परिस्थितीचा अंदाज घेऊन शहरातील शाळांबाबत निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मुंबईत दररोज 8 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने तेथील मनपा प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात मंगळवारी 87 कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आम्ही परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोत. लवकरच यासंदर्भात निर्णय घेऊ अशी माहिती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आधी ग्रामीण भागातील शाळा उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात औरंगाबाद शहरातील ही शाळा उघडण्याची परवानगी देण्यात आली. शाळा सुरू होऊन महिना ही झालेला नसताना पुन्हा कोरोना चा उद्रेक सुरू झाला आहे.

चार दिवसांपासून शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पालक चिंताग्रस्त आहेत. मंगळवारी रुग्ण वाढीचा अचानक उद्रेक झाला. त्यासंदर्भात प्रशासक पांडेय यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले.

Leave a Comment