‘या’ राज्यातील गहू व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकेल रशिया-युक्रेन युद्ध, जाणून घ्या कसे?

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने बहुतेक लोकांसाठी अडचण वाढविली आहे, मात्र हे युद्ध काही जणांसाठी चांगले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. सर्वात मोठे संकट सर्वसामान्यांवर आले आहे, कारण कच्च्या तेलाच्या महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर झपाट्याने वाढण्याच्या तयारीत आहेत. मात्र पंजाबच्या गहू व्यापाऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरू शकते.

पंजाबच्या गव्हाच्या व्यापाऱ्यांना यावेळी फायदा मिळण्याची आशा आहे. खरं तर, रशिया आणि युक्रेन जगातील 40 टक्के गव्हाचा पुरवठा करतात. अशा स्थितीत युद्ध लांबले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या गव्हाची मागणी वाढेल, त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना चांगला भाव मिळेल, असे पंजाबमधील व्यापाऱ्यांना वाटते.

2019 मध्ये रशिया हा सर्वात मोठा गहू निर्यातक होता
2019 च्या आकडेवारीनुसार, रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू निर्यात करणारा देश होता. त्याचवेळी युद्धग्रस्त युक्रेन या बाबतीत पाचव्या क्रमांकावर होते. एका न्यूज चॅनेलच्या रिपोर्टनुसार, हे दोन देश जगातील 40 टक्के गव्हाची निर्यात करतात. व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की, जर युद्ध आणखी चिघळले तर दोन्ही देशांतील गव्हाच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकेल. अशा स्थितीत भारत गव्हाचा मोठा निर्यातदार होऊ शकतो.

युद्धानंतर भारताच्या गव्हाची मागणी वाढू शकते
जर आपण भारताबद्दल बोललो तर पंजाबमध्ये चांगल्या दर्जाचे गव्हाचे उत्पादन होते, मात्र त्याची निर्यात केवळ श्रीलंका आणि बांगलादेशपर्यंतच मर्यादित आहे. भारतातही मोठ्या कंपन्या देखील रशिया आणि युक्रेनच्या गव्हावर लक्ष ठेवतात, मात्र या युद्धानंतर भारताच्या गव्हाची मागणी वाढू शकते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आशियातील सर्वात मोठा धान्य बाजार पंजाबमधील खन्ना शहरात आहे, मात्र काही काळापासून ते ओसाड पडले आहे. फार कमी खरेदीदार येथे येत आहेत. मात्र आजकाल येथील शेतकरी आणि व्यापारी रशिया-युक्रेन युद्धाकडे टक लावून पाहत आहेत.

200 लाख टन गव्हाचा साठा असेल
खन्ना शहरातील गहू व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरबंस सिंग रोशा यांनी एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले की, युद्धामुळे आम्ही खूप अडचणीत सापडलो आहोत. कांडला बंदरात जाणारा बहुतांश गहू सहारनपूर आणि मध्य प्रदेशातून येतो. पंजाबमध्ये चांगल्या प्रतीचा गहू असूनही त्याला खरेदीदार नाही.

ते म्हणाले की,”MSP खूपच कमी आहे. आमच्याकडे अजूनही ४0 लाख टन गव्हाचा साठा पडून आहे. कापणीनंतर, तो 200 लाख टन होईल, मात्र रशिया-युक्रेन युद्धाने आम्हाला थोडी आशा दिली आहे.” सूत्रांनी सांगितले की, मोठे खरेदीदार अदानी आणि आयटीसीने व्यापाऱ्यांशी बोलणे सुरू केले आहे.

पंजाबच्या नव्या सरकारकडून अपेक्षा
शेतकऱ्यांची राजकीय संघटना युनायटेड समाज मोर्चा (SSM) चे अध्यक्ष बलबीर सिंग राजेवाल म्हणाले की” होय, हे खरे आहे की हे युद्ध व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते मात्र शेतकऱ्यांसाठी नाही. MSP चा चांगला दर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला आशा आहे की, पंजाबच्या नवीन सरकारला हे समजेल.

व्यापारी निवडणुकीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत
10 मार्च रोजी जाहीर होणार्‍या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालाची खन्ना येथील व्यापारी आतुरतेने वाट पाहत आहेत. आम आदमी पार्टी (आप) सत्ताधारी काँग्रेसची हकालपट्टी करू शकते, असे संकेत एक्झिट पोलने दिले आहेत. अशा स्थितीत नव्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली मागणी लावून धरण्याचा घाट व्यापाऱ्यांनी आखला आहे. रोशा म्हणाल्या की,” गुजरात, यूपी आणि मध्य प्रदेशातील गहू स्वस्त आहे कारण तेथे कमी टॅक्स आहे. आम्हाला आशा आहे की, नवीन मुख्यमंत्री करात कपात करतील जेणेकरून खाजगी व्यापारी स्पर्धात्मक दराने विक्री करू शकतील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here