26/11 हल्ला हा फक्त मुंबईवर झाला नसून तो….; फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण होत आहेत. दहशतवादी हल्ल्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. दरम्यान भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोशल मिडियावर शहिदांना आदरांजली वाहणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 26/ 11 हल्ला हा फक्त मुंबईवर झाला नसून संपूर्ण संपूर्ण मानवतेवर झाला आहे असे फडणवीसांनी म्हंटल.

26/ 11 हा केवळ मुंबईवर नाही, भारतावर नाही, तर संपूर्ण मानवतेवर झालेला हल्ला..26-11…आजच्या दिवशी भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. जो सार्वभौमत्वावर हल्ला होता. या हल्ल्यादरम्यान मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणी टार्गेट करण्यात आले होते. ज्याच्या आधारे केवळ मुंबईलाच नाही तर संपूर्ण आंतराष्ट्रीय समाजाला पराजित करण्याचं लक्ष्य होतं. ज्या प्रकारे हा हल्ला झाला होता. तो कोणालाच विसरता येण्यासारखा नाही असे फडणवीस यांनी म्हंटल.

२६-११ हल्ला जेव्हा झाला. तेव्हा नागरिकांनी संपूर्ण भारतावरील हल्ला मानला होता. यानंतर आंतराष्ट्रीय समाज देखील हेच मानतो, की हा हल्ला केवळ भारतातच नाही, तर परराष्ट्रात देखील अशाप्रकारे हल्ले होत आहेत. हा हल्ला मानवतेवर तसेच संपूर्ण आंतराष्ट्रीय समुदायावर होत आहे. आपल्या सर्वांना मिळून या विरोधात लढावं लागेल. आणि माझा विश्वास आहे, की यामुळे मानवता जिंकेल, आणि आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाही. याप्रसंगी या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस अधिकारी आणि जनतेला नमन करतो असे म्हणत फडणवीसांनी आदरांजली वाहिली.

Leave a Comment