तिकीट कापले जाणार, याची कल्पना आल्यानं त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीतून छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने त्यांचंच नाव फायनल केलं जाईल, असं बोललं जात होतं. गोडसे आणि भुजबळ यांच्यातील या वादामुळे महायुतीसाठी नाशिकचा तिढा चांगलाच वाढला होता. या मधल्या काळात राजाभाऊंनी आपल्या प्रचाराला चांगली धार लावली होती. राजाभाऊ हे नाव मतदारसंघात तोपर्यंत पोहोचलं देखील होतं. महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यानं विरोधक राजाभाऊंना घाबरलंय… राजाभाऊ वर्सेस हू?… असा प्रचारही ठाकरेंकडून सुरू झाला. जो की त्यांना चांगलाच ऍडव्हान्टेज मिळवून देण्याची शक्यता आहे…
पण महायुतीकडून नाशिकच्या जागेला आणि विशेषतः राजाभाऊंच्या उमेदवारीला हलक्यात घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. दिल्लीची इच्छा असतानाही आपलं नाव फायनल होत नाही, यामुळे थोड्याशा नाराजीनेच भुजबळांनी आपल्या उमेदवारीचा दावा सोडला. त्यानंतर लागलीच हेमंत गोडसेंना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली. पण उमेदवारी मिळवण्यासाठी गोडसेंनी केलेल्या वर्ष बंगल्या बाहेरील शक्ती प्रदर्शनापासून ते जिल्ह्यातील आंदोलनानं स्वतःची एक निगेटिव्ह इमेज बनवून घेतली. त्यात हेमंत गोडसेंवर जिल्ह्यातील भाजपचे आमदार नाराज होते. खासदार आमच्या कार्यक्षेत्रात लुडबुड करतात, कामं होऊन देत नाहीत असा त्यांचा आरोप होता. राष्ट्रवादीची भुजबळ कंपनीही गोडसेंच्या उमेदवारीवर फारशी खुश नाहीये. त्यामुळे उमेदवारी मिळाली… पण प्रचारासाठी आपलाच घोडा आणि आपलाच बैल अशी परिस्थिती सध्या हेमंत गोडसेंवर ओढवलीय… स्वतः मुख्यमंत्र्यांनी नाशकात जाऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण त्यासोबतच गोडसेंना त्यांच्या चुका भर सभेत दाखवून दिल्यानं गोडसे नाशिकच्या लढतीसाठी चांगलेच मायनसमध्ये गेलेत..
म्हणूनच राजाभाऊ विरुद्ध हेमंत गोडसे अशी आपण लढत बघतो तेव्हा राजाभाऊ प्रचारात फार पुढे निघून गेल्याचे सध्या तरी नाशकात दिसून येतय… सिन्नर विधानसभा – इगतपुरी ग्रामीण वरची त्यांची पकड, मराठा चेहरा, स्वच्छ आणि संयमी नेतृत्व, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट, गोडसेंच्या विरोधात असणारे नाराजी आणि या सगळ्याला मिळणारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची जोड हे सगळं एकवार नीट जोडून पाहिलं तर यंदा नाशकात मशाल फिक्स असं बोलायला बराच स्कोप राहतो…त्यामुळे राजाभाऊ यंदा नाशकात खरंच मशाल पेटवणार का? जर असेल तर ते गोडसेंना कितीच्या लीडनं मात देतील? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
शरद पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा एडवांटेज असतानाही अमोल कोल्हेंमुळे (Amol Kolhe) तुतारी धोक्यात आलीय. तर शिवसेनेतून शिंदे गटात आणि उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलेल्या… पक्ष बदलाचा शिक्का पडलेल्या… आढळरावांचं वजन मात्र त्यांना यंदा खासदारकीचा चौकार मारून देणार. होय, आम्ही जे काही बोलतोय त्या कुठल्या हवेतल्या गोष्टी नाहीयेत. तर ही आहे ग्राउंड रियालिटी. अमोल कोल्हे हे नाव मागच्या पाच वर्षांपासून राजकारणात लाईमलाईटमध्ये राहिलं… त्यांची संसदेतील भाषणही गाजली… पण असं असूनही शिरूरच्या जनतेलाच आपला खासदार काही पचनी पडेना झालाय. त्यापेक्षा कोल्हेंच्या आधी तीन टर्म खासदार राहिलेल्या आढळरावांवरचा(Shivajirao Adhalrao Patil) विश्वास मात्र कणाकणाने वाढत चाललाय. शरद पवारांनी उभ्या केलेल्या सर्वच मतदारसंघांमध्ये तुतारी फॉर्ममध्ये असताना शिरूर मध्ये ती कशी धोक्यात आलीय? याला बदलत्या राजकारणासोबतच स्वतः अमोल कोल्हे कसे जबाबदार आहेत? आढळराव यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटी उड्या घेतल्या तरी त्यांच्या जिंकण्याचे चान्सेस जास्त का आहेत. हेच थोडंसं साध्या सोप्या भाषेत सांगतोय…
तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत महाराष्ट्रात दोनच ठिकाणी होतेय. पहिली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत. आणि दुसरी बारामतीलाच लागून असणाऱ्या शिरूरमध्ये… बारामतीचा निकाल सात तारखेलाच ईव्हीएममध्ये बंद झालाय. त्यामुळे आता लक्ष लागलंय ते म्हणजे शिरूर मध्ये काय होणार? बारामतीच्या सगळ्या प्रचाराचा फोर्स शिरूरकडे शिफ्ट झालाय. अजित दादा, शरद पवार यांनी एकामागून एक शिरूर मध्ये सभांचा धडाका लावलाय. पण मागच्या दहा दिवसांपासून वारं हे तुतारीच्या विरोधात फिरलंय…
आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे कोल्हेंचा शिरूरमधला कमी जनसंपर्क…
अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून पुन्हा तिकीट देण्यात आलं. त्यांचा प्रचारही सुरू झाला. पण काही गोष्टी सारख्या कानावर पडत होत्या. खासदार साहेब, 2019 पासून आमच्याकडे फिरकलेच नाहीत… आमच्या गावात पायच ठेवला नाही… अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले. तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं? असा थेट प्रश्न कोल्हेंना विचारण्याची धमक गावकऱ्यांनी दाखवली? यावरून एक चित्र स्पष्ट दिसतं ते म्हणजे शिरूरमध्ये अमोल कोल्हेंचा कमी जनसंपर्क होता. विरोधकांनीही हीच लाईन मोठी करत कोल्हेंना प्रचारातून चांगलंच झोडलंय. हा माणूस कधी मतदारसंघात फिरकत नाही, विकास काम करत नाही, याला फक्त अभिनय क्षेत्राची आवड आहे. पण आता आम्हाला अभिनेता नकोय नेता हवाय…अशा भाषेत ते कोल्हेंना बॅकफुटला टाकतायत. याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हेंकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत विकासकामं सोडली तर इतर कोणतीही काम त्यांना सांगता येत नाही. थोडक्यात हुशार खासदार असूनही निष्क्रियतेचा ठपका त्यांच्यावर बसलाय. त्यामुळेच शिरूरमध्ये तुतारी धोक्यात आलीय.
दुसरं कारण ठरतं ते म्हणजे अमोल कोल्हेंची धरसोड प्रवृत्ती.
खासदार झाल्यानंतर काही दिवसातच कोल्हे आपल्याकडे येऊन मला राजीनामा द्यायचा आहे, असं म्हणाले होते. अभिनय क्षेत्राला वेळ देता येत नाही याचं कारण पुढे करून ते राजकारणातून संन्यास घेणार होते, असा किस्सा सांगून अजितदादांनी नवा बॉम्ब फोडला. त्यानंतर मधल्या काळात कोल्हेंचं पक्षाच्या सभांना, महत्त्वाच्या मीटिंगांना दांडी मारणं, मतदार संघातून महिनोमहिने गायब असणं आणि तितक्यातच भाजपच्या जवळ जाणं या सगळ्या गोंधळामुळे त्यांच्याविषयी मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या तारखाही समोर येऊ लागल्या… पण खूप दिवसांच्या मौनानंतर त्यांनी आपण राष्ट्रवादीतच कायम राहणार असल्याचं ठणकावून सांगितलं. पुढे अजितदादांनी बंड केलं तेव्हा त्यांच्या शपथविधीला कोल्हेही हजर होते. पण नंतर मात्र त्यांनी यु टर्न घेत आपल्याला याची काही कल्पना नव्हती, असं कव्हर करून शरद पवार गटाचा रस्ता धरला. या सगळ्या आधीचा शिवसेनेतला त्यांचा राजकीय वावर आपल्याला माहित आहेच. थोडक्यात काय तर अमोल कोल्हे मागच्या पाच वर्षात अनेक दगडांवर पाय ठेवताना दिसले. त्यांची कोणतीही एक ठाम भूमिका नसल्याने या सगळ्यात मतदार संघातील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या यांना हरताळ फासलं गेलं. अजित पवार कोल्हेंच्या अशा अनेक खासगी गोष्टी पब्लिकली सांगून तुतारीला डॅमेज करतायत. आणि हीच गोष्ट कोल्हेंना विजयापासून लांब घेऊन चाललीय…
तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे अमोल कोल्हेंची कमी झालेली क्रेझ…
अमोल कोल्हे जेव्हा निवडणुकीला उभे राहिले होते. तेव्हा त्यांची स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका घराघरात पोहोचली होती. त्यातील कोल्हेंनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिकेनं अमोल कोल्हे या नावाची क्रेझ होती. त्यामुळेच मोदी लाट असताना, सलग तीन टर्म निवडून जाण्याचा अनुभव असताना आणि तळागाळाशी चांगला कनेक्ट असताना देखील आढळराव निवडणूक हरले.. आणि कोल्हेंची सरशी झाली… या सगळ्यात दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांनी कोल्हे निवडून यावेत यासाठी केलेल्या प्रयत्नांचा मोठा वाटा राहिला होता. मात्र 2024 ला परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीचे दोन गट पडलेत. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील कोल्हेंचे विरोधक आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल्हे यांच्या अभिनयाची क्रेझ पूर्णतः मावळलेली आहे. त्यामुळे शरद पवारांविषयी असणारी सहानुभूतीची लाट आणि आपल्या कारकिर्दीत केलेली काम एवढंच काय कोल्हेंच्या हाताशी राहत. मात्र याच्या जीवावर आपली सारी यंत्रणा कामाला लावलेल्या आढळरावांचा पराभव करणे कोल्हेंना सध्या तरी अशक्य वाटतंय. त्यामुळेच शिरूरमध्ये तुतारी धोक्यात आलीये, हे ठामपणे बोलायला स्कोप उरतो.
दुसऱ्या बाजूला निवडणूक हरले असले तरी आढळरावांनी तळागाळातील आपला शेवटचा कनेक्ट कमी होऊ दिला नाही. मतदारसंघातील सामाजिक कामं आणि कार्यकर्त्यांची ॲक्टिव्ह यंत्रणा हे आढळरावांचं राजकारण प्लसमध्ये घेऊन जाणारच होतं. पण त्यासोबतच आता याला घड्याळाची जोड मिळाल्याने आढळराव चौथ्यांदा दिल्लीत जातील याचे चान्से जास्त आहेत. हे सगळं विश्लेषण पाहता शिरूरमध्ये सहानुभूतीच्या लाटेचा इफेक्ट होऊन तुतारी वाजणार की आढळरावांच्या बेरजेच्या राजकारणाला यश येऊन ते खासदारकीचा चौकार मारणार? तुम्हाला काय वाटतं? शिरूरचा पुढचा खासदार म्हणून तुम्हाला कुणाला पाहायला आवडेल? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.