मोदी सरकारमुळे देशातील लोकशाही बिकट अवस्थेत ; ‘या’ भाजप खासदाराचाच घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मोदी सरकारमुळे देशातील लोकशाही बिकट अवस्थेत ; ‘या’ भाजप खासदाराचाच घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोदी सरकारमुळे देशातील लोकशाही बिकट अवस्थेत बनली आहे. तसेच मोदी सरकारने देशातील लोकशाही, अर्थव्यवस्था आणि सीमेबाबत गंभीर तडजोडी केल्या आहेत, असा ठपका ठेवत भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला घरचा आहेर दिला.सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, वृत्तसंस्था, न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय व्यवस्था हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये याबाबत अनेक तडजोडी झाल्या आहेत. सध्याच्या घडीला प्रसारमाध्यमं आणि न्यायव्यवस्थेच्या बाबतीत जगात भारताचा बराच खालचा क्रमांक लागतो. देशातील आर्थिक विषमता आणि बेरोजगारीनेही उच्चांक गाठल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. तसेच पैशाचे मूल्य सातत्याने घसरत आहे. पेट्रोल-डिझेलवरील कर वाढत आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर भारत दुबळा पडत आहे. मोदी सरकारने या सगळ्याबाबत तडजोड केली आहे. यापैकी अनेक गोष्टी काँग्रेसच्या राजवटीचा परिपाक असला तरी ही परिस्थिती बदलण्यासाठी फार कमी प्रयत्न झाला आहे.

सुब्रमण्यम स्वामींच्या या ट्विटवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हाला इतका त्रास होतो किंवा सरकार नीट काम करत नाही, असे वाटते तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा का देत नाही, असा सवाल एका युजरने विचारला. तर आणखी एका युजरने सुब्रमण्यम स्वामी यांची फिरकी घेताना त्यांच्याकडे अर्थखाते द्या, अशी मिश्किल टिप्पणी केली. तर एकाने स्वामीजी तुमची मार्गदर्शक मंडळात जाण्याची वेळ जवळ आली आहे, असे म्हटले.

Leave a Comment