नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलो आहे – प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर । मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पंढरपुरात आंदोलन केलं जात आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पोहोचले असून यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराकडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. पंढरपुराला छावणीचं स्वरुप आलं आहे. पण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे.  दरम्यान,  लोकांकडून बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला गेला. याबाबत प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता. आपण नियम मोडण्यासाठीच आलो असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

“मंदिरं खुली करा अशी लोकांची भावना आहे. लोकच शासनाला दाखून देत आहेत. हे पाहून सरकारने आपली भूमिका बदलावी,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. मंदिरात प्रवेश दिला नाही तर जे काही करायचं ते करु असं म्हणाले. गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे असं सांगितलं असता लोक जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही हेच आम्हाला दाखवायचं आहे असं त्यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर यांनी आपण मंदिरात प्रवेश करण्यावर ठाम असून स्वत: मंदिरात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं.

कोरोनाची भीती लोकांच्या मनातुन घालवायची आहे. सरकारकडून अजून कोणीही माझ्याशी बोललेलं नाही. दारू, दुकान, एसटी असं सगळं सुरू केलं. मोबाईलच्या माध्यमातून कोरोनाची भीती पसरवली जात आहे. लोकांच्या भावना असलेली धार्मिक स्थळ सुरू करावी. सरकारने अंत पाहू नये, आजची परिस्थिती बघून सरकार लवकर निर्णय घेईल असं वाटतं. माझ्या प्रत्येक आंदोलनाला यशच आलं आहे. त्यामुळे मंदिर लवकरच खुली होतील, दुसरं काही करायची गरज पडणार नाही. असं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आणि आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच आंदोलकांनी अंतर ठेऊन उभे राहण्याचं आवाहन देखील आंदोलकांना केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment