बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात मोदींना कोणत्या जेलमध्ये ठेवले याची माहिती त्यांनी दिली तर…; जयंत पाटलांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यावर असताना विधान केलं होतं की ते बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले होतो. तसेच माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं तसेच यासाठी मी तुरुंगात देखील गेलो होतो असे मोदी यांनी म्हंटल होत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा ! मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल.असे जयंत पाटील यांनी म्हंटल.

यापूर्वी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी देखील मोदींच्या या विधानावर टीका केली होती. अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी”.असे म्हणत नाना पटोले यांनी मोदींवर हल्लाबोल केला होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment