सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन का मिळत होती? नाना पटोलेंचा विरोधकांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सावरकरांना इंग्रजांकडून ६० रुपये पेन्शन मिळायची असा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर भाजपनं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. यांनतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या दाव्याचे समर्थन करत सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन का मिळत होती हे आधी स्पष्ट करावे असं आव्हान विरोधकांना दिले आहे.

राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर टीका करणाऱ्यांनी सावरकरांना ब्रिटिशांकडून ६० रुपये पेन्शन का मिळत होते, हे आधी स्पष्ट करावे. आमच्या पक्षाला वैचारिक चर्चा हवी आहे आणि आम्हाला लोकांना एकत्र आणायचे आहे. भारत जोडो यात्रेला जनतेचं चांगलं समर्थन मिळत असून काँग्रेस अहिंसेवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे असेही नाना पटोले यांनी म्हंटल.

राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल नेमकं काय म्हंटल-

सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे असे एकामागून एक सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केले. येव्हडच नव्हे तर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेली चिट्ठीही त्यांनी वाचून दाखवली त्यांनतर राज्यातील भाजपसह मनसेने देखील राहुल गांधींचा निषेध नोंदवला होता