अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे; चंद्रकांत पाटलांनी दिला दम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. यातच मराठा आरक्षणातील चंद्रकांत पाटील यांना काय कळत असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्यतर देत अशोक चव्हाण यांची औकात काढली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, अशोक चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये. चव्हाणांनी
स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्याबद्दल त्यांचे आभार. केंद्राने दाखल केलेली ही याचिका म्हणजे हवेची गार झुळूक आहे. आता राज्य सरकारने देखील ही याचिका दाखल करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment