….तर 30 वर्षांनंतर तुमच्या मुलींनाही हिजाब घालावा लागेल- अनिल बोंडे

0
73
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते अनिल बोंडे यांनी हिजाब प्रकरणावरून अजून 1 विधान केलं आहे. परिस्थिती अशीच राहिली आणि असेच जर आपण हातावर हात देऊन बसलो तर 30 वर्षानंतर तुमच्या मुलींनाही इतर देशाप्रमाणे हिजाब, बुरखा घालावा लागेल, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. अनिल बोंडे मोर्शी येथे बोलत होते.

अनिल बोंडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा वाचला. तुळजापूरची भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी वाचली.अयोध्या, मथुरा व काशी विश्वनाथ येथे चित्र वेगळे आहे. कारण जिथं शिवाजी महाराज नव्हते, तिथं मंदिराच्या बाजूला मशीद तयार झाली.

अमरावती शहरात 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेमध्ये आम्ही होतो आणि आमच्या तरुणांनी समर्थपणे ताकद दाखवली. छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण म्हणतो. कोणी कमी आवाजात म्हणतो, कोणी मोठ्या आवाजात म्हणतो. पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पंढरपूरचा विठोबा आणि तुळजापूरची भवानी वाचली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here