भारतात १६ मे रोजी येणार चक्रीवादळ; हवामान खात्याने दिली चेतावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटावेळी भारतासमोर आता आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी सांगितले की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे १६ मे रोजी चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागावर हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या तयार झाले आहे, असे हवामान विभाग सांगत आहे आणि यामुळे १६ मे रोजी चक्रीवादळ निर्माण होऊ शकते. आणि हे वादळ बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि पश्चिम मध्य प्रदेशाच्या दिशेने १६ मे रोजी सरकेल, या कमी दाबाच्या क्षेत्राचे नाव आहे अम्फान.

‘चक्रीवादळा’साठी केला हाय अलर्ट जारी
इतकेच नाही तर हवामानाशी संबंधित असलेले बरेच मॉडेल्सही हे सूचित करत आहेत की १५ मे नंतर २०२० मधील पहिले ‘चक्रीवादळ’ तयार होऊ शकेल. मात्र, अद्यापही त्याचा मार्ग, त्याची क्षमता आणि त्याचे लँडफॉल या संदर्भात परिस्थिती स्पष्ट झालेली नाही.

‘चक्रीवादळा’ बद्दल गोंधळ अजूनही कायम आहे
यापूर्वी स्कायमेटने असे सांगितले होते की १ मे ते ३ मे दरम्यान हे ‘चक्रीवादळ ‘ येऊ शकेल, परंतु नंतर ते मंदावले, मात्र आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात याचा प्रभाव वाढू लागलेला आहे, असे मानण्यात येते कि वर्षातून किमान दोनदा असे घडते जेव्हा ‘चक्रीवादळ’ येण्याची शक्यता असते.

पावसाळा
पहिली संधी पावसाळ्याच्या आधी आणि दुसरी पावसाळ्या नंतर येते आणि मान्सूनचा हंगाम साधारणत: जूनच्या पहिल्या महिन्यात सुरू होतो, यावेळी मात्र पावसाळा येण्याच्या आधीच हे वादळ येण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाचे म्हणजे नेमके असते काय ?
भारत आणि जगभरातील किनारपट्टीवरील भागात चक्रीवादळ नेहमीच येत असते. चक्रीवादळ वादळांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे ठेवली जातात. सायक्लोन, हरिकेन आणि टायफून हे तिन्ही चक्रीवादलाचे तीन प्रकार आहेत. उत्तर अटलांटिक महासागर आणि ‘ईशान्य प्रशांत महासागरात या चक्रीवादळांना हरिकेन असे म्हणतात. उत्तर-पश्चिम प्रशांत महासागरात या ‘चक्रीवादळाला’ टायफून म्हणतात तर हिंद महासागरातील फून आणि दक्षिणी पॅसिफिक येथे या वादळांना “सायक्लोन” असे म्हणतात, भारतातील चक्रीवादळ हे दक्षिण पॅसिफिकहून येते आणि म्हणूनच हिंदी महासागराला “सायक्लोन” म्हणतात.

‘चक्रीवादळ’ का येतात?
पृथ्वीच्या वातावरणामध्ये हवा असते, समुद्राच्या वरही पृथ्वीसारखीच हवा असते, ही हवा नेहमीच उच्च दाब ते कमी दाब असलेल्या भागातून वाहते. जेव्हा हि हवा गरम होते, ती फिकट होते आणि ती वाढण्यास सुरवात होते, जेव्हा समुद्राचे पाणी गरम होते तेव्हा तिथली हवा देखील गरम होते आणि वाढू लागते. त्यामुळे या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास सुरवात होते, त्यासभोवती थंड हवा भरण्यासाठी हे कमी दाब असलेल्या क्षेत्राच्या दिशेने जाऊ लागते. परंतु पृथ्वी आपल्या अक्षावर एका टट्टूप्रमाणे फिरत राहते, ज्यामुळे ही हवा सरळ दिशेने फिरण्यास सुरवात होते आणि फिरत फिरत पुढे सरकू लागते, ज्याला ‘चक्रीवादळ’ असे म्हणतात.

 

वादळांची नावे अशी ठेवली जातात
वास्तविक १९४५ च्या पूर्वी कोणत्याही चक्रीवादळाचे नाव नव्हते, त्यामुळे हवामानशास्त्रज्ञांना खूप त्रास झाला. जेव्हा ते आपल्या अभ्यासामध्ये चक्रीवादळाचा तपशील देत असत किंवा त्यावर चर्चा करत असत, तेव्हा त्याचे वर्ष लिहायचे होते आणि वर्षात जर थोडीशी घसरण झाली असेल तर सर्व गणितच बदलले असायचे. या समस्येवर उपाय म्हणून जागतिक हवामान संघटनेने १९४५ पासून या चक्रीवादळांची नावे ठरविण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आलेल्या सर्व चक्रीवादळांना वेगवेगळी नावे दिली गेली.

अगदी मोजलेल्या वर्षात वादळांची नावे
पूर्वी असे सांगितले जात असत की या वादळांची नावे नाविक त्यांच्या प्रेमिकांच्या नावावर ठेवायचे, आणि म्हणूनच सुरुवातीला या वादळांचे औपचारिकरित्या ठेवलेली नावे ही स्त्रियांची असत, ही परंपरा ७० च्या दशकापासून बदलली आणि वादळाला स्त्रि आणि पुरुष या दोघांचेही नाव देण्यात आले. चक्रीवादळ स्त्रियांची नावे ही समान वर्षांमध्ये तर पुरुषांची नावे ही विषम वर्षांमध्ये आढळतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment