तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!

0
124
thumbnail 1531712823674
thumbnail 1531712823674
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद | तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!कारण बालाजीचे मंदिर इतिहासात पहिल्यांदाच बंद राहणार आहे. या संबंधी मंदिर समितीने सूचना प्रसिद्ध केली आहे. महा समरेशन अधिष्ठान या महापूजे साठी मंदिर ११ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. या काळात फक्त पुजारी आत जाऊन या महापूजेचा विधी पार पडणार आहेत.
तिरुपती बालाजी हे देशातील श्रीमंत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवस्थानास भेट देण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. तिरूपती बालाजीच्याप्रति देशातील तमाम लोकांची मोठी श्रद्धा आहे. बालाजी मंदिरात रोज लाखो भाविक दर्शन घेतात. विशेषतः श्रावण महिन्यात इथे मोठी गर्दी असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here