उदय सामंत, केसरकर आयत्या बिळावरील नागोबा; राऊतांची टीका

0
57
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जे आमदार खरेदी विक्रीच्या बाजारत विकले गेले त्याची आम्हांला अजिबात चिंता नाही अस म्हणत उदय सामंत आणि दीपक केसरकर हे आयत्या बिळावरील नागोबा आहेत अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचाच राहील. उदय सामंत आणि म्हणजे आयत्या बिळातील नागोबा म्हणावे लागेल. त्यांना शिवसेनेत आहे असे म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. उदय सामंत यांनी शिवसेना वाढविली नाही तर शिवसेनेने उदय सामंत यांना वाढविले असेही विनायक राऊत यांनी म्हंटल.

शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिले आणि तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपसोबत गेला आणि आता शिवसेना विकायला काढताय, तुम्हांला जनाची नाही तर mnachi तरी लाज वाटायला हवी अशा शब्दांत विनायक राऊत यांनी केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. तसेच जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना 100 जागा नक्कीच जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here