कोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजपचं जबाबदार- नवाब मालिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यास भारतीय जनता पक्षच जबाबदार असेल असे नवाब मलिक यांनी म्हंटल .

नवाब मलिक म्हणाले, पंतप्रधान मोदी लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला, मास्क लावायला सांगत आहेत. पण भाजपवालेच त्यांचे ऐकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजारोंच्या संख्येने लोक जमवत आहेत. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुका असताना दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपाच्या लोकांचा हात राहील हे स्पष्ट आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान , आगामी निवडणूका रद्द करू नका असे म्हणत डोअर टू डोअर प्रचार करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे अशी पद्धत वापरून तुम्ही निवडूक घेऊ शकता असे नवाब मलिक यांनी म्हंटल. तसेच कोणत्याही राज्यात राष्ट्रपती राजवट लावून राज्याचे अधिकार हातात घेण्याचा डाव करू नका असेही मलिक यांनी म्हंटल

Leave a Comment