राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी, अजितदादांना मानलंच पाहिजे- फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला. त्यावरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.अर्थसंकल्पातील सर्वाधिक पैसा हा राष्ट्रवादीला देण्यात आला आहे. त्यामुळे अजितदादांना मानलंच पाहिजे, सर्व निधी राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीलाच अशी शेलकी टीका विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

फडणवीस म्हणाले , या अर्थसंकल्पातील एकूण निधीपैकी 3 लाख 14 हजार 820 कोटी रुपये म्हणजे तब्बल 57 टक्के निधी हा राष्ट्रवादी काँग्रेस कडे असलेल्या खात्यांना मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या खात्यांना 1 लाख 14 कोटी रुपये म्हणजे 26 टक्के निधी मिळाला आहे. आणि शिवसेनेला सर्वात कमी 16 टक्के म्हणजे 90 हजार कोटी रुपये मिळाले आहेत.

आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पगार जास्त द्यावा लागतो ती खाती काँग्रेस आणि शिवसेनेकडे कडे आहेत. गेल्या वर्षीही असंच चित्र होतं. अजित दादांना मानलंच पाहिजे कारण त्यांनी डंकेच्या चोटवर काम केलंय. मागच्यावेळीही त्यांनी हेच केलं होतं असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला

Leave a Comment