भाजप धोकादायक पक्ष, उत्तरप्रदेश निवडणूकीपूर्वी हिंदू नेत्याची हत्या होऊ शकते; राकेश टीकैत यांचा खळबळजनक आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर टीका केली आहे. भाजप हा अत्यंत धोकादायक पक्ष असून उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पूर्वी एखाद्या हिंदूंची हत्या देखील होऊ शकते असा खळबळजनक आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

जेव्हा उत्तर प्रदेशात निवडणुका होतील तेव्हा ते निवडणुक जिंकण्यासाठी एका मोठ्या हिंदू नेत्याला मारण्याचा कट रचतील. हिंदू-मुस्लिम संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करतील. त्यांना हिंदू-मुस्लिमांमध्ये संघर्ष निर्माण करून, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील हिंदू नेत्यांना मारून निवडणुका जिंकायच्या आहेत. भाजप हा आजपर्यंतचा सर्वात धोकादायक पक्ष आहे अस टीकैत यांनी म्हंटल.

ज्या लोकांनी भाजपाची निर्मिती केली, आज त्याच नेत्यांनाही घरात कैद करून ठेवण्यात आलं आहे. देशावर सरकारी तालिबानींचा कब्जा आहे. ज्या SDM ने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्यांचे चुलते RSS मध्ये मोठ्या पदावर आहे. हे आम्हाला खालिस्तानी म्हणत असतील तर आम्ही यांना तालिबानी म्हणू” असं ही टिकैत म्हणाले.

Leave a Comment