इर्टिका गाडी पलटी होऊन एकाच गावातील 3 जण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरेगाव तालुक्यातील सुर्ली येथे काल रविवारी रात्री 10 वाजता इर्टिका गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीनजण जागीच ठार झाल्याची दुर्देंवी घटना घडली आहे. अपघातातील ठार झालेले तिघेही आर्वी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील आहेत.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताराहून कोरेगाव तालुक्यातील आर्वी या आपल्या गावी तुकाराम आबाजी माने (वय- 65 ), तानाजी आनंद माने (वय- 62), सुभाष गणपत माने (वय- 60) हे तिघेजण येत होते. चारचाकी इर्टिका गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने सुर्ली गावानजीक असलेल्या वळणावर हा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाली होते, या तिघांना वाठार किरोली येथील युवकांनी सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रस्त्यातच या तिघांचा दुर्दैवी अंत झाला.

रविवारी रात्री झालेल्या या घटनेची माहिती मिळताच आर्वी गावावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी तात्काळ सातारा येथील जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून पुढील बाजूची तोडफोडही झाली आहे.