राज्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ कोटींची दारुविक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. तळीरामांच्या या दारूवेडामुळे दारू विक्रीच्या आकड्यांनी उचांक गाठला आहे. दिवसभरात सरासरी 17 कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

काल किरकोळ दारूची दुकानं सुरू झाली आहेत, यात काही जिल्ह्यात दुकानं बंदच आहेत, तर ज्या जिल्ह्यात सुरू आहेत तिथलीही सर्व दुकानं सुरू नाहीत. याशिवाय हॉटेलमधील विक्रीही बंद आहे. त्यामुळे काय दिवसभरात 15 ते 17 कोटी रुपयांची दारू विक्री झाली असण्याची शक्यता आहे. काही राज्यांनी दारू विक्रीवर जादा कर लावला आहे. मात्र आपल्या राज्यात दारूवर पूर्वीपासूनच जादा कर आकारला जातो. दिल्लीने 70 टक्के कर वाढवला असला तरी आपल्या राज्यातील कर सध्या त्यापेक्षाही जास्त आहे.

मात्र ही गर्दी जास्त दिवस राहणार नाही, आज किंवा उद्यापर्यंत ही गर्दी संपेल असा विश्वास राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आहे. जिथे गर्दी होईल तिथली दुकानं काही काळासाठी बंद करण्याची कारवाई स्थानिक प्रशासन करत आहे. त्यामुळे नियम पाळले नाहीत तर दारूची दुकानं बंद होतील हे लक्षात घेऊन ग्राहकांनी शिस्त पाळावी असं आवाहन उमप यांनी केलं आहे. तसंच गर्दी टाळण्यासाठी दुकानांनी टोकन द्यावे अशा सूचना देण्यात येणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

.

Leave a Comment