हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी भेट दिली. शुक्रवारी केलेल्या दौऱ्यानंतर उस्मानाबाद येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईच इशारा दिला. शेतकऱ्यांनाजे पीक कर्जाचे वाटप केले जाते. त्या पीक कर्ज वाटपाबाबत अधिकाऱ्यांनी जर काही दुजाभाव केला तर त्यांची जि केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.
राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती वाढत आहे. या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे आरोगयमंत्री डॉ. राजेश टोपे जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांच्या बैठकही घेत आहेत. या बैठकांतून खरीप हंगामाबाबत तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत चर्चाही करीत आहेत. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उस्मानाबाद येथे खरीप हंगामाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना कारवाईचा इशाराही दिला.
अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी 15 जुलैपर्यंत पीककर्ज शून्य टक्के व्याजाने उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत पीक कर्ज वाटप करताना जो अधिकारी हयगय करेल त्याची जि केली जाणार नाही. त्याच्यावर कडक स्वरूपाची कारवाई केली जाईल. त्यामुळे अधिकार्यांनीही आपले काम योग्य रीतीने करावे.