मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने मराठा आंदोलन हिंसक झाले – शरद पवार

1
93
Thumbnail 1532757320799
Thumbnail 1532757320799
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले म्हणून आंदोलक क्रोधीत झाले आणि हिंसाचार घडला असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात धरणे आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकांची शरद पवार यांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. सरकारने आता आश्वासने देत बसण्यापेक्षा ती पूर्ण करण्याच्यासाठी कामाला लागावे असा सल्ला शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्य सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यात अपयशी झाले आहे त्यांनी आंदोलनावर सकारात्मक पावले उचलली नाहीत तर राज्याची स्थिती हाताबाहेर जाईल असे शरद पवार म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार बोलत नसल्याची नेटिझममध्ये चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी आंदोलकांना दिलेली भेट ही सूचक भेट मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here