‘अच्छे दिन’चा ऊर्जावान नारा देऊनही आज देशभरात गरिबी व भिकारीच; संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

0
22
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातील रोखठोक सदरातून देशातील गरीबी आणि भिकारी यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला फटकारले आहे. देशात गेल्या 50 वर्षांत गरिबी हटली नाही तर 7 वर्षात अच्छे दिन देखील आले नाहीत अस म्हणत त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला.

हिंदुस्थानसारख्या देशात गरिबी आणि भिकारयांची पैदाइश का होत आहे? गेल्या पन्नास वर्षांपासून प्रत्येक सरकार गरिबी हटावांचे नारे देत निवडणुका लढवीत आहे. मोदी यांनी तर गरिबी निर्मुलनासाठी प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यात 15 लाख टाकून घराघरांत सोन्याचा धूर काढण्याचीच घोषणा केली होती. ‘गरिबी हटावांची खिल्ली उडवत ‘अच्छे दिन आयेगे’ चा ऊर्जावान नारा देऊनही आज देशभरात गरिबी व भिकारी आहेत असे राऊतांनी म्हंटल.

देशात भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे व हा एक सामाजिक विषय म्हणून पाहायला हवा. आपल्या देशात भिकाऱ्यांची नक्की संख्या किती? मार्च 2021 च्या सरकारी आकडेवारीनुसार देशात भिकाऱ्यांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. म्हणजे नक्की किती? हा गोंधळच आहे.

एकेकाळचा धनाढ्य विजय मल्ल्या यास कोर्टाने दिवाळखोर जाहीर केले. म्हणून तोसुद्धा कंगाल आणि भिकारीच झाला. मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांच्या बाबतीत तेच म्हणायला हवे. देशात श्रीमंत भिकाऱ्यांचीच संख्या वाढते आहे. हजारो कोटींची सरकारी कर्जे बुडवून हे श्रीमंत स्वतःस दिवाळखोर म्हणून जाहीर करतात व पुन्हा त्याच श्रीमंती तोऱ्यात जगतात. या भिकाऱ्यांचे काय करायचे? हा प्रश्नच आहे. आपल्या सर्वच धार्मिक स्थळी काय दिसते? गरीब प्रार्थनास्थळांबाहेर भीक मागतो आणि श्रीमंत आत उभा राहून भीक मागत असतो, पण देव श्रीमंत भिकाऱ्यांनाच प्रसन्न होतो! असे संजय राऊत यांनी म्हंटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here