नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसचा परिणाम महागाईवर तसेच देशातील बेरोजगारीच्या दरावरही (Unemployment rate) दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील बेरोजगारीचा दर वाढत आहे (Unemployment rate rises in May). 16 मे रोजी देशातील बेरोजगारीचा दर 14.5 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या एका वर्षातील ही सर्वोच्च पातळी आहे. या आठवड्यात बेरोजगारीचा दर 49 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, CMIE ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 16 मे रोजी संपलेल्या आठवड्यात ग्रामीण बेरोजगारीचा दर वाढून 14.34 टक्के झाला आहे. तर मागील महिन्यात ती 7.29 टक्क्यांवर पोहोचली आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन लादल्यानंतर एप्रिलमध्ये 75 लाखाहून अधिक लोकांनी आपल्या नोकर्या गमावल्या आहेत.
ग्रामीण भागातही हा दर झपाट्याने वाढत आहे
शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे, पण आता ग्रामीण भागातही त्याची गती वाढली आहे. ग्रामीण भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर 100 टक्क्यांनी वाढून 17.51 टक्के झाला आहे.
CMIE चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश व्यास म्हणाले की,”येत्या काळात रोजगार आघाडीवर ही परिस्थिती आव्हानात्मक राहील.” ते म्हणाले,”मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात आम्ही 75 लाख रोजगार गमावला. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.”
एप्रिलमध्ये बेरोजगारीचे दर काय होता ?
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय बेरोजगारीचा दर 7.97 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागात 9.78 टक्के, तर ग्रामीण बेरोजगारीचा दर 7.13 टक्के होता. यापूर्वी मार्च महिन्यात राष्ट्रीय बेरोजगारीचा दर 6.50 टक्के होता. ग्रामीण आणि शहरी भागातही हा दर तुलनेने कमी होता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा




