ईडीच्या कारवाईला घाबरून राणे पिता-पुत्रांनी भाजपाचे पाय पकडले; राऊतांचा हल्लाबोल

0
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवनावरून भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपमधील नेत्यांनाही टार्गेट केले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे व नितेश राणे यांच्यावर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. “ईडीच्या कारवाईला घाबरून नारायण राणे, नितेश राणे यांनी भाजपाचे पाय पकडले. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये जे काही आहे ते आधी शोधावं आणि मग शिवसेनेवर टीका करावी,” अशा शब्दात खासदार राऊत यांनी राणे पिता-पुत्रांवर टीका केली आहे.

शिवसेना भवनावरून रविवारी भाजप नेते व शिवसेना नेत्यांमध्ये वादावादीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपच्या प्रसाद लाड, नितेश राणे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी राऊत यांनी टीका करताना म्हंटले आहे की, हे भांडगे लोक आता खूप भुंकायला लागलेले आहेत. या भुंकणाऱ्या लोकांचे तोंड बंद करायला शिवसेनेला फारसा वेळ लागणार नाही. परंतु भाजपा नेत्यांनी त्यांची तोंडे बंद केली तर तर भविष्यकाळ आहे अन्यथा या भांडग्यांच्या संगे भाजपा सुद्धा संपून जाईल.

यावेळी भाजपच्या नेत्यांवर टीका करताना खासदार राऊत यांनी म्हंटले आहे की, ” नारायण राणे व नितेश राणे यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्ही भाजपाचे पाय पकडले आहेत. त्यामुळेच त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही आहे ते आधी शोधावे आणि मग शिवसेनेवर टीका करावी. तुमची ओळखच शिवसेनेतून निर्माण झालेली आहे, त्या शिवसेनेवर टीका करत असताना तुमची जीभ हसडण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. हे तुम्ही लक्षात घ्यावे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here