अजित पवार हे पुन्हा परत येतील, त्यांना भाजपने ब्लॅकमेल केलं आहे- संजय राऊत

0
41
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी। आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेत महाराष्ट्रातील राजकारणाला चांगलाच हादरा दिला. राज्यातील या राजकीय भूकंपानंतर आता संजय राऊत यांनी आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत असा दावा केला आहे. अजित पवार यांना ब्लॅकमेल केलं गेलं आहे. याबाबत उद्या सामानात आम्ही त्याचा खुलासा करू. तसेच धनंजय मुंडे आमच्या संपर्कात असून ते सुद्धा परत येतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

रात्री केवळ काळे धंदे होतात तेच भाजपने केलं आहे. असा आरोपही राऊत यांनी केला आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांच्या राऊत यांनी शिवसेनेचे नुकसान केलं आहे या वक्तव्याचा राऊत यांनी खरपूस संचार घेतला. चंद्रकांत पाटील असं विधान करायला शिवसेना प्रमुख आहेत का? त्यांनी सांभाळून बोलावं. आपला पक्ष सांभाळा अशी तंबी राऊत यांनी पाटील यांना दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here