पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त; पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेकवेळा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. आघाडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पडळकरांनी वारंवार आरोपही केले आहेत. आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महापूर, नुकसानीवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त आहे, अशी टीका पडळकरांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज टीका करीत ट्विटद्वारे ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त आहे.पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता. तातडीनं प्रत्येकी १ लाखाची मदत करा आणि व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षासाठी घरपट्टी,पाणीपट्टी,वीजबील माफ करा, अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे.

 

आमदार पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी मुसळधार पावसाने आतोनात नुकसान आहे. या जिल्ह्यातील नुकसानग्रस्थांसाठी या सरकारला आपली तिजोरी उघडता येत नाही. हे सरकार नुसत्या फसव्या घोषणा करीत आहेत. मागे जेव्हा पूर आला होता तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली होती. या सरकारला एवढीच विंनती आहे कि, नुकसानग्रस्थाना तत्काळ एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी.

Leave a Comment