राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? फडणवीसांचा नवाब मलिकांना चिमटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात खडाजंगी रंगली आहे. समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर टिका करताना जोरदार टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. तसेच कोण कोणाचा पोपट आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. आमच्यासाठी नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. नवाब मलिक दिवसभर काही ना काही बोलत असतात. सध्या त्यांना दुसरं काहीच काम नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असं म्हणत या प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले होते-

समीर वानखेडे प्रकरणावरून नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. भाजपने माझ्या जावयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण आता मी काही बोलणार नाही. मला विषयांतर करायचे नाही. हे जे काही पोपट आहे. त्याचा पोपट केल्यानंतर बरेच्या गोष्टी बाहेर येणार आहेत. हिवाळी अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होणार आहे, त्यानंतर यांना महाराष्ट्राला तोंड दाखवता येणार नाही,असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Comment