अनिल देशमुखांना मंत्रिमंडळातुन हाकलून द्यावे ; भाजपा आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणावर सुनावणी झाली. परमबीर सिंग यांचा आरोप गंभीर असून याबाबत सीबीआय चौकशी करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असून भाजप अजून आक्रमक झाली आहे. भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या विरोधातील याचिकेची सीबीआय चौकशी व्हावी असा आदेश दिला याच आम्ही स्वागत करतो. आणि अनिल देशमुख यांना आता तात्काळ मंत्रिमंडळातुन हाकलुन द्यावे असे भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी म्हंटल.

सीबीआय चौकशी नंतर याबाबतीतील सत्य बाहेर आल्यानंतर यातील सर्व व्यक्तींवर तातडीने कारवाई केली पाहिजे अशी मागणी अतुल भातखलकर यांनी केली.

नक्की काय म्हंटल हायकोर्ट –

याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने सीबीआय संचालकांना या प्रकरणी १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचसोबत जर यात कोणत्याही प्रकारे गुन्हा आढळत असेल तर FIR दाखल करण्यासही म्हटलं आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment