आनंद महिंद्रा म्हणाले-“मी पद्म पुरस्काराला पात्र नाही,” तुलसीगौडाचा फोटो शेअर करून सांगितली ‘ही’ भावनिक गोष्ट

0
57
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा हे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप ऍक्टिव्ह आहेत. लोकांशी कनेक्ट राहण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टही शेअर करतात. आपल्या मजेशीर पोस्ट्समुळे त्यांचे चांगले फॅन फॉलोइंग देखील आहेत. यावेळी आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून आपण पद्मभूषण पुरस्कारास पात्र नसल्याचे म्हटले आहे. वास्तविक, आनंद महिंद्रा यांना सोमवारी भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महिंद्रांनी राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून कर्नाटकातील पर्यावरणवादी आणि पद्मश्री विजेते तुलसी गौडा यांच्याबद्दल शेअर केलेली पोस्ट रिट्विट केली. महिंद्रांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “या सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांच्या स्वभावात दीर्घकाळ प्रलंबित, परिवर्तनात्मक बदल केले आहेत. आता प्रामुख्याने तळागाळातील समाजाच्या सुधारणेत मूलभूत योगदान देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले आहे. मला त्यांच्या श्रेणीत सामील होण्यास खरोखरच पात्र वाटले नाही.”

दुसर्‍या एका ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, “माझ्या पद्मभूषण पुरस्काराबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. एक जुनी म्हण आहे – जर तुम्हाला कुंपणावर कासव दिसले तर तुम्हाला माहिती आहे की ते स्वतःहून तेथे पोहोचणार नाही. मी सर्व महिंद्रावासीयांच्या खांद्यावर उभा आहे.”

पद्म पुरस्कार ‘हे’ केवळ सेलिब्रिटींपुरते मर्यादित नाहीत
या वर्षी पद्म पुरस्कार दिग्गजांव्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांनाही मिळाले आहेत. यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये संत्रा विक्रेते हरेकला हजबा, सायकल मेकॅनिक मोहम्मद शरीफ, अब्दुल जब्बार खान, लीला जोशो, तुलसी गौडा, राहीबाई सोमा पोपरे आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here