सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी फडणवीसांनी आखला हा मास्टर प्लॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या तोफा थंडावताच विधानसभा निवडणुकीच्या तोफा देखील कडाडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीला विषय वेगळे असतात तर विधानसभा निवडणुकीला वेगळ्या मुद्द्यावर मतदान केले जाते. त्यामुळे राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मोठी कोशिश करावी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी चांगलाच मास्टर प्लॅन बनवला आहे.

देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत विकास यात्रा काढून राज्यातील मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. येत्या १ ऑगस्ट पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवशाही विकास यात्रा काढणार आहेत. त्यांच्यासोबत या विकास यात्रेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे भाजपचा विकासाचा मुद्दा विरोधकांवर भारी पडणार का हे येत्या काळात समजून येणार आहे.

शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे एक पाऊल टाकले असून त्यांनी देखील जनाशीर्वाद यात्रा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात काढली आहे. शिवसेनेच्या या यात्रेला देखील चांगलाच प्रतिसाद मिळत असून राज्याचे वातावरण सेना भाजपमय होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गांगारून गेलेल्या विरोधकांना रणनीती आखण्यास देखील दहा वेळा विचारविमर्श करावा लागत आहे.

Leave a Comment