सरकारने आता एकतरी काम पारदर्शकपणे करून दाखवावे; बच्चू कडूंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून राज्य सरकारवर भाजपकडून अनेकवेळा निशाणा साधण्यात आला आहे. यावरून आता शाळेय शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. “आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळ होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकारनं किमान एक तरी पारदर्शक काम करावे,” असे कडू यांनी म्हंटले आहे.

बच्चू कडू यांनी अमरावती येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, आरोग्य विभागाच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्याची मागणी केली आहे. आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मागील वेळी परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तर आता 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेतही गोंधळ उडाला आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळामुळे विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागलेले आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरीही न्यासा कंपनीला पुन्हा परीक्षेचं काम दिल्याची खंत आहे. ज्या कंपनीने घोळ केला तरी त्यांना काम द्यायचं कारण काय? त्याबाबत सरकारने उत्तर द्यावे, असेही बच्चू कडू यांनी यावेळी म्हंटले आहे.

Leave a Comment