मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद ; मंदिर उघडण्यावर करणार का भाष्य ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दुपारी 1.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. दिवाळी, बिहार निवडणुकीचे अंदाज आणि अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी काय संवाद साधणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील कोरोना, दिवाळी, मराठा आरक्षण यांसह विविध विषयांवर मुख्यमंत्री जनतेला सूचना देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील जनतेला संबोधित केल्यानंतर उद्धव ठाकरे विविध कामांचे ऑनलाईन लोकार्पण करणार आहेत.

महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवळी राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. या माध्यमातून ते नागरिकांना सातत्याने राज्यातील कोरोनाची परिस्थिती, सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि इतर गोष्टींची माहिती देत होते. अनेक लोकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे कौतुकही करण्यात आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment