अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करून फाळणीच्या वेदना कमी कराव्या; राऊतांचा भाजपला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदींनी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी करून या वेदना कमी केल्या. भाजपचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न होते. त्यांनी हे स्वप्न पूर्ण करून फाळणीच्या वेदना कमी कराव्यात, असे म्हणत राऊतांना टोला लगावलेला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपला टोला लगावला. यावेळी राऊत म्हणाले की, “भारत-पाक फाळणीच्या वेदना अनुभवलेले आज देशात मोजकेच लोक आहेत. त्यावर अनेक चित्रपट, पुस्तके निघाली. अशात पंतप्रधान म्हणतात की, 14 ऑगस्ट वेदनेचा दिवस आहे व ही वेदना सदैव आम्हाला आहे. फाळणीची वेदना इंदिरा गांधी यांनी थोडी फार कमी केली. पाकिस्तानची फाळणी करून त्यांनी ही वेदना कमी केली. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून दाखवून दिले,” असा टोला राऊत यांनी लगावला.

राऊतांनी आता भाजपवर निशाणा निशाणा साधत भारत-पाकिस्तान यांच्या फाळणीवरून टीका केली आहे. तसेच फाळणीबाबत राऊतांनी जुने संदर्भ देत उदाहरणेही सांगितलेली आहेत. आता राऊतांच्या या टीकेला भाजपकडून काय प्रतिक्रिया दिल्या जाणार हे पाहावे लागेल.

Leave a Comment