सरकार पडलं तर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?? पवार म्हणतात….

Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्या नंतर राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जर सरकार कोसळलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाशी संपर्क साधणार का? असा सवाल केला असता पवारांनी थेट त्या प्रश्नवरच आक्षेप घेतला.

शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर भाष्य केले. याचवेळी जर राज्यातील सरकार कोसळले तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का असा सवाल पत्रकारांनी केला असता पवारांनी संताप व्यक्त केला. किमान सेन्सिबल प्रश्न तरी विचारा अस म्हणत सरकार आजही ठाम आहे आणि यापुढेही राहिल असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल 25 आमदार गुजरात मध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे सरकार साठी हा मोठा धक्का मानला जात असून राज्यात राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने चर्चाना उधाण आले आहे.