पाकिस्तानी अभिनेत्याचं शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट ; म्हणाला की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केला. त्यांच्या या विधानावर देशभरातुन त्यांच्यावर सडकून टीका झाली. अशा परिस्थितीत आज पाकिस्तानच्या एका अभिनेत्याने भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केलं आहे

“भारतात शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा मनापासून पाठिंबा आहे. तसेच मला भारतातील शेतकऱ्यांबद्दल नितांत आदर आहे”, असे ट्विट पाकिस्तानी अभिनेता हामझा अली अब्बासी याने केले आहे.

आंदोलनामागे पाकिस्तान, चीनचा हात – रावसाहेब दानवे

सध्या सुरू असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment