कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सर्व गाड्या पुन्हा रद्द केल्या जातील का? रेल्वेचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग पसरू लागला आहे. कोरोना (Covid 19) ची वाढती प्रकरणें लक्षात घेता राज्य सरकारांनी वाढती निर्बंधं सुरू केली आहेत. अनेक राज्यात नाईट कर्फ्यू देखील लागू करण्यात आला आहे. काही शहरांमध्ये पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे तर काहींमध्ये शनिवार आणि रविवार यां दिवशी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये भारतीय रेल्वेने मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान तेजस एक्स्प्रेसचे कामकाज एका महिन्यासाठी थांबवले आहे. अशा परिस्थितीत देशात पुन्हा गाड्यांचे शटडाऊन सुरू होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

रेल्वे स्थानकांबाबत रेल्वेने ‘हे’ निवेदन दिले
या संदर्भात भारतीय रेल्वेकडून नुकतेच निवेदन आले आहे. रेल्वे बोर्डाने शुक्रवारी एक निवेदन जारी करुन स्पष्ट केले की,” भारतीय रेल्वेची गाड्या थांबवण्याची किंवा बंदी घालण्याची कोणतीही योजना नाही.”

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा म्हणाले की,”ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी गाड्यांची कमतरता भासणार नाही. मला सर्वांना खात्री द्यायची आहे की, मागणीनुसार गाड्या चालवल्या जातील. या महिन्यांत रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची संख्या सामान्य असल्याचे दिसून आली, मात्र आम्ही आवश्यकतेनुसार गाड्यांची संख्या वाढवू.”

ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी कोणत्याही निगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता नाही
शर्मा यांनी प्रसारमाध्यमांचे ते रिपोर्टही फेटाळून लावले आहेत कि, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता कि, यापुढे रेल्वेने प्रवास करताना कोविड निगेटिव्ह रिपोर्ट यावा लागेल. शर्मा पुढे म्हणाले की,”ज्या कामगारांची महाराष्ट्रात बाहेर पडायची चर्चा आहे ती निर्वासीत नसून ते रेल्वेचे सामान्य प्रवासी आहेत. नाईट कर्फ्यू टाळण्यासाठी ते लवकर स्टेशनवर पोहोचतात, ज्यामुळे गर्दी दिसून येत आहे. इथल्या गाड्यांची हालचाल थांबवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कोणतीही अधिकृत विनंती मिळालेली नाही.

मुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी
कोरोनाचा व्यापक प्रसार महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दिसून येत आहे. ते पाहता आज तातडीने अंमलबजावणी करून अनेक रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबविण्यात आली आहे. ज्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री बंद करण्यात आली आहे त्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश आहे. वृत्तवाहिनी एएनआयने मध्य रेल्वेच्या सीपीआरओच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की,” मध्य रेल्वेने मुंबई सीएसएमटीसह सहा लांब पल्ल्याच्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तातडीने प्रभावाने बंद केली आहे. “मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार म्हणाले की,”मुंबई सीएसएमटी व्यतिरिक्त, एलटीटीने कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटे देणे बंद केले आहे जिथून लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment