मत मिळत नाहीत म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अश्रू अनावर

जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांना अकोला निकळक गावातील भर सभेत अश्रू अनावर झालेत. ‘गेली १५ वर्ष बदनापूर मतदार संघात लोकांची सर्व कामे केली. मतदार संघातील जनतेच्या सोडवता आल्या तेवढ्या समस्या सोडवल्या. लोकांच्या सुख आणि दुःखात सहभागी होऊनही या मतदार संघातून कमी मतदान पडतं’ असं सांगत चौधरी यांनी यावेळी मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन उपस्थित गावकऱ्यांना केलं.

शरद म्हणतात,’अभी तो मैं जवान हूँ ‘

कोल्हापूर प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाची शैली सर्वश्रुत आहे. याचीच प्रचिती काल आली ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या त्यांच्या सभेमध्ये. काही दिवसांपूर्वी एका पत्रकारावर रागावलेले पवार संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने पाहिले. पण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये पवारांनी अशी दोन वक्तव्य केली की … Read more

परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महायुतीच्या मित्रपक्षांनी केली घुसखोरी

परभणी प्रतिनिधी| गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपामध्ये अनपेक्षित उलटापालट झाली असून जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय बंडखोरांच्या ‘इंट्री’मुळे बहुरंगी निवडणूक लढती होणार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यावेळी महायुतीच्या मित्रपक्षांनी घुसखोरी केल्याने सेनेचे पाथरी आणि जिंतूर बालेकिल्ले मात्र लढती पूर्वीच ढासळले आहेत. महायुतीच्या जागा वाटपामुळे शिवसेनेची स्वतःच्या घरात चांगलीच गोची झाली आहे. … Read more

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑलआऊट’

सांगली प्रतिनिधी। राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे निवडणूक काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगली जिल्हा पोलिसांकडून ‘ऑपरेशन ऑलआऊट’ नावाने अभियान राबविण्यात आले आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये ६८ अधिकारी, ५३३ पोलीस कर्मचारी आणि १६२ होमगार्ड सहभागी झाले होते. यामध्ये ३० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. न्यायालयातून वॉरण्ट … Read more

‘रोड नाही, तर वोट नाही’; पिंपळगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

यवतमाळ प्रतिनिधी। निवडणूका जवळ आल्या की, राजकीय नेते मतांसाठी अनेक आश्वासने देतात. निवडणूका संपल्या की, दिलेल्या आश्वासनांचा विसर पडणे हा काही नेत्यांचा आणि प्रशासनाचा स्वाभाविक गुण असतो. याच गुणांचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यातील पिंपळगावच्या ग्रामस्थांना आला आहे. गेल्या काही वर्षांपासून पिंपळगाव ते सराई हा रास्ता खड्ड्यात शोधायची वेळ आली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थामध्ये तीव्र … Read more

गंगाखेड येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे ‘आत्मक्लेश आंदोलन’

परभणी प्रतिनिधी । भाजपा च्या कोट्यातील जागा ‘शिवसेने’ला सोडल्याने गंगाखेड विधानसभेतील इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.  या नाराजीतून आज गंगाखेड येथे इच्छुक उमेदवार ,कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘आत्मक्‍लेश आंदोलन’ केले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागा कोणता पक्ष , कोणत्या उमेदवाराला देणार याविषयी प्रत्येक पक्षाकडून कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली होती. … Read more

भाजपच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील ‘या’ ३ नावांचा समावेश

अमरावती प्रतिनिधी। भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली. सोबतच बहुप्रतिक्षीत असलेल्या यादीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघाच्या उमेदवारांची देखील नावे जाहीर झाली आहेत. या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातील ३ नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे … Read more

चांद्रयान २ तांत्रिक अडचणींमुळं अडलं, आदित्य ठाकरे मात्र मुख्यमंत्रीपदावर पोहचतीलच – संजय राऊत

काही तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-२ चंद्रावर पोहचू शकले नाही, मात्र आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, येणाऱ्या २१ ऑक्टोबरला आदित्य ठाकरे मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर जरूर पोहचतील – संजय राऊत

पाथरी विधानसभा मतदार संघाचा इतिहास काय सांगतो..

परभणी प्रतिनिधी। ऑक्टोबर मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन वेळा सुरुंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक वेळ अपक्ष यशस्वी झालेले आहेत. १९९० पासून मतदारसंघात सलग ३ वेळा शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. २००४ मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार … Read more

संग्राम भाव-बहिणीचा, परळी विधानसभा मतदार संघाचा !!

प्रतिनिधी उस्मानाबाद। परळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील संग्रामाचे मैदान. मतदारसंघांत गेल्या ८ निवडणुकांमध्ये सात वेळा भाजपाने विजय मिळवला आहे. म्हणून या मतदारसंघाला भाजपाचा गड असे म्हंटले जाते. हा मतदार संघ पूर्वी रेणापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. या विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे ५ वेळा … Read more