महाराष्ट्रातील 11 कोटी जनता शिवरायांची वंशज – संजय राऊत

  टीम हॅलो महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. महाराष्ट्रातील 11कोटी जनता शिवाजी महाराजांची वंशज आहे, असे परखड मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संजय राऊत म्हणाले,  कोणी कोणत्या घराण्यात जन्माला आल्यामुळे महाराष्ट्रातील इतर श्रध्दास्थानाविषयी बोलण्याचा अधिकार त्यांना नाही.  तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही. सामान्य … Read more

उत्पन्न वाढविण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत, दारूबंदीशी तडजोड नको – डॉ. अभय बंग यांचं अजित पवारांना आवाहन

दारुबंदीमुळे महसूल कमी होत असल्याचं बोललं जातं असताना अभय बंग यांनी उत्पन्न वाढवण्याचे मार्ग दारूविक्रीपेक्षा वेगळे असू शकतात हे सांगितलं आहे.

संजय राऊतांविरोधात भाजप आमदार राम कदमांची पोलिसांत तक्रार

मुंबई | भाजप आमदार राम कदम शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे समजत आहे. राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवा असं म्हणुन चॅलेंज दिले आहे. याविरोधात भाजप आता आक्रमक झाली असून राम कदम राऊतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी … Read more

महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ करमुक्त करा! फडणवीसांनी केली मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, “तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्यात त्यासाठी हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा यासाठी तो करमुक्त करण्यात यावा.”

‘छत्रपतींच्या घराण्यात जन्म घेतल्याचा राऊतांना काय पुरावा हवाय हे त्यांनीच सांगावं?- शिवेंद्रराजे भोसले

आम्ही छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव” असं शिवेंद्रराजे म्हणाले.

कलम ३७० हटवणं हे ऐतिहासिक पाऊल – लष्करप्रमुख नरवणे

भारताचे नवनिर्वाचित लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी काश्मीरमधील कलाम ३७० हटवण्यावरून आज पहिल्यांदाच भाष्य केलं. कलम ३७० रद्द करणे हे एक ऐतिहासिक पाऊल असून, त्यामुळे जम्मू-काश्मीर संपूर्ण भारताशी जोडले जाणार आहे असं नरवणे पुढे म्हणाले. आर्मी दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहिदांप्रती श्रद्धांजली ही व्यक्त केली.

मोठी बातमी : युरिया अनुदानाची रक्कम सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवणार, सुरु होणार ‘ही’ नवीन योजना

नवी दिल्ली : युरियाच्या किंमतीवरील नियंत्रण काढून टाकण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सरकार युरियाच्या किंमतींवर नियंत्रण ठेवू शकते. यूरियावरील सरकारी नियंत्रण काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार खत-सबसिडी सिस्टम लागू करू शकते. सरकारी नियंत्रण हटवल्यानंतर युरियाचे दर प्रति बॅग 400 ते 445 रुपयांपर्यंत वाढतील. सध्या एका पोत्याच्या युरियाची किंमत 242 रुपये आहे. सध्या अनुदानाची … Read more

शिवसेनेने घातले कर्नाटक सरकारचे श्राद्ध; कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा केला निषेध

कोल्हापूर : निपाणीच्या मराठी साहित्य संमेलनाला कर्नाटक पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे मराठी भाषिक व साहित्यीकांच्या विषयी कर्नाटक पोलीस दडपशाही करत आहे. ती दडपशाही कदापिही चालू देणार नाही, असा इशारा देत कर्नाटक सरकारचे श्राद्ध घालून शिवसेनेने निषेध केला. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीच्या पात्राजवळ आंदोलन झाले. या आंदोलनावेळी कायदा … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील शिवाजी महाराज; भाजपच्या माजी आमदाराकडून वादग्रस्त पुस्तकाचे समर्थन

कोल्हापूर, हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी, सतेज औंधकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि अशी तुलना करणे काही गैर नसल्याचे इचलकरंजीचे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी म्हंटले आहे. भाजपचा कार्यकर्ता या नात्याने मी या लेखकाचं समर्थन करतो. हा शिवाजी महाराज यांचा सन्मान आहे, असे म्हणत त्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र … Read more

मला जाणता राजा म्हणा असे मी म्हणालो नाही; शरद पवारांचे उदयनराजेंना प्रत्युत्तर

सातारा : मला जाणता राजा म्हणा असे मी कधी म्हणालो नाही, असे म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. साताऱ्या जिल्ह्यातील खटाव-माण अॅग्रो प्रायव्हेट लि. या साखर कारखान्याच्या दोन लाख एकावन्न हजार साखर पोत्याच्या पूजन प्रसंगी ते बोलत होते. जाणता राजा हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. त्यांच्याशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. सो कोल्ड … Read more